10.6 C
New York
Monday, May 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 61

⚠️ सावंतवाडीत पाईपलाईनचे काम की भ्रष्टाचाराचा खड्डा? ⚠️

सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी सत्ताधारी नगरसेवकांवर डागला निशाणा! ❌ निकृष्ट दर्जाचे काम ❌ धुळीचे साम्राज्य ❌ आरोग्याचा प्रश्न

ठेकेदाराला २ दिवसांचा अल्टीमेटम… अन्यथा जनआंदोलन छेडणार! 📢

सावंतवाडी दि.२७
“५७ कोटींच्या योजनेत भ्रष्टाचार? निकृष्ट कामामुळे सावंतवाडीकर धुळीत! सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा महेश पांचाळ यांचा खळबळजनक आरोप आहे.”

👉 दोन दिवसात सुधारणा करा, अन्यथा रस्त्यावर उतरू!
🚨 सावंतवाडीकरांच्या जीवाशी खेळ थांबवा! 🚨

सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या ५७ कोटींच्या नळ पाणी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि उडालेली धूळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

📍 महेश पांचाळ यांचे थेट सवाल: ✅ रस्ते खोदून ठेवलेत, मग डांबरीकरण नीट का होत नाहीये? ✅ सत्ताधारी आणि प्रशासन या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक का करत आहेत? ✅ नागरिकांच्या आरोग्याला जबाबदार कोण?असा सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी केला असून येत्या दोन दिवसांत खड्डे नीट न बुजल्यास आता थेट ‘रस्त्यावर उतरून आंदोलन’ होणार! असा इशारा दिला आहे. ✊🔥

निवडणुका बिनविरोध करण्याचा अट्टाहास नवा ट्रेंड म्हणजे हुकूमशाही कडे वाटचाल .मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांची टिका

  • .
    सावंतवाडी दि.२७
    जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी अनेक आमिषे दाखवून किंवा इतर मार्गांचा वापर करून निवडणूक अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव आणला जात असून या आमिषाला बळी पडून काही ठिकाणी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. जो पॅटर्न महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान कल्याण डोंबिवली , ठाणे येथे राबविण्यात आला तोच पॅटर्न आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली असून या नव्या पॅटर्न मुळे हळूहळू लोकशाही संपुष्टात येणार असून राजकारणाची वाटचाल हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेने चालू झाली आहे. सत्तेच्या व पैशाच्या मस्तीत वावरणाऱ्यांनी शह काटशहाच्या राजकारणामुळे लोकशाही संपुष्टात आणण्याचे पाप सुरू केले असून यामुळे भविष्यात सर्वसामान्य लोक मतदानाकडे पाठ फिरवतील व हुकूमशाही अस्तित्वात येण्याची भीती असल्याची टीका ॲड.अनिल केसरकर यांनी केली आहे. पक्षासाठी तन मन व धन अर्पण करून काम करणारे कार्यकर्ते सत्तेच्या राजकारणात बाजूला फेकले जात असून फक्त पैसा फेकून आपण निवडून येवू शकतो हा नवा राजकीय ट्रेंड आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे असा आरोप ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे.

दोडामार्ग तालुक्यातील पं समितीच्या कोलझर मधून शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस  बिनविरोध निवड

दोडामार्ग दि.२७ दोडामार्ग तालुक्यातील पंचायत समितीच्या कोलझर मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्याच्या राजकारणात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. भाजप–शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केला होता.त्यांच्या विरोधात सुरुवातीला ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच काही अपक्ष उमेदवार असे एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आज, दि. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने मोठा राजकीय बदल घडून आला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी गणेशप्रसाद गवस यांच्या विरोधात उभे असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच अवघी काही मिनिट शिल्लक असताना उबाठाचे उमेदवार प्रवीण परब यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि श्री. गवस बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.

​सावंतवाडीत निवडणुकीचे रणकंदन: जिप त प्रमोद कामत व पंस त महेश धुरी यांची भाजप मधून बिनविरोध निवड, तर अनेक ठिकाणी बंडखोरीचे पेच!​

सावंतवाडी दि २७ :सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये भाजपला एकीकडे बिनविरोध विजयाचा आनंद मिळाला असला, तरी दुसरीकडे अनेक मतदारसंघांत स्वकीयांच्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.​शेर्ले गणात भाजपचा श्रीगणेशा: महेश धुरी बिनविरोधसावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद चे बांदा मधील भारतीय जनता पार्टीचे प्रमोद कामत हे यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. आणि आज​सावंतवाडी पंचायत समितीच्या शेर्ले निर्वाचन गणामध्ये भारतीय जनता पार्टीने आपले खाते उघडले आहे. भाजपचे उमेदवार महेश मोहन धुरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले अपक्ष उमेदवार जगन्नाथ धुरी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने महेश धुरी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.​४८ जणांची माघार; भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना थेट लढत१७ जागांसाठी पंचायत समिती आणि आठ जागांसाठी जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे यासाठी ​तालुक्यात आज एकूण ४८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ५३ जण रिंगणात उतरले आहेत. बहुतांश ठिकाणी आता भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे शिवसेना) असा तिरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. मात्र, काही महत्त्वाच्या मतदारसंघांत अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी राजकीय समीकरणे कठीण केली आहेत.​बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली​अनेक मतदारसंघांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध स्वकीयांनीच शड्डू ठोकल्याने चुरस वाढली आहे ​कोलगाव जि.प. मतदारसंघात भाजपमध्ये उघड बंडखोरी झाली आहे. अधिकृत उमेदवार महेश सारंग यांच्या विरोधात नुकतेच ठाकरे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले मायकल डिसोझा यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला असून, त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.​इन्सुली जि.प. मतदारसंघात भाजपचे स्वागत नाटेकर यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने येथे तिरंगी लढत होत आहे, ज्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.​तांबोळी पं.स. मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या अर्चना पांगम यांनी बंडखोरी केल्याने महायुतीसमोर आव्हान उभे राहिले आहे. आंबोली जिल्हा परिषदेमध्ये शिंदे शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सामना होत असल्याने महायुती पूर्णतः अपयशी ठरली आहे या मतदारसंघांमध्ये शोभा गावडे या भारतीय जनता पार्टी पक्षामधून देऊ नका आहेत तर शिंदे शिवसेनेच्या सुप्रिया दिनेश गावडे या सुद्धा रिंगणात आहेत तर अपक्ष उमेदवार सेजल सदाशिव नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तळवडे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भाजपचे संदीप गावडे त्यांच्याविरुद्ध ठाकरे शिवसेनेचे रुपेश राऊळ हे रिंगणात आहेत तर या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार गंगाराम पै हे रिंगणात आहे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.सावंतवाडीत एका बाजूला बिनविरोध निवडीचा उत्साह असताना, दुसऱ्या बाजूला बंडखोरीमुळे होणारी मतविभाजन थोपवण्याचे मोठे आव्हान भाजप आणि महायुतीसमोर असणार आहे.

​या ठिकाणी रंगणार ‘तिहेरी’ थरार

​माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत समझोता न झाल्याने खालील ठिकाणी तिरंगी लढती निश्चित झाल्या आहेत

:​मळेवाड पंचायत समिती​,सातार्डा पंचायत समिती,तांबोळी पंचायत समिती

सावंतवाडीत नगराध्यक्ष रजेवर; पाणी, रस्ते, स्वच्छतेवरून काँग्रेसची टीका

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीनंतर नगराध्यक्ष युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले सध्या रजेवर असल्याने पालिकेचा कारभार नेमका कोणाच्या हाती आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उपनगराध्यक्ष अ‍ॅड. निरवडेकर यांच्याकडे प्रत्यक्ष चार्ज दिला आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उभाबाजार परिसरात अनेक घरांत गेल्या तीन दिवसांपासून पाणी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण स्वच्छता आणि नगरसेवकांचा संपर्क नसल्यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सर्व प्रश्न सोडवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत, या कालावधीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

कोकणच्या सांस्कृतिक एकसंधतेचे प्रतीक: ‘बारापाच’ गावरहाटी आणि जत्रोत्सव

सिंधुदुर्ग दि.२७: कोकणच्या लाल मातीतील लोकसंस्कृती आणि देवभक्तीचा अनोखा संगम म्हणजे येथील ‘गावरहाटी’. गोव्यापासून रत्नागिरीपर्यंत पसरलेल्या या बारापाच देवस्थानच्या जत्रोत्सवांना कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमेपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी आणि शिस्तीचा एक पुरातन नमुना म्हणून या जत्रोत्सवांकडे पाहिले जाते. याबाबतची माहिती मळगाव येथील देवस्थानची जाणकार शामसुंदर राऊळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.गावरहाटीची त्रिसूत्री आणि सामाजिक संरचना
कोकणातील ग्रामरचनेत ‘बारापाच’ देवस्थानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधिभौतिक, आधिदैविक आणि आधिआध्यात्मिक ताळमेळ राखण्यासाठी ही व्यवस्था पूर्वापार चालत आली आहे. यामध्ये राजसत्ता, पूर्वसत्ता, कुळकर, स्थळकर आणि भूमीचा मूळ मालक महार अशा पाच महत्त्वाच्या घटकांचा समन्वय असतो. श्री देव रवळनाथ हे या बारापाच देवस्थानचे ‘राजसत्ताप्रमुख’ मानले जातात.

शिस्त आणि सीमांचे अनोखे समीकरण
कोकणातील जत्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे गावागावांतील परस्पर समन्वय. एका गावात रवळनाथाची जत्रा असताना, त्याच्या सीमेला लागून असलेल्या दुसऱ्या गावात त्याच वेळी जत्रा नसते. इतकेच नव्हे, तर शेजारच्या गावात उत्सव सुरू असताना सीमेवरील गावकरी आपल्या देवाचा ‘प्रसाद’ किंवा ‘कौल’ लावत नाहीत. “आज देवाचे सुकृत तत्व शेजारच्या गावी गेले आहे,” अशी यामागची उदात्त भावना असते.

वेंगुर्ले येथे सोमवती अमावास्येला होणारे समुद्रस्नान असो किंवा मळगाव-सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीची प्रसिद्ध ‘लोटांगण’ जत्रा, या सर्व ठिकाणी शिस्तीचे पालन काटेकोरपणे केले जाते. जोपर्यंत स्थानिक मुख्य देवतांचे स्नान होत नाही, तोपर्यंत इतर गावांतील तरंग किंवा पालख्या समुद्रात प्रवेश करत नाहीत.

दशावतार: जत्रांचे मुख्य आकर्षण
कोकणी जत्रेचा प्राण म्हणजे ‘दशावतार’ नाट्य. श्रीगणेश पूजन आणि शंकासुर वधाच्या कथानकाने सुरू होणारे हे नाटक उत्तरार्धात रामायण-महाभारतातील आख्यानांनी रंगते. पालखी प्रदक्षिणा, झांज-मृदंगाचा ताल आणि शार्दूलविक्रीडित श्लोकांच्या गजरात होणारा हा उत्सव भक्तांना मंत्रमुग्ध करतो.

शेकडो वर्षांची अखंड परंपरा
आदिलशाही, निजामशाही आणि इंग्रज राजवटीतही ही गावरहाटी आणि त्यातील नीतिमत्ता तसूभरही ढळली नाही. “कोकणपुराधिनाथ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव रवळनाथाप्रती असलेली ही श्रद्धा आजही कोकणी माणसाला एकत्र बांधून ठेवते. वर्षातून एकदा होणाऱ्या या जत्रेत नारळ आणि पाच केळी अर्पण करून कृतकृत्य होणारा कोकणी माणूस, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली ही संस्कृती आजही तितक्याच निष्ठेने जपत आहे.

वृत्त संकलन: शामसुंदर राऊळ मोबा.8381085205

शामसुंदर राऊळ

आज कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनस प्रश्नी बेलापूर येथे बैठक, सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी दि.२७ कोकण रेल्वेच्या ‘सावत्र’ कारभाराविरोधात कोकणात संताप व्यक्त होत आहे. सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम, राजधानी व गरीब रथचे थांबे रद्द करणे आणि अमृत भारत योजनेत कोकणातील स्थानकांना डावलणे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. २७ जानेवारी रोजी बेलापूर येथील बैठकीकडे सर्वांचे लक्ष असून, सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या ‘सावत्र’ कारभाराविरोधात संताप; सावंतवाडी टर्मिनस, राजधानी थांबा आणि अमृत भारत योजनेचा मुद्दा ऐरणीवर

कोकण रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या कोकणवासीयांनाच आज आपल्या हक्कासाठी लढावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या कथित ‘सावत्र’ कारभाराविरोधात कोकणात तीव्र असंतोष व्यक्त होत असून, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम, राजधानी व गरीब रथ एक्सप्रेसचे थांबे आणि अमृत भारत योजनेतील दुर्लक्ष या मुद्द्यांवरून नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाले असतानाही, आज टर्मिनसच्या अस्तित्वावरच पुरावा मागितला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात सावंतवाडी स्थानकातून राजधानी व गरीब रथचे थांबे अचानक रद्द करण्यात आले, मात्र माहिती अधिकारात विचारणा केली असता “रेकॉर्ड उपलब्ध नाही” असे उत्तर देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.२७ जानेवारी रोजी बेलापूर येथील बैठकीकडे सर्वांचे लक्ष असून, सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.

चार वर्षानंतर प्रथमच मिळाला प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर यांना सावंतवाडी नगर परिषदेच्या ध्वजारोहणाचा मान

सावंतवाडी दि.२६ सावंतवाडी नगर परिषदेच्या ध्वजारोहणाचा मान तब्बल चार वर्षानंतर नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांना मिळाला. त्यांच्या हस्ते 77 व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी ध्वजारोहण पार पडले. सावंतवाडी नगर परिषदेवर गेली चार वर्षे प्रशासक होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये उप नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ऍड अनिल निरवडेकर यांची बहुमताने निवड झाली. दरम्यान नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले या मॅटर्निटी रजेवर गेल्यामुळे त्यांचा कार्यभार उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळाला. ध्वजारोहणाच्या या सोहळ्यासाठी ऍड अनिल निरवडेकर यांनी गुलाबी फेटा बांधून ध्वजारोहण केले. अत्यंत शिस्तबद्ध रित्या झालेल्या या कार्यक्रमासाठी सावंतवाडी चे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय सावंतवाडी नगर परिषदेचे नगरसेवक सुधीर आडीवरेकर प्रतीक बांदेकर,आनंद नेवगी तौकीर शेख यांच्यासह नगरसेविका दिपाली भालेकर अॅड सायली दुभाषी मोहिनी मडगावकर आनंद नेवगी स्नेहा नाईक सुनिता पेडणेकर नीलम नाईक आधी सह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

गांधी चौकात रोटरी क्लबच्या ध्वजारोहणाचा मान विनय काणेकर यांना

सावंतवाडी दि.२६ सावंतवाडी शहरातील गांधी चौकातील रोटरी क्लब च्या ध्वजारोहणाचा मान यंदाही विनय काणेकर यांना मिळाला. या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर नगरसेवक सुधीर आडीवरेकर आनंद नेवगी प्रतीक बांदेकर अजय गोंदावळे तौकीर शेख,ऍड सिद्धार्थ भांबुरे,नगरसेविका दिपाली भालेकर शर्वरी धारगळकर मोहिनी मडगावकर सुनिता पेडणेकर ऍड सायली दुभाषी दुलारी रांगणेकर आधी उपस्थित होते. कांता काणेकर यांनी ही परंपरा सुरू केली असून गांधी चौकाच्या बरोबर मधोमध प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी रोटरी क्लबच्या वतीने ध्वजारोहण केले जाते. सुरुवातीला विनय काणेकर यांनी आमदार केसरकर आणि प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ध्वजारोहण झाले राष्ट्रगीताच्या धुन नंतर महाराष्ट्र गीताने ध्वजारोहणाची सांगता झाली.