11.3 C
New York
Monday, May 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 6

सावंतवाडीत उद्या ठाकरे शिवसेनेची तातडीची बैठक; कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी दि.२०: आगामी राजकीय घडामोडी आणि पक्ष बांधणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सावंतवाडी तालुका स्तरावरील महत्त्वाची बैठक उद्या, २१ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी दिली आहे.

बैठकीचा तपशील:
दिनांक: मंगळवार, २१ एप्रिल २०२६
वेळ: सायंकाळी ४:०० वाजता
स्थळ: शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,संचयनी पॅलेस,सावंतवाडी.

रुपेश राऊळ यांचे मार्गदर्शन
या बैठकीला विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांचे नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क वाढवण्याबाबत ते उपस्थित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तालुकाप्रमुखांचे आवाहन
तालुक्यातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी विधानसभा ‘शिवसेना BLA प्रमुख’ पदी नियुक्ती

सावंतवाडी दि.२०: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना जिल्हा सचिव श्री. परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा ‘शिवसेना बिएलए (Booth Level Agent) प्रमुख’ म्हणून महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार करण्यात आली आहे.

संघटनात्मक कौशल्याची पावती
परीक्षित मांजरेकर यांनी आजवर जिल्हा सचिव म्हणून काम करताना तळागाळातील कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क ठेवला आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विधानसभा स्तरावरील बूथ यंत्रणा सक्षम करण्याची मोठी धुरा सोपवली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यातील बुथ प्रमुखांचे जाळे विणणे आणि निवडणूक प्रक्रियेत बुथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करणे, ही त्यांची मुख्य जबाबदारी असणार आहे.

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून अभिनंदन
मांजरेकर यांच्या नियुक्तीची घोषणा होताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मांजरेकर म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवत आगामी काळात महायुती आणि शिवसेनेची ताकद प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून परीक्षित मांजरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत भक्तिमय वातावरणात ‘औदुंबर स्वामी’ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

सावंतवाडी दि.२०: शहराच्या आध्यात्मिक वैभवात आज एका नवीन अध्यायाची भर पडली आहे. येथील पोलीस स्टेशनच्या समोर नूतन बांधण्यात आलेल्या ‘औदुंबर स्वामी मंदिराचा’ प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे संपूर्ण पोलीस ठाणे परिसर आणि सावंतवाडी शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.

धार्मिक विधी आणि प्राणप्रतिष्ठापना
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे मंत्रघोषाने करण्यात आली. वेदोक्त मंत्रांच्या उच्चारामुळे वातावरणात एक वेगळेच चैतन्य पसरले होते. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर दिवसभर लघुरुद्र अभिषेक, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली, ज्यात प्रामुख्याने:मिलीश शर्मा (उपवनसंरक्षक, सावंतवाडी वन विभाग),विनोद कांबळे (उपविभागीय पोलीस अधिकारी)
संजू परब (शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष)
बबन साळगावकर (माजी नगराध्यक्ष) अॅड अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष),विद्याधर परब (जिल्हा बँक सदस्य) व सुरेश भोगटे (माजी नगरसेवक)
यांच्यासह सुहास पाटील (वनक्षेत्रपाल), पंकज शिंदे, जयेश खंदरकर (पोलीस उपनिरीक्षक) आदींनी श्रींचे दर्शन घेतले.
सहकार्यकर्त्यांचा सन्मान
मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा आणि कार्यकर्त्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये अच्युत भोसले (भोसले नॉलेज सिटी), उद्योजक शैलेश पै, शैलेश नाबर, अमित व अनिकेत आसोलकर, शासकीय ठेकेदार अरविंद सावंत, प्रताप मूर्ती, गौरेश सावंत आणि पोलीस कर्मचारी अमित राऊळ, मनोज राऊत आदींचा समावेश होता.

सोहळ्याची सांगता
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अमोल टेबकर, भुवन नाईक, अक्षय माशाळ, सचिन मोरजकर यांसह अनेक सदस्यांनी विशेष सहकार्य केले. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. महाप्रसादाने या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली.पोलीस स्टेशन समोरील हे औदुंबर स्वामी मंदिर आता भाविकांसाठी श्रद्धेचे एक मुख्य केंद्र बनले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

बेळगावात अडीच लाखांचे हेरॉईन जप्त; सावंतवाडीच्या तरुणासह दोघांना अटक

बेळगाव दि.२०:अंमली पदार्थ विक्री विरोधात बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणी सावंतवाडी येथील एका तरुणासह दोघांना अटक करण्यात आली असून, सीसीबी (शहर गुन्हे शाखा) पोलिसांनी ही कारवाई केली.अखेरीस ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा संशय तंतोतंत खरा ठरला,गोवा व कर्नाटक राज्यातील अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याचे सिंधुदुर्ग कनेक्शन वेळोवेळी उघड होत आहे.

सावंतवाडी कनेक्शन आणि कारवाईचा तपशील: अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे नागेश मधुकर भगत (वय ३५, मूळ रा. सावंतवाडी, सध्या रा. सुळगा) आणि राहुल ज्योतिबा जाधव (वय ३३, रा. कंग्राळी केएच, सध्या रा. सुळगा) अशी आहेत. सुळगा गावातील देशपांडे गल्ली येथे हे दोघे अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

श्वान पथकाची कामगिरी: पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी (१८ एप्रिल) या ठिकाणी छापा टाकला. यावेळी श्वान पथकातील ‘अधिती’ या श्वानाने घरातील उशीत लपवून ठेवलेले अमली पदार्थ शोधून काढले. पोलिसांनी १२.९२ ग्रॅम वजनाच्या एकूण ११९ हेरॉईनच्या पुड्या आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

मुंबईतून येत होता माल: प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे संशयित मुंबईतील कोळीवाडा परिसरातील ‘संतोष’ नावाच्या व्यक्तीकडून हेरॉईन आणून बेळगाव परिसरात विक्री करत होते. सध्या तो तिसरा संशयित पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीत क्रिकेटचा महासंग्राम: ‘ओम स्पोर्ट्स’ अजिंक्य! युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते गौरव; १७ दिवसांच्या थराराचा भव्य समारोप

सावंतवाडी दि.२०: शहरात गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेने रविवारी क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एस.एन.आर.आर. ग्रुप आयोजित आणि सावंतवाडी भाजपा पुरस्कृत या स्पर्धेत स्थानिक ‘ओम स्पोर्ट्स’ संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले. भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळा जल्लोषात पार पडला.

स्पर्धेचे ठळक मुद्दे:
सहभागी संघ: सावंतवाडी, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि गोवा येथील एकूण १६ दिग्गज संघ.
अंतिम सामना: सावंतवाडीच्या ‘ओम स्पोर्ट्स’ विरुद्ध ‘एबी इलेव्हन सावंतवाडी’ यांच्यात चुरशीची लढत.
विजेता पद: ओम स्पोर्ट्स (सावंतवाडी) – १ लाख रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी.
उपविजेता पद: एबी इलेव्हन (सावंतवाडी) – ५० हजार रुपये रोख आणि ट्रॉफी.

विशाल परब यांचा खेळाडूंना कानमंत्र
विजेत्यांना सन्मानित करताना विशाल परब यांनी खेळाडूंमध्ये नवचैतन्य भरले. ते म्हणाले,
“खेळ हा केवळ मनोरंजन नसून तो व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपली चमक दाखवण्याची संधी मिळते. इथूनच उद्याचे क्रीडातारे घडतील.”

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह केतन आजगांवकर, राजन नाईक, राजा राणे, बाबा रेडकर, रघू धारणकर, गुरू चिटणीस, संतोष केनवडेकर, शोएब बेग, धिरेंद्र म्हापसेकर आणि सुदेश नेवगी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

१७ दिवस चाललेल्या या क्रिकेटच्या उत्सवामुळे सावंतवाडी परिसरातील वातावरण पूर्णपणे ‘क्रीडामय’ झाले होते. उत्कृष्ट नियोजन आणि चुरशीच्या सामन्यांमुळे ही स्पर्धा जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

दोडामार्ग-बांदा रस्ता रक्ताने माखला; एसटी बसच्या धडकेत कुडासे येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दोडामार्ग दि.१९: अक्षय तृतीयेच्या सणासुदीच्या दिवशीच दोडामार्ग तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसने सासोली-हेदूस येथे दिलेल्या धडकेत कुडासे-वानोशी येथील दिलीप हळणकर (वय ५८) यांचा जागीच मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप हळणकर हे आपल्या दुचाकीने इब्रामपूरहून बांदा-दोडामार्ग मुख्य रस्त्यावर येत होते. त्याच वेळी पणजीहून दोडामार्गमार्गे धाराशिवकडे जाणारी बस समोरून आली. बस चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला नेली. हा प्रयत्न इतका भीषण होता की, रस्त्याशेजारील एका स्टॉलचे पत्रेही बसच्या धडकेने उडाले. मात्र, चालकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही दुचाकी आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.

कुडासे गावावर शोककळा
या भीषण अपघातात दिलीप हळणकर यांचा जागीच अंत झाला. ते एका खासगी कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच घरातील कर्त्या पुरुषाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुडासे गावावर दुःखा डोंगर कोसळला आहे.

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

महिला आरक्षणावर काँग्रेसचा ‘डबल गेम’; साक्षी वंजारींनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडावी!

भाजप जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांचा घणाघात; मतदारसंघ पुनर्रचनेवरून काँग्रेसला घेरले

सौ श्वेता कोरगावकर

सावंतवाडी दि.१९: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका ही अत्यंत हतबल आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे. काँग्रेस सध्या या विषयावर ‘राजकीय डबल गेम’ खेळत असून, यावर भाष्य करणाऱ्या काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांनी आधी ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) या संकल्पनेचा नीट अभ्यास करावा, असा खोचक टोला भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी लगावला आहे.

काँग्रेसवर टीकेची झोड

श्वेता कोरगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की: प्रगतीत अडथळा: अनेक दशकांपासून केवळ आश्वासने देणाऱ्या काँग्रेसने संसदेत आपले खरे स्वरूप उघड केले आहे. ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसने घेतलेली भूमिका ही महिलांच्या प्रगतीत अडथळा आणणारी आहे.

डबल गेम: काँग्रेस एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र महिलांचे हक्क डावलण्याचे काम करते.

‘डिलिमिटेशन’ वरून सवाल

२०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवताना कोरगावकर यांनी विचारले की, साक्षी वंजारी यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या गुंतागुंतीचा अभ्यास केला आहे का?

“नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना झाल्याशिवाय आरक्षणाची अंमलबजावणी तांत्रिकदृष्ट्या कठीण होती. या प्रक्रियेला १० ते १२ वर्षे लागू शकली असती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना या आरक्षणाचा लाभ तातडीने मिळावा अशी स्पष्ट आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही भूमिका महिलाहिताची असतानाही काँग्रेस त्याला विरोध करत आहे, हे दुर्दैवी आहे.”

महिला शक्ती देशाच्या प्रगतीचा आधार

भारतासारख्या विशाल देशात महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळणे काळाची गरज असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की: निर्णय प्रक्रिया: ज्या कुटुंबात महिलांचे मत विचारात घेतले जाते, त्या कुटुंबाची प्रगती होते; त्याच धर्तीवर देशातही सकारात्मक बदल घडवण्यासाठी महिलांना लोकसभेत आरक्षण मिळणे आवश्यक आहे.

मतदारांचा कौल: काँग्रेसच्या या दिशाभूल करणाऱ्या राजकारणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुजाण महिला मतदानातून योग्य उत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप आणि महायुती सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली असताना, काँग्रेसकडून केवळ संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत कोरगावकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚩 पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा! 🚩

💰 १० लाखांचा निधी मंजूर; संजू परब यांच्या हस्ते दिमाखात पार पडले भूमिपूजन!

सावंतवाडी दि.१९: तालुक्यातील पारपोली गावचे ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचे रूप आता पालटणार आहे. शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आज या विकासकामाचे अधिकृत भूमिपूजन जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आले.

“धार्मिक स्थळांचा विकास आणि जतन करणे ही काळाची गरज आहे. ग्रामस्थांच्या सोयीसुविधांसाठी आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे शिवसेना नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील.”— संजू परब (जिल्हाप्रमुख)

यावेळी पारपोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या या निधीबद्दल ग्रामस्थांनी आमदार केसरकर यांचे आभार मानले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

जिद्द आणि चिकाटीचे फळ! शेतकरी कुटुंबातील दया पालवची पोलीस दलात निवड; महेंद्रा अकॅडेमीच्या शिरपेचात मानाचा तुरा ठाणे ग्रामीण पोलीस दलात निवडीमुळे सावंतवाडी परिसरात आनंदाचे वातावरण

सावंतवाडी दि.१९: तळकोकणच्या लाल मातीतील संघर्षाला जिद्दीची जोड देत, सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडेमीची विद्यार्थिनी दया पालव हिने पोलीस होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. दयाची ठाणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाली असून, तिच्या या यशामुळे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याची भावना व्यक्त होत आहे. संघर्षातून खाकी वर्दीपर्यंतचा प्रवास दया पालव ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही तिने कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. स्पर्धा परीक्षेचा कठीण मार्ग, शारीरिक मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. कष्टाला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश नक्की मिळते, हेच दयाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. परिसरातून कौतुकाचा वर्षाव दयाच्या या निवडीची बातमी समजताच सावंतवाडी आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महेंद्रा अकॅडेमीच्या शिक्षकांनी, नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील आणि विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुली अशा प्रकारे मोठ्या पदावर विराजमान होत असल्याने इतर तरुण-तरुणींसाठी ती एक प्रेरणास्थान ठरली आहे. महेंद्रा अकॅडेमीचे यशस्वी पाऊल विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या महेंद्रा अकॅडेमीसाठी हा सुवर्णक्षण ठरला आहे. संस्थेचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी दयाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, “दयाचे यश हे तिच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. तिने घेतलेली ही भरारी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना उंच झेप घेण्याची प्रेरणा देईल. तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस आमच्या खूप शुभेच्छा!” दया पालव हिच्या या यशामुळे कोकणच्या सुपुत्रीने पुन्हा एकदा आपल्या जिद्दीच्या जोरावर ‘खाकी’ मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/ *अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज* 🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क : 📱9422054887,8275659563

भाजपची रॅली म्हणजे ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’! 🚩 विरुद्ध ✋महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल!

सावंतवाडी दि.१९: सावंतवाडीत भाजपने काढलेल्या रॅलीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजपच्या ‘क्रेडिट पॉलिटिक्स’चा समाचार घेताना सडकून टीका केली आहे.

📌 मुख्य आरोप आणि मुद्दे:
🔹 प्रसिद्धीचा हव्यास: “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या म्हणीप्रमाणे भाजपने केवळ प्रसिद्धीसाठी घाईघाईत रॅली काढली. एक दिवसही संयम न दाखवता श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद आहे.

🔹 विद्यार्थ्यांचा वापर: स्वतःच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा राजकीय रॅलीसाठी वापर करणे चुकीचे आहे. ज्यांना आरक्षणाचे महत्त्व ठाऊक नाही, अशा विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

🔹 फसवणुकीचा डाव: काल मांडलेले विधेयक हे आरक्षणाचे नसून ‘मतदारसंघ पुनर्रचना’ (Delimitation) संदर्भातील होते. आरक्षणाची अंमलबजावणी लांबणीवर टाकून महिलांची फसवणूक केली जात आहे.

✋ काँग्रेसची स्पष्ट भूमिका:
✅ महिला आरक्षण तात्काळ लागू झाले पाहिजे.
✅ आरक्षणात ओबीसी (OBC) महिलांसाठी स्वतंत्र कोटा असावा, जेणेकरून सत्तेत खरा ‘सामाजिक न्याय’ प्रस्थापित होईल.
✅ केवळ उच्चवर्गीयांपुरते आरक्षण मर्यादित न राहता ते तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावे.

“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीचा जुमला नसावा, तर तो समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देणारा मार्ग असावा.”
— सौ. साक्षी वंजारी (अध्यक्षा, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563