19 C
New York
Tuesday, July 7, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 45

माजी आ. वैभव नाईक यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन जल्लोषात

वैभव नाईक यांना केक भरवताना पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक व पदाधिकारी.

कुडाळ दि.२५ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुडाळ–मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे बुधवारी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. गुरुवार, दि. 26 मार्च रोजी वाढदिवस असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वैभव नाईक यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना प्रमुख मंदार शिरसाट, उपनेत्या जान्हवी सावंत, वैभव नाईक यांची पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक, मुलगी नंदीनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, रूपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, अवधूत मालंडकर, संतोष शिरसाट, तालुका संघटक सचिन कदम, बबन बोभाटे, संदीप महाडेश्वर, अमित राणे, गोट्या चव्हाण, बाबी गुरव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परशुराम उपरकर म्हणाले, आज वैभव नाईक माजी आमदार असले तरी उद्या ते पुन्हा आमदार होणार आणि भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी सभागृहातील परिस्थितीचा उल्लेख करत, आज सत्तेतील मंत्री स्वतःच आपण मार खाल्ल्याचे सांगत आहेत, यावरून राज्यातील राजकारणाची दिशा लक्षात येते, असे म्हटले.उपरकर यांनी निवडणुकीतील आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपले चार प्रामाणिक कार्यकर्तेही मोठे परिवर्तन घडवू शकतात. त्यामुळे पुढील निवडणुकीत वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत.असे आवाहन केले.
वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात पराभवानंतरही न डगमगता पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. आज माझा पराभव झाला असला तरी याच उर्जेने मी काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी लोकांचा पाठिंबा आमच्यासोबत आहे,असे हे आताच झालेल्या निवडणुकींने दाखवून दिले.निवडणुका काही वेळा पैशाच्या जोरावर जिंकता येतात, पण संघर्ष आपल्यासाठी नवीन नाही,पैसे खर्च करून निवडून आलेले काही लोक मतदारसंघात फिरताना दिसत नाहीत, पण आम्ही मात्र लोकांसाठी कायम उभे राहणारे आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मी घेतलेल्या भूमिकेमुळे मला धमक्या देण्यात आल्या, पण हे माझं वैयक्तिक काम नव्हतं. विरोधात राहिल्यामुळे त्रास सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.राजकीय पक्षांतरावर भाष्य करताना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.आज काही लोक सत्तेत गेले असतील, पण त्यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही. खरी ताकद ही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येच असते,असे ते म्हणाले.रामनवमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भूमिकेचा उल्लेख करत,मी अयोध्येला जाणार नाही, पण माझ्या मतदारसंघात रामनवमी साजरी करणार आहे,असे सांगितले. शेवटी त्यांनी देवाकडे प्रार्थना करत, मला चांगली बुद्धी दे, कुणासमोर लाचार होऊ देऊ नको आणि लोकसेवा करण्याची ताकद दे,अशी भावना व्यक्त केली. तसेच आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करूया,असे आवाहनही त्यांनी उपस्थित पदाधिकारी -कार्यकत्यांना करताच उपस्थितीतामधुन टाळ्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
जान्हवी सावंत, अमरसेन सावंत, अतुल बंगे, कृष्णा धुरी यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना म्हटले, राज्यात निष्ठावंत आमदार म्हणून तुमची ओळख आहे. भविष्यात तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून वैभव नाईक यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने दशावतार कलाकारांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कुडाळ येथील रिक्षा व्यावसायिकांसाठी विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सातेरी दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚆 कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी!

🚆 बेलापूर दि.२५: कोकण रेल्वे मार्गावर सुरत (उधना) – मंगळुरू विशेष एक्सप्रेस गाडीला अखेर कायमस्वरूपी दर्जा मिळाला आहे. आता ही गाडी 19057/58 या क्रमांकाने नियमित धावणार आहे.
👉 या गाडीला सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण आदी स्थानकांवर थांबे मिळणार आहेत.
✅ यामुळे कोकणातील प्रवाशांना गुजरात व कर्नाटककडे प्रवास अधिक सोयीचा होणार
✅ नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी मोठा दिलासा
🙏 या गाडीच्या नियमितीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
– सागर तळवडेकर
उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

​📢 मळगाव पंचकोशी ग्रामीण पतसंस्थेचे नूतन कार्यालय आता अधिक सुसज्ज! 🚩 ​”भविष्यात तंत्रज्ञान आणि कायद्याचा अभ्यास केल्यास पतसंस्था अधिक बळकट होतील” – सुनील राऊळ

📢  🚩📍 मळगाव (कुंभारवाडी) दि.२५: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मळगाव पंचकोशी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे नूतन कार्यालय कुंभारवाडी येथे थाटात सुरू झाले आहे. या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सरपंच श्री. हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
​🌟 कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:
सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. पतसंस्थांनी पारदर्शकता आणि जलद सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. तसेच, बदलत्या सहकार कायद्यांचा अभ्यास करून या चळवळीला अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
​✅ महत्त्वाचे मुद्दे:
​कर्ज वसुलीत फेडरेशनची साथ: छोट्या पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसाठी फेडरेशन पूर्णपणे पाठिशी उभे राहणार.
​कायदेशीर सहकार्य: ज्येष्ठ विधीतज्ज्ञ डि.के. गांवकर यांनी संस्थेला कायदेशीर सल्ल्याचे आश्वासन दिले.
​अनुभवाचा उपयोग: संस्थेचे चेअरमन श्री. शिरोडकर यांनी आपल्या लेखापरीक्षक (Auditor) पदाच्या अनुभवातून संस्था अधिक भक्कम करण्याचा मानस व्यक्त केला.
​गावाचे सहकार्य: सरपंच पेडणेकर यांनी पतसंस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
​🤝 यावेळी व्हा. चेअरमन श्री. तेली, प्रा. गणपत शिरोडकर, प्रा. रवी शिरोडकर, श्री. चंद्रकांत जाधव, माजी संचालक आणि मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिराचा येत्या गुरुवारी २ एप्रिल २०२६ चैत्र शुद्ध पौर्णिमाला भव्य ‘कलशारोहण सोहळा’

सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस सोबत खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सुधीर धुमे,‌ दीपक पटेकर, जितेंद्र पंडित, लतिका सिंग, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत आदीं

सावंतवाडी दि.२४: शहरातील सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे येत्या गुरुवारी २ एप्रिल २०२६ चैत्र शुद्ध पौर्णिमाला भव्य ‘कलशारोहण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे या निमित्ताने ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी दिली. या मंदिरपूर्ततेसाठी हातभार लावणाऱ्या दात्यांसह परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. गवस म्हणाले, प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या कृपेने आम्ही हे मंदिर पूर्ण करू शकलो. मंदिराचे काम पूर्ण झालं असून ‘कलशारोहण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.‌ या सोहळ्याला सोमवार, दि. ३० मार्च रोजी सायं. ४ वाजता भव्य कलश दिंडीने प्रारंभ होणार असून ही दिंडी मराठी शाळा क्र. ४ पासून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत सबनिसवाडा येथील मंदिरात रात्री आरतीने समाप्त होईल. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वा. शांतिपाठ पठन, प्रायाश्चित विधी, त्यानंतर गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राध्द आचार्यदि वरणं आदी होणार असून ९ ते १ दरम्यान प्राकारशुद्धि, देवतांचे आवाहन, पूजन, श्रींची आरती, दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वा. सौ. मंजिरी धोपेश्वरकर यांचा ‘भक्तीरंग’ व रात्री ८.३० वा. निलेश मेस्त्री प्रस्तुत ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा नाट्यसंगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच १ एप्रिल रोजी सकाळी पवमान अभिषेक व होमहवन पार पडेल. ९ वा. तुलीशपूजा होणार असून भाविकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी योगेश सावंत भोसले यांचा ‘स्वरसाद’ आणि रात्री किरण सिद्धये संचलित ‘स्वरधारा’ हा संगीताचा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच कलशारोहण सोहळा गुरुवार २ एप्रिल रोजी पार पडेल. सकाळी देवता पूजन, हवन, शतकलशार्चन, शतकलाभिषेक, देवतांवर अभिषेक होणार असून दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा संपन्न होईल. यावेळी अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी), प.पू. शरद जोशी महाराज (पुणे) आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते कलशपूजन व कलशारोहण होणार आहे. दुपारी आरती व महाप्रसाद होणार असून ह.भ.प. स्नेहलदिप प्रभाकर सामंत यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर श्रींची पालखी आणि रात्री ‘नादब्रह्म’ हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या सुवर्ण सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे,‌ सदस्य दीपक पटेकर, जितेंद्र पंडित, लतिका सिंग, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत आदींनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

खरात प्रकरणाचे धागेदोरे शोधणार; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठणकावले, राजकारण्यांचे धाबे दणाणले!

मुंबई दि.२४ : सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिले. खरातला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठबळ देणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मग तो कितीही मोठा राजकारणी असो वा अधिकारी, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

केवळ फोटोंवरून नाही, तर पुराव्यांच्या आधारे होणार कारवाई
शिवसेना (UBT) आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणातील राजकारण्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “अनेकांचे फोटो समोर आले आहेत, मग अशा बड्या लोकांची चौकशी होणार का?” असा सवाल त्यांनी विचारला.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले:

“राजकारणात असताना कोणाचे फोटो कोणासोबत येतील हे सांगता येत नाही. केवळ फोटो आहे म्हणून कोणालाही आरोपी ठरवता येणार नाही. मात्र, आम्ही खरातच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा (Deleted Data) पुन्हा मिळवत आहोत. त्यातून कोणाचे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, कोणी मेसेज केले आहेत का, याचा तपास केला जाईल. पुरावा आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”

SIT च्या चौकशीत ‘या’ गोष्टींवर असणार लक्ष:
आर्थिक व्यवहार: खरातला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांची चौकशी.तांत्रिक पुरावे: मोबाईल डेटा आणि चॅट्सचे विश्लेषण.महिला अधिकाऱ्याचे नेतृत्व: या तपासासाठी जाणीवपूर्वक एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांचे ‘वरदहस्त’ उघड होणार?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात काही आयपीएस (IPS), आयएएस (IAS) आणि महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला. गुन्ह्यावर पांघरूण घालणाऱ्या या अधिकाऱ्यांची चौकशी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

मात्र, तांत्रिक मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, क्रिमिनल लॉ नुसार एसआयटी चौकशीत थेट न्यायालयाचा हस्तक्षेप नसतो, परंतु तपास अधिकारी आपला अहवाल न्यायालयाला सादर करतील.

नेत्यांमध्ये अस्वस्थता
मुख्यमंत्र्यांनी ‘डिलीटेड डेटा’ आणि ‘आर्थिक व्यवहार’ तपासण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या अनेक नेत्यांना आता चौकशीची धडकी भरली असल्याचे बोलले जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आजारपणाला कंटाळून वृद्धाची घराच्या छपराला गळफास घेत केली आत्महत्या

सावंतवाडी दि.२४: आजारपणाला कंटाळून नारायण तुकाराम जाधव वय 78 वर्षे राह. आरोंदा जाधववाडी यांनी घराच्या छपराला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सकाळी ११ वा उघडकीस आली असून याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यातील मयत हे हृदयरोग व मधुमेह या सततच्या आजाराला त्रस्त होते. त्याला कंटाळून आपल्या घरातील लोट्यावरील छपराच्या वासाला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. पोलीस ठाण्यात सद्गुरु कृष्णा जाधव यांनी माहिती दिली. याबाबत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला आहे. पो अरवारी, आरोंदा दुरक्षेत्र हे अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी तर हॉस्पिटलमध्ये पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

झाडावरून पडल्यामुळे नेरूर येथील प्रगतशील शेतकऱ्याचा मृत्यू

कुडाळ,दि.२४: तालुक्यातील नेरूर-कांडरीवाडी येथील प्रगतशील शेतकरी गोविंद वासुदेव नाईक (वय ७५) यांचे झाडावरून पडून निधन झाले. नेरूर परिसरात ‘काका नाईक’ या नावाने परिचित असलेल्या गोविंद नाईक यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद नाईक हे आपल्या घरासमोरील शेतात असलेल्या झाडावर चढले होते. मात्र, काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते कॉनबॅकचे कर्मचारी मंगेश नाईक यांचे वडील, तर पत्रकार अजय सावंत यांचे सासरे होते. ​त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, वहिनी, सुना, पुतणे, पुतणी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक कष्टाळू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपल्याने नेरूर पंचक्रोशीतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत ‘मेगा मेडिकल’ शिबिराचा आरोग्योत्सव; ९४७ रुग्णांची तपासणी, तर ३४ चिमुरड्यांच्या ‘टू-डी इको’ चाचण्या

सावंतवाडी दि.२४: सिंधुदुर्ग जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असल्याने येथील रुग्णांना अनेकदा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेसाठी गोवा किंवा मुंबईची वाट धरावी लागते. ही उणीव भरून काढण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत आयोजित ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी’ तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ९४७ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून, अत्याधुनिक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा लाभ दुर्गम भागातील जनतेला मिळाला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
या आरोग्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे,आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक देव्या सुर्याजी, सामाजिक बांधीलकी संघटनेचे प्रा. सतीश बागवे, रोटरी क्लबचे अनंत उचगावकर, श्रीमती विनया बाड यांसह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अत्याधुनिक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा लाभ
शिबिरात केवळ तपासणीच नाही, तर प्रत्यक्ष उपचार आणि शस्त्रक्रियांवर भर देण्यात आला.
महत्त्वाच्या चाचण्या: ९६ प्रौढ आणि ३४ बालकांच्या २डी इको (2D Echo) चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय ७५ सोनोग्राफी, ३३ सीटी-स्कॅन, ८० ईसीजी आणि ३५९ रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या मोफत पार पडल्या.
यशस्वी शस्त्रक्रिया: पोटाची एन्डोस्कोपी, हर्नियोप्लास्टी आणि अस्थिव्यंग शस्त्रक्रिया यांसह एकूण ७ तातडीच्या शस्त्रक्रिया या शिबिरात करण्यात आल्या. ४ बालकांना पुढील उपचारांसाठी संदर्भीय (Refer) करण्यात आले आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची ‘फौज’ तैनात
सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची मोठी टिम कार्यरत होती.
प्रमुख तज्ज्ञ: मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सागर कोल्हे, जनरल सर्जन डॉ. अनिकेत वजराटकर व डॉ. पल्लवी देशमंतार, रेडिओलॉजिस्ट डॉ. हर्षल जाधव, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला सावंत, आणि ठाणे येथील केआयएमएस (KIMS) हॉस्पिटलचे बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास.
सहभागी रुग्णालये: मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटल, डेरवण येथील वालावलकर रुग्णालय, एसएसपीएम (SSPM) हॉस्पिटल आणि आयुष हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनीही आपली सेवा दिली.
दर तीन महिन्यांनी होणार शिबिर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे इतर जिल्ह्यांतील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आणि अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. “जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकातील रुग्णांना सर्व सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी हे शिबिर आता दर तीन महिन्यांनी नियमितपणे आयोजित केले जाईल,” अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, डॉ. सुबोध इंगळे यांच्यासह अधिपरिचारिका रश्मी नाईक, सिस्टर दीक्षा वेंगुर्लेकर आणि संपूर्ण नर्सिंग व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

भोंदू बाबा खरात प्रकरणाचे पडसाद: केसरकरांच्या राजीनाम्यासाठी सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचा भव्य मोर्चा

सावंतवाडी दि.२४: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप करत, आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. “केसरकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी,” अशी आक्रमक मागणी सावंतवाडी विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी केली.

नेमकी घटना काय?
सावंतवाडीत आज सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी दीपक केसरकर यांचे कथित संबंध असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी आणि निदर्शनांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

रुपेश राऊळ यांचा प्रहार
या मोर्चाचे नेतृत्व करताना शिवसेना (ठाकरे) नेते रुपेश राऊळ यांनी केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले:

“भोंदू बाबा अशोक खरात याला राजकीय पाठबळ केवळ केसरकर यांच्यामुळेच मिळाले. या संपूर्ण प्रकरणाचे खरे सूत्रधार केसरकरच आहेत. त्यांच्यामुळे सावंतवाडीची संस्कृती आणि नाव बदनाम झाले आहे. जर त्यांना थोडी जरी लाज-शरम उरली असेल, तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.”

प्रमुख मागण्या:
मोर्चाच्या शेवटी प्रांत अधिकारी कार्यालयाला एक निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

आमदार दीपक केसरकर यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अशोक खरात प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी व्हावी.राजकीय वरदहस्त असलेल्या सर्वांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करावी.

उपस्थिती:
या भव्य मोर्चात ठाकरे शिवसेनेचे जिल्हास्तरीय आणि स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

📌 सावंतवाडी नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय! ३४ वारसांना मिळणार हक्काची सरकारी नोकरी! 🧹✨

अॅड. अनिल निरवडेकर प्रभारी नगराध्यक्ष सावंतवाडी नगरपरिषद

सावंतवाडी दि.२४: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे! प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ३४ वारसांना नियुक्ती देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाचे मुद्दे: 👇
✅ ३४ कुटुंबांना दिलासा: लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार पात्र ३४ वारसांना ‘विशेष बाब’ म्हणून सेवेत सामावून घेणार.
✅ १९७५ पासूनचा बॅकलॉग संपणार: १२ ऑगस्ट १९७५ ते २३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीतील प्रलंबित प्रकरणांना सुधारित तरतुदींचा लाभ मिळणार.
✅ शहराच्या स्वच्छतेला मिळणार गती: वाढती लोकसंख्या (२०२७ पर्यंत ३०,०००+) लक्षात घेता नवीन सफाई व गटर कामगारांची नियुक्ती अनिवार्य.
✅ २४ विकासकामांना मंजुरी: केवळ नोकऱ्याच नव्हे, तर शहराच्या सर्वांगीण विकासाचे २४ महत्त्वाचे ठरावही मंजूर!

कोण ठरणार पात्र? 🤔
पती/पत्नी, मुलगा/मुलगी, सून/जावई, विधवा/परित्यक्ता मुलगी किंवा बहीण. वारस नसल्यास सांभाळ करण्याची हमी देणारी व्यक्तीही पात्र ठरू शकते.

“हा निर्णय कामगार कुटुंबांना न्याय देणारा आणि सावंतवाडीच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावणारा ठरेल!”
— अॅड. अनिल निरवडेकर (प्रभारी नगराध्यक्ष)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563