
सावंतवाडी दि.१७: तालुक्यातील आजगाव आणि आसपासच्या निसर्गसमृद्ध परिसरात जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या वतीने सुरू होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या मायनिंग विरोधी आंदोलनाला कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी आपला पूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर केला असून, कॉग्रेस वरिष्ठ नेते लवकरच आंदोलक ग्रामस्थांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी दिली आहे. दरम्यान, हे आंदोलन केवळ आणि केवळ स्थानिक ग्रामस्थांच्याच नेतृत्वाखाली लढले जावे आणि ते जनतेच्या हातात राहील याची चोख दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मायनिंग सुरू करण्याच्या हालचालींचा प्राथमिक भाग म्हणून, नेमका भूभाग अधोरेखित करण्यासाठी आणि मायनिंगची खोली मोजण्यासाठी कंपनीने या भागात ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आजगाव व आसपासच्या परिसरात ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला आहे. सध्या जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात आहे. “ज्यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला, तेव्हा या दोन्ही सत्ताधारी पक्षांचे सदस्य तोंड बंद करून का बसले होते? याचे उत्तर त्यांनी आधी जनतेला दिले पाहिजे,” असा संतप्त सवाल साक्षी वंजारी यांनी उपस्थित केला.याला स्थानिक आमदार दीपक केसरकर हे मूग गिळून गप्प का आहेत?
पुढे बोलताना वंजारी म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही, आजगाव, धाकोरे, मातोंड यांसारख्या निसर्गसंपन्न गावांमध्ये एखादा प्रदुषणकारी प्रकल्प येत असल्याची साधी माहिती सत्ताधाऱ्यांना नसणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. कोणता प्रकल्प कुठे येणार याची पूर्ण कल्पना आधीच असल्याने, ही सत्ताधारी मंडळी आपल्या बगलबच्यांमार्फत प्रकल्पाच्या आसपासच्या जमिनी आधीच खरेदी करायला सुरुवात करतात आणि आजगावच्या बाबतीतही नेमके हेच घडले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी गावात जाऊन नौटंकी करण्यापेक्षा आपल्या सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प तातडीने रद्द करून दाखवावा, यात स्थानिक आमदार केसरकर यांनी पुढाकार घ्यावा असे थेट आव्हान कॉग्रेसने दिले आहे.
‘कळणे’च्या अनुभवातून शहाणे व्हा; दलालांपासून सावधान! “पूर्वी कळणे मायनिंग सुरू करताना जी रणनीती वापरली गेली, तीच रणनीती आजगावमध्येही वापरली जाण्याची दाट शक्यता आहे. कळणे आंदोलनाचे नेतृत्व काही ठराविक मंडळी करत होती आणि हे आंदोलन स्थानिक ग्रामस्थांच्या हातातून कधी निसटले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. त्या आंदोलनात मायनिंग कंपनीसाठी दलाली करणारेच पुढे सहभागी झाले होते. या अनुभवातून शहाणे होऊन आजगावच्या ग्रामस्थांनी पुन्हा तीच चूक होऊ देऊ नये. हे आंदोलन शेवटपर्यंत स्थानिक जनतेच्याच हातात राहील याची काळजी घ्यावी आणि सावध राहावे,” असे आवाहन साक्षी वंजारी यांनी केले आहे.या संपूर्ण लढ्यात कॉग्रेस ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :


