🚢 मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी: ‘चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला!’ 🐔💸

🚢 🐔💸 कोकणवासीयांच्या खिशाला मोठी कात्री; रो-रो फेरीचे भाडे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई दि.०३: नुकतीच सुरू झालेली मुंबई ते विजयदुर्ग M2M रो-रो सेवा म्हणजे कोकणी माणसाची सोय की आर्थिक लूट? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या फेरीच्या भाड्याचे वाभाडे काढणारे एक ‘डोळे उघडणारे’ गणित मांडले आहे.

📊 प्रवासाचे गणित: कारने प्रवास Vs रो-रो फेरी
जर ४ जण स्वतःच्या कारने मुंबई ते विजयदुर्ग रस्ते मार्गे गेले, तर: इंधन (Fuel): ४,५००/- ₹ टोल (Toll): १,०००/- ₹ एकूण खर्च: ५,५००/- ₹ (४ लोक + कार)पण जर हीच कार रो-रो फेरीने नेली तर कारचे भाडे: ६,०००/- ₹ ४ जणांचे तिकीट (Economic): १०,०००/- ₹ (२,५०० प्रत्येकी) एकूण खर्च: १६,०००/- ₹ 😱

“रस्ते मार्गे ५,५०० मध्ये होणारा प्रवास फेरीने १६,००० रुपयांत पडतोय. मग कोकणातील सामान्य माणसाला ही सेवा परवडणार कशी? ही तर सरळ सरळ लूट आहे!” सुरेंद्र नेमळेकर

💡 रेल्वेचा स्वस्त आणि मस्त पर्याय! 🚂
रो-रो फेरीच्या अवाढव्य भाड्याला फाटा देऊन सरकारने खालील पर्याय अंमलात आणल्यास कोकणी जनतेचा फायदा होईल:
✅ वसई ते सावंतवाडी पॅसेंजर: रात्री १० वाजता वसईवरून सुटून सकाळी सावंतवाडीत पोहोचणारी गाडी सुरू करावी.
✅ भाडे फक्त २२५/- ₹: यामुळे सर्वसामान्य माणूस खिशाला परवडणाऱ्या दरात गावाला पोहोचू शकेल.
✅ थांबे: भिवंडी, कोपर रोड आणि कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा दिल्यास मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांची सोय होईल.

📢 कोकणवासीयांना आवाहन!

कोकणातील मंत्र्यांनी आणि प्रशासनाने हा ‘व्यापारी’ दृष्टिकोन सोडून सर्वसामान्यांचा विचार करावा. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचेल! ✊🚩- सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर (संस्थापक सदस्य कोकण रेल्वे, सल्लागार: महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here