चिपळूण दि.०८: सुट्ट्या संपवून मुंबईकडे परतणाऱ्या कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासाला मोठा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-माणगाव भागातील वाहतूककोंडी सहन केल्यानंतर, आता कोकण रेल्वेच्या रखडपट्टीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
📌 गाड्यांना प्रचंड उशीर:
एलटीटी-मडगाव, तेजस एक्सप्रेस, कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या तब्बल ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. गाड्या उशिरा धावण्याची कोणतीही ठोस माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
📌 वेग मंदावण्यामागचं कारण काय?
कोकण रेल्वे मार्ग डोंगराळ भागातून जातो आणि येथे मुसळधार पाऊस होतो. त्यामुळे पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी सध्या रुळांचे नूतनीकरण, ट्रॅक लिफ्टिंग आणि कटिंग-लोअरिंगसारखी मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे गाड्यांचा वेग तात्पुरता कमी करण्यात आला आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


