सावंतवाडीत वादळी वाऱ्याचे थैमान; अनेक ठिकाणी पडझड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सावंतवाडीत वादळी वाऱ्याचे थैमान; अनेक ठिकाणी पडझड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला; शहरात तब्बल २५ लाखांचे नुकसान

सावंतवाडी दि.२४: शहरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यांच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली असून मोठा अनर्थ टळला आहे.

वादळाचा तडाखा आणि नुकसान:
गुरुवारी सायंकाळपासूनच तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वातावरण तयार झाले होते. रात्री १२ च्या सुमारास वादळी वाऱ्याने शहरात रौद्र रूप धारण केले. याचा सर्वाधिक फटका ‘रामेश्वर प्लाझा’ला बसला, जिथले पत्र्याचे छत उडून थेट शेजारील श्री पंचम खेमराज (SPK) महाविद्यालय परिसरात जाऊन पडले.

या वादळात झालेली प्रमुख नुकसानी:
SPK महाविद्यालय: जुन्या इमारतीचे कौलारू छत उडाले असून नवीन इमारतीचे पत्रे उडून कॉलेजच्या मागील बाजूस पडले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पत्रे तीन मजली इमारत ओलांडून लांबवर फेकले गेले.

शहरातील इतर ठिकाणे: रामेश्वर प्लाझाच्या काचेच्या खिडक्या फुटल्या, राजवाडा परिसरात नारळाचे झाड पडून संरक्षक कठड्याचे नुकसान झाले, शिव उद्यान आणि उभाबाजार परिसरातही झाडे व पत्रे पडल्याच्या घटना घडल्या.

विद्युत पुरवठा: वादळामुळे शहरात सुमारे २ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षांनी केली पाहणी
वादळाची माहिती मिळताच आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली. शहरासह परिसरात एकूण २१ ठिकाणी वादळाचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देतानाच, “नागरिकांनी धीर सोडू नये, शासन पाठीशी आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून मदत प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नगर परिषदेने नुकतीच पत्र्याच्या शेडबाबत ऑडिटची सूचना दिली असतानाच ही घटना घडल्याने या विषयावर आता अधिक गंभीर चर्चा सुरू झाली आहे. सुदैवाने, हे छत मोती तलावा समोरील भागात न कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

सावंतवाडी शहरात तब्बल २५ लाखांचे नुकसान

सावंतवाडी शहरात काल झालेल्या वादळाच्या तडाख्यात अंदाजे तब्बल २५ लाख ९० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. रात्री झालेल्या वादळी वारा व पावसाने मोठी हानी झाली. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. शहरात जवळपास २५ ठिकाणी झाडे पडणे, महावितरण पोल वाकण्यासह ४ घरांवर झाड पडून नुकसान झाले. तसेच पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठी हानी झाली. यात शहरातील ज्योती मुद्राळे यांचे अंदाजे १८ हजार, दीपक गावडे २२ हजार, प्रशांत गोसावी १९ हजार, चेतन गुप्ता २० हजार, स्नेहा सबनीस ५० हजार, वैभव सावंत यांची पत्र्याची शेड उडून गेल्याने ११ ला ७५ हाजर तर शेजारील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे १२ लाख ६६ हजार तर गौरी परब यांचे २० हजार रूपयांचे मिळून अंदाजे २५ लाख ९० हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदारांनी दिली आहे. त्यामुळे या वादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतीच्या अपेक्षेत नागरिक आहेत

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here