नाशिक दि.२०: भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. खरातचे छुपे कारनामे जगासमोर आणणारा संशयित नीरज जाधव याला नाशिक क्राईम ब्रँचने अखेर ताब्यात घेतले आहे. नीरजच्या अटकेमुळे खरातच्या ‘काळ्या कुंडली’तील अनेक धक्कादायक गुपिते बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑफिस बॉय ते ब्लॅकमेलर?
मिळालेल्या माहितीनुसार, नीरज जाधव हा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये ‘ऑफिस बॉय’ म्हणून कामाला होता. कामावर असताना नीरजने खरातच्या नकळत त्याच्या ऑफिसमधील तब्बल ५८ सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवले होते. या व्हिडिओंमध्ये खरातचे आक्षेपार्ह कृत्य कैद असल्याचे समजते. याच व्हिडिओच्या जोरावर नीरजने खरातला ५ कोटी रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पीडितांचा वापर करून खंडणीचा कट?
अशोक खरातने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, नीरजने काही पीडित महिलांच्या मदतीने खरातला पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिर्डीतील एका महिलेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ वापरून खरातवर दबाव आणला गेल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही महिलांनी नीरज आपल्याला धमकावत असल्याची तक्रार खुद्द खरातकडेच केली होती, त्यानंतर खरातनेच त्यांना पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला होता. एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवून तिलाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप नीरजवर आहे.
भोंदू खरातचे ‘राजकीय’ कनेक्शन; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली?
अशोक खरातचे प्रस्थ केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे परराज्यातील राजकारण्यांपर्यंत पोहोचल्याचे उघड होत आहे.
हाय-प्रोफाईल भक्त: खरातचे भक्त केवळ सामान्य नागरिक नसून केंद्र आणि राज्यातील अनेक मोठे मंत्री, हरियाणा आणि राजस्थानमधील राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.
चाकणकरांवर निशाणा: या प्रकरणावरून आता राजकारण तापू लागले आहे. खरातचे अनेक उच्चपदस्थांशी असलेले लागेबांधे पाहता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता विरोधकांकडून आणि सामाजिक स्तरातून जोर धरू लागली आहे.
भोंदूगिरी आणि बलात्काराच्या आरोपाखाली खरात सध्या अटकेत असला, तरी आता नीरज जाधवच्या चौकशीतून या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ कोण आहे आणि यात किती मोठ्या नावांचा सहभाग आहे, हे स्पष्ट होईल.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*handhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,82756595



🚆🚩मुंबई दि.२०: आमदार सुलभा गायकवाड यांनी मांडल्या कोकणवासियांच्या प्रमुख मागण्या: ✅ कोरोना काळात रद्द केलेले थांबे त्वरित सुरू करा. ✅ सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करा. ✅ ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत समावेश करण्यासाठी पाठपुरावा करा. ✅ कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी राज्य सरकारने निधी द्यावा.
सावंतवाडी दि.२०: इस्कॉन (ISKCON) तर्फे श्री रामनवमी निमित्त एकदिवसीय रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असून भाविकांना श्रीरामभक्तीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🚩 🚠🛶 सावंतवाडी दि.२०: शहराच्या पर्यटनाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिकेच्या सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे. शहराबाहेरून गेलेला महामार्ग आणि रेल्वेमुळे पर्यटनात आलेली मरगळ झटकण्यासाठी आता ‘मोती तलाव ते नरेंद्र डोंगर’ असा भव्य रोप-वे (Ropeway) उभारण्याची मागणी करण्यात येणार आहे.
सावंतवाडी दि.१९: शहरात आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात करण्यात आले. सकल हिंदू समाज सावंतवाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने अवघी सावंतवाडी भगवीमय झाली होती. या सोहळ्यात भाजप युवा नेते विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन नागरिकांचा उत्साह वाढवला.

सावंतवाडी दि.१८: शहरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आज पुन्हा एकदा सालईवाडा परिसरात गव्यांचे दर्शन झाले. विशेष म्हणजे, बी.एस.एन.एल. (BSNL) ऑफिसच्या अगदी पाठीमागे असलेल्या नागरी वस्तीच्या जवळ हे गवे चरताना दिसून आले. भरवस्तीत गवे आल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

सावंतवाडी दि.१८ : मध्ये आज कोकण रेल्वेच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. चे मध्ये विलीनीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.