18.4 C
New York
Tuesday, July 7, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 49

माणगावच्या ‘त्रिमूर्ती संगीत विद्यालया’चा तेलंगणात डंका; उद्या होणार २०० वा गीत रामायण कार्यक्रम

कुडाळ/माणगाव दि.१८: कोकणातील कलावैभवाचा वारसा जतन करणाऱ्या माणगाव येथील श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाने एक मानाचा टप्पा गाठला आहे. या विद्यालयाचा ‘गीत रामायणाचा’ २०० वा ऐतिहासिक कार्यक्रम उद्या, गुरुवार १९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे सादर होणार आहे. एका ग्रामीण भागातील संगीत संस्थेने परराज्यात जाऊन द्विशतकी कार्यक्रम सादर करणे, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
निजामाबादमध्ये श्रीराम नवमी उत्सवानिमित्त आयोजन तेलंगणा राज्यातील निजामाबाद-गाजुलपेठ, ब्रह्मपुरी येथील श्री बडाराम मठात श्रीराम नवमीनिमित्त नऊ दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गीत रामायणाचा हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. ग.दि. माडगूळकर रचित आणि बाबूजींच्या सुरावटीने सजलेल्या या अजरामर गीतांमधील निवडक गीते यावेळी सादर केली जातील.
हे कलाकार करणार सादरीकरण या द्विशतकी कार्यक्रमात श्री राजाराम गव्हाणकर आणि त्यांचे सहकारी प्रमोद मुंडे, संतोष परब तसेच बेलापूर (नवी मुंबई) येथील केंद्र संचालक गोपाळ पाटील आणि नागनाथ पाटील हे आपली कला सादर करणार आहेत.
१९९ वा कार्यक्रम तेर्सेबांबर्डे येथे संपन्न या प्रवासातील १९९ वा कार्यक्रम नुकताच तेर्सेबांबर्डे येथे उत्साहात पार पडला. यावेळी राजाराम गव्हाणकर (गायन व हार्मोनियम), प्रमोद मुंडे (तबला), संतोष परब (निवेदन), बालकलाकार विर आडसरे (ताल साथ) आणि निवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी कोरसची साथ दिली होती.
धार्मिक स्थळांवर उमटलाय ‘त्रिमूर्ती’चा ठसा श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाने यापूर्वी कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, नृसिंहवाडी, चाफळचे श्रीराम मंदिर आणि सज्जनगड यांसारख्या अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी आपली सेवा रुजू केली आहे. गोवा राज्यातही या संस्थेच्या कार्यक्रमांना रसिकांनी मोठी दाद दिली आहे. आता तेलंगणात होणाऱ्या या २०० व्या कार्यक्रमाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

‘विश्वशांती’साठी पेटणार सर्वोदय नगरात प्रार्थना दीप; युद्धाच्या छायेतून मुक्तीसाठी रहिवाशांचे साकडे

सुनील राऊळ, अध्यक्ष सर्वोदय नगर रहिवासी संघ, सावंतवाडी

सावंतवाडी दि.१८: जगभरातील युद्धजन्य परिस्थिती, विशेषतः इराण आणि इस्राईल दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर होत आहे. या भीषण युद्धात निष्पाप जीव आणि चिमुकल्या बालकांच्या होणाऱ्या हत्यांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, मानव जातीवरील हे संकट टळावे आणि जगात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने सर्वोदय नगर रहिवाशी संघाच्या वतीने सामूहिक विश्वशांती प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ७:०० वाजता सर्वोदय नगर येथील गार्डनमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

प्रकाशाचा एक दीप, शांततेसाठी एक पाऊल
“चला पेटवूया एक दीप” या उपक्रमांतर्गत परिसरातील सर्व आबालवृद्धांना एक मेणबत्ती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी आणि ईश्वराकडे सामूहिक साकडे घालण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

स्थानिक समस्यांवरही होणार मंथन
शांती प्रार्थनेनंतर रहिवाशी संघाची महत्त्वाची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वोदय नगरातील धुळीची समस्या आणि इतर स्थानिक नागरी प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच मागील कार्यक्रमांच्या जमा-खर्चाचे वाचनही या सभेत केले जाईल.

या कार्यक्रमाला परिसरातील दोन्ही नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या उपस्थितीत रहिवाशांच्या समस्यांवर सहविचार केला जाणार आहे.

“जेव्हा मानवजात अनभिज्ञ अरिष्टाच्या उंबरठ्यावर उभी असते, तेव्हा प्रार्थना हाच एक मोठा आधार असतो. आपल्या नगरातून सुरू होणारा हा शांतीचा सूर विश्वापर्यंत पोहोचावा, हीच आमची भावना आहे. सर्वांनी या सामूहिक उपक्रमात सहभागी व्हावे.”
— सुनील राऊळ (अध्यक्ष, सर्वोदय नगर रहिवाशी संघ)

कार्यक्रमाचा तपशील:स्थळ: सर्वोदय नगर गार्डन
दिनांक: १८ मार्च २०२६
वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता

टीप: उपस्थित राहताना सोबत एक मेणबत्ती आणावी.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

*धाकोरे नंबर. १ शाळेत शिवकालीन शस्ञे प्रदर्शन उपक्रम*

सावंतवाडी दि.१७ : तालुक्यातील धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, नव्या पिढीला ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि शिवकालीन वारशाची जाणीव करून देणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाला धाकोरे सरपंच सौ.स्नेहा मुळीक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.यशश्री पवार , उपाध्यक्ष श्री.रविंद्र मुळीक , पोलीस पाटील धाकोरे श्री. श्रीराम प्रभुराळकर , पोलीस पाटील रेडी श्री.सिताराम राणे, दिपाली वैज, बबिता गावडे, इतिहास संशोधक ज्ञानेश्वर राणे , दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचे आबा चीपकर तसेचं पञकार मदन मुरकर , निलेश परब , नितेश तेली, निखिल पुळास्कर, नितिन गावडे यांच्यासह धाकोरे ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये मराठा शस्त्रागारातील मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार, बिचवा, वाघनखे, खंडा तलवार, नागीन तलवार, ढाल, जिरेटोप, तोफेची प्रतिकृती तसेच शिवकालीन ऐतिहासिक संदर्भग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले.

यावेळी इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन वस्तूंची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. अफजलखान वधावेळी वापरण्यात आलेल्या वाघनखांची माहिती सांगताना त्यांनी तो ऐतिहासिक प्रसंग जणू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेचं विविध दुर्गांची माहिती देत शिक्षणात्मक सत्रही घेण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिवकालीन शस्त्रे हाताळून त्यांची माहिती व अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिगंबर तळणकर,
सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री.सोनल जाधव, तर आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रेरणा गोवेकर यांनी केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

शहराचा पक्षी म्हणून ओळख असलेला भारद्वाज पक्षाला दिले जीवदान

जखमी भारद्वाज पक्षाला वनविभागाचे कर्मचारी यांच्याकडे सुपूर्त करताना आशिष सुभेदार

सावंतवाडी दि.१७: शहराचा पक्षी म्हणून ओळख असलेला भारद्वाज पक्षी मंगळवारी न्यू खासकीलवाडा येथे जखमी अवस्थेत आढळून आला. याबाबत ठाकरे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला पाचारण करत त्यांच्या ताब्यात दिले.

न्यू खासकीवाड्यातील रहिवासी वेलेरियन फुडतडू यांना हा भारद्वाज पक्षी आढळून आला. त्यांनी तातडीने याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांना दिली. श्री सुभेदार यांनी तात्काळ याची दखल घेत वनविभागाला पाचारण केले. जखमी असलेल्या भारद्वाज पक्षीला वनविभागाचे कर्मचारी यांनी दखल घेत पुढील उपचारासाठी नेले.वनरक्षक अमृतकर आणि फाटक यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत भारद्वाज पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत तत्परता दाखविली याबद्दल युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी त्यांचे आभार मानले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सातार्डा पोलीस दूरक्षेत्राच्या इमारतीची दयनीय अवस्था; छताचे सिमेंटचे पत्रे निखळून पडत असल्याने जीविताला धोका

सातार्डा दि.१७: येथील पोलीस दूरक्षेत्राच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथे कार्यरत पोलीस कर्मचारी आणि तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. इमारतीचे छप्पर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त होत असून, या गंभीर प्रश्नाकडे सिंधुदुर्ग जिल्हा अन्याय निवारण समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

पाच वर्षांतच इमारतीची दुरवस्था
सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ पाच वर्षांपूर्वी ही इमारत सिमेंटच्या पत्र्यांचा वापर करून उभारली होती. मात्र, अल्पावधीतच या इमारतीला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. छताला आतून करण्यात आलेले सिमेंटच्या पत्र्यांचे कोटिंग आता निखळून पडू लागले आहे. पावसाळ्यातील ओलावा आणि उन्हाळ्यातील प्रखर उष्णता यामुळे हे पत्रे ठिसूळ झाले असून, कार्यालय, किचन आणि विश्रांती कक्षात हे पत्रे केव्हाही अंगावर पडू शकतात, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

अधीक्षकांचे वेधले लक्ष
या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष साईप्रसाद कल्याणकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार: सुदन कवठणकर
या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे म्हटले आहे. पोलीस आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी: नवसारी येथे दोन मित्रांमध्ये हाणामारी; ‘सामाजिक बांधिलकी’च्या मदतीने जखमी तरुणाला जीवदान

सावंतवाडी दि.१७: येथील नवसरणी परिसरात आज दुपारी दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला होता. मात्र, ‘सामाजिक बांधिलकी’ चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत जखमीला स्वतःच्या दुचाकीवरून रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.

नेमकी घटना काय?
आज दुपारी ३ च्या सुमारास नवसरणी येथे आनंद भोसले (वय ४८, रा. कोल्हापूर) आणि त्याच्या एका मित्रामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादातून झालेल्या हाणामारीत आनंद भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक पॅनर परेरा यांनी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांना दिली.

रवी जाधव यांची तत्परता
घटनेचे गांभीर्य ओळखून रवी जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. जखमी आनंद भोसले हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रुग्णवाहिकेची वाट न पाहता, जाधव यांनी जखमीला आपल्या स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू
सध्या जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या धावपळीत सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्यासह रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि पॅनर परेरा यांनी मोलाचे सहकार्य केले. वेळेत मदत मिळाल्याने जखमीचा जीव वाचल्याबद्दल परिसरातून या सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 सिंधुदुर्गाच्या साहित्याचा वाशीत डंका! 🚩

नवी मुंबई वाशी दि.१७: येथे महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘बाल मराठी साहित्य संमेलना’चा दिमाखात शुभारंभ झाला. या संमेलनाच्या भव्य ग्रंथदिंडीत सिंधुदुर्गच्या दोन सुपुत्रांनी पालखीचे भोई होण्याचा बहुमान मिळवला!

✨ मानकरी:
म. ल. देसाई (महादेव लक्ष्मण देसाई) – सदस्य, विश्व निर्मिती
कविवर्य विठ्ठल कदम – सदस्य, साहित्य संस्कृती मंडळ

शिवाजी चौक ते सिडको भवन दरम्यान निघालेल्या या दिंडीत पारंपारिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि मराठी भाषेचा जयघोष पाहायला मिळाला. कोकणच्या मातीतील साहित्यिकांनी या सोहळ्याचे सारथ्य करणे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. 👏✨

ग्रंथदिंडीत म. ल. देसाई व विठ्ठल कदम यांना पालखीच्या भोईचा मान! 🏆

नवी मुंबई – वाशी येथील बाल मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ उत्साहात झाला. यातील मुख्य आकर्षण ठरलेल्या ग्रंथदिंडीमध्ये सिंधुदुर्गातील म. ल. देसाई आणि कविवर्य विठ्ठल कदम यांनी पालखीचे भोई होण्याचा सन्मान स्वीकारला.

महाराष्ट्र शासनाच्या भाषा मंत्रालयामार्फत आयोजित या सोहळ्यात अनेक दिग्गज साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वाशीच्या रस्त्यांवरून निघालेली ही ग्रंथदिंडी मराठी भाषेचा गौरव करणारी ठरली. सिंधुदुर्गाच्या साहित्य क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे! 🎉

📍 नवी मुंबई: बाल मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य ग्रंथदिंडीत सिंधुदुर्गच्या म. ल. देसाई आणि विठ्ठल कदम यांना ‘पालखीचे भोई’ होण्याचा बहुमान! 🚩

महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाचा स्तुत्य उपक्रम. वाशीतील सिडको भवन येथे रंगला मराठी साहित्याचा जागर. 📚✨

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी वकील संघटनेचा ॲड. आसिम सरोदे यांना सडेतोड इशारा! ⚖️🔥

📍 सावंतवाडी दि.१७: “राजकीय हेतूने प्रेरित होऊन वकिलांचे चारित्र्यहनन करू नका, अन्यथा गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी आसिम सरोदे यांच्या आरोपांचा सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला.
यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी ऍड शामराव सावंत, अनिल केसरकर, गोविंद बांदेकर अमोल कविटकर स्वप्नील कोलगावकर  सुमित सुकी सिद्धी परब संकेत नेवगी अंकुश ठाकूर राहुल मडगावकर प्रतीक्षा भिसे सुशील राजगे आदी उपस्थित होते.

✅ प्रमुख मुद्दे: 🔹 सरोदे यांचे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित. 🔹 संग्राम देसाई यांच्या माध्यमातून वकिलांसाठी खंडपीठ, एआय रिसर्च सेंटर आणि संरक्षण कायद्याचे मोठे काम. 🔹 निवडणूक प्रक्रिया निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली पूर्णपणे पारदर्शक. 🔹

‘चळवळ बदनाम होत आहे’
‘निर्भय बनो’ चळवळीच्या नावाखाली चुकीच्या प्रवृत्तींना थारा दिला जात असल्याचा आरोप.
“आम्ही ‘निर्भय बनो’च्या अनेक सभा घेतल्या आहेत, मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसोबत काम करण्यात सरोदे यांना काय रस आहे? अशाने चळवळ बदनाम होत आहे,” अशी टीका ॲड. संदीप निंबाळकर यांनी केली. तर ॲड. बी. बी. रणशूर यांनी स्पष्ट केले की, सावंतवाडी वकील संघटनेकडे सभेसाठी कोणताही अधिकृत अर्ज आला नव्हता; संघटना सर्व सदस्यांच्या संमतीनेच निर्णय घेते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ‘मेगा मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिर’ पूर्व तपासणी शिबिर संपन्न

 

सावंतवाडी दि.१७: येत्या २४ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या ‘मेगा मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिरा’च्या पार्श्वभूमीवर, आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पूर्व स्क्रीनिंग (तपासणी) कॅम्प उत्साहात पार पडला. या कॅम्पच्या माध्यमातून आगामी मुख्य शिबिरासाठी रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शित करण्यात आले.
दिग्गजांच्या उपस्थितीत उद्घाटन
या विशेष पूर्व तपासणी शिबिराचे उद्घाटन नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना बांदेकर यांनी नागरिकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणारे हे शिबिर सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त रुग्णांनी आपली नावनोंदणी करून तपासणी करून घ्यावी,” असे ते म्हणाले.
तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती
या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
वैद्यकीय अधीक्षक: डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, तज्ञ डॉक्टर: डॉ. देसाई, डॉ. अवधूत, डॉ. रेड्डी, डॉ. सागर जाधव, डॉ. अटक.
तसेच: टी.एम.ओ (TMO) ऑफिस कर्मचारी, प्राथमिक आरोग्य कर्मचारी आणि व्यापारी मुंज यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य शिबिराचे स्वरूप (२४ मार्च रोजी)
आगामी २४ मार्च रोजी होणाऱ्या महाशिबिरामध्ये विविध व्याधींवरील नामांकित तज्ञ डॉक्टर रुग्णसेवा देणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील विभागांचे तज्ञ उपलब्ध असतील हृदयरोग तज्ञ,कर्करोग (कॅन्सर) तज्ञ,मधुमेह व हार्मोन तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ
युरोलॉजिस्ट (मूत्रविकार तज्ञ),हाडांचे तज्ञ (ऑर्थोपेडिक)
जनरल सर्जन या पूर्व तपासणी कॅम्पमुळे कोणत्या रुग्णाला कोणत्या तज्ञाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, हे निश्चित करण्यात आले असून, यामुळे मुख्य शिबिराच्या दिवशी होणारी गर्दी टाळून रुग्णांना शिस्तबद्ध पद्धतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बार कौन्सिल निवडणूक पारदर्शक व्हावी; वकील असीम सरोदे यांचा सावंतवाडीतून एल्गार

सावंतवाडी दि.१६: “महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. वकिलांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, सारासार विचार करूनच आपले मतदान करावे,” असे आवाहन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सावंतवाडी येथे आयोजित वकील संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि वकिलांच्या समस्यांवर जोरदार भाष्य केले.

राजकीय गुलामगिरी स्वीकारणाऱ्यांपासून सावध राहा
निवडणुकीला उभे असलेल्या काही उमेदवारांवर टीका करताना सरोदे म्हणाले की, “जे उमेदवार राजकीय गुलामगिरी स्वीकारून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या मनात पराभवाची भीती आहे. ते खऱ्या अर्थाने वकिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. महाराष्ट्रात असा अनुभव कुठेच आला नव्हता, मात्र सावंतवाडीत तो पाहायला मिळत आहे.” बार कौन्सिलने वकिलांच्या न्याय्य हक्कांसाठी लढले पाहिजे, समाजात भ्रम पसरवू नये, असेही त्यांनी नमूद केले.

न्यायालय कोणाची खासगी मालमत्ता नाही
न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, न्यायालय हे ‘पब्लिक प्लेस’ असून ते संविधानात्मक दृष्टिकोनातून समाजासाठी काम करण्यासाठी आहे. “न्यायालय कोणाच्या मालकीचे नाही. जे निवडून आले आहेत ते केवळ प्रतिनिधी आहेत, मालक नाहीत. न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्यांनी हा गैरसमज दूर करावा,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, न्यायाधीशांनी सत्कार स्वीकारताना विचार करावा आणि पोलीस प्रशासनाने निवृत्त न्यायाधीशांचा अवमान करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडीतील कार्यक्रमाला मज्जाव आणि दबावतंत्राचा आरोप
सावंतवाडीतील कार्यक्रमाबाबत बोलताना सरोदे यांनी गंभीर आरोप केले. “येथील खरी वस्तुस्थिती समोर येईल या भीतीने पोलिसांच्या दबावातून या कार्यक्रमात अडथळा आणला गेला. स्थानिक वकिलांवर दबाव टाकण्यात आला. संग्राम देसाई यांनी पदाचा गैरवापर करून कार्यक्रम करण्यास मज्जाव केला असेल, तर अशी व्यक्ती पदावर राहण्यास पात्र नाही,” असे ते म्हणाले. बार कौन्सिलची निवडणूक आता राजकीय होत चालली असून वकिलांना दबावाखाली ठेवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

२ लाख १५ हजार वकिलांच्या कल्याणाचे काय?
“मी स्वतः निवडणूक लढवत नाही, पण समाजासाठी आणि वकिलांच्या हितासाठी महाराष्ट्रभर फिरत आहे. महाराष्ट्रात २ लाख १५ हजार वकील आहेत, त्यांच्या कल्याणासाठी बार कौन्सिलने गेल्या काही वर्षांत काय केले, हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे,” असे सरोदे यांनी म्हटले. तसेच, बार कौन्सिलमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी असावा आणि कामकाजात पूर्ण पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली.

बोगस मतदारांचा प्रश्न आणि तक्रारी
बार कौन्सिलच्या निवडणुकीत बोगस नावांचा वापर करून निवडणूक लढवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष कमिटी नेमण्याची गरज व्यक्त केली. “माझ्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र वकिलांवर अन्याय होऊ देणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563