सावंतवाडी दि.२८: शहरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि डिजिटल शिक्षणाची कवाडं खुली करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि विशेष पाठपुराव्यातून सावंतवाडीतील दोन प्रमुख शाळांना अद्ययावत संगणक प्रणाली प्रदान करण्यात आली.
📍 या शाळांना मिळाला लाभ:
१. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ (भटवाडी)
२. वि. स. खांडेकर विद्यालय, सावंतवाडी
आज शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते या संगणकांचे वितरण करण्यात आले.
नगरपरिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती श्रीमती दिपाली भालेकर आणि श्री. दिलीप भालेकर यांनी या दोन्ही शाळांच्या तांत्रिक गरजा ओळखून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही माहिती तंत्रज्ञानाचे धडे गिरवता येणार आहेत.
✨ उपस्थित मान्यवर याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी, दि.२८ : कोकण रेल्वे स्थानक परिसरातील निरवडे येथे आज सायंकाळी सुमारे चार फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यात थेट मानवी वस्तीत मगर दिसून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यावरील बंद घराशेजारील अंगणात संशयास्पद हालचाल दिसल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता ती मगर असल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच मगरीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.
मळगाव–निरवडे रेल्वे स्थानक परिसर व आसपासचा नैसर्गिक अधिवास लक्षात घेता, भक्ष्याच्या शोधात ही मगर नागरी वस्तीत शिरली असावी, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या जलद कृती पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनअधिकारी बबन रेडकर यांनी आवश्यक खबरदारी घेत मगरीला सुरक्षितपणे पकडले व तिची जेरबंदी करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी टळली असून, मगरीला ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
पुणे दि.२८: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरूच आहे. *पुण्यातून कोकणासाठी गाडी नाकारून, मध्य रेल्वेने आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करत मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.*
*काय आहे मध्य रेल्वेचा नवा डाव?*
१. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे-कोकण दरम्यान रोजची ट्रेन सुरू करण्याची मागणी केली असता, मध्य रेल्वेने पुण्यात ‘टर्मिनलची अडचण’ आणि ‘मार्गाची अडचण’ (Path constraints) असल्याचे कारण सांगून कोकणच्या गाडीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
२. पण संतापाची बाब म्हणजे, याच ‘अडचणी’ असलेल्या पुणे स्टेशनवरून ११४३१/११४३२ पुणे-दानापूर (बिहार) अमृत भारत एक्सप्रेस मंजूर करण्यात आली आहे. जी आधी स्पेशल म्हणून सुरू होती.
३. विशेष म्हणजे ही गाडी ‘मध्य रेल्वेच्या मालकीची’ (CR Owning) आहे. याचा सरळ अर्थ असा की, या बिहारला जाणाऱ्या गाडीचे मेंटेनन्स (देखभाल) पुण्यातच होणार आहे.
४. पुण्यात आधीच जागा नसताना हा मेंटेनन्स आणि पार्किंगचा स्लॉट बिहारच्या गाडीला दिल्यामुळे, आता भविष्यात महाराष्ट्रातील किंवा कोकणातील गाड्यांसाठी मध्य रेल्वेकडे क्षमताच उपलब्ध राहणार नाही! हा कोकणवासीयांवर अन्याय नाही तर काय आहे?
*पैसा महाराष्ट्राचा, फायदा परप्रांतीयांचा?*
कोणत्याही नवीन रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्र राज्य शासन ५०% आर्थिक वाटा उचलते. मग या रेल्वे प्रकल्पांचा आणि पायाभूत सुविधांचा पहिला फायदा राज्यातील जनतेला, इथल्या भूमिपुत्रांना व्हायला नको का? आपल्याच घामाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या सुविधांचा लाभ उत्तरेकडील राज्यांना का?
*महाराष्ट्रातील गाड्यांना सापत्न वागणूक!*
हा दुजाभाव केवळ कोकणापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या ‘नांदेड-पुणे’ आणि ‘पुणे-हरंगुळ’ एक्सप्रेस यांसारख्या हक्काच्या गाड्या मुख्य पुणे स्टेशनवरून चक्क बाहेर ‘हडपसर’ला फेकल्या गेल्या. स्वतःच्याच राज्यातील प्रवाशांना अशी दुय्यम वागणूक का? परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मुख्य स्टेशनवर रेड कार्पेट आणि महाराष्ट्राच्या गाड्यांना मात्र हद्दपारी? मध्य रेल्वे महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर एवढा दुजाभाव का करत आहे?
मराठी माणसाची आणि कोकणी चाकरमान्यांची ही गळचेपी आता सहन करण्यापलीकडे गेली आहे. हा अन्याय असाच खपवून घ्यायचा का?
*(हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा आणि या अन्यायाविरुद्ध तमाम मराठी बांधवांनी एकत्र आवाज उठवा!) 📢🚆🚩*
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
पुणे दि.२८: अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या मोठे अडचणीचे ठरले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाची पदे गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
अशोक खरात यांना ‘गुरुस्थानी’ मानल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणावरून केवळ विरोधकांनीच नव्हे, तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गतही त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटला होता. पक्षाची प्रतिमा डागाळू नये, यासाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.
दुहेरी धक्का
महिला आयोग: या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सर्वात आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.
पक्षीय पद: आयोगाचा राजीनामा देऊन २४ तास उलटत नाहीत तोच, आज त्यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही त्याग केला आहे.
“अशोक खरात प्रकरणामुळे पक्षात आणि जनमानसात निर्माण झालेली नाराजी पाहता, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.”
पक्षासमोर पेच
रुपाली चाकणकर यांनी एकापाठोपाठ एक दोन्ही पदांचे राजीनामे दिल्याने आता महिला प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर महिला आघाडीचे नेतृत्व रिकामे झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवीन चेहरा शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२७: तालुक्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे सामान्य जनतेसह शेतकरी आणि मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि चंद्रकांत कासार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तालुका प्रमुख राजू शेटकर, विनोद काजरेकर, विनोद ठाकूर, सुनील गावडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
बळीराजा आणि मच्छीमार संकटात
शासकीय स्तरावरून इंधनाची टंचाई नसल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत विदारक आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार:
गॅससाठी वनवण: सिलिंडरसाठी ग्राहकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी बुकिंग करूनही महिनाभर सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे हाल होत आहेत.
शेतीचे नुकसान: इंधन टंचाईमुळे आंबा आणि काजू बागायतदारांना आपला माल बाजारात नेण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नाहीत. परिणामी, तयार पीक शेतातच कुजण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
मच्छीमारी ठप्प: डिझेलअभावी मच्छीमार बांधवांच्या नौका किनाऱ्यावरच उभ्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्हीआयपी संस्कृतीवर कडक टीका
“सामान्य माणूस इंधनासाठी वणवण फिरत असताना, मंत्री आणि शासकीय अधिकारी मात्र गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत आहेत. त्यांना या टंचाईची कोणतीही झळ पोहोचत नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकेला इंधन मिळत नाही, मग मंत्र्यांच्या ताफ्याला इंधन कोठून येते?” असा जळजळीत सवाल या निवेदनातून विचारण्यात आला आहे.
चौकट
प्रमुख मागण्यामध्ये १. शेतकरी व मच्छीमारांना व्यवसायासाठी मुबलक इंधन साठा प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा. २. नागरिकांची सोय व्हावी यासाठी सर्व शासकीय दाखले ग्रामपंचायत स्तरावरच मिळण्याची व्यवस्था करावी. ३. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी गाड्यांचा ताफा कमी करून शासकीय दौऱ्यात एकाच गाडीचा वापर करावा. ४. रुग्णवाहिकांसाठी राखीव इंधन कोटा ठेवून ती सेवा तत्काळ उपलब्ध करून द्यावी. ५. प्रलंबित गॅस सिलिंडर नागरिकांना त्वरित घरपोच मिळतील याची चोख व्यवस्था करावी.
चौकट: आंदोलनाचा इशारा “सर्व काही अलबेला आहे,” असे उत्तर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिल्यानंतर रुपेश राऊळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती प्रशासनासमोर आणण्यासाठी लवकरच पेट्रोल-डिझेल पंप आणि गॅस कार्यालयांसमोर शिवसेना (ठाकरे) व जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
फोटो ओळ: सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना लेखी निवेदन सादर करताना शिवसेना (ठाकरे) विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ. सोबत चंद्रकांत कासार, राजू शेटकर, विनोद ठाकूर, विनोद काजरेकर व अन्य.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
कणकवली दि.२७: शहरातील मुडेडोंगरी परिसरात शुक्रवारी पहाटे एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा गोळी झाडून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुशांत जनार्दन दळवी (वय ४०) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत दळवी हे मूळचे कळसुली गावसेवाडी येथील रहिवासी असून सध्या कणकवलीत स्थायिक होते. शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुडेडोंगरी येथील नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ, मोहन मळा येथील पायवाटेवर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. एका स्थानिक कामगाराला हा मृतदेह प्रथम दिसला, ज्याने तातडीने मालकाला आणि पोलिसांनी माहिती दिली.
हत्येचा थरार आणि पोलिसांचा अंदाज
प्राथमिक तपासानुसार, मध्यरात्रीनंतर अज्ञात हल्लेखोरांनी दळवी यांच्या डोक्याच्या मध्यभागी पिस्तुलाने गोळी झाडून त्यांची हत्या केली. गोळी झाडल्यानंतर मृतदेह काही अंतर ओढत नेऊन पायवाटेवर टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग आणि संघर्षाच्या खुणा आढळून आल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक पवन कांबळे, अनिल हाडळ, वृषाली बरगे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पुराव्यांच्या संकलनासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.
तपासाचे चक्र वेगाने
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा पूर्वनियोजित घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
सध्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२६: ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने आणि ‘राम जन्मला ग सखे…’ या मंगल सुरावलींनी आज संपूर्ण सावंतवाडी शहर आणि तालुका दुमदुमून गेला. ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
📍 गांधी चौकातील ८१ वर्षांची परंपरा कायम! सावंतवाडीच्या मध्यवर्ती गांधी चौकात गेल्या ८१ वर्षांपासून सुरू असलेली सार्वजनिक रामनवमी उत्सवाची परंपरा यावर्षीही विनय काणेकर यांनी वडिलांच्या पश्चात तितक्याच उत्साहात कायम ठेवली. ✅ सकाळी महापूजा व श्रीराम प्रतिमेचे पूजन. ✅ सार्वजनिक सत्यनारायण महापूजा आणि भजनाचा कार्यक्रम. ✅ रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
🌸 शहरातील इतर प्रमुख उत्सव:
कोर्टाजवळील हनुमान मंदिर: भव्य महाप्रसादाचे आयोजन.
भटवाडी दत्त मंदिर: धार्मिक विधी आणि जन्मोत्सव सोहळा.
इस्कॉन केंद्र: कीर्तन आणि प्रवचनाने भक्तिमय वातावरण.
तालुक्यात ठिकठिकाणी भगवे ध्वज, पताका आणि कीर्तनांच्या गजरात रामभक्तांनी हा उत्सव साजरा केला. दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा पार पडल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची रेलचेल होती.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडी दि.२६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ प्रदर्शनामध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील ‘तिरंगा प्रभाग संघा’च्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या महिलांच्या यशामुळे सावंतवाडी तालुक्याचा लौकिक वाढला असून, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
’सिंधू सरस’च्या माध्यमातून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इन्सुलीच्या तिरंगा प्रभाग संघाच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. ‘खेळ पैठणीचा’ या लोकप्रिय स्पर्धेत ग्रामसखी दिव्या देसाई (डेगवे) यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारत प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस पटकावले. तसेच, पाककला स्पर्धेत आपल्या हातातील चवीची जादू दाखवत रोणापाल येथील एलआरपी (LRP) नमिता शेगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपले कसब सिद्ध केले.
यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमधील ग्रुप डान्स स्पर्धेत इन्सुलीच्या ‘श्री देवी माऊली कला मंडळा’ने अत्यंत प्रभावी सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिरंगा प्रभाग संघाच्या महिलांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचे नसून, ग्रामीण भागातील महिलांमधील संघटनशक्ती आणि आत्मविश्वासाचे उत्तम प्रतीक मानले जात आहे. या यशस्वी महिलांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
[26/03, 12:13] HP: 🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 42 हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22 हजार रुपये मिळणार; हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान ;सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुंबई दि.२६: चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्टरी 42 हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22 हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न या सर्वांनाच यश आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली.ते म्हणाले,१७ मार्च २०२६ रोजी कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीतील सूचनांच्या आधारे शासनाने कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्राथमिक अहवाल मागवला असून त्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३०२ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. यामध्ये ३५,५८० हेक्टर क्षेत्रावरील ८०,४१८ शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा घेतला आहे. कमी व जास्त तापमानामुळे सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे.
आंबा पिकासाठी कमी तापमानामुळे प्रति हेक्टर ६,०७१ ते ३४,००० रुपये, तर जास्त तापमानामुळे १७,१७१ ते ६८,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. तसेच अवेळी पाऊस, गारपीट व वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मेपर्यंत विमा संरक्षण लागू आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.दरम्यान, काजू पिकाखाली कोकणात १,७५,१४० हेक्टर क्षेत्र असून १९८ महसूल मंडळांपैकी सुमारे १५० मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे. काजूसाठी प्रति हेक्टर १६,८०० ते ४२,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला नाही, त्यांनाही शासन वाऱ्यावर न सोडता मदत देणार आहे. यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नुकसानीचा अंतिम अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार असून, मागील वेळेपेक्षा वाढ करून यंदा सुमारे २२ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचा शासनाचा मानस असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सिंधुदुर्गनगरी दि. २५: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चार महत्त्वपूर्ण विषय समिती सभापती पदांसाठी आज झालेल्या निवडीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपानुसार, चारही जागांवर प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी शारदा पोवार यांनी केली.
नवनिर्वाचित सभापती आणि त्यांच्या समित्या:
निवडींमध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल राखत महायुतीने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
प्रितेश राऊळ भाजप शिक्षण व आरोग्य
सुलोचना नारकर भाजप महिला व बाल कल्याण,संतोष साटविलकर शिवसेना वित्त व बांधकाम,रुहिता तांबे शिवसेना समाजकल्याण
निवड प्रक्रियेचा थरार
ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी ३ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित केली. निर्धारित वेळेत विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज न आल्याने ही प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
निवडीची घोषणा होताच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांनी नवनिर्वाचित सभापतींना सन्मानाने त्यांच्या दालनात विराजमान केले.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
या विजयानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. “नव्या आणि जुन्या सदस्यांच्या या संगमामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना आता अधिक गती मिळेल,” असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563