सिंधुदुर्गनगरी,दि.१५: जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई येथील मंत्रालयाकडून तातडीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. विशेषतः सायंकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सतर्क राहावे आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय सूचनांचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


