25 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 62

प्रा. रूपेश पाटील यांची अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड

सावंतवाडी दि.३०: अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक प्रा. रूपेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी सावंतवाडी येथील पर्णकुटी शासकीय विश्रामगृहावर आयोजित विशेष कार्यक्रमात ही घोषणा केली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव
यावेळी संघटनेच्या कोकण विभागातील अन्य महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचीही अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये
कोकण विभाग अध्यक्ष: प्रा. रूपेश पाटील जिल्हाध्यक्ष: भरत केसरकर
कोकण विभाग संघटक: राजेश नाईक (ज्येष्ठ पत्रकार)
सावंतवाडी तालुका अध्यक्ष: सिद्धेश सावंत,तालुका संघटक: आनंद धोंड यांची निवड जाहीर केली.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सिताराम गावडे यांच्यासह कोकण विभागातील अनेक मान्यवर पत्रकार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल पत्रकारितेला मिळणार बळ
प्रा. रूपेश पाटील आणि इतर अनुभवी पत्रकारांच्या नियुक्तीमुळे कोकण पट्ट्यातील डिजिटल पत्रकारितेला आता अधिक संघटित स्वरूप प्राप्त होणार आहे. या निवडीबद्दल सर्वाचे अभिनंदन होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

💥 मोठी बातमी: बाळा गावडेंची शिवसेनेच्या ‘मशाली’सोबत पुन्हा एकदा घरवापसी! 🏹➡️🔥

मुंबई दि.३०: सिंधुदुर्गच्या राजकारणातील बडे नाव आणि माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी अखेर दीड वर्षांचा राजकीय अज्ञातवास संपवून पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
📍 कुठे झाला प्रवेश? मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी बाळा गावडे यांना शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
🔄 काय आहे पार्श्वभूमी?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी बाळा गावडे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता.
मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ते पक्षीय उपक्रमांपासून लांब होते.
शिंदे गटातील दुर्लक्ष आणि विचारधारेतील तफावतीमुळे त्यांनी पुन्हा ‘मातोश्री’ची वाट धरली.
🗣️ “आता फक्त ८०% समाजकारण!” प्रवेशानंतर बोलताना बाळा गावडे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या विचाराने आता पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे!”
🚀 राजकीय प्रवास एका नजरेत: ✅ माजी जिल्हाध्यक्ष – राष्ट्रीय काँग्रेस (सिंधुदुर्ग) ✅ माजी जिल्हाप्रमुख – शिवसेना (ठाकरे गट) ✅ आता पुन्हा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बाळा गावडेंच्या या घरवापसीमुळे सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

दीपक केसरकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम; ‘ठाकरे सेने’चे आंदोलन म्हणजे ‘सुपारी’ वाजवण्याचा प्रकार – संजू परब

सावंतवाडी दि.३०: आमदार दीपक केसरकर यांच्यावर होत असलेल्या टीकेला आणि उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आंदोलनाला शिवसेनेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. “दीपक केसरकर यांच्या पाठीशी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत. उबाठा गटाचे आंदोलन हे केवळ कुणाकडून तरी पैसे घेऊन केलेले ‘सुपारी’ आंदोलन आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उबाठा गटाच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला.
‘केसरकरांच्या भाकरीवर जगणारेच आज टीका करताहेत’
संजू परब पुढे म्हणाले की, “आज जे पदाधिकारी केसरकरांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्यातील अनेक जण काही वर्षांपूर्वी केसरकरांच्याच भाकरीवर आपला उदरनिर्वाह करत होते. आज केवळ राजकीय स्वार्थापोटी ते त्यांच्यावर नाहक चिखलफेक करत आहेत. एका फोटोच्या आधारे एखाद्या लोकप्रतिनिधीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे.”
केसरकर हे चार वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी असून ते अत्यंत श्रद्धाळू आहेत. ते विविध देवळांना भेटी देत असतात. सावंतवाडीच्या जनतेला त्यांच्या स्वभावाची आणि वर्तनाची पूर्ण जाणीव आहे, असेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
आंदोलनात मतदारसंघाबाहेरचे लोक – ॲड. निता सावंत-कविटकर
यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी उबाठा गटाच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “उबाठाच्या आंदोलनात स्थानिक महिलांचा सहभाग नसून, बाहेरून लोक आणून गर्दी जमवण्यात आली आहे. मतदारसंघातील महिला भगिनी आजही केसरकर यांच्या पाठीशी ठाम आहेत,” असे त्या म्हणाल्या. तसेच, भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, क्लेटस फर्नांडिस, गुंडू जाधव, राकेश पवार, संजय गावडे यांच्यासह शिवसेनेचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कणकवली स्थानकातील वातानुकुलीत वेटींग रूम सेवेत रुजू,सरकत्या जिन्याच्या कामाचा हि शुभारंभ,पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते झाला शुभारंभ.

कणकवली दि.३०: कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात  पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्या चे भूमिपूजन आणि प्लॅटफॉर्म नजीकच्या वातानुकूलीत वेटींग रूम चा शुभारंभ करण्यात आला.
कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात आज वातानुकूलीत वेटींग रूम प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आले.या वेटींग रूम मध्ये मोफत वायफाय ,येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची स्थिती दाखवणारा डिजिटल बोर्ड,स्वच्छतागृह ,चार्जिंग पॉइंट अशा सुविधा रेल्वेकडून पुरवण्यात आल्या आहेत.या करिता साडे बारा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.याच बरोबर कणकवली स्थानकातील सरकत्या जिन्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.स्थानकातून बाहेर उतरताना प्रवाश्यांना हा जीना उपयुक्त ठरणार आहे.या जिन्यावर 67 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे.त्याची क्षमता ताशी सहा हजार प्रवासी इतकी आहे. पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आमदार निरंजन डावखरे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,कोकण रेल्वेचे वाहतूक आणि वाणिज्य निदेशक सुनील गुप्ता,मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर,विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांचे सह कोकण रेल्वेचे अधिकारी,नागरिक उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कणकवलीत धावती सीएनजी कार पेटली; सुदैवाने जीवितहानी टळली

कणकवली दि.३०: कणकवली-नरडवे रोडवरील कनकनगर येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका चालत्या कारला अचानक आग लागल्याची भीषण घटना घडली. ही कार सीएनजीवर चालणारी असून, आगीत कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब मुंबईहून दारिस्तेच्या दिशेने कारने प्रवास करत होते. कनकनगर परिसराजवळ पोहोचल्यावर कारमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ कार रस्त्याच्या कडेला उभी केली. कार उभी केल्यानंतर काही वेळातच कारच्या पुढील भागातून (इंजिनच्या बाजूने) धूर निघू लागला.
काही क्षणातच या धुराचे रूपांतर भीषण आगीत झाले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने कारमधून आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होत्या. यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती.
स्थानिकांची धावपळ
आगीची भीषणता पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुरक्षित अंतर राखत गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांना पाचारण करण्यात आले. ही कार सीएनजी इंधन प्रणालीवर आधारित असल्याने आगीचा धोका अधिक होता, मात्र सुदैवाने कोणताही स्फोट झाला नाही.
नुकसान आणि कारण
या आगीत कारचा बहुतांश भाग जळून खाक झाला असून मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा सीएनजी किटमधील तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासन आणि पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी पोलिसांची मोठी कारवाई; मित्रासोबत पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रत्नागिरीत रोखले भल्या पहाटे पासून मुंबईतील मित्रासह सहकाऱ्यांची चौकशी सुरू

सावंतवाडी दि.३०: आपल्या मित्रासोबत मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला सावंतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी येथे धाडसी कारवाई करत रोखले आहे. ही मुलगी मूळची सावंतवाडीची असून सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. या प्रकरणी तिच्यासोबत असलेल्या तरुणांची आणि सहकाऱ्यांची पोलीस चौकशी सुरू आहे.
मैत्रीला घरच्यांचा विरोध मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मुंबईत राहत असताना तिथे एका तरुणाशी तिची मैत्री झाली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना ही मैत्री मान्य नव्हती. त्यामुळे तिला काही दिवसांपूर्वी मुंबईहून सावंतवाडीत आणण्यात आले होते. परंतु, तिला पुन्हा मुंबईला नेण्यासाठी तो मित्र आपल्या अन्य काही सहकाऱ्यांसह सावंतवाडीत दाखल झाला.
पोलीस ठाण्यातील हायड्रॅामा या मित्रांसोबत वेगवेगळ्या धर्माचे तरुण असल्याने हे प्रकरण सुरुवातीला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले होते. मात्र, घरी गेल्यानंतरही ती मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तिने पुन्हा मित्रासोबत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
रातोरात सूत्रे हलली मुलगी पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती मिळताच पालकांनी तातडीने सावंतवाडी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे ती मुलगी रेल्वेने जात असल्याचे समजताच, सावंतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणांना रोखण्यात आले.
अल्पवयीन असल्याने नातेवाईकांच्या ताब्यात देणार या सर्वांना आज पहाटे सावंतवाडीत आणण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, मुलगी आणि तो तरुण एकमेकांना ओळखतात व त्यांचे कुटुंबीय देखील परिचित आहेत. मात्र, मुलगी अद्याप अल्पवयीन असल्याने तिला कायदेशीर प्रक्रियेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

जमिनीच्या वादातून ओवळीयेत रक्ताचा सडा; कोयत्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, पिता-पुत्राला अटक

सावंतवाडी दि.२९: तालुक्यातील ओवळीये-मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून एक भीषण हत्याकांड घडले. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा कोयत्याच्या वारामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (३७) यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
घटनेचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सरस्वती सावंत या आपला मुलगा एकनाथ सावंत याच्यासह घराशेजारील शेतात काम करत होत्या. यावेळी शेजारी राहणारे विजय सावंत आणि त्यांचा मुलगा रघुनाथ तिथे आले. “आमच्या जमिनीत काय करता?” या प्रश्नावरून दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयित पिता-पुत्राने सोबत आणलेल्या कोयत्याने सरस्वती यांच्या डोक्यावर भीषण वार केले.
उपचारापूर्वीच मृत्यू
हल्ल्यानंतर सरस्वती सावंत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मुलगा एकनाथ याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत जखमी सरस्वती यांना १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत सरस्वती सावंत यांनी अवघ्या दोन दिवसांपूर्वीच संशयित विजय आणि रघुनाथ सावंत यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. ही तक्रार देऊनही पोलिसांनी ठोस प्रतिबंधात्मक पावले का उचलली नाहीत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तपासाची चक्रे वेगवान
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी ओवळीये गावातून दोन्ही संशयितांना अटक केली आहे. एकनाथ सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. ओवळीये परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

निरवडे येथे ३ एप्रिलपासून ‘निरवडे महोत्सव २०२६’ चा थरार; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सावंतवाडी दि.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे, माळकरवाडी येथे शुक्रवार, ३ एप्रिल आणि शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी ‘निरवडे महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कलागुणांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

महोत्सवाचे सविस्तर वेळापत्रक:
शुक्रवार, ३ एप्रिल २०२६:
सायंकाळी ७:०० वा.: स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचे बहारदार सामूहिक नृत्य.
रात्री ८:०० वा.: देवगड येथील किंजवडे येथील प्रसिद्ध ‘पावणादेवी समई नृत्य’.
रात्री १०:०० वा.: दिनेश मेस्त्री ग्रुप (नेरूर) यांचा ‘शिमगोत्सव’. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ‘इंडियन आयडॉल’ फेम श्री. गणेश मेस्त्री हे असणार आहेत.

शनिवार, ४ एप्रिल २०२६:
सायंकाळी ७:०० वा.: सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. नागेश आडगावकर यांचा शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम.

रात्री १०:०० वा.: ओंकार डान्स अकॅडमी, सिंधुदुर्ग निर्मित ‘नृत्यविष्कार’ हा भव्य नृत्याचा कार्यक्रम.
रात्री ११:०० वा.: महोत्सवाचा मुख्य भाग असलेली ‘भव्य लकी ड्रॉ सोडत’ आणि निकाल.

आयोजकांचे आवाहन:
“हा महोत्सव स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि संस्कृती जोपासण्यासाठी आयोजित केला आहे. तरी सर्व रसिकांनी आणि नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर यांची पुनश्च निवड

सावंतवाडी दि.२९: अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भरत केसरकर यांची पुनश्च एकदा निवड करण्यात आली आहे. कोकणातील डिजिटल पत्रकारितेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, सावंतवाडी येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत घोषणा
सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी ही घोषणा केली. राष्ट्रीय स्तरावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राजा माने हे प्रथमच सावंतवाडीत आले होते. यानिमित्ताने संघटनेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा
यावेळी केवळ जिल्हाध्यक्षच नव्हे, तर कोकण विभाग आणि तालुका स्तरावरील महत्त्वाच्या पदांचीही घोषणा करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या निवडी खालीलप्रमाणे आहेत:
राज्य संघटक: सीताराम गावडे (ज्येष्ठ पत्रकार)
कोकण विभाग अध्यक्ष: प्रा. रुपेश पाटील व राजेश नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष: भरत केसरकर
सावंतवाडी तालुका अध्यक्ष: सिद्धेश सावंत
सावंतवाडी तालुका संघटक: आनंद धोंड यांची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल पत्रकारितेला मिळणार बळ
भरत केसरकर यांच्या अनुभवाचा फायदा जिल्हयातील डिजिटल मीडियाला होणार असून, त्यांच्या निवडीमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. या नूतन नियुक्त्यांमुळे कोकणातील डिजिटल पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि संघटनेची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🎨 स्वदेशी कलेचा महाकुंभ आता आपल्या कोल्हापुरात! ३१ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत 🚩

🎨 🚩कोल्हापूर दि.२९:भारताच्या १७ राज्यांतील अद्भुत हस्तकलेचा वारसा एकाच छताखाली पाहण्याची सुवर्णसंधी! श्री सिद्धगिरी संस्थान (कणेरी मठ) आणि महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय घेऊन येत आहेत – ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’.

📍 ठिकाण: श्री सिद्धगिरी संस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर.
📅 दिनांक: ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६
खास आकर्षणे:
✨ १७ राज्यांतील २००+ राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर.
✨ पिंगुळी, मधुबनी, पैठणी आणि बरच काही… प्रत्यक्ष बनवताना पाहण्याची संधी (Live Demo).
✨ टाकाऊतून टिकाऊ वस्तू आणि नाविन्यपूर्ण हस्तशिल्पे.
युवा पिढीसाठी हे केवळ प्रदर्शन नसून एक ‘लर्निंग हब’ आहे. आपल्या संस्कृतीचा हा जागर अनुभवण्यासाठी नक्की या!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563