
सावंतवाडी दि.२६: केवळ घोषणाबाजी किंवा प्रशासनाच्या नावाने ओरड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आदर्श कसा उभा करावा, याचा वस्तुपाठ सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. रुजूल पाटणकर यांनी घालून दिला आहे. सर्वोदय नगर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष न करता, त्यांनी स्वखर्चाने रस्त्यांवरील धोकादायक खड्डे बुजवून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
प्रशासनाची वाट न पाहता पुढाकार
सर्वोदय नगर ते शिक्षक कॉलनी दरम्यानच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. अनेकदा अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या खड्ड्यांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून ॲड. रुजूल पाटणकर यांनी संताप व्यक्त करण्याऐवजी स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
‘रिअल हिरो’चे कौतुक
कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, ॲड. पाटणकर यांनी स्वखर्चाने खडी व साहित्याची जुळवाजुळव केली आणि परिसरातील सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातील नागरिकांकडून जोरदार कौतुक होत आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना ॲड. रुजूल पाटणकर म्हणाले की, “रस्त्यांवरील खड्डे हे अपघातांचे प्रमुख कारण ठरतात. समाजाचे देणे लागतो या भावनेतून मी हा छोटासा प्रयत्न केला आहे. प्रशासनावर टीका करण्यापेक्षा आपण स्वतः त्यात किती योगदान देऊ शकतो, हे महत्त्वाचे आहे.”
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. पाटणकर यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत सावंतवाडीकरांच्या मनात ‘रिअल हिरो’ म्हणून स्थान मिळवले आहे. त्यांच्या या कृतीशील कार्यामुळे सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, इतर नागरिकांसाठीही ही कृती प्रेरणादायी ठरली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सावंतवाडी,दि.२६: संदीप गावडे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, यामध्ये माडखोल धवडकी शाळा नं. २ ची विद्यार्थिनी संस्कृती चोपडे हिने २०० पैकी १८२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे, परीक्षा समितीचे अध्यक्ष सुधीर गावडे, सचिव दत्ताराम सावंत आणि समीर जाधव यांच्या उपस्थितीत हा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कुणकेरी नं. २ ची विद्यार्थिनी आराध्या झोरे १८० गुणांसह द्वितीय आली आहे. तृतीय क्रमांकावर सावंतवाडी शाळा नं. २ चा राहील शेख, चौथ्या क्रमांकावर तळवणे शाळा नं. ४ चा गौरांग वैज आणि पाचव्या क्रमांकावर तळवणे शाळा नं. ४ ची श्रावणी कवडे यांनी झेप घेतली आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १७२ गुण मिळवले आहेत. यंदा या परीक्षेसाठी एकूण ३२८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा एकूण निकाल ७४.०८ टक्के लागला आहे.या यशाबद्दल गावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेतील पहिल्या पाच यशस्वी विद्यार्थ्यांना सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे, तर त्यानंतरच्या ७५ विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.सन २०२५ आणि २०२६ चा संयुक्त बक्षीस वितरण सोहळा ३० एप्रिलला दुपारी २.०० वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपालिका हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वंदना सावंत, तेजस्विता वेंगुर्लेकर, उद्देश नाईक यांच्यासह संदीप गावडे फाउंडेशनच्या संपूर्ण कार्यकारिणीने आणि अभ्यासक्रम मंडळाने विशेष मेहनत घेतली आहे.
कणकवली दि.२६:तालुक्यातील ओटव येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय आजीचे तोंड दाबून, त्यांना बेडरूममध्ये डांबून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या नातवाला आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला (LCB) यश आले आहे. साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२३, रा. विरार) आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी मीरा-भाईंदर परिसरातून ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सावंतवाडी दि.२६: विधानसभा मतदारसंघात सध्या शैक्षणिक प्रगती आणि प्रशासकीय गतिमानता या दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. एकीकडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले, तर दुसरीकडे निरवडे येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या माध्यमातून शेकडो नागरिकांचे शासकीय प्रश्न मार्गी लावले गेले.
आंबोली दि.२६: नांगरतास परिसरात आज सकाळी एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका गव्याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
सावंतवाडी दि.२५: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यात सुमारे ६१ ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
सावंतवाडी दि.२५: आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात आपण तासन्तास मोबाईल, टीव्ही आणि संगणकासमोर घालवतो. मात्र, या डिजिटल गोंगाटामुळे आपल्या मेंदूला प्रचंड थकवा येतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रसिद्ध ड्युक विद्यापीठाने (Duke University) एक महत्त्वाचे संशोधन केले आहे. दररोज केवळ दोन तास पूर्ण शांततेत राहिल्याने मेंदूसाठी ते ‘नॅचरल रिसेट बटण’प्रमाणे काम करते, असे या संशोधनात समोर आले आहे.
सावंतवाडी दि.२५: विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांसह शाळेला आणि कला शिक्षिकांना मिळाले प्रतिष्ठेचे पुरस्कार