🔥 सावंतवाडी दि.२३: शहरातील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला: यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, क्लेटस फर्नांडिस, महादेव पांगम आदी उपस्थित होते
💥 प्रमुख मुद्दे: १. भोंदूबाबा खरातसोबत मिलिंद नार्वेकरांचेही फोटो; मग त्यांचा राजीनामा का नको? २. खरातला ४० किमीवरून पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरेंचा आधी निषेध करा! ३. दीपक केसरकर हे देवभक्त आहेत, कोणत्याही मंदिरात ते श्रद्धेने जातात, त्याचा राजकीय अर्थ काढू नका. ४. काँग्रेस हा जिल्ह्यात संपलेला पक्ष; डिपॉझिट जप्त झालेल्यांवर आम्ही बोलत नाही!
राजकारण म्हणून राजकारण करू नका, आधी आपल्या नेत्यांकडे बघा! 🚩
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
🔥 संजू परबांचा रुपेश राऊळांना ‘टोला’! 🔥 “दीपक केसरकरांना टार्गेट करण्यापूर्वी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा मागा!” – संजू परब (शिवसेना जिल्हाप्रमुख)
सुसंस्कृत जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळिमा फासण्याचे काम आमदार दीपक केसरकर यांनी केले ठाकरे शिवसेनेचे रूपेश राऊळ यांचा घणाघात
सावंतवाडी,दि.२३: महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे अशोक खरात सारख्या भोंदू बाबाने महिलांवर अत्याचार करून जो धुमाकूळ घातला आहे, तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि शरमेची बाब आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राचे हित अपेक्षित होते, तेच लोक जर अशा भोंदू बाबांच्या आहारी जात असतील तर ही राज्यासाठी नाचक्की आहे. आमदार, खासदार आणि मंत्री जनतेला विकासाच्या गोष्टी सांगतात, मात्र स्वतःचे आयुष्य अशा भोंदू बाबांकडून घडवतात, मग हे लोक महाराष्ट्राचा काय विकास करणार? असा सवाल श्री. राऊळ यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी चंद्रकांत कासार आणि रमेश गावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राऊळ यांनी थेट आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.ते म्हणाले,सुसंस्कृत जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळिमा फासण्याचे काम केसरकर यांनी केले आहे. सावंतवाडीच्या मतदारांसाठी आणि जनतेसाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. जनतेने त्यांना विकासाची संधी दिली होती, मात्र त्यांनी मतदारसंघात उद्योग-व्यवसाय आणण्याऐवजी भोंदू बाबाकडे जाऊन स्वतःचे आरोग्य तपासण्याला आणि स्वतःचा विकास करून घेण्याला प्राधान्य दिले. केसरकर हे त्या भोंदू बाबाचे भक्त आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
केसरकर यांनी केवळ आपला राजकीय स्वार्थ जोपासण्याचे काम केले असून त्यांनी सावंतवाडीचा नावलौकिक धुळीस मिळवला आहे. जर त्यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या संपूर्ण प्रकरणाची आणि दीपक केसरकर यांच्या भूमिकची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात उद्या प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार पाठविली जाणार आहे. मुख्यमंत्री या प्रकरणात योग्य तो न्याय देतील आणि कडक निर्णय घेतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. या अन्यायाविरुद्ध आणि भोंदूगिरीविरुद्ध उद्या होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील जनतेने आणि विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. राऊळ यांनी यावेळी केले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
🚨 मोठी बातमी: भोंदू बाबा प्रकरणात आमदार दीपक केसरकरांच्या चौकशीची मागणी! 🚨सावंतवाडीत राजकीय भूकंप!
सावंतवाडी दि.२३: कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
📌
🧐 केसरकरांचे खरातशी नेमके संबंध काय? – चौकशीची जोरदार मागणी.
🗣️ “केसरकरांनी विकासाऐवजी फक्त भोंदूगिरी आणि बुवाबाजी केली” – चंद्रकांत कासार यांची टीका.
🛑 गुवाहाटी कनेक्शनचा खळबळजनक आरोप: शिंदेंना खरातच्या संपर्कात आणण्यात केसरकरांचाच हात?
🏛️ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कारवाईची मागणी करणार.
“रामराज्य असलेल्या सावंतवाडीची बदनामी खपवून घेणार नाही!” – शिवसेना (ठाकरे)
🔥 केसरकरांच्या चौकशीसाठी ठाकरे शिवसेना मैदानात! 🔥
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांच्या चौकशीसाठी सावंतवाडीत रणकंदन.
✅ काय आहेत आरोप?
१. खरातसोबतचे फोटो आणि विसंगत खुलासे.
२. विकासकामांकडे दुर्लक्ष करून बुवाबाजीला थारा.
३. ९ मंत्र्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
🔴 भोंदूबाबा प्रकरणात केसरकरांचे नाव; सावंतवाडीची बदनामी! 🛑 मदतनीस की भोंदूबाबाचे ‘खास भक्त’?

नाशिक दि.२३ येथील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सावंतवाडीचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे फोटो प्रसिद्ध झाल्याने खळबळ माजली आहे. यावरून काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
➡️ सौ. साक्षी वंजारी यांचे थेट सवाल:
१️⃣ रूपाली चाकणकरांनी राजीनामा दिला, मग केसरकर का नाही?
२️⃣ सावंतवाडीचा निधी नाशिकला कशासाठी?
३️⃣ ‘पवई एन्काउंटर’ प्रमाणे पुन्हा ‘क्लीन चिट’ मिळणार की निष्पक्ष चौकशी होणार?
🔥 “सावंतवाडीची मान शरमेने खाली गेली आहे. केसरकरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून एसआयटी (SIT) चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस जनआंदोलन छेडेल!” – सौ. साक्षी वंजारी]
🖼️ सावंतवाडीकरांसाठी लज्जास्पद बाब!
कथित भोंदूबाबा अशोक खरात आणि आमदार दीपक केसरकर यांच्यातील कथित संबंधांवरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सौ. साक्षी वंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खालील गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:
📍 प्रमुख मुद्दे:
⚡ जागतिक बदनामी: भोंदूबाबाच्या यादीत सावंतवाडीच्या आमदाराचे नाव येणे हे लाजिरवाणे आहे.
⚡ निधीचा घोळ: सावंतवाडीचा विकासनिधी नाशिकमधील रस्त्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय.
⚡ पोरका मतदारसंघ: निवडणुकीनंतर मतदारसंघाला पोरके करण्याची मनोवृत्ती.
👉 काँग्रेसची मागणी:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि दीपक केसरकर यांचा राजीनामा घ्यावा. निष्पक्ष चौकशीला सामोरे गेल्यासच सावंतवाडीचा अभिमान राहील.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडीत उद्या भव्य ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी’ तपासणी शिबिर; तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार
सावंतवाडी दि.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून उद्या, मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात भव्य ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचार मिळणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग आणि विविध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये आणि आरोग्य सेवा:
या शिबिरात खालील तज्ज्ञांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल:
हृदयरोग, कर्करोग (ऑन्कोलॉजिस्ट) आणि न्यूरॉलॉजी तज्ज्ञ.
स्त्रीरोग, बालरोग आणि बाल अस्थिरोग तज्ज्ञ.
युरॉलॉजी, फुफ्फुसरोग (पल्मनॉलॉजिस्ट) आणि त्वचा रोग तज्ज्ञ.
नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा आणि जनरल मेडिसिन.
तपासण्या: एक्सरे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, टू-डी इको, ईसीजी आणि रक्त लघवीच्या सर्व प्रयोगशाळा तपासण्या मोफत केल्या जातील.
शालेय मुलांची विशेष तपासणी देखील केली जाणार आहे.
योजनांचे लाभ आणि कार्ड सुविधा:
केवळ तपासणीच नव्हे, तर शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यासाठी आणि कार्ड काढण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये:
आयुष्मान कार्ड
वय वंदना कार्ड (ज्येष्ठ नागरिकांसाठी)
आभा (ABHA) कार्ड
ही कागदपत्रे शिबिराच्या ठिकाणीच तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेळ आणि ठिकाण: स्थळ: उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी. दिनांक: मंगळवार, २४ मार्च २०२६ वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ३:०० वाजेपर्यंत.
जास्तीत जास्त नागरिकांनी, रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या कर्मचारी वृंदाने केले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सर्वात मोठी बातमी: अमेरिका-इराण युद्धाला ‘ब्रेक’; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा!
वॉशिंग्टन दि.२३: मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीला आता तात्पुरता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याची मोठी घोषणा केली आहे. परंतु चर्चेचा दावा इराणने फेटाळला आहे.
ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले रोखले
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देताना स्पष्ट केले की, त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला (Pentagon) इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व नियोजित हल्ले पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे तणावाच्या वातावरणात काहीसा संयम पाहायला मिळत आहे.
चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. ही चर्चा पुढील एक आठवडा सुरू राहणार असून, मध्यपूर्वेतील तणाव पूर्णपणे संपवण्यासाठी दोन्ही देश गंभीरपणे प्रयत्न करत आहेत. पुढील पाच दिवसांच्या चर्चेनंतरच पुढचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
५ दिवसांची स्थगिती: इराणच्या वीज प्रकल्पांवरील लष्करी कारवाई तूर्तास थांबवली.
सकारात्मक संवाद: उभय देशांमध्ये गेल्या ४८ तासांत महत्त्वपूर्ण चर्चा.
शांततेची आशा: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू.
ट्रम्प यांच्या या अनपेक्षित घोषणेमुळे जागतिक स्तरावर, विशेषतः कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आता या पाच दिवसांच्या चर्चेतून काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
🚨 रुपयाची ऐतिहासिक घसरण! ९३ पार! 📉
युएसए दि.२२: जागतिक बाजारातील घडामोडी आणि आखाती देशांमधील युद्धाचा भारतीय चलनाला मोठा तडाखा बसला आहे. इतिहासात पहिल्यांदाच रुपयाने निचांकी पातळी गाठली आहे.
📍 💵 डॉलरचा भाव: ₹९३.२४ वर पोहोचला.
🛢️ कच्चे तेल: प्रति बॅरल ११५ डॉलरच्या पार.
⚔️ कारण: इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता.
वाढत्या महागाईचे सावट? तुम्हाला काय वाटते, कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
💥 मोठी बातमी: रुपया ऐतिहासिक निचांकी पातळीवर!
आखाती देशांतील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय रुपया कोसळला आहे. आज सकाळी बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपया ९३.२४ या विक्रमी स्तरावर पोहोचला.
📌 परिणाम: आयात महागणार आणि महागाई वाढण्याची शक्यता.भारतीय रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण! 📉
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरची मागणी वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमती ($११५+) वाढल्याने रुपयावर दबाव वाढला असून आज रुपया ९३.२४ वर व्यवहार करत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
सावंतवाडीत तंत्रज्ञानाचा महाकुंभ; ‘भोसले नॉलेज सिटी’मध्ये २४ मार्चपासून ‘क्वांटेक्झेरा २०२६’चा थरार ३ लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके; राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्टसाठी भोसले नॉलेज सिटी सज्ज
सावंतवाडीत तंत्रज्ञानाचा महाकुंभ; ‘भोसले नॉलेज
सावंतवाडी दि.२२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तंत्रशिक्षणाचे अग्रगण्य केंद्र असलेल्या भोसले नॉलेज सिटीमध्ये तंत्रज्ञानाचा महाउत्सव रंगणार आहे. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने २४ आणि २५ मार्च रोजी ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या भव्य राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवाचे (Tech-Fest) आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रत्येकासाठी शाश्वत तंत्रज्ञान’ (Sustainable Technology for All) हे यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य ब्रीदवाक्य आहे.
मुख्य आकर्षण: ऑटो आणि टेक एक्स्पो
या दोन दिवसीय महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ‘ऑटो आणि टेक एक्स्पो’ असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
२४ मार्च: टेक्निकल क्वीझ, फोटोग्राफी आणि वादविवाद स्पर्धा.२५ मार्च: ब्लाइंड सी कोडिंग (Blind C Coding) आणि रोबो रेस (Robo Race).विशेष स्पर्धा: प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आणि रील मेकिंग स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आपले नाविन्यपूर्ण संशोधन आणि कला सादर करता येणार आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मोठी पारितोषिके
या महोत्सवात केवळ स्पर्धाच नव्हे, तर ‘भविष्यातील तंत्रज्ञान आणि करिअरच्या संधी’ या विषयावर नामवंत तज्ज्ञांची व्याख्याने आणि पॅनेल डिस्कशनचेही आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण महोत्सवात विजेत्यांसाठी ३ लाख रुपयांहून अधिक रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
नोंदणीसाठी आवाहन
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी www.quantexera.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कॉलेज प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
वनांच्या रक्षणासाठी ३२ हजार हात सरसावले; ३२० गावांत घुमणार ‘अग्निमुक्त वन’ची गर्जना भारतीय वन कायद्याच्या शताब्दी वर्षाचे औचित्य; सामूहिक शपथेचे आयोजन सिंधुदुर्ग दि.२२:


सिंधुदुर्ग दि.२२: निसर्गाने हजारो वर्षांत निर्माण केलेली वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी संपूर्ण कार्यक्षेत्रात “अग्निमुक्त वन शपथ” हा भव्य लोकसहभाग कार्यक्रम राबविण्यात आला. ‘भारतीय वन कायदा, १९२७’ या ऐतिहासिक कायद्याला २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण जनजागृती मोहीम ठरला आहे.
एकाच वेळी, ३२० गावांत संकल्प
वनक्षेत्राला लागून असलेल्या आणि वनलगतच्या एकूण ३२० गावांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी पार पडला आहे. प्रत्येक गावातून किमान १०० ग्रामस्थ सहभागी झाले असून, जवळपास ३२,००० नागरिक एकत्र येऊन आपली वने आगीपासून सुरक्षित ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली आहे .
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक, क्षेत्रीय वन अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक यांना विशेष सूचना देण्यात आल्या . केवळ सरकारी औपचारिकता न ठेवता, हा कार्यक्रम एक लोकचळवळ बनावा यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांशीही समन्वय साधण्यात आला आहे. वनाग्नीमुळे काही तासांतच पाणी, माती, हवामान आणि वन्यजीवांचे होणारे अपरिमित नुकसान टाळणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
भविष्यातील पिढ्यांसाठी ‘सुरक्षा कवच’
वने ही केवळ झाडे नसून ती मानवी जीवनाचा आधार आहेत. वनाग्नी प्रतिबंधासाठी वन कर्मचारी आणि स्थानिक समुदाय यांच्यातील समन्वय बळकट करणे हा या उपक्रमाचा गाभा आहे. ग्रामस्थांमध्ये वनांविषयी कर्तव्यभावना निर्माण व्हावी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग शिल्लक राहावा, यासाठी हा ‘सार्वजनिक संकल्प’ अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
वनविभागाच्या वतीने सर्व निसर्गप्रेमी नागरिक, तरुण मंडळे आणि महिला बचत गटांना या ‘अग्निमुक्त वन’ मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563
राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी दि.२२: शहरातील राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे गुढीपाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. त्या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे हि आयोजन केले जाते या कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजा शिवाजी चौक (गवळी तीठा) येथे लवकरच लोकवर्गणीतून भव्य – दिव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण व पालकमंत्री नितेशजी राणे यांची लवकरच भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवून त्यानंतर सर्व शिवप्रेमींना एकत्र करून कमिटी स्थापन केली जाईल. ही शुभ वार्ता ऐकताच कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी एकच टाळ्यांचा गडगडात केला. मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, रवी जाधव, उपाध्यक्ष दिलीप पवार बंड्या तोरस्कर,सचिव दीपक सावंत , महादेव राऊळ यांनी हा प्रस्ताव एकमताने साळगावकर यांच्यासमोर ठेवला होता त्यामुळे या पवित्र विषयाला दिशा देण्याचे काम बबन साळगावकर यांनी केले आहे त्यामुळे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी यासाठी ताकतीने कामाला लागून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले तर नवनिर्वाचित प्रभारी नगराध्यक्ष ऍड.अनिल यांनीही मदत करू असे आश्वासन दिले.या प्रसंगी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, नगराध्यक्ष ऍड.अनिल निरवडेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, रोटरी क्लब अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक ऍड सिद्धार्थ भांबुरे,यशवंत देसाई,विजय सावंत,अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दिलीप पवार, सहसचिव महादेव राऊळ, प्रसिद्धी प्रमुख रवी जाधव, मनोज घाटकर, सत्यम सावंत,नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, संजय पेडणेकर, प्रदीप भालेकर, दिलीप भालेकर, मनोज राऊळ, वासुदेव खानोलकर, संजय साळगावकर, सुंदर गावडे, शुभम मळकाचे उपस्थित होते.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


