सावंतवाडी दि.०२: राज्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास सावंतवाडी शहरासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात अचानक आलेल्या या पावसामुळे शहरात नागरिकांची मोठी धावपळ उडाली, तर दुसरीकडे या पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बाजारपेठेत उडाली तारांबळ
दिवसभर कडक ऊन आणि उकाडा जाणवत असतानाच, सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि रत्यावरील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. पावसामुळे व्यापाऱ्यांनाही आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ करावी लागली.
बळीराजा संकटात
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. सध्या कोकणात आंबा आणि काजूचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावल्याने बागायतदार धास्तावले आहेत. पावसामुळे आंबा आणि काजूच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची आणि तयार फळांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे अधिकच चिंतेत पडला आहे.
वातावरणात गारवा
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज झालेल्या या पावसामुळे वातावरणात लक्षणीय बदल झाला असून परिसरात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तास सतर्कतेचा इशारा दिला आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


