23.2 C
New York
Saturday, June 6, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 63

 🔴 BREAKING NEWS : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवरून रणकंदन!

🔴
सावंतवाडी टर्मिनसचा पुरावा द्या! कोकण रेल्वे CMD च्या विधानाने खळबळ.

🚨प्रशासनाचा ‘विस्मरण’ रोग की आडमुठेपणा? १० वर्षांपासून प्रकल्प रखडल्याने संताप🚨

🛑मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करावा! प्रवासी संघटनेचे थेट देवेंद्र फडणवीस यांना साकडे.🙏प्रकल्प ‘मित्रा’ (MITRA) कडे सोपवा; कोकण रेल्वेच्या उदासीनतेवर संघटनेचा प्रहार.🦾🛑टर्मिनस नाही तर स्वतंत्र गाड्या नाहीत; 🛑चाकरमान्यांची ससेहोलपट थांबणार कधी?मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा कोकणवासीयांचा इशारा.🚨

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस वादाच्या भोवऱ्यात; कोकण रेल्वेच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

सावंतवाडी दि.०६: “सावंतवाडी हे केवळ वे-साईड स्थानक असून टर्मिनसचा कोणताही प्रस्ताव नाही, असल्यास पुरावा दाखवा,” अशा शब्दांत कोकण रेल्वे प्रशासनाने (CMD) आपली भूमिका मांडल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या धक्कादायक विधानानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

महत्त्वाचे मुद्दे:प्रशासकीय उदासीनता: ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यालाच प्रशासन आता नाकारत असल्याचा आरोप होत आहे.प्रमुख मागणी: कोकण रेल्वेची उदासीनता पाहता हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे सोपवून स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.चाकरमान्यांचे हाल: टर्मिनसअभावी कोकणासाठी स्वतंत्र गाड्या सुटत नसल्याने सणासुदीला प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.प्रशासनाने आपली भूमिका न बदलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोकणवासीयांनी दिला आहे.

🛑/——–/——–/——-/🛑——-/——–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563

🚨 आमदारांच्या वर्तणुकीवर आता असणार ‘विशेष समिती’ची नजर! 🚨

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर

समितीवर सावंतवाडीचे आमदार ना. दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण निवड

मुंबई दि.०६: महाराष्ट्र विधिमंडळाच्या आमदारांसाठी आता अभ्यासदौऱ्यांदरम्यान आचारसंहिता लागू होणार आहे. यासाठी गठीत करण्यात आलेल्या नऊ सदस्यीय विशेष समितीवर सावंतवाडीचे आमदार ना. दीपक केसरकर यांची महत्त्वपूर्ण निवड झाली आहे! 👏

✅ काय आहे ही समिती? देश-विदेशातील दौऱ्यांदरम्यान आमदारांचे आचरण, शिस्त आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी ही समिती नियमावली तयार करणार आहे.

✅ काय आहे ही समिती? देश-विदेशातील दौऱ्यांदरम्यान आमदारांचे आचरण, शिस्त आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी ही समिती नियमावली तयार करणार आहे.

✅ केसरकरांचीच निवड का? त्यांचा दांडगा अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि सुसंस्कृत स्वभाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा! आमदार दीपक केसरकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन! 🎉✨

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563

 

समोर कितीही मोठी शक्ती असली तरी भगवाच फडकेल; महेश सावंत यांचा ठाम विश्वास

तळवडे मतदारसंघात ‘ठाकरे शिवसेना’ प्रचारात आघाडीवर; कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह

सावंतवाडी :“निवडणूक लढवताना समोर कितीही मोठी शक्ती किंवा आर्थिक ताकद असली, तरी निष्ठावंत शिवसैनिक आणि सामान्य जनता डगमगणार नाही. आगामी निवडणुकीत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघावर शिवसेनेचाच (ठाकरे गट) भगवा फडकेल,” असा ठाम विश्वास आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केला.
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यात आयोजित प्रचार समाप्तीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजयाचा मंत्र दिला.

निष्ठेचा विजय: रूपेश राऊळ हे पक्षाचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. जनतेची साथ नेहमीच निष्ठावंतांच्या पाठिशी राहते.
अनुभवाचा दाखला: माझ्या स्वतःच्या निवडणुकीतही समोर मोठी शक्ती होती, मात्र शिवसैनिकांची एकजूट आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय सुकर झाला. तोच निकाल या मतदारसंघातही दिसेल.
जनतेचा प्रतिसाद: मतदारसंघातील गावागावातून मिळणारा प्रतिसाद पाहता, विजयाबद्दल कोणतीही शंका नाही.
गावचा सुपुत्र मैदानात: रूपेश राऊळ
उमेदवार रूपेश राऊळ यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “मी नेमळे गावचा सुपुत्र असल्याने गावाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच. शिवाय तळवडे, मळगाव आणि निरवडे या भागांतूनही जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही पंचायत समिती जागांसह जिल्हा परिषदेवर आम्ही निश्चितपणे विजय मिळवू.”
या प्रचार सभेला मळगाव पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग राऊळ यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या दौऱ्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ठाकरे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563

 🚨 मोठी बातमी: दिल्लीत शिक्षकांचा एल्गार! आज शिक्षणमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक 🚨

दिल्ली जंतर-मंतरवर सुरू असलेले अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली दि.०६: प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संयुक्त मोर्चाच्या वतीने जंतरमंतर येथे हजारो शिक्षकांचे भव्य धरणे आंदोलन पार पडले! ✊🔥

📍 प्रमुख घडामोडी: ✅ टीईटी (TET) सूट, जुनी पेन्शन आणि शाळांचे विलीनीकरण थांबवण्यासाठी देशभरातील शिक्षक एकवटले. ✅ संसदेत पडसाद उमटल्यानंतर केंद्र सरकारला घ्यावी लागली दखल. ✅ आज सकाळी ११ वाजता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निर्णायक बैठक.

📌 प्रमुख मागण्या: 🔹 सेवेतील शिक्षकांना TET मधून कायमस्वरूपी सूट मिळावी. 🔹 जुनी पेन्शन योजना लागू करा. 🔹 कमी पटाच्या शाळा बंद करणे थांबवा. 🔹 प्राथमिक शिक्षकांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा हक्क द्या.

‘आजच्या बैठकीत टीईटी आणि इतर प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेल अशी आम्हाला खात्री आहे.” — कल्याण लवांडे (सरचिटणीस), म. ल. देसाई (राज्य उपाध्यक्ष), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

दक्षिण कोकणची काशी सज्ज! १५ फेब्रुवारीपासून श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचा दिमाखदार सोहळा

पत्रकार परिषदेत बोलताना ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संतोष लाड , संजय वासुदेव वाळके, मंगेश पेडणेकर, दीपक घाडी आदी

प्रशासकीय यंत्रणा व देवस्थान ट्रस्टची तयारी युद्धपातळीवर

​देवगड दि.०६:
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची वार्षिक यात्रा यंदा १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.

यंदा १७ फेब्रुवारी रोजी ‘दर्श अमावस्या’ असल्याने तीर्थस्नानासाठी आणि देव दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संतोष लाड , संजय वासुदेव वाळके, मंगेश पेडणेकर, दीपक घाडी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेली म्हणाले, भाविकांच्या सुविधेसाठी चोख नियोजन
​यात्रेकरूंच्या सोयीसाठी भव्य मंडप व्यवस्था, अखंडित विद्युत पुरवठा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मजबूत बॅरिकेडिंग आणि रेलिंग बसवण्यात आले आहे. तसेच, भाविकांना दर्जेदार ‘गुळ-बुंदी लाडू’ प्रसाद म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

​सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर

सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर
​यात्रेत चोऱ्या आणि छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी मंदिर व परिसर परिसरात ‘जम्बो कॅमेऱ्यांसह’ सीसीटीव्हीचे जाळे विणण्यात आले आहे. सुरक्षेसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्रकिनारी ‘सागरी सुरक्षा दल’ तैनात असेल. देवगड महाविद्यालयाचे १०० प्रशिक्षित विद्यार्थी स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि शोध-बचाव कार्यासाठी प्रशासनाला मदत करणार आहेत.

​रस्त्यांच्या प्रलंबित कामांमुळे भाविकांमध्ये नाराजी

​देवगड-मिठमुंबरी-तारामुंबरी पुलामार्गे समुद्रकिनाऱ्यावरून येणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन गेल्यावर्षी देण्यात आले होते. मात्र, हे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, पालकमंत्री महोदयांनी एमटीडीसीच्या जागेत पार्किंगसाठी सपाटीकरण करण्याच्या सूचना देऊनही संबंधित विभागाने अद्याप कार्यवाही केलेली नाही. यामुळे यात्रेत मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
​पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध यात्रा
​बॅनर बंदी: रस्त्यांवर कमानी व राजकीय बॅनर्स लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

यात्रोत्सवात ​प्लास्टिक मुक्ती

व्यापारी व पूजा साहित्य विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात एलईडी स्क्रीनद्वारे दाखवण्यात येणार आहे. ​

देवस्वाऱ्यांचे आगमन आणि भाविकांना आवाहन

​यंदा यात्रेसाठी ५ देवस्वाऱ्यांची नोंद झाली असून, पहिल्या दिवशी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे आगमन होईल. या काळात गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांनी दिवसा दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच, सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. अद्याप संपर्क न केलेल्या देवस्वारी कमिटींनी तातडीने ट्रस्टशी संपर्क साधावा.
​पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱 9422054887, 8275659563

 

श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक सोहळ्यानिमित्त विशाल परब यांची दर्शनासाठी उपस्थिती

365 चाळ्यांचा अधिपती श्री देव उपरलकर चरणी नतमस्तक होताना भाजपा युवा नेते विशाल परब व पदाधिकारी कार्यकर्ते

सावंतवाडी दि.०५: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच सावंतवाडी शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक पूजा सोहळ्यानिमित्त आज भाजप युवा नेते विशाल परब यांनी देवस्थानात भेट देत दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी श्री देव उपरलकर चरणी सर्वसामान्य जनतेला सुख, समाधान व उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला भरघोस यश मिळावे, असे साकडे देव चरणी घातल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. यावर्षीही या उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अभिषेक पूजा सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली आहे.
या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने विशाल परब यांनी देवस्थानात उपस्थित राहून आशीर्वाद घेतले. भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887

सावंतवाडीत लोकशाहीचा उत्सव! ७ फेब्रुवारीला मतदान तर ९ ला मतमोजणी

सावंतवाडीत निवडणूक यंत्रणा सज्ज

सावंतवाडी दि.०५: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा बिगुल वाजला असून, सावंतवाडी तालुक्यातील १४३ मतदान केंद्रांवर शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाने या निवडणुकीची जय्यत तयारी केली असून तब्बल ८५८ कर्मचारी या प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

निवडणुकीचे थोडक्यात स्वरूप
सावंतवाडी तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि १८ पंचायत समिती निर्वाचण गण आहेत. या निवडणुकीसाठी तालुक्याची सांख्यिकी माहिती खालीलप्रमाणे आहे:

एकूण मतदान केंद्रे: १४३ (१३८ मूळ + ५ सहाय्यकारी) एकूण मतदार संख्या: १,०४,०००, पुरुष मतदार: ५१,९०० | स्त्री मतदार: ५२,१००

विशेष केंद्रे: धवडकी नं. २ (माडखोल) येथे ‘सखी मतदान केंद्र’ (पूर्णतः महिला कर्मचारी) तर माजगाव नं. २ येथे ‘आदर्श मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहे.

मतदान पथके उद्या होणार रवाना
शुक्रवारी, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून मा. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी (सावंतवाडी नगरपरिषद) येथे मतदान साहित्याचे वाटप सुरू होईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता १८ एसटी बसेस, १ मिनीबस आणि १८ खाजगी वाहनांतून ही पथके आपापल्या केंद्रांकडे रवाना होतील.

प्रत्येक पथकात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अशा एकूण ६ जणांचा समावेश असून, देखरेखीसाठी २० झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतमोजणी ९ फेब्रुवारीला
७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व ईव्हीएम (EVM) मशीन्स पुन्हा ज्ञानप्रबोधिनी येथे जमा करण्यात येतील. यानंतर संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे असणार असून, सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.

प्रशासनाने मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563

सावंतवाडी शहरातील ३६५ खेड्यांचा अधिपती

श्री देव उपरलकर चरणी भक्तगण लीन

 ‘श्री देव उपरलकर’ देवस्थानचा वार्षिक उत्सव उत्साहात

श्री देव उपरलकर दर्शनासाठी झालेली गर्दी

सावंतवाडी दि.०५: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान आणि ३६५ खेड्यांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने सावंतवाडीसह लगतच्या कर्नाटक ,गोवा राज्यातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दशावतारी नाट्यप्रयोगातील एक क्षण

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
सावंतवाडी राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी एका मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. यावर्षीही परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते:

सकाळी : अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना तीर्थप्रसादाचा लाभ देण्यात आला.

दुपारी: दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी नारळ आणि केळी अर्पण करून आपले नवस फेडले.

रात्री: नामांकित भजनी कलाकारांच्या भजनांचा कार्यक्रम पार पडणार असून, रात्री उशिरा सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा भव्य नाट्यप्रयोग सादर केला जाईल.

देवस्थानचे महत्त्व आणि श्रद्धा
श्री देव उपरलकर हे सावंतवाडी-आंबोली रस्त्यावर वसलेले अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. ‘३६५ खेड्यांचा मालक’ म्हणून या दैवताची ख्याती असून, संकटाच्या वेळी हे दैवत भक्तांच्या हाकेला धावून येते, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक वाहनधारक या देवाचरणी नतमस्तक होऊनच पुढे मार्गस्थ होतो.या सोहळ्याचे नियोजन देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप, शुभम नाईक शितप आणि समस्त ग्रामस्थ व भाविक मंडळाने केले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887

बायकोला एका डोळ्याने दिसेना,

 नवरा कोर्टात गेला, न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला

सुरत (गुजरात) दि.०५: पत्नीने आपल्याला एका डोळ्याने दिसत नसल्याची बाब पतीपासून लपवून ठेवली त्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पतीने केलेल्या बायको आंधळी असल्याच्या तक्रारीनंतर कोर्टाने नवऱ्याची घटस्फोटासाठीची याचिका मंजूर केली आहे. सुरतच्या कौटुंबिक न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या…

पत्नीला आंधळेपण, पतीला जामीन मंजूर..याबाबत सविस्तर माहिती अशी की, लग्नापूर्वी जोडीदाराबद्दलच्या महत्त्वाच्या बाबी लपवून ठेवणे आणि त्यानंतर उद्भवलेल्या वादातून जोडीदाराला धमकावणे हा क्रूरतेचाच प्रकार असल्याचे स्पष्ट करत, सुरतच्या कौटुंबिक न्यायालयाने एका २३ वर्षीय साडी व्यापाऱ्याला घटस्फोट मंजूर केला आहे.

आपल्या पत्नीला एका डोळ्याने दिसत नसल्याची बाब लपवून ठेवून फसवणूक केल्याचा आणि त्यानंतर आत्महत्येची धमकी देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप पतीने केला होता. लग्नानंतर काही दिवसातच पत्नी पडल्यामुळे पती तिला नेत्ररोग तज्ज्ञांकडे घेऊन गेला होता. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले की, तिच्या डाव्या डोळ्याला १७ डायोप्टर इतका मोठा नंबर असून तिला त्या डोळ्याने अजिबात दिसत नाही. ही बाब समजताच पतीने जाब विचारला असता, पत्नीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र, एप्रिल २०२२ मध्ये अहमदाबाद येथील रुग्णालयात झालेल्या तपासणीत सत्य समोर आले.

न्यायालयाने काय म्हटलं? केवळ शारीरिक व्यंग लपवले एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. पतीने जेव्हा वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पत्नीने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि स्वतःचे जीवन संपवण्याची धमकी दिली. न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(i-a) अंतर्गत हा छळ आणि क्रूरता असल्याचे मान्य केले. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत न्यायालयाने पतीच्या बाजूने निकाल दिला.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱 9422054887, 8275659563

सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? थेट राज्यपालांना पत्र….

सुनेत्रा पवार

मुंबई दि.०५: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या त्या उपमुख्यमंत्री आहेत. असे असताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वर्ध्याच्या एका वकिलाने हा शपथविधीच घटनाबाह्य ठरवला आहे. इतकेच नाहीतर त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून या वकिलाने सुनेत्रा पवार यांना पुन्हा नव्याने पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची मागणी केली आहे.

वर्ध्याचे वकील हर्षवर्धन गोडघाटे यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. मंत्र्यांशी संबंधित तरतुदींशी निगडित असलेल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६४ नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल करत असतात. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतील. तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या स्वरूपानुसार, कोणताही मंत्री पदभार स्वीकारण्यापूर्वी राज्यपाल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, अशी तरतूद आहे.

संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये मंत्र्यांच्या पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा नमूना दिलेला आहे. दरम्यान, शपथविधी समारंभादरम्यान सुनेत्रा पवार यांनी दोनदा सांगितले की, त्या उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत, जे असंवैधानिक आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. भारतीय संविधानात कुठेही उपमुख्यमंत्री या पदाची तरतूद नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ आपोआपच बेकायदेशीर ठरते.

मंत्र्यांसाठीच्या तरतुदीनुसार शपथ घेणे घटनासंमत सुनेत्रा पवार यांनी भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या स्वरूपानुसार, म्हणजेच मंत्र्यांसाठी असलेल्या शपथेनुसार शपथ घ्यायला हवी होती. त्यामुळे ही शपथ घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्यासाठी जबाबदार राहिले पाहिजे. अन्यथा, महाराष्ट्रासारख्या राज्यात भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच उघडपणे संविधानाचे उल्लंघन करत आहेत, असा संदेश जाईल. राजभवनात जाऊन घेतली शपथ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या जाण्यानंतर उपमुख्यमंत्रिपद रिक्त झाले. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंबईत राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून सुनेत्रा पवारांची पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887