
सावंतवाडी दि.१५: नागपूर ते गोवा या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या सध्याच्या आराखड्यावरून कोकणात राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. “सध्याचा आराखडा हा कोकणावर, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, यामध्ये तातडीने सुधारणा करावी,” अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करून पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मांडला आहे.
‘कोकणचा विकास की केवळ गोव्याचा मार्ग?’
आमदार केसरकर यांनी विद्यमान आराखड्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या मते, जर नागपूरहून येणारा पर्यटक या महामार्गावरून थेट गोव्याला निघून जाणार असेल, तर कोकणातील पर्यटन व्यवसायाला त्याचा शून्य फायदा होईल.
“कोकणात जागतिक दर्जाचे समुद्रकिनारे आणि बंदरे असताना महाराष्ट्रातील माल निर्यातीसाठी गोव्याच्या बंदराचा वापर का व्हावा? हा महामार्ग केवळ गोव्याला जोडण्यासाठी नसावा तर तो कोकणच्या अर्थव्यवस्थेला बळ देणारा असावा,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
केसरकरांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आणि सुधारणा:
रेडी बंदराचा विकास: महामार्गाचा एक फाटा थेट सिंधुदुर्गातील रेडी बंदराला जोडला जावा. यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळेल.
पर्यायी मार्ग (आजरा-रेडी): हा मार्ग आजऱ्यावरून रेडी बंदराकडे वळवल्यास तो कोस्टल रोडला (विरार ते सिंधुदुर्ग) क्रॉस करेल, ज्यामुळे पर्यटकांना पत्रादेवी किंवा कोकणच्या किनारपट्टीवर येणे सोपे होईल.
इको-सेन्सिटिव्ह झोनचे रक्षण: चंदगड ते दोडामार्ग असा ‘फोरलेन’ हायवे केल्यास पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल. तसेच आंबोली, फणसवडे आणि केसरी भागातून बोगदा (Tunnel) काढल्यास संवेदनशील वनक्षेत्राला धक्का न लावता मार्ग काढणे शक्य आहे.
पर्यटनाचे विकेंद्रीकरण: एक फाटा तिलारीमार्गे उत्तर गोव्याला आणि दुसरा दक्षिण गोव्याला जोडल्यास चंदगड व दोडामार्ग तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल.
लोकप्रतिनिधींशी चर्चा
या विषयाचे गांभीर्य ओळखून केसरकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि चंदगडच्या आमदारांशी सविस्तर चर्चा केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधला जाणारा हा महामार्ग भविष्यात कोकणच्या मुळावर न येता प्रगतीचा मार्ग ठरावा, यासाठी राज्य सरकारने आराखड्यात बदल करावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
सावंतवाडी बस स्थानक राज्यातील एक उत्कृष्ट मॉडेल ठरेल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि मोक्याच्या ठिकाणी असलेले सावंतवाडी एसटी बसस्थानकाचा आता चेहरामोहरा बदलणार असून या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर सर्व सोयीसुविधांनी युक्त असे भव्य बस स्थानक उभारले जाणार आहे. कोरोना संकटामुळे गेल्या काही काळापासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला असून, येत्या दोन महिन्यांत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सावंतवाडीचे हे बस स्थानक राज्यातील एक उत्कृष्ट मॉडेल ठरेल, अशा पद्धतीने त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सुमारे ४ एकर विस्तीर्ण जागेत होणारा हा प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर राबवण्यात येणार असून, यामध्ये प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी आधुनिक पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रस्ते आणि गाड्यांच्या सुलभ वळणासाठी आवश्यक ते रुंदीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी केवळ बस स्थानकच नव्हे, तर व्यावसायिक दृष्टीकोनातूनही विविध सोयी उपलब्ध करून देऊन महसूल वाढीवर भर दिला जाईल. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सावंतवाडी आणि वेंगुर्ला बस स्थानक परिसरात इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशनची ही सोय केली जाणार आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


