11.8 C
New York
Monday, May 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 62

मळगाव येथे महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद; श्री देव मायापूर्वचारी चरणी विजयाचे साकडे

सावंतवाडी दि. २६ तालुक्यातील मळगाव येथे भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा आज मोठ्या उत्साहात करण्यात आला. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार संदीप गावडे आणि मळगाव-नेमळे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार गौरव मुळीक यांच्या प्रचारार्थ श्री देव मायापूर्वाचारी मंदिरात श्रीफळ ठेवून विजयाचे साकडे घालण्यात आले.प्रचाराच्या शुभारंभावेळी महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येऊन भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता प्रस्थापित व्हावी, असे गाऱ्हाणे मायापूर्वचारी चरणी घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता. देवदर्शनानंतर उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:हनुमंत पेडणेकर (सरपंच, मळगाव)गणेशप्रसाद पेडणेकर (माजी सरपंच तथा भाजप शक्ती केंद्रप्रमुख)चंद्रकांत जाधव (भाजप जिल्हा सरचिटणीस)निलेश कुडव (माजी सरपंच)सिद्धेश तेंडोलकर (भाजप सावंतवाडी तालुका चिटणीस)ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, निकिता राऊळ, बूथ अध्यक्ष महेश गवंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मळगाव येथील ब्राम्हण पाट परिसरातील वाड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली. दोन्ही उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. “युती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि भविष्यातील संकल्प” मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

प्रजासत्ताक दिनी प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

सावंतवाडी :दि.२६ सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात अंमलात आणण्यात आले आणि आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. 77 व्या प्रजासत्ताक दिनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. यावेळी समाज मंदिर परिसरातील परिसरातील नागरिक आणि रहिवासी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

77 वा प्रजासत्ताक दिन सावंतवाडीत धुमधडाक्यात साजरा

सावंतवाडी दि.२६. सावंतवाडी येथील पोलीस परेड मैदानावर 77 वा प्रजासत्ताक दिन प्रांताधिकारी समीर घारे यांच्या हस्ते ध्वजवंदनाने साजरा झाला यावेळी कमांडिंग ऑफिसर म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी परेडचे नेतृत्व केले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले स्वातंत्र सैनिक अण्णा केसरकर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग दर्शवला. यावेळी शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज उर्दू इंग्लिश स्कूल तसेच एनसीसी पथकाने संचलनात सहभाग घेतला या संचलनात सावंतवाडी पोलीस पथकही सहभागी झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले यावेळी नायब तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी – अखंड हिंदुस्तान लाईव्ह..! – विशेष संपादकीय.

संपादकीय

नमस्कार,

अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज चॅनल ची ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘सत्य सामर्थ्य आणि संकल्प’ ही टॅग लाईन घेऊन या तत्त्वावर चालण्याचे व्रत घेऊन चॅनेलची सुरुवात करत आहोत. यामध्ये ज्ञान मनोरंजन आणि ताज्या बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे देशभराच्या बातम्या बरोबर सत्य घटना या निमित्ताने आपणासमोर आणत असताना अखंड हिंदुस्थानचा प्रचारक होऊ इच्छित आहोत.

आपला हिंदुस्तान देश जात धर्म भाषा प्रांत मध्ये विभागला जाऊ शकत नाही सर्वधर्म समभाव मानणारा आपला देश आहे या देशाची कला, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय स्थिती अधिक उजळ व्हावी प्रांताप्रांतामध्ये समृद्धी यावी घराघरांमध्ये लक्ष्मीची पावले यावीत अशी मनोकामना व्यक्त करत असताना सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करत अखंड हिंदुस्तान लाईव्ह सुरू करत आहोत. या यूट्यूव चैनलची सुरुवात कोकण आणि महाराष्ट्रापासून करत असताना काश्मीर ते कन्याकुमारी पर्यतच्या महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्यांचाही यामध्ये समावेश असेल. ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’! याचा आम्हाला अभिमान आहे.

कवी वसंत सावंत यांची ‘अशा लाल मातीत जन्मास यावे’ ही कविता कोकणच्या भूमीचे सौंदर्य, तिथला निसर्ग आणि तिथल्या माणसांचे कष्टकरी जीवन यांचे अत्यंत प्रभावी दर्शन घडवते. ‘अशा लाल मातीत जन्मास यावे’या कवितेतून कवी वसंत सावंत यांनी अशा लाल मातीत जन्मास यावे जिथे रावणार्यास मान मिळावा अशा घाम-घामानं भिजल्या शरीरी नव्या अस्मितेचा प्रकाश मिळावा. अशा तृप्त मातीत जन्मास यावे. अशा कष्टकऱ्यांच्या पवित्र कुळी पुन्हा एकदा मी जन्मास यावे. असे सांगतात.

कवी वसंत सावंत यांच्या ‘स्वस्तिक’ या काव्यसंग्रहातील कवितेच्या ओळी आणि त्याचा अर्थ खूप काही सांगून जातो. कवी वसंत सावंत यांनी कोकणची अस्मिता ही कविता कोकणच्या लाल मातीचा आणि तिथल्या संस्कृतीचा गौरव करते. श्रमाची पूजा करते. निसर्ग वर्णनात माड-पोफळी (नारळ-सुपारीच्या बागा), समुद्र आणि सह्याद्रीच्या कड्यांचे सुंदर चित्रण करते अगदी त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्तान लाईव्ह चॅनल त्यांच्या काव्यार्थीला अभिप्रेत असे काम करू पाहत आहे. कोकणची जशी लाल माती तशी देशावरची काळी आई ! रंग वेगळा परंतु गुणधर्म एकच, सोन पिकवणे. अशा मातीशी प्रामाणिक राहून कष्टकरी बळीराजाच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या व्यथा मांडण्याचे काम आम्ही करणार आहोत.

‘जय जवान जय किसान’ चा नारा घेऊन अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्युज चॅनल सुरू होत आहे. सीमेवर लढणारा जवानांचा जय जयकार करत असताना मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचाही जय जयकार व्हायला हवा. अगदी छोट्या बालकांपासून तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आवडेल रुचेल असा अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्युज असेल. असत्यावर आसूड, सामथ्याची जाणीव आणि सुख-समृद्धीचा संकल्प घेऊन अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्युज चॅनल आपणांसमोर येत आहे.

चला तर मग बेल आयकॉनवर बटन दावा आणि चॅनल सबस्क्राईब करा.