
सावंतवाडी दि.१४: स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेरी नं. २ च्या विद्यार्थ्यांनी विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आराध्या झोरे आणि आर्यन झोरे या विद्यार्थ्यांनी अनेक परीक्षांमध्ये सुवर्णपदके पटकावून तालुक्यात व जिल्ह्यात शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
आराध्या झोरेची चौफेर कामगिरी
इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या आराध्या झोरे हिने ‘यशवंत स्पर्धा परीक्षा २०२६’ मध्ये १८० गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला व सुवर्णपदक (Gold Medal) प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल संदीप गावडे फाउंडेशनचे प्रमुख श्री. संदीप गावडे यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. याशिवाय आराध्याने:
सिंधूरत्न टॅलेंट सर्च: १६८ गुणांसह सुवर्णपदक.ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा: ७९ गुणांसह कांस्यपदक (Bronze Medal).
नॅशनल ॲबॅकस स्पर्धा (पुणे): २१ वा क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली.
आर्यन झोरेचे राष्ट्रीय स्तरावर यश
इयत्ता दुसरीतील आर्यन झोरे याने ‘मंथन जनरल नॉलेज स्पर्धा २०२६’ मध्ये १५० पैकी १३० गुण मिळवत राज्यात ११ वा तर जिल्ह्यात ६ वा क्रमांक पटकावला. पुण्यात झालेल्या ‘नॅशनल ॲबॅकस स्पर्धेत’ त्याने ९ वा क्रमांक मिळवून पहिल्या १५ विद्यार्थ्यांच्या विशेष राष्ट्रीय यादीत स्थान मिळवले. तसेच:
सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च: १७२ गुणांसह सुवर्णपदक.ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा: ८९ गुणांसह कांस्यपदक.सौम्या झोरेची यशस्वी वाटचाल,शाळेची तिसरीतील विद्यार्थिनी सौम्या रामदास झोरे हिने देखील ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ५१ गुण मिळवून यश संपादन केले आहे.
“विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे सातत्य आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागेश गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.”
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्रीम. भावना गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ऋतुजा झोरे, उपाध्यक्ष बाबू झोरे, सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनील परब, माजी सभापती प्रमोद सावंत यांच्यासह भगवान सावंत, एकनाथ सावंत, नाना गावडे, कैलास परब, रघुनाथ गावडे, तानाजी सावंत, कृष्णा गावडे, महादेव गावडे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563




सावंतवाडी (वा.) यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिन्स ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून डिझेल व गॅस इंजिन, जनरेटर, पॉवर सिस्टिम तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणांच्या निर्मितीत कार्यरत आहे. देश-विदेशातील विविध उद्योगांमध्ये कंपनीची उत्पादने वापरली जातात._
सिंधुदुर्गनगरी दि.१३: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि स्थानिक प्रवाशांच्या वाढत्या समस्यांकडे रेल्वे प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ मे रोजी कसाल येथे पहिल्या ‘सिंधुदुर्ग रेल्वे परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. “रेल्वे प्रवाशांच्या हक्काच्या सोयीसुविधांसाठी ही निकराची लढाई असून, जिल्ह्यातील प्रवाशांनी आपली एकजूट दाखवावी,” असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावस्कर आणि जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
सावंतवाडी दि.१३: साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या गडबडीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सावंतवाडीतील कारिवडे येथे घडली आहे. याप्रकरणी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आंबोली दि.१३: “हिंदूंमध्ये एकी नसल्यामुळेच जिहादी मानसिकतेच्या लोकांचे धैर्य वाढते आहे. आता केवळ चर्चा करून चालणार नाही, तर हिंदूंनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. जर आपला धर्म सुरक्षित राहिला, तरच आपण, आपली मुले आणि आपली पुढची पिढी सुरक्षित राहील,” असे परखड प्रतिपादन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी केले.
सावंतवाडी दि.१३: कित्येक वर्षे उलटली, पण इथला प्रश्न सुटलेला नाही! कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थ आणि ‘झिरंग ७ नंबर’ शाळेचे विद्यार्थी आजही एका मोडकळीस आलेल्या सिमेंटच्या खांबांच्या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.📍 भयावह वास्तव: नाल्यावर केवळ ३ सिमेंटचे पोल टाकून बनवलेल्या पुलावरून वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जावे लागते.
सावंतवाडी दि.१३: नव्या दमाच्या गायकांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या २०व्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या आंतर राज्यस्तरीय गायन स्पर्धेचा बिगुल सावंतवाडीत वाजला! बॅ. नाथ पै सभागृहात पार पडलेल्या पहिल्या प्राथमिक फेरीत स्पर्धकांनी आपल्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सावंतवाडी दि.१३: सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत अपघातांची मालिका सुरूच असून, आज सकाळी एका इको कारचा भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महिनाभरात त्याच ठिकाणी दुसरा अपघात घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०७ क्यू ७९०४ क्रमांकाची इको कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव घाटातील एका तीव्र वळणावर हा अपघात घडला. कार कडेला घसरत जाऊन दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे एक इको कार दरीत कोसळली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील तीव्र वळणे, तुटलेले संरक्षक कठडे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची नाराजी अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारावर ताशेरे ओढले. “या ठिकाणी असलेले तुटलेले रेलिंग आणि कठडे तातडीने दुरुस्त करून ते मजबूत करावेत, तसेच पावसाळ्यात निसरड्या होणाऱ्या रस्त्यावर उपाययोजना करावी,” अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने येथे तात्काळ संरक्षक गार्डरेल, वेगमर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी मागणी मळगाववासीयांकडून केली जात आहे.
पुणे/सावंतवाडी दि.१२: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यातून कोकणासाठी हक्काची गाडी देण्यास तांत्रिक अडचणींचे कारण सांगणाऱ्या मध्य रेल्वेने, आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ मंजूर करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.