सावंतवाडी दि.२८: ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या मोती तलावाचा दगडी काठ आता शेवटच्या घटका मोजत आहे. दीडशे वर्षांपूर्वीचे हे ऐतिहासिक बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत असून, याला कारणीभूत ठरत आहेत तलावाच्या काठावरील खोलवर गेलेली अशोक वृक्षांची झाडे!
🧐
काठ खचला: राजवाडा ते उपजिल्हा रुग्णालय परिसरातील दगडी भाग आधीच कोसळला आहे. आता कोर्ट परिसर आणि नगरपालिकेसमोरील दगडी बांधकामालाही मोठे तडे गेले आहेत.
झाडांची मुळे: अनेक वर्षांपासून असलेल्या अशोक वृक्षांची मुळे तलावाच्या पायापर्यंत पोचल्याने दगडी चिरे निखळू लागले आहेत.
पाणी ओसरल्याने वास्तव समोर: मार्च महिन्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे खचलेला पाया प्रकर्षाने दिसून येत आहे.
प्रभारी नगराध्यक्षांची भूमिका: 🗣️
प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. “धोकादायक झाडे काढून त्याजागी पर्यावरणाला पूरक आणि गार सावली देणारी नवीन झाडे लावल्यास काठ वाचवता येईल,” असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचा निर्णय आता वृक्ष प्राधिकरण कमिटीच्या अभ्यासानंतर घेतला जाईल.
सावंतवाडीकरांची मागणी: 🏛️
“नुसत्या सिमेंटच्या भिंती नकोत, तर तलावाला त्याचा ‘दगडी लूक’ (Stone Look) परत मिळावा!” ऐतिहासिक वारसा जपताना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


