सावंतवाडी दि.३०: आपल्या मित्रासोबत मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला सावंतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी येथे धाडसी कारवाई करत रोखले आहे. ही मुलगी मूळची सावंतवाडीची असून सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. या प्रकरणी तिच्यासोबत असलेल्या तरुणांची आणि सहकाऱ्यांची पोलीस चौकशी सुरू आहे.
मैत्रीला घरच्यांचा विरोध मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मुंबईत राहत असताना तिथे एका तरुणाशी तिची मैत्री झाली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना ही मैत्री मान्य नव्हती. त्यामुळे तिला काही दिवसांपूर्वी मुंबईहून सावंतवाडीत आणण्यात आले होते. परंतु, तिला पुन्हा मुंबईला नेण्यासाठी तो मित्र आपल्या अन्य काही सहकाऱ्यांसह सावंतवाडीत दाखल झाला.
पोलीस ठाण्यातील हायड्रॅामा या मित्रांसोबत वेगवेगळ्या धर्माचे तरुण असल्याने हे प्रकरण सुरुवातीला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले होते. मात्र, घरी गेल्यानंतरही ती मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तिने पुन्हा मित्रासोबत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
रातोरात सूत्रे हलली मुलगी पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती मिळताच पालकांनी तातडीने सावंतवाडी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे ती मुलगी रेल्वेने जात असल्याचे समजताच, सावंतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणांना रोखण्यात आले.
अल्पवयीन असल्याने नातेवाईकांच्या ताब्यात देणार या सर्वांना आज पहाटे सावंतवाडीत आणण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, मुलगी आणि तो तरुण एकमेकांना ओळखतात व त्यांचे कुटुंबीय देखील परिचित आहेत. मात्र, मुलगी अद्याप अल्पवयीन असल्याने तिला कायदेशीर प्रक्रियेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563




सावंतवाडी दि.२९: तालुक्यातील ओवळीये-मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून एक भीषण हत्याकांड घडले. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा कोयत्याच्या वारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (३७) यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सावंतवाडी दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे, माळकरवाडी येथे शुक्रवार, ३ एप्रिल आणि शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी ‘निरवडे महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कलागुणांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
सावंतवाडी दि.२९: अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भरत केसरकर यांची पुनश्च एकदा निवड करण्यात आली आहे. कोकणातील डिजिटल पत्रकारितेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, सावंतवाडी येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
🎨 🚩कोल्हापूर दि.२९:भारताच्या १७ राज्यांतील अद्भुत हस्तकलेचा वारसा एकाच छताखाली पाहण्याची सुवर्णसंधी! श्री सिद्धगिरी संस्थान (कणेरी मठ) आणि महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय घेऊन येत आहेत – ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’.

सावंतवाडी दि.२८: शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शहरातील घरगुती व सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी आता पालिकेचे स्वतःचे आधुनिक ‘सक्शन मशीन’ दाखल झाले आहे. पालिकेच्या या पुढाकारामुळे आता नागरिकांना अत्यंत माफक दरात ही सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली.
सावंतवाडी दि.२८: ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या मोती तलावाचा दगडी काठ आता शेवटच्या घटका मोजत आहे. दीडशे वर्षांपूर्वीचे हे ऐतिहासिक बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत असून, याला कारणीभूत ठरत आहेत तलावाच्या काठावरील खोलवर गेलेली अशोक वृक्षांची झाडे!
कणकवली दि.२८: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली असून, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने न झाल्यास पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथील ‘विजय भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.