📍 सावंतवाडी (प्रभाग ६) दि.०८:
शहरात विठ्ठल मंदिर ते मच्छी मार्केट दरम्यान ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या गटाराच्या कामावरून मोठा वाद पेटला आहे. पावसाळ्यापूर्वीच भूमिपूजन होऊनही प्रशासनाने कामाला नाहक उशीर लावल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सौ. शर्वरी धारगळकर यांनी केला आहे.
⚠️ अपघात झाल्यास ‘ते’ जबाबदार!
भर पावसात सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात चिखल आणि पाण्याचे साम्राज्य पसरले असून नागरिक घसरून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. “येथे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर आणि नगराध्यक्षा सौ श्रद्धाराजे सावंत-भोसले पूर्णपणे जबाबदार असतील,” असा थेट इशारा धारगळकर यांनी दिला आहे.
🛑 मुख्य मुद्दे:
भूमिपूजन होऊनही नगरपरिषदेची कामात मोठी दिरंगाई.
चिखलामुळे पादचारी आणि वाहनचालकांची प्रचंड गैरसोय.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


