17.8 C
New York
Tuesday, July 7, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 58

परमपूज्य सद्गुरू साटम महाराज* यांच्या *चरणी कोटी कोटी प्रणाम

*💐कोटी कोटी प्रणाम…!!💐 कोटी कोटी प्रणाम…!! 💐कोटी कोटी प्रणाम…!!💐*_

*⚡ अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्यूज  || ADVT*

_*💫परमपूज्य सद्गुरू साटम महाराज* यांच्या *चरणी कोटी कोटी प्रणाम…!!🙏🏻💐*_

श्री क्षेत्र दाणोलीचे श्री साटम महाराज
यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

_✨:-शुभेच्छुक -:✨_

सौ.प्रमिला शिंदे वनक्षेत्रपाल, आंबोली वनविभाग

_✨:-शुभेच्छुक -:✨_

श्री.बी.नायकवडे वनपाल, वनपरिमंडळ, देवसू – दाणोली ता. सावंतवाडी.
आणि कर्मचारी वृंद

💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

_*💐कोटी कोटी प्रणाम…!!💐 कोटी कोटी प्रणाम…!! 💐कोटी कोटी प्रणाम…!!💐*_

*⚡ अखंड हिंदुस्थान लाईव्ह न्यूज  || ADVT*

_*💫परमपूज्य सद्गुरू साटम महाराज* यांच्या *चरणी कोटी कोटी प्रणाम…!!🙏🏻💐*_

_✨:-शुभेच्छुक -:✨_

*♦️श्रीमंत खेम शिवराम सावंत भोंसले.*
_(मुख्य विश्वस्त)_

*🔸सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले.*
_(विश्वस्त)_

*🔹श्रीमंत लखम खेमसावंत भोंसले*
_(विश्वस्त)_

*🔸ॲड. शामराव नारायण सावंत*
_(विश्वस्त)_

*🔹डॉ. जी.ए. बुवा*
_(विश्वस्त)_

*🔸श्री. कमलाकांत सिताराम पांगम.*
_(विश्वस्त)_*💫आणि कर्मचारी वृंद.

श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदीर ट्रस्ट,दाणोली, सावंतवाडी. 

💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐

🚩 सावंतवाडी संस्थानचे राजगुरू: कर्मयोगी सद्गुरु साटम महाराज पुण्यतिथी विशेष 🚩

दाणोलीचे सद्गुरु श्री साटम महाराज यांचे दुर्मिळ छायाचित्र

लेख विशेष :साटम महाराजा ८९ वी पुण्यतिथी -तुकाराम बीज

कोकणच्या भूमीतील एक दैवी प्रकाश, शिर्डीच्या साईबाबांचे समकालीन आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प.पू. सद्गुरु साटम महाराजांचा ८९ वा पुण्यतिथी उत्सव आज गुरुवारी, ०५ मार्च रोजी ‘तुकाराम बीज’ दिनी साजरा होत आहे.
✨ महाराजांची काही वैशिष्ट्ये: 🔹 राजगुरू पद: सावंतवाडी संस्थानचे अधिपती राजे बापूसाहेब महाराज यांनी महाराजांच्या दैवी शक्तीची प्रचिती आल्यावर त्यांना ‘राजगुरू’ म्हणून सन्मानित केले होते. 🔹 सर्वधर्म समभाव: सर्व जाती-धर्मातील लोकांना परमार्थाकडे नेण्याचे महान कार्य त्यांनी केले. 🔹 अढळ विश्वास: “तुम्ही जिथे माझी आठवण काढाल, तिथे मी आहे,” हा महाराजांचा शब्द आजही भक्तांच्या जीवनातील संकटांत त्यांना बळ देतो. 🔹 चमत्कार की कृपा: एका मुक्या-बहिऱ्या बालकाला बोलतं करून त्यांनी आपल्या दिव्य शक्तीचा प्रत्यय जगाला दिला.
आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेले दाणोली हे तीर्थक्षेत्र आज केवळ भक्तांसाठीच नव्हे, तर पर्यटकांसाठीही विसाव्याचे ठिकाण बनले आहे. त्यांच्या ८९ व्या पुण्यतिथीनिमित्त या महान योगी पुरुषाला कोटी कोटी प्रणाम! 🙏
📍 स्थळ: दाणोली समाधी मंदिर, ता. सावंतवाडी. 🗓️ दिनांक: गुरुवारी, ०५ मार्च रोजी (तुकाराम बीज)✨ दाणोलीचे स्वामी समर्थ: सद्गुरु साटम महाराज ✨
“जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव…”
सावंतवाडी संस्थानचे राजगुरू आणि लाखो हृदयांत अधिराज्य गाजवणारे प.पू. साटम महाराज यांची ८९ वी पुण्यतिथी! 🚩
✅ काय आहे खास?
शिर्डीच्या साईबाबांचे समकालीन.
सावंतवाडी संस्थानचे आदरणीय राजगुरू.
मुक्या जीवाला वाचा फोडणारे सिद्ध पुरुष.
दाणोलीच्या निसर्गरम्य सानिध्यात वसलेले पावन समाधी स्थळ.
यंदा ०५ मार्च रोजी होणाऱ्या ‘तुकाराम बीज’ सोहळ्यानिमित्त दाणोलीत भक्तीचा महाकुंभ भरणार आहे. या मंगल दिनी महाराजांच्या चरणी लीन होऊया! 🙇‍♂️
🚩 दाणोलीचे वैभव, भक्तांचे माहेरघर! 🚩 प.पू. सद्गुरु साटम महाराज यांच्या ८९ व्या पुण्यतिथी निमित्त चरणी साष्टांग दंडवत! 🗓️ ०५मार्च – तुकाराम बीज, दाणोली. 🙏✨

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

संत सद्गुरु श्री साटम महाराजांचा ८९ वा पुण्यतिथी सोहळा उद्या; दाणोलीनगरी भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज!

सावंतवाडी दि.०४: कोकणचे श्रद्धास्थान आणि संतांचे संत मानले जाणारे प.पू. साटम महाराज यांचा ८९ वा पुण्यतिथी उत्सव गुरुवार, ५ मार्च रोजी दाणोली येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण दाणोलीनगरी सजली असून, तीर्थक्षेत्र नागझरी ते समाधी मंदिरापर्यंत करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.
भक्तांची मांदियाळी आणि जय्यत तयारी
शिर्डीच्या साईबाबांचे समकालीन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर आणि बेळगाव परिसरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट आणि दाणोली ग्रामस्थांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवसभराचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
उत्सवानिमित्त पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:
पहाटे ५:०० ते ८:००: काकड आरती, अभ्यंगस्नान आणि श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या हस्ते समाधी पूजन व पाद्यपूजा.
सकाळचे सत्र: श्री. घाटकर (बासरी वादन), बुवा श्री. बोभाटे, बुवा अंकुश सांगेलकर आणि श्री. दळवी बुवा यांचे सुश्राव्य भजन.
दुपारी १२:३०: महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन.
दुपारचे सत्र: सौ. विणाताई दळवी (भक्तीगीते), बुवा श्री. म्हाडगुत, बुवा संदेश भोगटे यांची भजने आणि पुणे येथील ह.भ.प. नातू यांचे कीर्तन.
संध्याकाळी ७:३०: दाणोली पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या हस्ते सत्कार.
रात्रीचे आकर्षण: पालखी सोहळा आणि दशावतार
रात्री ८:०० वाजल्यापासून शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. रात्री ९:३० वाजता महाराजांच्या भव्य सवाद्य पालखी मिरवणुकीला सुरुवात होईल. उत्सवाची सांगता मध्यरात्री २:३० वाजता धामापूर येथील भावई पारंपरिक दशावतार मंडळाच्या ‘भैरव भैरवी संग्राम’ या नाटकाने होणार आहे.
आवाहन: “महाराजांच्या या मंगलमय उत्सवात सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन मुख्य विश्वस्त श्रीमंत खेमसावंत भोसले, युवराज लखम सावंतभोसले आणि दाणोली बाजारपेठ वासियांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

हत्तींना हटवा; अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडू!

काजू हंगाम धोक्यात आल्याने कोलझर पंचक्रोशीतील शेतकरी आक्रमक; सावंतवाडी वनविभागाला निर्वाणीचा इशारा

सावंतवाडी दि.०४: “काजू उत्पन्नावर आमच्या शेकडो कुटुंबांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून आहे. आता हक्काच्या हंगामातच हत्तींनी बागांमध्ये ठाण मांडल्याने काजू झाडाखाली सडून जात आहे. वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या चार दिवसांत हत्तींना हटवले नाही, तर वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठाण मांडून उपोषण करू,” असा संतप्त इशारा कोलझर-तळकट दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिला आहे.
सध्या कोलझर भागात हत्तींच्या कळपाने मुक्काम ठोकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज संतप्त शेतकऱ्यांनी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. उपवनसंरक्षक मिनीश शर्मा रजेवर असल्याने सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.
‘वनतारा’च्या प्रयोगाचा फटका
गेल्या वर्षी हत्तींच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्यासाठी ‘वनतारा’ प्राणी संग्रहालयाचे तज्ज्ञ आले होते. त्यावेळी हत्तींना परिसरातून हटवू नका, अशी अजब भूमिका वनविभागाने घेतली होती. या प्रयोगामुळे हत्ती या भागात स्थिरावले आणि त्यांनी नारळ, सुपारी व काजू बागांचे कोट्यवधींचे नुकसान केले. वनविभागाचा हा ‘खेळ’ शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारा ठरल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
जीवितहानी झाल्यास वनविभाग जबाबदार
शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, बहुतांश बागा डोंगराळ भागात आहेत. तिथे हत्तींचा वावर असल्याने शेतकरी बागेत जायला घाबरत आहेत. पोटासाठी जिवावर उदार होऊन बागेत गेल्यावर जर काही जीवितहानी झाली, तर त्याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
तात्काळ मोहीम: हत्तींना तातडीने परिसरातून हुसकावून लावणे.
अतिरिक्त यंत्रणा: गस्तीसाठी तातडीने किमान दोन अतिरिक्त ड्रोन उपलब्ध करून देणे.
सौर कुंपण: हत्तींचा शिरकाव रोखण्यासाठी ‘केर’ ते ‘कोलझर’ मार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे हँगिंग कुंपण उभारणे.
नुकसान भरपाई: नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी स्वतंत्र आणि कार्यक्षम यंत्रणा राबवून त्वरित भरपाई देणे.
वनविभागाचे आश्वासन
सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. हत्तींना हटवण्याची कार्यवाही आज संध्याकाळपासूनच सुरू केली जाईल आणि पुढील १० दिवसांत काजू नुकसानीचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, सरपंच सुजल गवस, शामराव देसाई, आपा देसाई, महादेव देसाई, रोहन देसाई, दिलीप देसाई यांच्यासह कोलझर पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

इन्सुली येथे भीषण अपघात: कार २५ फूट दरीत कोसळली, ४ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू

कोसळलेली कार

बांदा दि.०४: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने कार २५ फूट खोल गटारात कोसळली, ज्यामध्ये शौर्य सचिन तुयेकर

शौर्य सचिन तुयेकर वय ४ याचा जागीच मृत्यू

या चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास तुयेकर कुटुंब कारने इन्सुलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. खामदेव नाका येथे आले असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट २५ फूट खोल दरीत (गटारात) कोसळली.
अपघात इतका भीषण होता की:
कार कोसळताना चिमुरडा शौर्य गाडीबाहेर फेकला गेला.
दुर्दैवाने कोसळलेली गाडी थेट त्याच्या अंगावर पडली.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शौर्यचा जागीच मृत्यू झाला.
प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत?
अपघातानंतर शौर्यला तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गावर पुलाचे काम सुरू असूनही तेथे कोणतेही सूचना फलक (Signboards) लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तुयेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत शौर्यचे वडील सचिन तुयेकर हे तिलारी पाटबंधारे विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी बांदा येथे मोठी गर्दी केली होती. बुधवारी सकाळी तिलारीचे अभियंता बी. व्ही. जाधव यांनी बांदा येथे भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
महामार्गावरील अर्धवट कामे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव निष्पाप जीवांच्या मुळावर उठत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚢 मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी: ‘चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला!’ 🐔💸

🚢 🐔💸 कोकणवासीयांच्या खिशाला मोठी कात्री; रो-रो फेरीचे भाडे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई दि.०३: नुकतीच सुरू झालेली मुंबई ते विजयदुर्ग M2M रो-रो सेवा म्हणजे कोकणी माणसाची सोय की आर्थिक लूट? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या फेरीच्या भाड्याचे वाभाडे काढणारे एक ‘डोळे उघडणारे’ गणित मांडले आहे.

📊 प्रवासाचे गणित: कारने प्रवास Vs रो-रो फेरी
जर ४ जण स्वतःच्या कारने मुंबई ते विजयदुर्ग रस्ते मार्गे गेले, तर: इंधन (Fuel): ४,५००/- ₹ टोल (Toll): १,०००/- ₹ एकूण खर्च: ५,५००/- ₹ (४ लोक + कार)पण जर हीच कार रो-रो फेरीने नेली तर कारचे भाडे: ६,०००/- ₹ ४ जणांचे तिकीट (Economic): १०,०००/- ₹ (२,५०० प्रत्येकी) एकूण खर्च: १६,०००/- ₹ 😱

“रस्ते मार्गे ५,५०० मध्ये होणारा प्रवास फेरीने १६,००० रुपयांत पडतोय. मग कोकणातील सामान्य माणसाला ही सेवा परवडणार कशी? ही तर सरळ सरळ लूट आहे!” सुरेंद्र नेमळेकर

💡 रेल्वेचा स्वस्त आणि मस्त पर्याय! 🚂
रो-रो फेरीच्या अवाढव्य भाड्याला फाटा देऊन सरकारने खालील पर्याय अंमलात आणल्यास कोकणी जनतेचा फायदा होईल:
✅ वसई ते सावंतवाडी पॅसेंजर: रात्री १० वाजता वसईवरून सुटून सकाळी सावंतवाडीत पोहोचणारी गाडी सुरू करावी.
✅ भाडे फक्त २२५/- ₹: यामुळे सर्वसामान्य माणूस खिशाला परवडणाऱ्या दरात गावाला पोहोचू शकेल.
✅ थांबे: भिवंडी, कोपर रोड आणि कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबा दिल्यास मुंबईच्या उपनगरातील प्रवाशांची सोय होईल.

📢 कोकणवासीयांना आवाहन!

कोकणातील मंत्र्यांनी आणि प्रशासनाने हा ‘व्यापारी’ दृष्टिकोन सोडून सर्वसामान्यांचा विचार करावा. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचेल! ✊🚩- सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर (संस्थापक सदस्य कोकण रेल्वे, सल्लागार: महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ)

🏥 सावंतवाडीकरांसाठी गुड न्यूज! शहरात लवकरच घुमणार ‘आयुष’ हॉस्पिटलचा डंका! 🌿

🏥 🌿 धारगळ गोवा दि.०३: सावंतवाडीतील आरोग्य सेवेत आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे. माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे शहरात ‘आयुष’ हॉस्पिटलची ओपीडी (OPD) लवकरच सुरू होणार आहे! 🛡️

📍 आमदार दीपक केसरकर यांनी आज अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ (गोवा) येथे भेट देऊन वरिष्ठ डॉक्टरांशी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेतून सावंतवाडीत आयुर्वेदिक उपचार सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

✨ या निर्णयाचे फायदे:
✅ स्थानिक उपचार: आता उच्च दर्जाच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी गोव्याला जाण्याची ओढाताण थांबणार.
✅ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे नामांकित डॉक्टर्स सावंतवाडीत उपलब्ध होणार.
✅ पंचकर्म सुविधा: आयुर्वेदिक जीवनशैली आणि उपचारांचा सर्वसामान्यांना मोठा लाभ.

🤝 बैठकीस मान्यवर:
मेडिकल सुपरिंटेंडंट डॉ. विठ्ठल उद्धार, डॉ. विनायक चकोर, डॉ. राजेश उकरे, परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे आणि गौरव कुडाळकर यांची उपस्थिती होती.

“सावंतवाडीच्या जनतेला सर्वोत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात हेच आमचे ध्येय आहे. या आयुष ओपीडीमुळे कोकणातील आयुर्वेदिक उपचार पद्धतीला मोठी बळकटी मिळेल!”
— आ. दीपक केसरकर 🎤

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बेळगांवात शस्त्रक्रिया व तपासणी शिबिर; पूर्व तपासणी शिबिर मंगळवारी- १० मार्च ला*

 *जाहीर आवाहन !*

सिंधुदुर्ग दि.०३: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व ऑपरेशन स्माईल व यांच्या संयुक्त विद्यमाने केएलई रुग्णालय बेळगाव येथे मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

*जन्मतः फाटलेले ओठ व टाळू*
_(वयोमर्यात ६ महिने ते पुढील सर्व)_
*मोफत शस्त्रक्रिया*
____________________________
*शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर*
*मंगळवार दिनांक- १० मार्च २०२६*
*स्थळ – कणकवली*
*वेळ – सकाळी १०*
___________________________
*निवडलेले लाभार्थी यांना १३ मार्च ते २० मार्च २०२६ ला केएलई बेळगाव येथे शस्त्रक्रियेकरिता नेण्यात येईल*
_(मोफत वास्तव्य, भोजन व प्रवास, एक ते दोन नातेवाईकांसह )_
___________________________
*_अधिक माहिती व नोंदणी संपर्क-_* 9404740490 / 9421235586, 9403636454
———————————– शिल्पा खोत- 9309103330 हिराचंद तानावडे 9423303611
राजेश पडवळ 7057544643
मकरंद सावंत 9420306048

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

चंद्रग्रहण 2026: आज आकाशात दिसणार विलोभनीय ‘ब्लड मून’; ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल!

पुणे/मुंबई दि.०३: अवकाशात एक अत्यंत दुर्मिळ आणि विलोभनीय खगोलीय घटना आज, ३ मार्च २०२६ रोजी घडणार आहे. आज होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान आपल्याला ‘ब्लड मून’ (Blood Moon) पाहायला मिळणार आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा रंग तांबूस-लाल होतो, ज्याला शास्त्रज्ञ ‘ब्लड मून’ म्हणतात.
खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी असली, तरी ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण मानवी मन आणि राशीचक्रावर खोलवर परिणाम करणारे ठरणार आहे. विशेषतः हे ग्रहण सिंह राशीत होत असल्याने शिस्त, जबाबदारी आणि मानसिक बदलांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे मानले जात आहे.
या ४ राशींवर होणार सर्वाधिक प्रभाव:
या ग्रहणाचा प्रभाव सर्वच राशींवर कमी-अधिक प्रमाणात जाणवेल, परंतु प्रामुख्याने खालील चार राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता आहे:
रास
संभाव्य परिणाम आणि बदल
मिथुन
संवाद कौशल्यात बदल होईल. नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा वाढेल. नातेसंबंधांमध्ये वैचारिक स्पष्टता येईल.
कन्या
आत्मचिंतनाचा काळ आहे. ‘परफेक्शन’चा ध्यास सोडून स्वतःला स्वीकारणे फायद्याचे ठरेल. मानसिक शांतीकडे कल वाढेल.
धनु
आयुष्यातील मोठ्या निर्णयांची वेळ. जुने विचार मागे सोडून व्यवहार्य दृष्टिकोन स्वीकाराल. भविष्यातील योजनांना नवी दिशा मिळेल.
मीन
आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम काळ. अंतर्मनाचा आवाज ऐकून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भावनिक स्थिरता प्राप्त होईल.

विशेष टीप: हे ग्रहण सिंह राशीत होत असल्याने लोकांमधील मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वतःवर जास्त ताण न घेता मन शांत ठेवणे आणि मेडीटेशन करणे फायदेशीर ठरेल.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563