17.8 C
New York
Tuesday, July 7, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 59

माजगाव येथे भीषण अपघात; कोलगावचे दोन तरुण जखमी, चारचाकी चालक फरार

सावंतवाडी दि.०३: तालुक्यातील माजगाव येथील धोकादायक वळणावर काल रात्री एकच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोलगाव येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर चारचाकी चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.

अपघाताचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव येथील दोन तरुण रात्री एकच्या सुमारास माजगावमार्गे आपल्या घराकडे जात होते. माजगाव येथील वळणावर समोरून आलेल्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

चालकाचे पलायन आणि पोलीस तपास
अपघात घडल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चारचाकी चालकाने आपले वाहन घेऊन तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तपासाची सद्यस्थिती:
पंचनामा: सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.
शोधमोहीम: फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबी तपासण्यास सुरुवात केली आहे.

सावधानता: माजगाव येथील हे वळण अत्यंत धोकादायक असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्काऊट-गाईड शिबिरात उल्लेखनीय कामगिरी

_सावंतवाडी दि.०२: कोल्हापूर जवळील सोनतळी येथे आयोजित भारत स्काऊट्स व गाईड्सच्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्य पुरस्कार प्राप्त केला. सेवाभाव, नेतृत्व, शिस्त व राष्ट्रनिष्ठा यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी शाळेचे व जिल्ह्याचे नाव राज्यभरात उंचावले. या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आज शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता._

_या विद्यार्थ्यांमध्ये सहा स्काऊट्स व सात गाईड्स मिळून एकूण तेरा जणांचा समावेश आहे. स्काउट्समध्ये नववीतील मंथन सावंतभोसले, वेदांग अंबापूरकर, अधिराज ठाकूर, स्पर्श धुरी, यजत रावळ तर आठवीतील वेद परांजपे यांचा समावेश आहे. गाईड्समध्ये नववीतील अद्विता दळवी, स्वरा धुरी, माही विठलानी, लिसा मेंडिस, रुची गावडे आणि आठवीतील स्वरा पंडित व स्फूर्ती सितावर यांचा समावेश आहे._

_विद्यार्थ्यांना शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट्स व गाईड्स प्रशिक्षण आयुक्त क्लारा डिसोझा, सहाय्यक आयुक्त अरविंद मेस्त्री, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत लवकरच राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यासाठी सदिच्छा दिल्या. या यशस्वी कामगिरीमुळे संपूर्ण शाळेत अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून भविष्यातही चांगले काम करण्याचा मानस यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला._

ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांचा वाढदिवस सावंतवाडी पालिकेत उत्साहात साजरा

सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोबत अभिमन्यू लोंढे विजय देसाई विनायक गावस,सागर चव्हाण रुपेश पाटील नरेंद्र देशपांडे उमेश सावंत आदी

मोती तलावाकाठी पक्षी आणि पर्यटकांना पूरक वृक्षारोपण करणार; प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची माहिती

सावंतवाडी दि.०२: मराठी पत्रकार परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांचा वाढदिवस आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले व त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

या छोटेखानी सोहळ्याला पत्रकार संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी अभिमन्यू लोंढे, सचिव विनायक गावस, माजी अध्यक्ष विजय देसाई, माजी सदस्य सागर चव्हाण, सदस्य उमेश सावंत, नरेंद्र देशपांडे आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील आदी उपस्थित होते.

मोती तलावाचे होणार ‘इको-फ्रेंडली’ सुशोभीकरण
वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहराच्या पर्यावरणाविषयी महत्त्वाची माहिती दिली. मोती तलावाच्या काठी करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाबाबत त्यांनी खालील मुद्दे मांडले:

तज्ज्ञांचा सल्ला: तलावाकाठी कोणती झाडे लावावीत, यासाठी ‘वृक्ष संवर्धन समिती’चा तांत्रिक सल्ला घेतला जाणार आहे.

तलावाचे संरक्षण: तलावाच्या पायऱ्या, कठडे आणि फुटपाथची कमीत कमी धूप होईल, अशाच प्रजातींची निवड केली जाईल.

जैवविविधता: चिमण्या, इतर पक्षी आणि फुलपाखरांचा किलबिलाट वाढेल अशा पर्यावरणपूरक झाडांना प्राधान्य दिले जाईल.

पर्यटकांची सोय: येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना सावली मिळेल, अशा पद्धतीने नियोजन असेल.

उद्यानांचे संवर्धन कमी खर्चात
शहरातील जिमखाना उद्यान आणि जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान यांचे संवर्धन करण्यासाठी नगर परिषद विशेष लक्ष देत आहे. कमीत कमी खर्चामध्ये या दोन्ही उद्यानांचे रूप पालटले जाईल आणि त्यांचे योग्य प्रकारे जतन केले जाईल, असेही निरवडेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कोलगाव पाणीप्रश्नी सकारात्मक चर्चा; कायमस्वरूपी तोडगा निघणार!

कोलगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर सोबत जि प सदस्य मायकल डिसोजा,मेघाशाम काजरेकर प्रणाली पिळले आदी

कोलगाव पाणीप्रश्नी सकारात्मक चर्चा; 
प्रभारी नगराध्यक्ष आणि मायकल डिसूजा यांच्या शिष्टमंडळात बैठक; कामाला गती देणार

सावंतवाडी दि.०२: कोलगाव ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाबाबत आज सावंतवाडी नगर परिषदेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसूजा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात झालेली ही चर्चा सकारात्मक ठरली असून, लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही दोन्ही बाजूंनी देण्यात आली आहे.
पाळणे कोंड धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा
सुमारे १.५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाळणे कोंड धरण प्रकल्पातील पाणी कोलगाव गावासह सावंतवाडी शहरालाही मिळणार आहे. या प्रकल्पाचे राहिलेले अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून दोन्ही भागांना जास्तीचा पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील असल्याचे ॲड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान कोलगावातून जाणाऱ्या पाईपलाईन मधून हे पाणी नरेंद्र डोंगराच्या डोंगरावर उभारण्यात आलेल्या साठवण टाकीमध्ये दिले जाणार असून तेथून सावंतवाडी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे 24 तास पाणी शहरवासी या नळपाणी योजनेतून मिळणार आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा प्रभारी नगराध्यक्ष निरवडे कर यांनी व्यक्त केली आहे.
आक्रमक भूमिकेनंतर हालचालींना वेग
कोलगावमधून जाणाऱ्या नळपाणी योजनेचे काम सध्या रखडलेले आहे. या पार्श्वभूमीवर मायकल डिसूजा यांनी आक्रमक पवित्रा घेत काम थांबवण्याचा इशारा दिला होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात तातडीने बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:
करार प्रक्रिया: कामाला गती देण्यासाठी आवश्यक असलेला कायदेशीर करार लवकरच पूर्ण केला जाईल.
संयुक्त फायदा: या योजनेमुळे केवळ कोलगावच नव्हे, तर सावंतवाडी शहराची पाण्याची गरजही भागणार आहे.
प्रलंबित कामे: तांत्रिक अडचणी दूर करून थांबलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन.

या बैठकीत ग्रामस्थांचे नेतृत्व जि.प. सदस्य मायकल डिसूजा यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, माजी पंचायत समिती सदस्य  मेघा श्याम काजरेकर,कोलगाव ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पडते, बाळू गवस, मारिया डिमेलो, शिवदत्त घोगळे, शैलेश टिळवे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

“कोलगावच्या हक्काच्या पाण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आवश्यक करार करून लवकरच हे काम पूर्ण करू, जेणेकरून कोलगाव आणि सावंतवाडी शहराला दिलासा मिळेल.” > — ॲड. अनिल निरवडेकर (प्रभारी नगराध्यक्ष, सावंतवाडी)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

*कोनशी शाळेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ दिमाखात साजरा”*

दोडामार्ग (कोनशी) दि.०२: मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अभिमान वाटावा असा हा दिवस… मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. तसेच मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यी व समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्त्व जाणून घ्यावे, मराठी भाषेचे संरक्षण, संवर्धन व विकास व्हावा हेतूने कोनशी शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे जीवनचरित्र व त्यांची वाङ्मय आधारित चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविली. मुख्याध्यापक श्री सुरेश जाधव, डॉ. राजेंद्र चव्हाण, श्री बाबुराव पास्ते आणि श्रीम स्वाती देसाई यांनी कवी कुमाग्रजांच्या जीवनकार्य व साहित्याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यानी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कवितांचे वाचन करण्यात आले. वेदांत बर्वे याने सूत्र संचालन केले तर यश सावंत याने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत महास्वच्छता अभियानानंतर आता शहरात ‘डास निर्मूलन’ मोहीम युद्धपातळीवर सुरू, “दिलेल्या शब्दाची पूर्तता”: प्रभारी नगराध्यक्ष ॲड निरवडेकर.

सावंतवाडी शहरात सुरू झालेली डान्स निर्मूलन मोहिमेत फोगिंग करतांना स्वच्छता विभागाचे कर्मचारी

सावंतवाडीत  ‘डास निर्मूलन’ मोहीम युद्धपातळीवर सुरू
: प्रभारी नगराध्यक्ष ॲड निरवडेकर.

सावंतवाडी दि.०२: सावंतवाडी शहरात राबवण्यात आलेल्या ‘महास्वच्छता अभियाना’ला यश मिळत असतानाच, आता प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी शहरात डास निर्मूलनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
दिलेल्या शब्दाची पूर्तता
शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त होते. डास निर्मूलनासाठी फवारणी आणि फोगिंग करण्यात यावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने केली जात होती. भारतीय जनता पार्टीने ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन शहरवासीयांना दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी तात्काळ पावले उचलत संपूर्ण शहरात फोगिंग मशीनद्वारे धूर फवारणी सुरू केली आहे.
अस्वच्छतेच्या ठिकाणांवर विशेष लक्ष
शहरातील ज्या भागांमध्ये अस्वच्छता आहे किंवा जिथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक आहे, अशा ठिकाणांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
फोगिंग मशीनचा वापर: अत्याधुनिक फोगिंग मशीनद्वारे औषध फवारणी केली जात आहे.
व्याप्ती: ही मोहीम केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न राहता, शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राबवण्यात येणार असल्याचे निरवडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांकडून समाधान
गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने सावंतवाडीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

“नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. डास निर्मूलनासाठी आम्ही वचनबद्ध होतो आणि त्या दृष्टीने ही मोहीम आता सातत्याने सुरू राहील. शहरातील एकही कोपरा फवारणीविना राहणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत.”
— अॅड अनिल निरवडेकर (प्रभारी नगराध्यक्ष, सावंतवाडी)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

प्रभारी नगराध्यक्षांचा ‘ऑन द स्पॉट’ निकाल! सालईवाड्यातील सांडपाण्याचा प्रश्न तासाभरात मार्गी

प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांचा’ऑन द स्पॉट’ निर्णय!

सावंतवाडी दि.०१:नगरपालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक दिवस रेंगाळलेला सांडपाण्याचा प्रश्न प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या सक्रियतेमुळे अवघ्या एका तासात सुटला. साळईवाडा मारुती मंदिर परिसरातील दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका झाल्याने, निरवडेकर यांच्या ‘ॲक्शन मोड’चे शहरात कौतुक होत आहे.

नेमका प्रकार काय होता?
सालईवाडा येथील मारुती मंदिराजवळील एका इमारतीचे सांडपाणी साचल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक रहिवाशांनी याबाबत सावंतवाडी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र पालिका प्रशासनाकडून याकडे सतत दुर्लक्ष केले जात होते.

दर्शनासाठी आले अन् प्रश्न सोडवला!
शनिवारी ॲड. अनिल निरवडेकर हे मारुती मंदिरात दर्शनासाठी आले असताना, एका सजग भाविकाने हा गंभीर प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निरवडेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळी धाव घेतली.

अशी झाली कारवाई:
तातडीची भेट: तक्रार मिळताच नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली.

प्रशासनाला आदेश: कार्यालयात बसून आदेश देण्याऐवजी त्यांनी सफाई कामगारांना तातडीने घटनास्थळी बोलावले.

प्रत्यक्ष उपस्थिती: नगराध्यक्षांच्या देखरेखीखाली सांडपाण्याची वाहिनी स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

एका तासात मार्ग: जो प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता, तो नगराध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या एका तासात सुटला.

“नगरपालिकेत तक्रार देऊनही कर्मचारी दुर्लक्ष करत होते. मात्र, नगराध्यक्षांनी स्वतः मैदानात उतरून काम करून घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.”
— स्थानिक रहिवासी

या घटनेमुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या सुस्त प्रशासनाला चपराक बसली असून, प्रभारी नगराध्यक्षांच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्याचे २७ वे रक्तदान; मुंबईत रुग्णाच्या मदतीला धावले वैभववाडीचे सुपुत्र

मुंबई दि.०१: ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा वसा जपत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्याने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मूळचे वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील आणि सध्या बोरिवली (मुंबई) येथे स्थायिक असलेले श्री. दीपक कुडतरकर यांनी आज एका महिला रुग्णासाठी तातडीने रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडवले.

नेमकी घटना काय?
आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सैफी हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार घेत असलेल्या पाटील नामक महिला रुग्णाला ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्ताची नितांत गरज होती. रक्ताची तातडीची गरज असल्याचे समजताच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य श्री. दीपक कुडतरकर यांनी कोणतीही वेळ न घालवता सैफी हॉस्पिटल ट्रस्ट रक्तपेढी गाठली आणि रक्तदान केले.

रक्तदानाचा ‘सत्ताविसावा’ टप्पा
विशेष बाब म्हणजे, श्री. दीपक कुडतरकर यांचे हे आजचे २७ वे रक्तदान आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकवेळा आपत्कालीन परिस्थितीत धावून जात रक्तदान केले आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे आणि तत्परतेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिष्ठानचे सामूहिक प्रयत्न
या केसच्या पूर्ततेसाठी आणि समन्वयासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य श्री. विनोद पाटील सर व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठान नेहमीच तत्पर असते, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली.

“दीपक कुडतरकर यांनी दाखवलेली ही तत्परता आणि सातत्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या जिद्दीला आणि सेवाभावी वृत्तीला ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ आणि समाज बांधवांतर्फे सलाम करण्यात येत आहे.”

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कोकणच्या सागरी प्रवासात नवा अध्याय; मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचा दिमाखात शुभारंभ!

कोकणात मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचा दिमाखात शुभारंभ!

विजयदुर्ग दि.०१: गेले कित्येक महिने कोकणवासी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण आज प्रत्यक्षात अवतरला. मुंबई ते विजयदुर्ग या ‘एम टू एम’ रो-रो जलवाहतूक सेवेचे पहिले जहाज आज सायंकाळी ४ वाजता विजयदुर्ग बंदरात दाखल झाले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि तुतारीच्या निनादात सिंधुदुर्गवासीयांनी या बोटीचे आणि प्रवाशांचे अभूतपूर्व स्वागत केले.

मुंबईत नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
या जलवाहतूक सेवेचा रीतसर शुभारंभ सकाळी ९ वाजता मुंबई येथील भाऊचा धक्का येथे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटनानंतर हे अत्याधुनिक जहाज प्रवाशांना घेऊन विजयदुर्गच्या दिशेने रवाना झाले. पहिल्याच प्रवासाला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, जवळपास सर्वच श्रेणींमधील तिकिटे बुक होती.

प्रवासाचा लेखाजोखा: वेग आणि क्षमता
हे अत्याधुनिक रो-रो जहाज मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या ८ तासांत पूर्ण करते. रस्ते मार्गाच्या तुलनेत हा प्रवास अत्यंत सुखकारक आणि वेळ वाचवणारा ठरत आहे.

प्रवासी क्षमता: ६२६ प्रवासी
पहिल्या दिवशीचे बुकिंग: ३९० प्रवासी, ४१ चारचाकी वाहने आणि १७ बाईक्स.

विजयदुर्ग बंदरात जल्लोष
विजयदुर्ग जेटीवर बोटीचे आगमन होताच वातावरण उत्साहाने न्हाऊन निघाले होते. जेटी फुलांनी सजवण्यात आली होती. माजी राज्यमंत्री भाई गिरकर आणि माजी आमदार प्रमोद जठार यांचे महिलांनी ओवाळून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रवाशांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी सर्वांचे स्वागत केले.

या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती घोडमीसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिसर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवाशांची प्रतिक्रिया:
“हा प्रवास केवळ सुखकारकच नाही तर सुरक्षितही आहे. समुद्रातून सहलीचा आनंद घेत आम्ही वेळेत कोकणात पोहोचलो,” अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

पुढील प्रवासासाठी एसटीचे नियोजन
विजयदुर्ग बंदरात उतरलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) वतीने कणकवली आणि देवगड अशा दोन विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले होते. बोट बंदरात लागताच या बसेस प्रवाशांनी भरून मार्गस्थ झाल्या.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कलंबिस्त-पास्तेवाडी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; नैराश्यातून टोकाचे पाऊल

सावंतवाडी दि.०१: तालुक्यातील मौजे कलंबिस्त-पास्तेवाडी येथील एका ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाडू शिवाजी पास्ते असे मृत तरुणाचे नाव असून, गेल्या काही काळापासून असलेल्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, लाडू पास्ते (अविवाहित) यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ठीक नव्हती. सततच्या आजारपणामुळे ते नैराश्यात होते. आज सकाळी ९ ते ११:३० च्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील छताच्या खांबाला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

पोलीस कार्यवाही आणि तपास
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय सरदार पाटील, पोलीस हवालदार महेश जाधव आणि अनिल धुरी यांनी तत्काळ पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) पाठवण्यात आला होता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार दीपक शिंदे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तरुण वयातील व्यक्तीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने कळंबिस्त परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.