काजू बागेला लागलेली आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना ग्रामस्थ.
दोडामार्ग न.पं.चा अग्निशमन बंब तातडीने पोहोचला ; पुढील अनर्थ टळला
दोडामार्ग दि.१३: झरेबांबर काजुळवाडी येथे शुक्रवारी दुपारी काजू बागायतीला आग लागून २०० हुन अधिक काजू कलमे जळून खाक झाली. पिकुळे शेळपीवाडी येथील प्रदीप नाईक असं त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना कसई दोडामार्ग नगरपंचायतला समजताच अग्निशमन बंमने सदरील आग आटोक्यात आणली.
याबाबत घटना अशी की, शुक्रवारी दुपारी झरेबांबर काजूळवाडी येथे एका काजूच्या बागेतून आगीचे धूर येत असल्याचे काही लगतच्या ग्रामस्थांना निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अन्य सहकाऱ्यांना या आगीची कल्पना दिली. लागलीच कसई दोडामार्ग नगरपंचायतीचा अग्निशमन बंब पाचारण करून येथील आग आटोक्यात आणली. यावेळीच ही आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी विद्यमान जि प सदस्य दीपक गवस, आनंद तळणकर, पिकी कवठणकर, नयन भणगे, पेडणेकर, तसेच नगरपंचायतचे कर्मचारी सावंत, ताटे, पप्पू, सचिन, यांनी मदत कार्य केले.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563