🛑 जीवघेणा प्रवास! सावंतवाडीच्या कोलगाव कुंभारवाडीत ग्रामस्थांची ‘तारेवरची कसरत’! 🛑

सावंतवाडी दि.१३: कित्येक वर्षे उलटली, पण इथला प्रश्न सुटलेला नाही! कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थ आणि ‘झिरंग ७ नंबर’ शाळेचे विद्यार्थी आजही एका मोडकळीस आलेल्या सिमेंटच्या खांबांच्या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.📍 भयावह वास्तव: नाल्यावर केवळ ३ सिमेंटचे पोल टाकून बनवलेल्या पुलावरून वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जावे लागते.
📍 धोका वाढला: सध्या यातील एक पोल पूर्णपणे मोडला असून, आधारासाठी कोणतेही रेलिंग (कठडा) उपलब्ध नाही.📍 पावसाळी संकट: पाऊस सुरू झाल्यावर हे पोल निसरडे होतात, ज्यामुळे नाल्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
📍 नेत्यांकडे दुर्लक्ष: सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना या समस्येची माहिती असूनही वर्षानुवर्षे फक्त ‘कानाडोळा’ केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.लोकप्रतिनिधींना आवाहन! 📢
पालकमंत्री नितेश राणे,
माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक भाई केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते महेश सारंग, विशाल परब, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) नेत्या अर्चना घारे-परब, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन या पुलाची डागडुजी व कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.”एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?” – असा संतप्त सवाल कोलगाव कुंभारवाडीतील जनता विचारत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here