सावंतवाडी दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे युवा नेतृत्व विक्रांत सावंत यांनी आपल्या प्रभावी कार्यशैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माजी मंत्री स्वर्गीय भाई सावंत आणि स्वर्गीय विकासभाई सावंत यांचा लोकसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेत, विक्रांत सावंत आज जनतेच्या आशा-आकांक्षांचे केंद्रबिंदू बनले आहेत.
परंपरेचा दीपस्तंभ आणि शैक्षणिक वारसा
स्वर्गीय भाई सावंत यांनी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली, तर स्वर्गीय विकासभाईंनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि ‘शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून या कार्याला नवी उंची दिली. विकासभाईंच्या निधनानंतर ही मोठी जबाबदारी विक्रांत सावंत यांच्या खांद्यावर आली. शिक्षण प्रसारक मंडळाच्या धुरा यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या व्यवस्थापकीय कौशल्याची आणि अभ्यासू वृत्तीची प्रचिती दिली आहे.
राजकीय यशाचा जाहीरनामा
भाजपच्या तिकिटावर माजगाव जिल्हा परिषद गटातून मिळवलेला विक्रमी विजय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर झालेली निवड, हा त्यांच्या नियोजनकौशल्याचा विजय मानला जातो. नुकत्याच झालेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या रणनीतीमुळे रंजना कानसे यांनी मिळवलेला विजय हा सावंत घराण्याच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा मोहोर उमटवणारा ठरला आहे.
विधायक उपक्रमांतून समाजपरिवर्तन
केवळ राजकारण न करता सामाजिक ऋणाची जाणीव ठेवत विक्रांत सावंत यांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत:
शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण: तरुणांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी मर्दानी खेळांचे प्रशिक्षण सुरू केले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा: जिल्ह्यातून उत्तम अधिकारी घडावेत या हेतूने स्पर्धा परीक्षांना प्रोत्साहन दिले जात आहे.
पायाभूत सुविधा: मतदारसंघातील रस्ते, मंदिरांचे सुशोभीकरण आणि वाडी-वस्तीवरील समस्या सोडवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.
सर्वसमावेशक नेतृत्व आणि विनम्रता
विक्रांत सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘सर्वपक्षीय स्वीकारार्हता’. पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राणे परिवारापासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यापर्यंत सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत. उच्चविद्याविभूषित असूनही त्यांच्यातील साधेपणा आणि विनम्रता यामुळे ते युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे लाडके ‘आयडॉल’ बनले आहेत.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, मनीष दळवी यांसह अनेक दिग्गजांनी त्यांच्या कार्यशैलीचे वेळोवेळी कौतुक केले आहे. समाजकारण, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत गगनभरारी घेणारा हा ‘सावंत परिवाराचा कुलदीपक’ भविष्यात महाराष्ट्राच्या नकाशावर आपली अमिट छाप उमटवेल, असा विश्वास जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. श्री देव पाटेकर आणि ग्रामदेवता सातेरीच्या आशीर्वादाने त्यांची ही घोडदौड अशीच सुरू राहो, अशा शुभेच्छा सध्या संपूर्ण जिल्ह्यातून दिल्या जात आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.२९: तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवार रंजना रवींद्र कानसे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. या विजयामुळे माजगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष केला.
सावंतवाडी दि.२८: तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी मंगळवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी अत्यंत थंड प्रतिसाद दिला. वाढत्या उष्णतेचा परिणाम मतदानावर दिसून आला असून, दिवसभरात केवळ ४०.११ टक्के मतदान झाले आहे. महायुती विरुद्ध अपक्ष अशा या दुरंगी आणि अटीतटीच्या लढतीचा निकाल बुधवारी सकाळी १० वाजता सावंतवाडी तहसील कार्यालयात स्पष्ट होईल.
सिंधुदुर्गनगरी दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने शिस्तीबाबत अत्यंत कठोर पाऊल उचलले असून, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. पूर्वपरवानगीशिवाय रजेवर जाणे त्यांना महागात पडले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी ही धडक कारवाई केली आहे.
मालवण दि.२७: केंद्र सरकारने २०२३ मध्ये मंजूर केलेले ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक केवळ कागदावरच न ठेवता, त्याची अंमलबजावणी ‘आज आणि आत्ता’ करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय महिला काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात राबवल्या जाणाऱ्या ‘पोस्टकार्ड अभियानाचा’ शुभारंभ आज मालवण येथून करण्यात आला.
🚨 BREAKING NEWS: आंबोली घाटात आयशर टेम्पो पलटी! 🚨