18.4 C
New York
Tuesday, July 7, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 48

भोंदूबाबा अशोक खरातचे बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या जाळ्यात; ५८ सीसीटीव्ही फुटेजसह ५ कोटींची मागणी?

नाशिक दि.२०: भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. खरातचे छुपे कारनामे जगासमोर आणणारा संशयित नीरज जाधव याला नाशिक क्राईम ब्रँचने अखेर ताब्यात घेतले आहे. नीरजच्या अटकेमुळे खरातच्या ‘काळ्या कुंडली’तील अनेक धक्कादायक गुपिते बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑफिस बॉय ते ब्लॅकमेलर?
मिळालेल्या माहितीनुसार, नीरज जाधव हा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये ‘ऑफिस बॉय’ म्हणून कामाला होता. कामावर असताना नीरजने खरातच्या नकळत त्याच्या ऑफिसमधील तब्बल ५८ सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवले होते. या व्हिडिओंमध्ये खरातचे आक्षेपार्ह कृत्य कैद असल्याचे समजते. याच व्हिडिओच्या जोरावर नीरजने खरातला ५ कोटी रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पीडितांचा वापर करून खंडणीचा कट?
अशोक खरातने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, नीरजने काही पीडित महिलांच्या मदतीने खरातला पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिर्डीतील एका महिलेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ वापरून खरातवर दबाव आणला गेल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही महिलांनी नीरज आपल्याला धमकावत असल्याची तक्रार खुद्द खरातकडेच केली होती, त्यानंतर खरातनेच त्यांना पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला होता. एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवून तिलाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप नीरजवर आहे.

भोंदू खरातचे ‘राजकीय’ कनेक्शन; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली?
अशोक खरातचे प्रस्थ केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे परराज्यातील राजकारण्यांपर्यंत पोहोचल्याचे उघड होत आहे.

हाय-प्रोफाईल भक्त: खरातचे भक्त केवळ सामान्य नागरिक नसून केंद्र आणि राज्यातील अनेक मोठे मंत्री, हरियाणा आणि राजस्थानमधील राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

चाकणकरांवर निशाणा: या प्रकरणावरून आता राजकारण तापू लागले आहे. खरातचे अनेक उच्चपदस्थांशी असलेले लागेबांधे पाहता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता विरोधकांकडून आणि सामाजिक स्तरातून जोर धरू लागली आहे.

भोंदूगिरी आणि बलात्काराच्या आरोपाखाली खरात सध्या अटकेत असला, तरी आता नीरज जाधवच्या चौकशीतून या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे आणि यात किती मोठ्या नावांचा सहभाग आहे, हे स्पष्ट होईल.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*handhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,82756595

ठळक बातमी: सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा प्रश्न विधीमंडळात गाजला! 🚆🚩

 🚆🚩मुंबई दि.२०: आमदार सुलभा गायकवाड यांनी मांडल्या कोकणवासियांच्या प्रमुख मागण्या: ✅ कोरोना काळात रद्द केलेले थांबे त्वरित सुरू करा. ✅ सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करा. ✅ ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत समावेश करण्यासाठी पाठपुरावा करा. ✅ कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी राज्य सरकारने निधी द्यावा.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत श्री रामनवमी निमित्त २८ मार्चला एकदिवसीय रामकथा सोहळा

सावंतवाडी दि.२०: इस्कॉन (ISKCON) तर्फे श्री रामनवमी निमित्त एकदिवसीय रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असून भाविकांना श्रीरामभक्तीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा रामकथा सोहळा दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच महाप्रसादाचा समावेश असणार आहे.
या प्रसंगी प्रख्यात प्रवचनकार दामोदर सखा प्रभुजी (एम.बी.ए., दिल्ली) हे रामकथेचे निरूपण करणार आहेत. श्रीरामचंद्रांच्या कृपेचा लाभ मिळावा व भक्तीभाव वाढावा, या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण हरिकृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी, सावंतवाडी येथे असून सर्व भक्तांनी उपस्थित राहून रामकथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

“केसरकरांच्या कामांचे श्रेय लाटू नका!” .. बाबू कुडतरकर यांचा टोला

खेमराज उर्फ बाबू कुडतरकर

🚩 सावंतवाडी दि.२०: शहरातील विकासकामांवरून शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर आक्रमक झाले असून प्रभारी नगराध्यक्षांना टोला लगावला. योगा सेंटर, खाऊ गल्ली आणि क्रिकेट गॅलरीवरून राजकीय जुंपली!
कुडतरकर यांनी आमदार केसरकर यांनी मंजूर केलेल्या कामांची यादीच सादर केली आहे.
यात प्रामुख्याने:मोती तलाव काठावरील खाऊ गल्ली.
जिमखाना येथील क्रिकेट गॅलरी (गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या नावे).मोती तलावासमोरील संगीत कारंजे.
बॅ. नाथ पै सभागृह नूतनीकरण.,टर्फ क्रिकेट मैदान आणि नरेंद्र डोंगरावरील योगा सेंटर.
“यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर काहींची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प केसरकर यांच्या योगदानामुळेच उभे राहत आहेत. सत्ताधाऱ्यांनी स्वतः काय आणले ते सांगावे, मंजूर प्रकल्पांचे श्रेय लाटू नये,” अशी टीका कुडतरकर यांनी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 सावंतवाडीच्या पर्यटनाला मिळणार नवी भरारी! ‘रोप-वे’ आणि ‘बोटींग’साठी पालिकेचा पुढाकार! 🚠🛶

🚩 🚠🛶 सावंतवाडी दि.२०: शहराच्या पर्यटनाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिकेच्या सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. शहराबाहेरून गेलेला महामार्ग आणि रेल्वेमुळे पर्यटनात आलेली मरगळ झटकण्यासाठी आता ‘मोती तलाव ते नरेंद्र डोंगर’ असा भव्य रोप-वे (Ropeway) उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे.

✅ मोती तलावाकाठी ‘खाऊगल्ली’: राजवाड्यासमोर ११ गुंठे जागेत भव्य खाऊगल्ली साकारणार. १ कोटींचा निधी मंजूर! 🍔🥘
✅ स्थानिकांना प्राधान्य: खाऊगल्लीतील स्टॉल्ससाठी स्थानिक महिला आणि तरुणांना पहिले प्राधान्य दिले जाणार.
✅ बोटींग प्रकल्प: तलावातील बंद असलेली बोटींग सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार.
✅ नरेद्र डोंगर रोप-वे: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रोप-वे उभारण्याची महायुती नेत्यांकडे मागणी.

उद्यान सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांनी नगरसेविकांसह आज खाऊगल्लीच्या जागेची पाहणी केली. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेचा गट आग्रही आहे.

“सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटकांना शहरात खेचून आणण्यासाठी रोप-वे आणि बोटींग प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
— मोहिनी मडगावकर (उद्यान सभापती)

सावंतवाडीत भव्य शोभायात्रेने हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत; ‘मर्दानी खेळांनी’ वेधले लक्ष

सावंतवाडी दि.१९: शहरात आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात करण्यात आले. सकल हिंदू समाज सावंतवाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने अवघी सावंतवाडी भगवीमय झाली होती. या सोहळ्यात भाजप युवा नेते विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन नागरिकांचा उत्साह वाढवला.

राजवाड्यापासून जयघोषात सुरुवात
ऐतिहासिक राजवाड्यापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. हातात भगवे ध्वज आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष करत निघालेल्या या यात्रेने शहर दुमदुमून गेले होते. पारंपारिक वेशभूषेतील आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सामील झाले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरले होते.

चित्तथरारक मर्दानी खेळ आणि भक्तीमय सादरीकरण
शोभायात्रा नारायण मंदिर येथे पोहोचल्यानंतर महिलांनी सादर केलेल्या चित्तथरारक ‘मर्दानी खेळांनी’ उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यासोबतच, वसंत शिशुवाटिका विद्याभारतीच्या लहान मुलांनी प्रभू श्रीरामावर आधारित सुंदर गीत सादर करून संपूर्ण परिसर भक्तीमय करून टाकला.

बालकलाकारांचा गौरव
कार्यक्रमादरम्यान विशाल परब आणि सौ. वेदिका परब यांच्या हस्ते या चिमुकल्या कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने सावंतवाडीत हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवत नवीन वर्षाची दिमाखदार सुरुवात केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बांदा व सावंतवाडीत ‘नववर्ष स्वागत यात्रे’चा जल्लोष; मर्दानी खेळ आणि भगव्या रॅलीने अवघी नगरी दुमदुमली

सावंतवाडी दि.१९: हिंदू संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने, सावंतवाडी शहरात हिंदू धर्म जनजागृतीसाठी भव्य ‘नववर्ष स्वागत यात्रा’ काढण्यात आली. संस्थानकालीन वारसा लाभलेल्या राजवाड्याच्या ‘ईस्टर गेट’मधून या रॅलीचा दिमाखात शुभारंभ झाला. ढोल-ताशांचा गजरात आणि “जय श्रीराम”च्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तीमय झाले होते.
मर्दानी खेळांचे आकर्षण आणि महिलांचा सहभाग
राजवाड्यापासून निघालेली ही रॅली श्रीराम वाचन मंदिर समोरील तलावाकाठी पोहोचली. यावेळी तरुण मुलींनी सादर केलेल्या मर्दानी खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. ‘आरंभ सखी’ समूहासह शहरातील विविध महिला संघटनांनी पारंपारिक वेशभूषा, डोक्यावर भगवे फेटे आणि हाती भगवा ध्वज घेऊन या यात्रेत सहभाग नोंदवला.
रॅलीचे मार्गक्रमण आणि स्वागत
गांधी चौक: रॅलीचे आगमन होताच नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
जयप्रकाश चौक: येथे रॅली पोहोचताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या थाटात रॅलीचे स्वागत केले.
विशेष आकर्षण: रासाई तर्फे आकर्षक लेझीम पथकाचे आयोजन करण्यात आले होते, तर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
महत्त्वाच्या घोषणा आणि सन्मान
‘आरंभ सखी’ संघटनेच्या वतीने मर्दानी खेळ सादर करणाऱ्या कलाकारांना शुभेच्छा देत सावंतवाडी नगर परिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी नाट्यकलाकार सुधीर धुमे उपस्थित होते.विशेष म्हणजे, सावंतवाडीत स्वसंरक्षणासाठी मर्दानी खेळाचे प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. रॅलीमध्ये ‘वराह अवताराची’ भव्य प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
“आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत एकत्रितपणे करण्यासाठी या स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे,” असे प्रास्ताविकात बाळ पुराणिक यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि इस्कॉनचा प्रसाद
या सोहळ्यात महिलांचे ‘घे भरारी’ पथक, नगरसेविका सायली दुभाषी, बाळू कशाळीकर, डॉ. प्रवीण कुमार ठाकरे, अच्युत सावंत भोसले यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. रॅलीच्या शेवटी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे सर्व सहभागी भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या रॅलीने सावंतवाडीत नववर्षाचा उत्साह द्विगुणित केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत गव्यांचा वावर वाढला! सालईवाडा परिसरात पुन्हा दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सावंतवाडी दि.१८: शहरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज पुन्हा एकदा सालईवाडा परिसरात गव्यांचे दर्शन झाले. विशेष म्हणजे, बी.एस.एन.एल. (BSNL) ऑफिसच्या अगदी पाठीमागे असलेल्या नागरी वस्तीच्या जवळ हे गवे चरताना दिसून आले. भरवस्तीत गवे आल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
नेमकी घटना काय? गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहराच्या विविध भागात गव्यांचा वावर वाढला आहे. आज सालईवाडा येथील बी.एस.एन.एल. कार्यालयालगत असलेल्या मोकळ्या जागेत गव्यांचा कळप दिसून आला. नागरी वस्तीच्या इतक्या जवळ हे वन्यप्राणी आल्याचे समजताच स्थानिक रहिवाशांची धावपळ उडाली. गव्यांना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांमध्ये भीती: शहराच्या मध्यवर्ती भागात आणि नागरी वस्तीच्या इतक्या जवळ गवे सातत्याने येत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “मुलांना बाहेर खेळायला पाठवणे किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडणे आता धोक्याचे झाले आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. या गव्यांमुळे शेतीचे आणि बागायतीचेही नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वनविभागाकडे मागणी: सावंतवाडी परिसरात गव्यांचा उपद्रव वाढल्याने वनविभागाने तात्काळ यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. गव्यांना मानवी वस्तीपासून दूर हाकलण्यासाठी पावले उचलावीत आणि भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी वनविभागाने सतर्क राहावे, अशी विनंती सालईवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत फणसाला केळीचा घड? ‘त्या’ चमत्कारामागचे वैज्ञानिक सत्य आले समोर!

सावंतवाडी दि.१८: निसर्गाच्या किमया अगाध असतात, पण कधीकधी याच किमयांना ‘चमत्काराचे’ रूप दिले जाते. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले-फौजदारवाडी येथे फणसाच्या झाडाला चक्क केळीचा घड लागल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केलेल्या सत्यशोधनानंतर या ‘चमत्कारा’मागचे वैज्ञानिक वास्तव आता उघड झाले आहे.
नेमकी घटना काय?
वेर्ले येथील रहिवासी विश्राम पुंडलिक लिंगवत यांच्या बागेतील एका फणसाच्या झाडाला जमिनीपासून १०-१५ फूट उंचीवर केळीच्या घडासारखी दिसणारी एक दुर्मिळ आकृती पाहायला मिळाली. फणसाच्या देठातूनच हा आकार बाहेर आल्याचे दिसत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. हा ‘दैवी चमत्कार’ पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
अंनिसचा वैज्ञानिक खुलासा
या घटनेची दखल घेत अंनिसचे उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या निरीक्षणातून खालील बाबी समोर आल्या आहेत:
नैसर्गिक प्रक्रिया: फणसाचे गरे नैसर्गिक प्रक्रियेत बाहेरच्या बाजूला आल्यामुळे त्याला केळीच्या घडासारखा आकार प्राप्त झाला आहे.
जनुकीय बदल (Genetic Changes): झाडातील मूलद्रव्यांमध्ये किंवा जनुकीय रचनेत बदल झाल्यामुळे फळाच्या आकारात हा वेगळेपणा आला आहे. ही एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया असून यात कोणताही चमत्कार नाही.
अंधश्रद्धेला थारा नको: हा कोणताही दैवी प्रकार नसून केवळ निसर्गाची किमया आहे. नागरिकांनी अशा अफवांना चमत्काराचे रूप देऊ नये, असे आवाहन डॉ. लिंगवत यांनी केले आहे.
निष्कर्ष
विज्ञानाच्या कसोटीवर हा तथाकथित चमत्कार फोल ठरला आहे. निसर्गातील जनुकीय आणि रासायनिक बदलांमुळे फळांच्या आकारात असे वैविध्य पाहायला मिळते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚆 कोकण रेल्वेवरून विधानसभेत गदारोळ! सावंतवाडी टर्मिनससह प्रवासी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

सावंतवाडी दि.१८ : मध्ये आज कोकण रेल्वेच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. चे मध्ये विलीनीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
सावंतवाडीचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला.रेल्वे स्थानकांच्या बाह्य सुशोभीकरणाचे काम माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून झाले असले, तरी स्थानकातील अंतर्गत सुविधा अद्याप अपूर्ण आहेत. या सुविधांसाठी जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने निधीची तरतूद करावी आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी केसरकर यांनी केली.
कल्याण पूर्व मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड यांनी सावंतवाडी स्थानकाबाबत विशेष लक्षवेधी मांडली.आमदार संजय केळकर यांनी देखील कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाचा विषय सभागृहात लावून धरला.
आमदार सुनील प्रभू यांनी कोकण रेल्वे महामंडळाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. १९९८ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी हावडा एक्सप्रेस बंद करून कुर्ला-सावंतवाडी गाडी सुरू केली होती, मात्र आता ती मडगावपर्यंत वाढवण्यात आली आहे. “या गाड्यांमध्ये कोकणी माणसाला तिकीट मिळते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

👉 माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनसचा मुद्दा लावून धरत, “ट्रेन थांबली नाही तर पर्यटक कसे येणार?” असा सवाल उपस्थित केला.
👉 यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत तातडीची बैठक घ्यावी, अशी मागणी.
👉 यांनी कोरोना काळात रद्द झालेले थांबे पूर्ववत करण्याची मागणी केली.
👉 यांनी विलीनीकरणामुळे तांत्रिक-आर्थिक प्रश्न सुटतील, असे स्पष्ट केले.
👉 यांचा सवाल – “कोकणी माणसाला तिकीट मिळते का?”
📍 सावंतवाडी स्थानकातील अपुऱ्या सुविधा, रद्द झालेले थांबे आणि दुहेरीकरणाचा प्रश्न यावरून सरकारवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.
⚠️ मुख्य मागण्या: • कोकण रेल्वेचे तातडीने विलीनीकरण
• सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करणे
• रद्द झालेले थांबे पूर्ववत करणे
• स्थानकांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करणे
🔥 आता प्रश्न एकच — सरकार यावर तातडीने निर्णय घेणार का?

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563