प्रतिनिधी | विशेष लेख
एका अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. आकड्यांच्या भाषेत ही बातमी इथेच संपते. पण वास्तवात मात्र जग थांबलं ते फक्त एका नावासाठी. उरलेले चार जण बातमीच्या शेवटच्या ओळीत हरवून गेले. त्यांच्या नावांचा उल्लेख झाला नाही, त्यांचे फोटो फिरले नाहीत, ना “RIP”चे दोन शब्द लिहिले गेले.
मात्र त्या चार जणांच्या घरात आजही वेळ थांबलेली आहे.
कुणाच्या घरात अजूनही दाराशी रिकामी पडलेली चप्पल आहे.
कुणाच्या घरात अर्धवट राहिलेली जबाबदारी आहे.
कुणाच्या घरात “आता पुढे काय?” हा प्रश्न आहे — ज्याचं उत्तर कुणाकडेच नाही.
त्या चार जणांकडे पैसा नव्हता, पद नव्हतं, मोठं नाव नव्हतं.
पण त्यांच्याकडे कुटुंब होतं.
स्वप्नं होती.
आणि उद्याची भीतीही होती — जी आता खरी झाली आहे.
मोठं नाव मेलं तर देश हळहळतो. सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा पूर येतो, चर्चासत्रं रंगतात.
पण सामान्य माणूस मेला तर त्याच्या घरच्यांना “सावर” असं सांगून जग पुढे निघून जातं.
मरण सगळ्यांचं सारखंच असतं.
पण इथे दुःखालाही वर्ग आहे.
हा फरक अपघाताचा नाही.
हा फरक आपल्या संवेदनशीलतेचा आहे.
आपण कुणासाठी रडतो आणि कुणाला विसरतो — हे आपलं समाज म्हणून अपयश आहे.
आज RIP एका माणसासाठी आहे, पण उद्या आपण किंवा आपले कोणीही त्या “उरलेल्या चारांपैकी” असू.
म्हणून प्रश्न मृत्यूचा नाही.
प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा.
कारण मृत्यू सगळ्यांना समान आहे,
पण माणुसकी अजूनही समान नाही…!
मळगाव नेमळे आणि तळवडे मतदार संघासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना सावंतवाडी चे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर सोबत उमेदवार संदीप गावडे गौरव मुळीक विनोद राऊळ गणेश प्रसाद पेडणेकर आदी
सावंतवाडी दि.३०:
मळगाव-नेमळे आणि तळवडे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत संपर्क कार्यालयाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला.
सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उच्चशिक्षित लोकप्रतिनिधीच समाजाचा खरा विकास करू शकतात, हा विचार घेऊन आमचे उमेदवार संदीप गावडे आणि गौरव मुळीक निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
या कार्यक्रमाला महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रामुख्याने खालील मान्यवर उपस्थित होते संदीप गावडे: उमेदवार, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ.
गौरव मुळीक: उमेदवार, मळगाव–नेमळे पंचायत समिती.विनोद राऊळ: माजी सरपंच, नेमळे.
गणेशप्रसाद पेडणेकर: शक्ती केंद्रप्रमुख.
लक्ष्मण गावकर: विभागप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य.
याशिवाय माजी सरपंच निलेश कुडव, नीलकंठ बुगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, निकिता राऊळ, अनुजा खडपकर, तसेच बूथ अध्यक्ष महेश गवंडे, सुदेश राऊळ, मदन तेंडोलकर, रुपेश सावंत आणि सुभाष देवळी यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मळगाव नेमळे तळवडे मतदार संघाच्या महायुतीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर सोबत संदीप गावडे गौरव मुळीक विनोद राऊळ गणेश प्रसाद पेडणेकर आदी
माजगाव येथे भाजप उमेदवार विक्रांत सावंत यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब सोबत विक्रांत सावंत, अशोक दळवी, रेश्मा सावंत,गुणाजी गावडे आदी
जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला ठाम विश्वास: नम्र स्वभाव आणि विकासकामे हीच त्यांच्या विजयाची शिदोरी ठरेल!
सावंतवाडी दि.२९: “विक्रांत सावंत यांच्यातील नम्रपणा आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ त्यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करेल. ज्याप्रमाणे भाई सावंत आणि विकास सावंत यांनी जनसेवेची परंपरा जपली, तीच परंपरा विक्रांत समर्थपणे पुढे नेत आहेत. येथील अफाट जनसागर पाहता विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार असून विक्रांत सावंत विक्रमी मताधिक्याने निवडून येतील,” असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.
माजगाव येथे आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उमेदवार विक्रांत सावंत, उत्कर्षा गावकर, सचिन बिर्जे यांच्यासह अनेक सरपंच आणि मान्यवर उपस्थित होते.
दोन पिढ्यांच्या विकासकामांची पावती मिळणार
संजू परब यांनी आपल्या भाषणात सावंत कुटुंबाच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “माजगावमध्ये ९९ टक्के मते मिळतील असे काम भाई सावंत यांच्या दोन पिढ्यांनी केले आहे. विकास भाईंनी या भागाचा कायापालट केला आणि त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवले. आज विक्रांत सावंत देखील त्याच आदराने आणि नम्रतेने लोकांमध्ये मिसळत आहेत. राजकारणात असा स्वभाव दुर्मिळ असून, हाच गुण त्यांना विजयाकडे खेचून नेईल.”या प्रचार सभेला सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, चराठा सरपंच प्रचिती कुबल, माजी सभापती गौरी पावसकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह प्रशांत बुराने, भरत गावकर, राजू कुबल, राजन सरमळे, संजय गावडे, विशाखा जाधव, गीता कासार, मधु कुंभार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधकांवर साधला निशाणा
सभेतील गर्दीचा संदर्भ देत परब यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “जितके बोलतो तितके काम करतो, हा आमचा बाणा आहे. ज्याप्रमाणे माझा जिल्ह्यामध्ये मोठ्या मताधिक्याने विजय झाला, तसाच विजय विक्रांतचा देखील होईल. समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल इतका उत्साह मतदारांमध्ये दिसत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
माजगाव येथील जाहिर प्रचारसभेत बोलताना भाजप उमेदवार विक्रांत सावंत व अन्य.
“आता तुम्हीच आमचे माय-बाप!”; विक्रांत सावंतांची माजगावमध्ये भावनिक साद
विरोधकांचे वाल्मिकी केले, पण आता विकासासाठी साथ द्या;
“गेल्या ३७ वर्षांत मी नेहमी इतरांसाठी भाषणे केली, पण आज आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी उभा आहे. मी माझी आई, वडील आणि पत्नी गमावली आहे, आता तुम्हीच आमचे माय-बाप आहात,” अशा शब्दांत माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रांत विकासभाई सावंत यांनी मतदारांना भावनिक साद घातली. माजगाव येथे आयोजित भव्य प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि रिपाई या चारही घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकारणाचे बाळकडू जन्मापासूनच
आपल्या भाषणात विक्रांत सावंत म्हणाले की, “माझा जन्म झाला तेव्हा माझे आजोबा भाईसाहेब सावंत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू मला आईच्या गर्भातच मिळाले आहे. गेल्या पाऊणे चाळीस वर्षांपासून मी राजकारण जवळून पाहत आलो आहे. भाईसाहेब आणि विकासभाईंनी जो पारदर्शक व्यवहाराचा वारसा जपला, त्याच वाटेने मी काम करणार आहे.”
नारायण राणे आणि रवींद्र चव्हाणांचे पाठबळ
“बाहेरून कुणीही काहीही अफवा पसरवल्या तरी, माझ्या पाठीशी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची ताकद आहे. तसेच माझ्या सर्व भगिनींचे आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती आहे. ज्याप्रमाणे शिवरायांना मावळ्यांची साथ मिळाली, तशीच साथ मला इथल्या जनतेकडून मिळत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्यांचे ‘वाल्मिकी’ केले त्यांनीच फायदा घेतला
विक्रांत सावंत यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की, “आम्ही अनेकांना मोठे केले, अनेकांचा फायदा करून दिला. ज्यांचा ‘वाल्या’ होता त्यांचा आम्ही ‘वाल्मिकी’ केला, त्यांनीही आमचा फायदा घेतला. पण मी नेहमी दुसऱ्यांसाठी जगणारा माणूस आहे. आज माझ्यासमोर कोणी उभा असेल तर ते त्याचं दुर्दैव आहे, माझे नाही. कारण माजगावची जनता विकासकामांना ओळखते.”
विकासासाठी महायुतीला निवडून द्या
जवळपास चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यावेळी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा, जे सरकार केंद्रात आणि राज्यात काम करत आहे, त्याच विचारांचे लोक जिल्हा परिषदेत पाठवा, जेणेकरून माजगावमध्ये विकासाची गंगा अखंड वाहत राहील. विकास भाईंनी ६० वर्षे ज्ञानदानाचे जे पवित्र कार्य केले, तोच वारसा पुढे नेण्यासाठी तिन्ही उमेदवारांना (विक्रांत सावंत, उत्कर्षा गावकर, सचिन बिर्जे) विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सावंतवाडीत मराठा समाज बांधवांकडून जननेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लोकनेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना सावंतवाडी मराठा समाज बांधव
सावंतवाडी दि.२९: सावंतवाडीत अखिल भारतीय मराठा समाज शाखेतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री, जननेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्पष्टवक्तेपणा, कामाचा वेग आणि कोकणाबद्दलची आस्था असलेला एक हक्काचा माणूस आपण गमावला आहे. दादा, आपल्या स्मृती कायम जनमानसात राहतील.अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.आरपीडी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये झालेल्या या शोकसंभेला मराठा समाजाचे पदाधिकारी विनय गायकवाड, विशाल सावंत, अभिजित सावंत, मनोज घाटकर, दिगंबर नाईक, धोंडी दळवी, बापू राउळ, आनंद नाईक, शांताराम पारधी, मनीष गावडे तसेच नगरसेवक देवेंद्र टेमकर आणि मायकल डिसोजा यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग दि.२९: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने शिस्तीचा बडगा उगारत मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या २३ जणांचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रद्द करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २८ जानेवारी रोजी हे आदेश जारी केले आहेत.
नेमकी कारवाई कशासाठी?
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षादेश झुगारून अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले होते, तर काही जण विरोधी उमेदवारांना छुपी मदत करत असल्याचे समोर आले होते. या पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळू नये, यासाठी ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या प्रमुख व्यक्ती:
या कारवाईत एकूण २३ जणांचा समावेश असून, त्यातील काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत.राजन बाळकृष्ण चिके,राजेंद्र दत्ताराम महापसेकर,सुजाता अजित पडवळ,वंदना किरण किनळेकर,विजय महादेव रेडकर,जितेंद्र पांडुरंग गावकर,शर्वाणी शेखर गावकर,उल्हास उत्तम परब,स्नेहल संदीप नेमळेकर यांचा समावेश आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपने इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईचा परिणाम मतदानावर होणार की पक्ष आपली शिस्त राखण्यात यशस्वी ठरणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
“पक्षशिस्त हीच भाजपची खरी ओळख आहे. पक्षाच्या विरोधात जाणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही.” — प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप सिंधुदुर्ग.
राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्यामुळे दोघांना ‘संजय गांधी निराधार योजने’चा लाभ
सावंतवाडी दि.२९: समाजातील गरजू आणि दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. सावंतवाडी येथील शुभांगी वसंत गवंडी आणि सुवर्ण कारागीर नितीन कारेकर या दोघांनाही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आता दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
उभा बाजार येथील रहिवासी आणि कष्टकरी सुवर्ण कारागीर नितीन कारेकर हे दिव्यांगत्वामुळे अडचणीत होते. त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वात मोठी अडचण ‘अपंगत्वाचा अधिकृत दाखला’ मिळवणे ही होती. श्री. राजू मसुरकर यांनी केवळ मार्गदर्शन न करता, स्वतःच्या खासगी वाहनाने कारेकर यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे आवश्यक सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अधिकृत दाखला मिळवून दिला.
दाखला मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालयात रीतसर अर्ज सादर करण्यापासून ते मदत मंजूर होईपर्यंत मसुरकर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या संवेदनशील प्रयत्नांमुळेच:शुभांगी वसंत गवंडी (रा. वैश्य वाडा) यांना दरमहा २,५०० रुपयांचे अर्थसहाय्य सुरू झाले आहे.नितीन कारेकर (उभा बाजार) यांनाही या योजनेचा लाभ मिळून त्यांच्या जीवनाला आर्थिक आधार प्राप्त झाला आहे.राजू मसुरकर यांनी दाखवलेली ही तत्परता आणि मानवतावादी दृष्टिकोन पाहून सावंतवाडी परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सामान्य नागरिकांना शासकीय योजनांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून प्रत्यक्ष लाभ मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात असून, लाभार्थ्यांनी व नागरिकांनी मसुरकर यांचे आभार मानले आहेत.
“नितीन कारेकर हे अत्यंत कष्टाळू आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना हक्काची शासकीय मदत मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलता आला, याचे समाधान आहे.” — राजू मसुरकर, अध्यक्ष – जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान
उपमुख्यमंत्री अजित पवार अंत्यदर्शन – थेट प्रक्षेपण (Live)
👉 https://www.youtube.com/live/dy5Td1fzJ-w
हे अंतिम दर्शन वर्तमानात थेट (live) सुरू आहे किंवा जिथे तुम्ही पुढे पुनर्बघू शकता — वर दिलेल्या YouTube Live लिंक वर क्लिक करा.
निरवडे येथे विनापरवाना खैर वाहतूक उघड💰 ₹१ लाखांपर्यंतचा खैर माल व टेम्पो जप्त
सावंतवाडी दि.२९: बुधवारी दि. २८/०१/२०२६ रोजी रात्री गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सावंतवाडी वन विभागाच्या पथकाने मौजे निरवडे येथे मोठी कारवाई केली.यात
🚚 वाहन क्रमांक MH-07 थांबवून तपासणी केली असता
👉 १.५ ते २.०० घन मीटर खैर लाकूड
👉 अंदाजे किंमत ₹८०,००० ते ₹१,००,०००
👉 विनापरवाना वाहतूक
📌 मालासह टेम्पो जप्त करून
📌 संबंधितांविरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला
👮♂️ ही कारवाई उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी
🌿 श्री. पृथ्वीराज प्रताप, श्री. प्रमोद राणे, श्री. प्रकाश रानगिरे व श्री. चंद्रकांत पडते यांच्या पथकाने केली.
🌱 वनसंपत्तीचे संरक्षण ही आपली जबाबदारी!
बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सावंतवाडी दि.२८: शहरात सुरू असलेल्या पाईपलाइन आणि खोदाईच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर, उपनगराध्यक्ष डॅा. अनिल निरवडेकर यांनी स्वतः मैदानात उतरून कामाची पाहणी केली.
✅ महत्त्वाचे मुद्दे: 🔹 शिल्पग्राम आणि ज्यूस्तीनगर भागातील कामांची बारकाईने तपासणी. 🔹 नागरिकांना होणारा त्रास त्वरित कमी करण्याचे आदेश. 🔹 कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना दिली कडक ताकीद.
“विकास हवा, पण नागरिकांना त्रास देऊन नको!” – हीच भूमिका मांडत त्यांनी कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सावंतवाडी दि.२८: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उद्या २९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे . या शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर यांनी केले आहे.