
वेंगुर्ला दि.२९:तालुक्यातील
शिरोडा गावात अमली पदार्थ विक्री व गैर व्यवसाय सुरु आहेत व ही बाब गंभीर आहे. याबाबत शिरोडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेंगुर्ला पोलिसांना निवेदन देत लक्ष वेधले आहे.
शिरोडा गावात ब-याच ठिकाणी चायनीय सेंटर, समुद्र किनारी, मिठागर परिसर, उपजिल्हा रुग्णालय शिरोडाच्या मागील बाजूस या परिसरात गांजा, चरस, अंमली पदार्थ रात्रौ राजरोसपणे विक्री करुन सेवन केल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेत शिरोडा परिसरात नागरिकांच्या असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या प्रकारामुळे अमली पदार्थ विक्री करणा-यांकडून गुंडगिरी करुन दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पर्यटनदृष्टया महत्वाच्या असलेल्या शिरोडा गावात अनैतिक धंद्यांना आळा घालावा, अन्यथा या विरुद्ध मोठे आंदोलन करण्यातं येईल. शिरोडा गावात अमली पदार्थ विक्री सह गैर व्यवसाय सुरु असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत त्वरित पुढील कार्यवाही व्हावी, अशी मागणी शिरोडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिरोडा ग्रामस्थ अमोल परब, दत्तगुरु परब, मयुरेश शिरोडकर, भिवा गावडे, भरत शेटये, माजी उपसरपंच राहुल गावडे, अमित गावडे, कौशिक परब, गणपत साळगावकर, प्रशांत गावडे, देऊ परब, दीक्षांत परब, विजय परब, उद्धव परब, सचिन जेठे, वेदांत परब, निखिल गावडे, ओम परब, आदित्य घोडके,माजी सरपंच मनोज उगवेकर आदी उपस्थित होते.दरम्यान शिरोड्यातील गंभीर प्रकाराबाबत त्वरित दखल न घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांची सोमवारी भेट घेण्यात येणार आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https: // akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563




सावंतवाडी दि.२८: शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शहरातील घरगुती व सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी आता पालिकेचे स्वतःचे आधुनिक ‘सक्शन मशीन’ दाखल झाले आहे. पालिकेच्या या पुढाकारामुळे आता नागरिकांना अत्यंत माफक दरात ही सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली.
सावंतवाडी दि.२८: ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या मोती तलावाचा दगडी काठ आता शेवटच्या घटका मोजत आहे. दीडशे वर्षांपूर्वीचे हे ऐतिहासिक बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत असून, याला कारणीभूत ठरत आहेत तलावाच्या काठावरील खोलवर गेलेली अशोक वृक्षांची झाडे!
कणकवली दि.२८: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली असून, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने न झाल्यास पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथील ‘विजय भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सावंतवाडी दि.२८: शहरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि डिजिटल शिक्षणाची कवाडं खुली करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि विशेष पाठपुराव्यातून सावंतवाडीतील दोन प्रमुख शाळांना अद्ययावत संगणक प्रणाली प्रदान करण्यात आली.
सावंतवाडी, दि.२८ : कोकण रेल्वे स्थानक परिसरातील निरवडे येथे आज सायंकाळी सुमारे चार फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सिल्वर एकर इमारतीच्या तळमजल्यात थेट मानवी वस्तीत मगर दिसून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पुणे दि.२८: रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणी चाकरमान्यांची सतत फसवणूक सुरूच आहे. *पुण्यातून कोकणासाठी गाडी नाकारून, मध्य रेल्वेने आता थेट बिहारसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करत मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.*
पुणे दि.२८: अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या मोठे अडचणीचे ठरले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाची पदे गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सावंतवाडी दि.२७: तालुक्यात सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे सामान्य जनतेसह शेतकरी आणि मच्छीमार मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि चंद्रकांत कासार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.