सावंतवाडी दि.१३: कित्येक वर्षे उलटली, पण इथला प्रश्न सुटलेला नाही! कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थ आणि ‘झिरंग ७ नंबर’ शाळेचे विद्यार्थी आजही एका मोडकळीस आलेल्या सिमेंटच्या खांबांच्या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.📍 भयावह वास्तव: नाल्यावर केवळ ३ सिमेंटचे पोल टाकून बनवलेल्या पुलावरून वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जावे लागते.
📍 धोका वाढला: सध्या यातील एक पोल पूर्णपणे मोडला असून, आधारासाठी कोणतेही रेलिंग (कठडा) उपलब्ध नाही.📍 पावसाळी संकट: पाऊस सुरू झाल्यावर हे पोल निसरडे होतात, ज्यामुळे नाल्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
📍 नेत्यांकडे दुर्लक्ष: सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना या समस्येची माहिती असूनही वर्षानुवर्षे फक्त ‘कानाडोळा’ केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.लोकप्रतिनिधींना आवाहन! 📢
पालकमंत्री नितेश राणे,
माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक भाई केसरकर, भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते महेश सारंग, विशाल परब, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) नेत्या अर्चना घारे-परब, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन या पुलाची डागडुजी व कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.”एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?” – असा संतप्त सवाल कोलगाव कुंभारवाडीतील जनता विचारत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.१३: नव्या दमाच्या गायकांना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या २०व्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या आंतर राज्यस्तरीय गायन स्पर्धेचा बिगुल सावंतवाडीत वाजला! बॅ. नाथ पै सभागृहात पार पडलेल्या पहिल्या प्राथमिक फेरीत स्पर्धकांनी आपल्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सावंतवाडी दि.१३: सावंतवाडी-रेडी राज्यमार्गावरील मळगाव घाटीत अपघातांची मालिका सुरूच असून, आज सकाळी एका इको कारचा भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महिनाभरात त्याच ठिकाणी दुसरा अपघात घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०७ क्यू ७९०४ क्रमांकाची इको कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव घाटातील एका तीव्र वळणावर हा अपघात घडला. कार कडेला घसरत जाऊन दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे एक इको कार दरीत कोसळली होती. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील तीव्र वळणे, तुटलेले संरक्षक कठडे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची नाराजी अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारावर ताशेरे ओढले. “या ठिकाणी असलेले तुटलेले रेलिंग आणि कठडे तातडीने दुरुस्त करून ते मजबूत करावेत, तसेच पावसाळ्यात निसरड्या होणाऱ्या रस्त्यावर उपाययोजना करावी,” अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने येथे तात्काळ संरक्षक गार्डरेल, वेगमर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी मागणी मळगाववासीयांकडून केली जात आहे.
पुणे/सावंतवाडी दि.१२: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यातून कोकणासाठी हक्काची गाडी देण्यास तांत्रिक अडचणींचे कारण सांगणाऱ्या मध्य रेल्वेने, आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ मंजूर करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
सावंतवाडी दि.१२: तालुक्यातील आंबोली येथील एका २९ वर्षीय तरुणाने पत्नीच्या विरहातून आणि वादातून आंबोली मुख्य धबधबा परिसरातील खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय २९, रा. आंबोली गावठाणवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी सह्याद्री ॲडव्हेंचर्सच्या मदतीने त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम कुडतरकर याचे पाच वर्षांपूर्वी सांगेली येथील एका युवतीशी लग्न झाले होते. मात्र, राजारामच्या दारूच्या व्यसनामुळे लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्यात वाद होऊन पत्नी माहेरी निघून गेली होती. सध्या या दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, पत्नीचे दुसरे लग्न ठरल्याची माहिती राजारामला मिळाली होती. याच कारणावरून तो सोमवारी (११ मे) तिला भेटण्यासाठी सांगेली येथे गेला होता. मात्र, तिने भेटण्यास नकार दिल्याने तो निराश होऊन आपल्या दुचाकीवरून आंबोलीच्या दिशेने निघाला होता.
आंबोली दि.१२: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबोली गावठणवाडी येथील राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय ३१) या डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणाहून सुमारे १२०० फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी ही घटना उघडकीस आली असून, रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
सिंधुदुर्ग दि.१२: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशातील जनतेला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि सोन्यातील गुंतवणूक थांबवण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणा आणि मंत्र्यांच्या ताफ्यात होणारा इंधनाचा वारेमाप खर्च थांबवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. “पंतप्रधानांच्या आवाहनाला खुद्द सरकारकडूनच हरताळ फासला जात असून, केवळ सामान्य जनतेनेच का होरपळायचे?” असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.