कुडाळ/माणगाव दि.१८: कोकणातील कलावैभवाचा वारसा जतन करणाऱ्या माणगाव येथील श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाने एक मानाचा टप्पा गाठला आहे. या विद्यालयाचा ‘गीत रामायणाचा’ २०० वा ऐतिहासिक कार्यक्रम उद्या, गुरुवार १९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे सादर होणार आहे. एका ग्रामीण भागातील संगीत संस्थेने परराज्यात जाऊन द्विशतकी कार्यक्रम सादर करणे, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
निजामाबादमध्ये श्रीराम नवमी उत्सवानिमित्त आयोजन तेलंगणा राज्यातील निजामाबाद-गाजुलपेठ, ब्रह्मपुरी येथील श्री बडाराम मठात श्रीराम नवमीनिमित्त नऊ दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गीत रामायणाचा हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. ग.दि. माडगूळकर रचित आणि बाबूजींच्या सुरावटीने सजलेल्या या अजरामर गीतांमधील निवडक गीते यावेळी सादर केली जातील.
हे कलाकार करणार सादरीकरण या द्विशतकी कार्यक्रमात श्री राजाराम गव्हाणकर आणि त्यांचे सहकारी प्रमोद मुंडे, संतोष परब तसेच बेलापूर (नवी मुंबई) येथील केंद्र संचालक गोपाळ पाटील आणि नागनाथ पाटील हे आपली कला सादर करणार आहेत.
१९९ वा कार्यक्रम तेर्सेबांबर्डे येथे संपन्न या प्रवासातील १९९ वा कार्यक्रम नुकताच तेर्सेबांबर्डे येथे उत्साहात पार पडला. यावेळी राजाराम गव्हाणकर (गायन व हार्मोनियम), प्रमोद मुंडे (तबला), संतोष परब (निवेदन), बालकलाकार विर आडसरे (ताल साथ) आणि निवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी कोरसची साथ दिली होती.
धार्मिक स्थळांवर उमटलाय ‘त्रिमूर्ती’चा ठसा श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाने यापूर्वी कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, नृसिंहवाडी, चाफळचे श्रीराम मंदिर आणि सज्जनगड यांसारख्या अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी आपली सेवा रुजू केली आहे. गोवा राज्यातही या संस्थेच्या कार्यक्रमांना रसिकांनी मोठी दाद दिली आहे. आता तेलंगणात होणाऱ्या या २०० व्या कार्यक्रमाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563




सावंतवाडी दि.१७ : तालुक्यातील धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
सातार्डा दि.१७: येथील पोलीस दूरक्षेत्राच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथे कार्यरत पोलीस कर्मचारी आणि तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. इमारतीचे छप्पर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त होत असून, या गंभीर प्रश्नाकडे सिंधुदुर्ग जिल्हा अन्याय निवारण समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडी दि.१७: येथील नवसरणी परिसरात आज दुपारी दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला होता. मात्र, ‘सामाजिक बांधिलकी’ चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत जखमीला स्वतःच्या दुचाकीवरून रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.
नवी मुंबई वाशी दि.१७: येथे महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘बाल मराठी साहित्य संमेलना’चा दिमाखात शुभारंभ झाला. या संमेलनाच्या भव्य ग्रंथदिंडीत सिंधुदुर्गच्या दोन सुपुत्रांनी पालखीचे भोई होण्याचा बहुमान मिळवला!
📍 सावंतवाडी दि.१७: “राजकीय हेतूने प्रेरित होऊन वकिलांचे चारित्र्यहनन करू नका, अन्यथा गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी आसिम सरोदे यांच्या आरोपांचा सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला.
सावंतवाडी दि.१७: येत्या २४ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या ‘मेगा मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिरा’च्या पार्श्वभूमीवर, आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पूर्व स्क्रीनिंग (तपासणी) कॅम्प उत्साहात पार पडला. या कॅम्पच्या माध्यमातून आगामी मुख्य शिबिरासाठी रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शित करण्यात आले.
सावंतवाडी दि.१६: “महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. वकिलांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, सारासार विचार करूनच आपले मतदान करावे,” असे आवाहन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सावंतवाडी येथे आयोजित वकील संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि वकिलांच्या समस्यांवर जोरदार भाष्य केले.