10.6 C
New York
Monday, May 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 60

सावंतवाडीत ‘श्री स्वामी’ समर्थांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

 

जयघोषाने परिसर दुमदुमला

सावंतवाडी दि.२८: अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पालखीचे आज सावंतवाडीतील चांदतळी, भटवाडी येथे मोठ्या भक्तिभावात आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण सावंतवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

भव्य मिरवणूक आणि फुलांची उधळण

सायंकाळी शहराच्या मुख्य भागातून श्री स्वामी समर्थांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांच्या मुखातील “श्री स्वामी समर्थ” या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण करत दर्शन घेतले. मिरवणुकीतील शिस्त आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

पालखी आगमनानिमित्त रात्री भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भक्तिमय सोहळ्याचे औचित्य साधून सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि शांततेत हा कार्यक्रम पार पडला.

नियोजनाची यशस्वी सांगता

श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा यशस्वी झाला. ग्रामस्थांनी दाखविलेले सहकार्य आणि शिस्तीमुळे हा पालखी सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पहाटेचा झंझावात’ शांत

 

उपमुख्यमंत्री अजित पवार 

सावंतवाडी दि.२८: प्रशासनावर उत्तम पकड असलेला, कार्यकर्त्यांची नस जाणणारा आणि राज्याचे राजकारण नेहमी स्वतःभोवती फिरवत ठेवणारा एक धडाडीचा नेता हरपला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन हे संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारे आहे, अशी भावना मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी व्यक्त केली.

प्रशासनावरील पकड आणि कामाचा उरक
अजितदादांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ॲड. केसरकर म्हणाले की, “दादांची कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि निराळी होती. पहाटेपासूनच कामाला सुरुवात करून सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा असा हा लोकनेता होता. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.”

“अजितदादांशिवाय राज्याचे राजकारण पुढील काही वर्षे तरी निस्तेज वाटेल. त्यांच्या जाण्याने एका पर्वचा अंत झाला आहे.” — ॲड. अनिल केसरकर (जिल्हाध्यक्ष, मनसे)

तिरोडा पंचक्रोशीत बीएसएनएलची ‘४जी’ सेवा अखेर कार्यान्वित

सागर नाणोसकर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश

सावंतवाडी दि.२८: सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा आणि नाणोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आंदोलनाच्या पवित्र्यानंतर तिरोडा येथील बीएसएनएलचा ४जी टॉवर सुरू करण्यात आला असून, यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

तिरोडा गावात सुमारे पाच वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर मंजूर झाला होता. अनेक प्रयत्नांनंतर १० महिन्यांपूर्वी टॉवरची उभारणी पूर्ण झाली, परंतु तांत्रिक कारणांमुळे तो बंद अवस्थेत होता. यामुळे तिरोडा, नाणोस आणि परिसरातील गावांमधील नागरिकांना मोबाईल नेटवर्कसाठी मोठी कसरत करावी लागत होती.

नेटवर्कच्या या समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, लेखी पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासन आणि दिरंगाई मिळत होती. अखेर नाणोस ग्रामपंचायत सदस्य सागर सोमकांत नाणोसकर यांनी आक्रमक भूमिका घेत, “येत्या आठ दिवसांत टॉवर सुरू न झाल्यास २६ जानेवारी रोजी टॉवरवर चढून आंदोलन करू,” असा इशारा दिला होता.

या इशाऱ्याची दखल घेत बीएसएनएल प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या. २६ जानेवारीपूर्वीच या टॉवरची ४जी सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली. नेटवर्क सुरू झाल्यामुळे आता तिरोडा आणि नाणोस गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार असून ऑनलाइन कामांना गती मिळणार आहे. या यशाबद्दल सागर नाणोसकर यांच्यासह पाठपुरावा करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत आहे.

अजितदादांच्या आठवणीने सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना फुटला पान्हा; ‘एक कार्यक्षम नेतृत्व हरपले’ अशा शब्दांत भावना व्यक्त

सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांची व्याकुळ भावना
सावंतवाडी दि.२८:“राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ आमचे नेते नव्हते, तर तो आम्हा कार्यकर्त्यांचा मोठा आधार होते. त्यांच्या जाण्याने आज घरातील माणूस गेल्याची भावना आमच्या मनात आहे,” अशा शब्दांत सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी आपल्या अतीव संवेदना व्यक्त केल्या.

विमान अपघाताच्या कथित वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, दादांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले आहेत.

अजितदादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिस्तीचे आणि कार्यकर्त्यांवरील प्रेमाचे दाखले दिले. “काही दिवसांपूर्वीच आम्ही दादांना भेटायला गेलो होतो. सकाळी साडेपाच-सहा वाजता हा नेता बंगल्यावर हजर राहून कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकत होता. गवस साहेब आणि मी जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तातडीने कामाचे आदेश दिले होते. असा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रात्रंदिवस राबणारा नेता पुन्हा होणे कठीण आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

अजितदादांनी एकदा ‘हो’ म्हटले की ते काम झालेच पाहिजे, हा त्यांचा शब्द प्रशासनासाठी आदेश असायचा. “दादांकडे पाहिल्यावर आम्हाला पक्षात सुरक्षित वाटायचे. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात आम्ही जो जोमाने काम करतोय, तो केवळ दादांनी दिलेल्या उभारीमुळेच,” असेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.

या कठीण प्रसंगी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जनता पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. नियतीने घातलेला हा घाला अत्यंत क्लेशदायक असून, दादांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

सावंतवाडीत भाजप नगरसेवकांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण

  1. सावंतवाडी दि २८:  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित विशेष शोकसभेत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्या प्रशासकीय पकडीचा आणि विकासकामांच्या धडाक्याचा गौरव केला. “एक कणखर नेतृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आज राज्याने गमावले आहे,” असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या श्रद्धांजली सभेला प्रभारी नगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर,लखमराजे भोसले (उपाध्यक्ष, भाजप प्रदेश युवा मोर्चा)सुधीर आडीवरेकर (शहर अध्यक्ष व नगरसेवक)नगरसेवक: आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर.अॅड सिद्धार्थ भांबुरे,नगरसेविका: मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, निलम नाईक.तसेच दिलीप भालेकर व अन्य भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सावंतवाडी न. प. ची विशेष समिती सभापती निवड रद्द

सावंतवाडी दि.२८ :
सावंतवाडी नगरपालिकेच्या विशेष
समिती सभापतींची निवड आज, २८ जानेवारीला सकाळी ११.०० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणार होती.परंतू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवड सभा रद्द करण्यात आली तर शोकसभा घेण्यात आली.
सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता असून अकरा नगरसेवक निवडून आले आहेत. या विशेष समिती सभापतीपदी भाजपच आपला दावा होता. शिवसेनेचे सात नगरसेवक विरोधी बाकावर असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष व काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक हे तटस्थ आहेत.

अजितदादांच्या निधनामुळे महायुतीवर शोककळा; मुख्यमंत्र्यांची कणकवलीतील सभा रद्द.​

सिंधुदुर्ग दि.२८:राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर, आज कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारी महायुतीची जाहीर प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे.​आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कणकवली येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार होते, मात्र अजितदादांच्या निधनामुळे सर्वच राजकीय कार्यक्रम तातडीने स्थगित करण्यात आले आहेत.​मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी ही सभा रद्द झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याला गमावल्याच्या भावनेने महायुतीचे सर्वच घटक पक्ष आणि कार्यकर्ते दुःखात बुडाले आहेत.

सावधान! खिशात हात न घालताही तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं; ‘कॉन्टॅक्टलेस’ फसवणुकीपासून असा करा बचाव

मुंबई दि.२७: डिजिटल क्रांतीच्या युगात आता चोर तुमच्या खिशाला हात न लावताही पैसे चोरू शकतात. गर्दीच्या ठिकाणी ‘पॉईंट ऑफ सेल’ (POS) मशीनचा वापर करून सायबर ठग तुमच्या खिशातील क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चोरून स्कॅन करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. वाय-फाय सुविधेमुळे अवघ्या काही सेकंदांत हा व्यवहार पूर्ण होत असून, पीडिताला कळेपर्यंत खात्यातून पैसे कट झालेले असतात.

आजकालच्या बहुतांश कार्ड्समध्ये NFC (Near Field Communication) म्हणजेच वाय-फाय सुविधा असते. यासाठी पिन टाकण्याची किंवा कार्ड मशीनमध्ये स्वाइप करण्याची गरज नसते. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. गर्दीच्या ठिकाणी तुमचं पाकीट ज्या बाजूला आहे, त्याजवळ चोर हळूच POS मशीन नेतात. कार्ड मशीनच्या संपर्कात येताच २-३ सेकंदात व्यवहार पूर्ण होतो.या आधुनिक डिजिटल चोरीपासून वाचण्यासाठी खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे:NFC सुविधा बंद करा: तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपवर जाऊन ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’ किंवा ‘NFC’ पर्याय तातडीने बंद करा. गरज असेल तेव्हाच तो सुरू करा.
मर्यादा (Limit) निश्चित करा: जर तुम्हाला ही सुविधा वापरायची असेल, तर त्याची दैनंदिन मर्यादा १,००० रुपयांपेक्षा कमी सेट करा, जेणेकरून मोठी चोरी टाळता येईल.
RFID-Blocking पाकीट वापरा: बाजारात ‘RFID-Blocking Wallet’ किंवा विशेष कार्ड होल्डर मिळतात. यामुळे मशीन तुमच्या कार्डचे सिग्नल पकडू शकणार नाही.
कार्ड पाकीटात अशा प्रकारे ठेवा की ते बाहेरील स्पर्श किंवा स्कॅनिंगला लगेच प्रतिसाद देणार नाही.

महत्त्वाची टीप:

सतर्क राहणे आणि तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित ठेवणे, हाच या आधुनिक चोरीपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.


फसवणूक झाल्यास काय करावे?
१. विलंब न करता बँकेला कळवून आपले कार्ड त्वरित Block करा.
२. नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० वर त्वरित संपर्क साधा.
३. ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा.

सावंतवाडी टर्मिनसवर कोकण रेल्वेचे ‘रेड सिग्नल’; तांत्रिक असमर्थता आणि निधीअभावी प्रकल्प रखडला

सिंधुदुर्ग दि.२७: दक्षिण कोकणच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीत सावंतवाडी येथे टर्मिनस उभारणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य (Feasible) नाही आणि रेल्वेकडे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, असे स्पष्ट मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. यामुळे आता या प्रकल्पाचा चेंडू थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या कोर्टात गेला आहे.

कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर यांनी सावंतवाडी टर्मिनसच्या मागणीसाठी पुकारलेल्या उपोषणानंतर, बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या (KRCL) मुख्य कार्यालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (CCM) आशुतोष श्रीवास्तव आणि सिव्हिल विभागाचे एल. प्रकाश यांनी प्रकल्पातील अडचणींची माहिती दिली.टर्मिनससाठी लागणारा निधी प्रचंड असून, कोकण रेल्वेच्या सध्याच्या बजेटमध्ये अशी तरतूद करणे अशक्य आहे.सध्याच्या रचनेत सावंतवाडी स्टेशनचे पूर्ण क्षमतेच्या टर्मिनसमध्ये रूपांतर करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष निधी मिळवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आता राजकीय इच्छाशक्तीची कसोटी
प्रशासनाने हात वर केल्यामुळे आता या प्रश्नाला राजकीय वळण मिळाले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार नारायण राणे आणि सुनील तटकरे यांनी हा विषय लोकसभेत लावून धरावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच, मुंबई-ठाणे परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या कोकणी मतदारांच्या जोरावर तेथील खासदारांनीही रेल्वे मंत्रालयावर दबाव निर्माण करणे आवश्यक बनले आहे.

चौकट

सावंतवाडी टर्मिनस का आवश्यक आहे?
सावंतवाडी स्टेशनचे टर्मिनसमध्ये रूपांतर झाल्यास दक्षिण कोकणचा चेहरामोहरा बदलू शकतो.सावंतवाडी गाड्यांचे उगमस्थान (Originating point) बनल्यास स्थानिकांना ‘कन्फर्म सीट’ मिळणे सुलभ होईल.सध्या मडगावपर्यंत जाणाऱ्या गाड्या सावंतवाडीत थांबवता येतील, ज्यामुळे गोवा रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होईल.गाड्यांच्या देखभालीसाठी आणि साफसफाईसाठी लागणारी यंत्रणा येथे उपलब्ध झाल्यास नवीन गाड्या सुरू करणे शक्य होईल.या बैठकीत कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत, सुरेंद्र नेमळेकर, गणेश परब, अमित नार्वेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी टर्मिनससह कोकण रेल्वेच्या इतर प्रवाशांच्या समस्यांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

कणकवलीत २८ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा; हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा

सिंधुदुर्ग दि.२७ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे.

या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांच्यासहीत विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येत आहेत. या निवडणुकांत सर्व जागांवर यश मिळविण्याच्या अनुषंगाने महायुतीने कंबर कसली आहे. गावोगावी प्रचार, नियोजनही जोरदार करण्यात येत आहे. याच प्रचाराच्या अनुषंगाने ही जाहिर प्रचार सभा कणकवलीत होत आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर होणाऱ्या या जाहिर प्रचार सभेच्या अनुषंगाने भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. यात जाहिर प्रचार सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.