लग्नाला नकार दिल्याने महिलेची निर्घृण हत्या; सावंतवाडीचा संशयित मुंबईतून जेरबंद, डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

डिचोली दि.२२: तालुक्यातील चिकणे-कुडणे परिसरात घडलेल्या शैला संजय घाडी (वय ५८) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील फरार संशयिताला अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मृत महिलेच्या धाकट्या मुलीशी विवाह करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून संशयिताने हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे शांत समजल्या जाणाऱ्या चिकणे-कुडणे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डिचोली पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली होती. संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सावंतवाडी, कोल्हापूर आणि मुंबईपर्यंत जाळे विणले होते.

अखेर आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेत, मुंबई पोलिसांच्या सहकार्याने पोलिसांनी सागर राऊळ याला मीरा भाईंदर-ठाणे परिसरातून ताब्यात घेतले. त्याला तेथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला गोव्यात आणले जाईल. या हत्येमागे आणखी काही पूर्वनियोजन होते का, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here