नवी दिल्ली दि.१६: लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. “सरकार एकीकडे हाय-स्पीड कॉरिडॉरच्या गप्पा मारत असताना, सामान्य रेल्वे प्रवाशांना मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे,” अशा शब्दांत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
सीएसएमटीवर महाराजांच्या पुतळ्याला विरोध का?
खासदार सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा बसवण्यास होत असलेल्या विलंबावर तीव्र संताप व्यक्त केला. “जर केवडिया स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो, तर शिवरायांच्या नावाने असलेल्या स्थानकावर त्यांचा पुतळा बसवण्यास ‘नीती’चे कारण देऊन नकार का दिला जातो?” असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.
रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अद्याप अधांतरी
मुंबईतील ब्रिटीशकालीन नावे बदलण्याच्या आश्वासनांचा त्यांनी समाचार घेतला. निवडणुकीच्या काळात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स आणि चर्नी रोड या स्थानकांच्या नामांतराचे फलक दिसले, मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असे ते म्हणाले. तसेच, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.
कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि दुहेरीकरणाची मागणी
कोकणवासीयांच्या व्यथा मांडताना सावंत म्हणाले की, सणासुदीच्या काळात कोकण रेल्वेचा प्रवास अत्यंत खडतर होतो. यावर उपाय म्हणून:
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे.संपूर्ण मार्गाचे तातडीने दुहेरीकरण करावे.
कोकणच्या विकासासाठी बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे दुहेरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
बुलेट ट्रेनमुळे घरांना तडे; शेतकऱ्यांचे प्रश्न
बुलेट ट्रेन प्रकल्पावर टीका करताना त्यांनी पालघर जिल्ह्यातील सपाडे परिसरातील घरांचे उदाहरण दिले. टनेलसाठी केलेल्या स्फोटांमुळे सुमारे १०० ते १५० घरांना मोठ्या भेगा पडल्या असून कंत्राटदारांकडून मिळणारी मदत तोकडी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या वारसांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष केवळ प्रवाशांच्याच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी आवाज उठवला.
“मुंबईतील मोटरमन सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. कामाचे वाढते तास आणि केबिनमधील गोंगाटामुळे अनेक जण राजीनामे देत आहेत,” असे ते म्हणाले.
याशिवाय, ट्रॅकची सुरक्षा करणाऱ्या गँगमन आणि खलाशी यांच्या समस्यांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563




सिंधुदुर्गनगरी दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांची समृद्ध माहिती जागतिक पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “आपलो सिंधुदुर्ग” या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दुसरी कार्यशाळा जिल्हा परिषद ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सावंतवाडी दि.१६: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. रंगभरण स्पर्धेत धन्विका सचिन मुळीक तर चित्रकला स्पर्धेत प्रार्थना प्रणय नाईक प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली. ही पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतीचा विकास या कामांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सन्मानामुळे राज्यातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या मानाच्या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग दि.१६: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीमध्ये १९ मार्च रोजी भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. सकल हिंदू समाज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.ही शोभायात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता राजवाडा येथून सुरू होईल. यात्रेचा मार्ग नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक, शिवरामराजे पुतळा मार्गे भोसले उद्यान येथे संपणार आहे. हिंदू धर्माचे नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आणि सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक श्री. शैलेश गुरुदास पै आणि सह-संयोजिका श्रीम. सौ. गायत्री गुरुदास देवस्थळी यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.या पत्रकार परिषदेत खजिनदार आनंद साधले, विकास रांगणेकर, विशाखा रांगणेकर, कस्तुरी देवस्थळी, दिनेश गावडे आदी उपस्थित होते. या नववर्ष स्वागत यात्रेत विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात येत असून, विविध संस्था आणि उत्सव समित्या यात सक्रिय सहभाग घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या यात्रेत आरंभ सखी, बजरंग दल, दुर्गावाहिनी, एकमुखी दत्तमंदिर ट्रस्ट, घे भरारी, गोरक्षक, हरेकृष्ण संस्कार केंद्र, हिंदू वैश्य वाणी संघटना, पाटीदार समाज, पुर्व सैनिक सेवा परिषद, रासाई कला क्रीडा मंडळ, रिक्षा संघटना, सालईवाडा मित्रमंडळ, समता महिला मंडळ, सनातन संस्था, शिवकन्यका, शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तान, श्री. रामानंद संप्रदाय नरेंद्र महाराज, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सुवर्णकार संघ, वैश्यवाडा मित्रमंडळ, वेदपाठशाळा सावंतवाडी, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, विद्याभारती शिशुवाटिका, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांचा समावेश आहे. हिंदू नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे संयोजक शैलेश पै व सह संयोजक सौ गायत्री देवस्थळी यांनी आवाहन केले आहे.
सावंतवाडी दि.१६: कोकण रेल्वे मार्ग आता कात टाकणार आहे. मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा विलंब टाळण्यासाठी ‘पॅच डबलिंग’चा (टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.