सावंतवाडी नगरपरिषदेत ‘गाळे’ घोटाळा? मुंज बंधूंवर गंभीर आरोप

श्रेयस साईनाथ मुंज

३ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा

सावंतवाडी दि.१३: सावंतवाडी नगरपरिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे वाटपात मोठा गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. नियमबाह्य गाळे वाटप आणि इमारतीमधील अनधिकृत तोडफोडीविरोधात प्रशासनाने १५ दिवसांत कारवाई न केल्यास, येत्या ३ मार्च २०२६ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा स्थानिक रहिवासी श्री. श्रेयस साईनाथ मुंज यांनी दिला आहे.

श्रेयस मुंज यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनानुसार, इंदिरा गांधी व्यापारी संकुलात प्रसाद रमाकांत मुंज, विनोद मुंज आणि प्रमोद मुंज या एकाच कुटुंबातील व्यक्तींनी अनेक गाळे लाटले आहेत. नगरपरिषदेच्या नियमानुसार एका कुटुंबाला दोनपेक्षा अधिक गाळे देता येत नाहीत, तरीही याठिकाणी १० हून अधिक गाळे एकाच व्यक्तीच्या ताब्यात असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

तक्रारीतील मुख्य मुद्दे आणि आरोप:
इमारतीला धोका: व्यावसायिक फायद्यासाठी ९ गाळ्यांमधील मधल्या भिंती, बीम आणि पिलरची अनधिकृतपणे तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चर कमकुवत होऊन इतर गाळेधारक आणि ग्राहकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
भ्रष्टाचाराचा संशय: तत्कालीन सत्ताधारी बॉडीला १५ लाख रुपये दिल्याचे आणि अधिकाऱ्यांना मासिक हप्ते पोहोचवले जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. या ‘आर्थिक संगनमतामुळे’ प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याचा त्यांचा दावा आहे.
दुहेरी फायदा: ‘संत गाडगे महाराज मंडई’ मधील जुन्या गाळ्यांचा ताबा अद्याप सोडलेला नसताना, पुनर्विकासाच्या नावाखाली नवीन इमारतीतही गाळे वापरले जात आहेत. काही गाळ्यांचा वापर केवळ गोदामासाठी (गोडाऊन) केला जात असून ते बंद अवस्थेत आहेत.
तक्रारदाराच्या प्रमुख मागण्या:
१. एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे असलेले अतिरिक्त गाळे त्वरित जप्त करून सील करावेत. २. इमारतीच्या तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीची वसुली संबंधितांकडून करण्यात यावी. ३. भविष्यात या कुटुंबाला कोणत्याही नवीन इमारतीत गाळे देऊ नयेत. ४. गरजू आणि नवीन व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत.
प्रशासनाची भूमिका: या गंभीर आरोपांमुळे सावंतवाडी शहरात एकच खळबळ उडाली आहे. आता १५ दिवसांच्या या ‘अल्टिमेटम’नंतर नगरपरिषद प्रशासन संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारणार की उपोषणाची वेळ येणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

“वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जर काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी नगरपरिषद घेणार का? १५ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर मी ३ मार्चपासून उपोषणाला बसण्यावर ठाम आहे.” — श्रेयस साईनाथ मुंज (तक्रारदार)
🛑/——–/——-/—–/🛑——🛑—/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here