22.7 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 64

कणकवली हादरली! प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा गोळी झाडून खून; शहरात खळबळ

सुशांत जनार्दन दळवी

कणकवली दि.२७: शहरातील मुडेडोंगरी परिसरात शुक्रवारी पहाटे एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा गोळी झाडून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुशांत जनार्दन दळवी (वय ४०) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत दळवी हे मूळचे कळसुली गावसेवाडी येथील रहिवासी असून सध्या कणकवलीत स्थायिक होते. शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुडेडोंगरी येथील नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ, मोहन मळा येथील पायवाटेवर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. एका स्थानिक कामगाराला हा मृतदेह प्रथम दिसला, ज्याने तातडीने मालकाला आणि पोलिसांनी माहिती दिली.

हत्येचा थरार आणि पोलिसांचा अंदाज
प्राथमिक तपासानुसार, मध्यरात्रीनंतर अज्ञात हल्लेखोरांनी दळवी यांच्या डोक्याच्या मध्यभागी पिस्तुलाने गोळी झाडून त्यांची हत्या केली. गोळी झाडल्यानंतर मृतदेह काही अंतर ओढत नेऊन पायवाटेवर टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग आणि संघर्षाच्या खुणा आढळून आल्या आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक पवन कांबळे, अनिल हाडळ, वृषाली बरगे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पुराव्यांच्या संकलनासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.

तपासाचे चक्र वेगाने
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा पूर्वनियोजित घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

सध्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚩 राम जन्मला ग सखे… सावंतवाडीत रामजन्मोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह! 🚩

सावंतवाडी दि.२६: ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने आणि ‘राम जन्मला ग सखे…’ या मंगल सुरावलींनी आज संपूर्ण सावंतवाडी शहर आणि तालुका दुमदुमून गेला. ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
📍 गांधी चौकातील ८१ वर्षांची परंपरा कायम! सावंतवाडीच्या मध्यवर्ती गांधी चौकात गेल्या ८१ वर्षांपासून सुरू असलेली सार्वजनिक रामनवमी उत्सवाची परंपरा यावर्षीही विनय काणेकर यांनी वडिलांच्या पश्चात तितक्याच उत्साहात कायम ठेवली. ✅ सकाळी महापूजा व श्रीराम प्रतिमेचे पूजन. ✅ सार्वजनिक सत्यनारायण महापूजा आणि भजनाचा कार्यक्रम. ✅ रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
🌸 शहरातील इतर प्रमुख उत्सव:
कोर्टाजवळील हनुमान मंदिर: भव्य महाप्रसादाचे आयोजन.
भटवाडी दत्त मंदिर: धार्मिक विधी आणि जन्मोत्सव सोहळा.
इस्कॉन केंद्र: कीर्तन आणि प्रवचनाने भक्तिमय वातावरण.
तालुक्यात ठिकठिकाणी भगवे ध्वज, पताका आणि कीर्तनांच्या गजरात रामभक्तांनी हा उत्सव साजरा केला. दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा पार पडल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची रेलचेल होती.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 ​जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ मध्ये इन्सुलीच्या ‘तिरंगा प्रभाग संघा’चा डंका; सावंतवाडी तालुक्याचा गौरव : विविध स्पर्धांमध्ये पटकावले यश

सावंतवाडी दि.२६: ​सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ प्रदर्शनामध्ये सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील ‘तिरंगा प्रभाग संघा’च्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या महिलांच्या यशामुळे सावंतवाडी तालुक्याचा लौकिक वाढला असून, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
​’सिंधू सरस’च्या माध्यमातून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इन्सुलीच्या तिरंगा प्रभाग संघाच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. ‘खेळ पैठणीचा’ या लोकप्रिय स्पर्धेत ग्रामसखी दिव्या देसाई (डेगवे) यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारत प्रथम क्रमांकाचे मानाचे बक्षीस पटकावले. तसेच, पाककला स्पर्धेत आपल्या हातातील चवीची जादू दाखवत रोणापाल येथील एलआरपी (LRP) नमिता शेगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपले कसब सिद्ध केले.
​यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमधील ग्रुप डान्स स्पर्धेत इन्सुलीच्या ‘श्री देवी माऊली कला मंडळा’ने अत्यंत प्रभावी सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिरंगा प्रभाग संघाच्या महिलांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचे नसून, ग्रामीण भागातील महिलांमधील संघटनशक्ती आणि आत्मविश्वासाचे उत्तम प्रतीक मानले जात आहे. या यशस्वी महिलांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

[26/03, 12:13] HP: 🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये मिळणार; हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान ;सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई दि.२६: चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न या सर्वांनाच यश आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली.ते म्हणाले,१७ मार्च २०२६ रोजी कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीतील सूचनांच्या आधारे शासनाने कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्राथमिक अहवाल मागवला असून त्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३०२ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. यामध्ये ३५,५८० हेक्टर क्षेत्रावरील ८०,४१८ शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा घेतला आहे. कमी व जास्त तापमानामुळे सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे.
आंबा पिकासाठी कमी तापमानामुळे प्रति हेक्टर ६,०७१ ते ३४,००० रुपये, तर जास्त तापमानामुळे १७,१७१ ते ६८,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. तसेच अवेळी पाऊस, गारपीट व वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मेपर्यंत विमा संरक्षण लागू आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.दरम्यान, काजू पिकाखाली कोकणात १,७५,१४० हेक्टर क्षेत्र असून १९८ महसूल मंडळांपैकी सुमारे १५० मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे. काजूसाठी प्रति हेक्टर १६,८०० ते ४२,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला नाही, त्यांनाही शासन वाऱ्यावर न सोडता मदत देणार आहे. यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नुकसानीचा अंतिम अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार असून, मागील वेळेपेक्षा वाढ करून यंदा सुमारे २२ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचा शासनाचा मानस असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीचा गुलाल! चारही सभापतींची बिनविरोध निवड

सिंधुदुर्गनगरी दि. २५: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चार महत्त्वपूर्ण विषय समिती सभापती पदांसाठी आज झालेल्या निवडीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपानुसार, चारही जागांवर प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी शारदा पोवार यांनी केली.

नवनिर्वाचित सभापती आणि त्यांच्या समित्या:
निवडींमध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल राखत महायुतीने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
प्रितेश राऊळ भाजप शिक्षण व आरोग्य
सुलोचना नारकर भाजप महिला व बाल कल्याण,संतोष साटविलकर शिवसेना वित्त व बांधकाम,रुहिता तांबे शिवसेना समाजकल्याण
निवड प्रक्रियेचा थरार
ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी ३ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित केली. निर्धारित वेळेत विरोधी पक्षाकडून कोणताही अर्ज न आल्याने ही प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

निवडीची घोषणा होताच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांनी नवनिर्वाचित सभापतींना सन्मानाने त्यांच्या दालनात विराजमान केले.

कार्यकर्त्यांचा जल्लोष
या विजयानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. “नव्या आणि जुन्या सदस्यांच्या या संगमामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना आता अधिक गती मिळेल,” असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

माजी आ. वैभव नाईक यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन जल्लोषात

वैभव नाईक यांना केक भरवताना पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक व पदाधिकारी.

कुडाळ दि.२५ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुडाळ–मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे बुधवारी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. गुरुवार, दि. 26 मार्च रोजी वाढदिवस असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वैभव नाईक यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना प्रमुख मंदार शिरसाट, उपनेत्या जान्हवी सावंत, वैभव नाईक यांची पत्नी सौ.स्नेहा वैभव नाईक, मुलगी नंदीनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, रूपेश पावसकर, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, अवधूत मालंडकर, संतोष शिरसाट, तालुका संघटक सचिन कदम, बबन बोभाटे, संदीप महाडेश्वर, अमित राणे, गोट्या चव्हाण, बाबी गुरव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परशुराम उपरकर म्हणाले, आज वैभव नाईक माजी आमदार असले तरी उद्या ते पुन्हा आमदार होणार आणि भविष्यात राज्याचे नेतृत्व करतील, असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी सभागृहातील परिस्थितीचा उल्लेख करत, आज सत्तेतील मंत्री स्वतःच आपण मार खाल्ल्याचे सांगत आहेत, यावरून राज्यातील राजकारणाची दिशा लक्षात येते, असे म्हटले.उपरकर यांनी निवडणुकीतील आश्वासनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपले चार प्रामाणिक कार्यकर्तेही मोठे परिवर्तन घडवू शकतात. त्यामुळे पुढील निवडणुकीत वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत.असे आवाहन केले.
वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात पराभवानंतरही न डगमगता पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. आज माझा पराभव झाला असला तरी याच उर्जेने मी काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी लोकांचा पाठिंबा आमच्यासोबत आहे,असे हे आताच झालेल्या निवडणुकींने दाखवून दिले.निवडणुका काही वेळा पैशाच्या जोरावर जिंकता येतात, पण संघर्ष आपल्यासाठी नवीन नाही,पैसे खर्च करून निवडून आलेले काही लोक मतदारसंघात फिरताना दिसत नाहीत, पण आम्ही मात्र लोकांसाठी कायम उभे राहणारे आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मी घेतलेल्या भूमिकेमुळे मला धमक्या देण्यात आल्या, पण हे माझं वैयक्तिक काम नव्हतं. विरोधात राहिल्यामुळे त्रास सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.राजकीय पक्षांतरावर भाष्य करताना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.आज काही लोक सत्तेत गेले असतील, पण त्यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही. खरी ताकद ही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येच असते,असे ते म्हणाले.रामनवमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भूमिकेचा उल्लेख करत,मी अयोध्येला जाणार नाही, पण माझ्या मतदारसंघात रामनवमी साजरी करणार आहे,असे सांगितले. शेवटी त्यांनी देवाकडे प्रार्थना करत, मला चांगली बुद्धी दे, कुणासमोर लाचार होऊ देऊ नको आणि लोकसेवा करण्याची ताकद दे,अशी भावना व्यक्त केली. तसेच आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करूया,असे आवाहनही त्यांनी उपस्थित पदाधिकारी -कार्यकत्यांना करताच उपस्थितीतामधुन टाळ्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
जान्हवी सावंत, अमरसेन सावंत, अतुल बंगे, कृष्णा धुरी यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना म्हटले, राज्यात निष्ठावंत आमदार म्हणून तुमची ओळख आहे. भविष्यात तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून वैभव नाईक यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने दशावतार कलाकारांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कुडाळ येथील रिक्षा व्यावसायिकांसाठी विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सातेरी दशावतार नाट्य मंडळाच्या कलाकारांचाही सत्कार करण्यात आला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚆 कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी!

🚆 बेलापूर दि.२५: कोकण रेल्वे मार्गावर सुरत (उधना) – मंगळुरू विशेष एक्सप्रेस गाडीला अखेर कायमस्वरूपी दर्जा मिळाला आहे. आता ही गाडी 19057/58 या क्रमांकाने नियमित धावणार आहे.
👉 या गाडीला सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण आदी स्थानकांवर थांबे मिळणार आहेत.
✅ यामुळे कोकणातील प्रवाशांना गुजरात व कर्नाटककडे प्रवास अधिक सोयीचा होणार
✅ नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी मोठा दिलासा
🙏 या गाडीच्या नियमितीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
– सागर तळवडेकर
उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

​📢 मळगाव पंचकोशी ग्रामीण पतसंस्थेचे नूतन कार्यालय आता अधिक सुसज्ज! 🚩 ​”भविष्यात तंत्रज्ञान आणि कायद्याचा अभ्यास केल्यास पतसंस्था अधिक बळकट होतील” – सुनील राऊळ

📢  🚩📍 मळगाव (कुंभारवाडी) दि.२५: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मळगाव पंचकोशी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे नूतन कार्यालय कुंभारवाडी येथे थाटात सुरू झाले आहे. या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सरपंच श्री. हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
​🌟 कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण:
सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. पतसंस्थांनी पारदर्शकता आणि जलद सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. तसेच, बदलत्या सहकार कायद्यांचा अभ्यास करून या चळवळीला अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
​✅ महत्त्वाचे मुद्दे:
​कर्ज वसुलीत फेडरेशनची साथ: छोट्या पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसाठी फेडरेशन पूर्णपणे पाठिशी उभे राहणार.
​कायदेशीर सहकार्य: ज्येष्ठ विधीतज्ज्ञ डि.के. गांवकर यांनी संस्थेला कायदेशीर सल्ल्याचे आश्वासन दिले.
​अनुभवाचा उपयोग: संस्थेचे चेअरमन श्री. शिरोडकर यांनी आपल्या लेखापरीक्षक (Auditor) पदाच्या अनुभवातून संस्था अधिक भक्कम करण्याचा मानस व्यक्त केला.
​गावाचे सहकार्य: सरपंच पेडणेकर यांनी पतसंस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
​🤝 यावेळी व्हा. चेअरमन श्री. तेली, प्रा. गणपत शिरोडकर, प्रा. रवी शिरोडकर, श्री. चंद्रकांत जाधव, माजी संचालक आणि मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिराचा येत्या गुरुवारी २ एप्रिल २०२६ चैत्र शुद्ध पौर्णिमाला भव्य ‘कलशारोहण सोहळा’

सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस सोबत खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, सुधीर धुमे,‌ दीपक पटेकर, जितेंद्र पंडित, लतिका सिंग, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत आदीं

सावंतवाडी दि.२४: शहरातील सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे येत्या गुरुवारी २ एप्रिल २०२६ चैत्र शुद्ध पौर्णिमाला भव्य ‘कलशारोहण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे या निमित्ताने ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी दिली. या मंदिरपूर्ततेसाठी हातभार लावणाऱ्या दात्यांसह परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. गवस म्हणाले, प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या कृपेने आम्ही हे मंदिर पूर्ण करू शकलो. मंदिराचे काम पूर्ण झालं असून ‘कलशारोहण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.‌ या सोहळ्याला सोमवार, दि. ३० मार्च रोजी सायं. ४ वाजता भव्य कलश दिंडीने प्रारंभ होणार असून ही दिंडी मराठी शाळा क्र. ४ पासून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत सबनिसवाडा येथील मंदिरात रात्री आरतीने समाप्त होईल. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वा. शांतिपाठ पठन, प्रायाश्चित विधी, त्यानंतर गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राध्द आचार्यदि वरणं आदी होणार असून ९ ते १ दरम्यान प्राकारशुद्धि, देवतांचे आवाहन, पूजन, श्रींची आरती, दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वा. सौ. मंजिरी धोपेश्वरकर यांचा ‘भक्तीरंग’ व रात्री ८.३० वा. निलेश मेस्त्री प्रस्तुत ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा नाट्यसंगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच १ एप्रिल रोजी सकाळी पवमान अभिषेक व होमहवन पार पडेल. ९ वा. तुलीशपूजा होणार असून भाविकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी योगेश सावंत भोसले यांचा ‘स्वरसाद’ आणि रात्री किरण सिद्धये संचलित ‘स्वरधारा’ हा संगीताचा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच कलशारोहण सोहळा गुरुवार २ एप्रिल रोजी पार पडेल. सकाळी देवता पूजन, हवन, शतकलशार्चन, शतकलाभिषेक, देवतांवर अभिषेक होणार असून दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा संपन्न होईल. यावेळी अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी), प.पू. शरद जोशी महाराज (पुणे) आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते कलशपूजन व कलशारोहण होणार आहे. दुपारी आरती व महाप्रसाद होणार असून ह.भ.प. स्नेहलदिप प्रभाकर सामंत यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर श्रींची पालखी आणि रात्री ‘नादब्रह्म’ हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या सुवर्ण सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे,‌ सदस्य दीपक पटेकर, जितेंद्र पंडित, लतिका सिंग, विनायक पराडकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत आदींनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

खरात प्रकरणाचे धागेदोरे शोधणार; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठणकावले, राजकारण्यांचे धाबे दणाणले!

मुंबई दि.२४ : सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन दिले. खरातला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठबळ देणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, मग तो कितीही मोठा राजकारणी असो वा अधिकारी, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

केवळ फोटोंवरून नाही, तर पुराव्यांच्या आधारे होणार कारवाई
शिवसेना (UBT) आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणातील राजकारण्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “अनेकांचे फोटो समोर आले आहेत, मग अशा बड्या लोकांची चौकशी होणार का?” असा सवाल त्यांनी विचारला.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले:

“राजकारणात असताना कोणाचे फोटो कोणासोबत येतील हे सांगता येत नाही. केवळ फोटो आहे म्हणून कोणालाही आरोपी ठरवता येणार नाही. मात्र, आम्ही खरातच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा (Deleted Data) पुन्हा मिळवत आहोत. त्यातून कोणाचे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, कोणी मेसेज केले आहेत का, याचा तपास केला जाईल. पुरावा आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”

SIT च्या चौकशीत ‘या’ गोष्टींवर असणार लक्ष:
आर्थिक व्यवहार: खरातला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांची चौकशी.तांत्रिक पुरावे: मोबाईल डेटा आणि चॅट्सचे विश्लेषण.महिला अधिकाऱ्याचे नेतृत्व: या तपासासाठी जाणीवपूर्वक एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांचे ‘वरदहस्त’ उघड होणार?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात काही आयपीएस (IPS), आयएएस (IAS) आणि महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला. गुन्ह्यावर पांघरूण घालणाऱ्या या अधिकाऱ्यांची चौकशी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

मात्र, तांत्रिक मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, क्रिमिनल लॉ नुसार एसआयटी चौकशीत थेट न्यायालयाचा हस्तक्षेप नसतो, परंतु तपास अधिकारी आपला अहवाल न्यायालयाला सादर करतील.

नेत्यांमध्ये अस्वस्थता
मुख्यमंत्र्यांनी ‘डिलीटेड डेटा’ आणि ‘आर्थिक व्यवहार’ तपासण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या अनेक नेत्यांना आता चौकशीची धडकी भरली असल्याचे बोलले जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563