सावंतवाडी दि.१३: सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत अपघातांची मालिका सुरूच असून, आज सकाळी एका इको कारचा भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महिनाभरात त्याच ठिकाणी दुसरा अपघात घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०७ क्यू ७९०४ क्रमांकाची इको कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव घाटातील एका तीव्र वळणावर हा अपघात घडला. कार कडेला घसरत जाऊन दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे एक इको कार दरीत कोसळली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील तीव्र वळणे, तुटलेले संरक्षक कठडे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची नाराजी अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारावर ताशेरे ओढले. “या ठिकाणी असलेले तुटलेले रेलिंग आणि कठडे तातडीने दुरुस्त करून ते मजबूत करावेत, तसेच पावसाळ्यात निसरड्या होणाऱ्या रस्त्यावर उपाययोजना करावी,” अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने येथे तात्काळ संरक्षक गार्डरेल, वेगमर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी मागणी मळगाववासीयांकडून केली जात आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


