सावंतवाडी दि.२३ : शहरात सध्या गॅस आणि पाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, या कामांमुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या दहा दिवसांपासून विविध ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. खोदकामादरम्यान पाण्याच्या मुख्य लाईनना धक्का बसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.याबद्दल शिवसेना माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
रस्त्यांवर सर्वत्र खड्डे असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. दिवसभर वाहतूक कोंडी होत असून, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत यंत्रांच्या आवाजामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. ध्वनी व वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन किंवा नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गॅस कंपनीला परवानगी देताना अटी व शर्तींचे पालन करून कामाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे.
खोदकामानंतर रस्ते पूर्ववत करणे, पाण्याच्या गळतीची तात्काळ दुरुस्ती करणे आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवणे ही जबाबदारी ठेकेदाराची असताना याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे “याला जबाबदार कोण?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
पावसाळा तोंडावर असताना शहरातील नालेसफाई, गटार साफसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती यांसारखी कामे अद्याप सुरू नसल्याने आगामी काळात नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
एकूणच नगरपरिषदेचा कारभार गोंधळलेल्या अवस्थेत सुरू असून, नागरिकांना अपेक्षित नागरी सेवा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांनी केली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


