24 C
New York
Sunday, July 5, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 23

पत्नीच्या विरहातून तरुणाची आंबोली घाटात उडी मारून आत्महत्या; २५० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

सावंतवाडी दि.१२: तालुक्यातील आंबोली येथील एका २९ वर्षीय तरुणाने पत्नीच्या विरहातून आणि वादातून आंबोली मुख्य धबधबा परिसरातील खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय २९, रा. आंबोली गावठाणवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी सह्याद्री ॲडव्हेंचर्सच्या मदतीने त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम कुडतरकर याचे पाच वर्षांपूर्वी सांगेली येथील एका युवतीशी लग्न झाले होते. मात्र, राजारामच्या दारूच्या व्यसनामुळे लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्यात वाद होऊन पत्नी माहेरी निघून गेली होती. सध्या या दोघांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, पत्नीचे दुसरे लग्न ठरल्याची माहिती राजारामला मिळाली होती. याच कारणावरून तो सोमवारी (११ मे) तिला भेटण्यासाठी सांगेली येथे गेला होता. मात्र, तिने भेटण्यास नकार दिल्याने तो निराश होऊन आपल्या दुचाकीवरून आंबोलीच्या दिशेने निघाला होता.

असा लागला शोध

सोमवारी रात्री राजाराम घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. मंगळवारी सकाळी आंबोली मुख्य धबधब्यापासून ५०० मीटर अंतरावर त्याची मोटारसायकल उभी असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. मोटारसायकलला चावी तशीच असल्याने संशय बळावला. अखेर सह्याद्री ॲडव्हेंचर्स अँड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने ड्रोन आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोध घेतला असता, मुख्य रस्त्यापासून सुमारे २५० ते ३०० फूट खोल दरीत राजारामचा मृतदेह आढळून आला.

 

पोलिस तपास सुरू

रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक परिश्रमानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आंबोली पोलीस दूरक्षेत्रात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे आंबोली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

आंबोली घाटात खळबळ: १२०० फूट दरीत उडी मारून डंपर चालकाची आत्महत्या.; ड्रोनच्या साहाय्याने मृतदेहाचा लागला शोध

आंबोली दि.१२: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबोली गावठणवाडी येथील राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय ३१) या डंपर चालकाने मुख्य दरडीच्या ठिकाणाहून सुमारे १२०० फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी ही घटना उघडकीस आली असून, रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

असा लागला घटनेचा छडा

राजाराम चालवत असलेला डंपर घाटात एकाच ठिकाणी रात्रभर उभा होता. डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली. डंपर जागेवरच असल्याने त्यांनी तातडीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने दरीत शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी १२०० फूट खोल दरीत राजारामचा मृतदेह दिसून आला. ड्रोन कॅमेऱ्यात केवळ हात आणि पाय दिसत असल्याने शोधकार्याला वेग आला.

रेस्क्यू टीमचे साहसी अभियान

घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम मदतीसाठी धावून आली. उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा आणि प्रथमेश गावडे यांनी खोल दरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचले. राजु राऊळ, राकेश अमृस्कर, दिपक मेस्त्री, फास्कू देसा, गुरु सावंत, संतान अल्मेडा, सहदेव सनाम, अमरेश गावडे आणि रमेश मोहीते या सदस्यांच्या अथक परिश्रमातून मृतदेह दरीतून वर काढण्यात आला.

मानसिक तणावातून टोकाचे पाऊल?

राजारामचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र काही कारणास्तव पत्नी सोबत राहत नव्हती. याच विरहातून त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. राजाराम स्वभावाने अत्यंत शांत आणि मनमिळावू होता. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

पोलिस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मनीष शिंदे घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

मोदींच्या आवाहनानंतर तरी मंत्र्यांनी ताफ्यातील वाहने कमी करावीत; वैभव नाईक यांचा घणाघात

पंतप्रधानांच्या आवाहनाला सरकारकडूनच हरताळ; सामान्य जनतेला वेठीस धरू नका अन्यथा तीव्र आंदोलन

सिंधुदुर्ग दि.१२: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशातील जनतेला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि सोन्यातील गुंतवणूक थांबवण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, दुसरीकडे सरकारी यंत्रणा आणि मंत्र्यांच्या ताफ्यात होणारा इंधनाचा वारेमाप खर्च थांबवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. “पंतप्रधानांच्या आवाहनाला खुद्द सरकारकडूनच हरताळ फासला जात असून, केवळ सामान्य जनतेनेच का होरपळायचे?” असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.

मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा

वैभव नाईक यांनी सरकारी यंत्रणेतील इंधनाच्या उधळपट्टीवर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की:

मंत्र्यांचा बडेजाव: मंत्र्यांच्या ताफ्यात पुढे-मागे चार-चार गाड्या असतात. केवळ गर्दी दाखवण्यासाठी वाहनांचा वापर होतो. हा ताफा कमी केल्यास मोठ्या प्रमाणात इंधन बचत होऊ शकते.

अधिकारी स्तरावर उधळपट्टी: अधिकारी विविध ठिकाणी वाहने फिरवून इंधनाचा गैरवापर करतात. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक केल्यास इंधन वाचू शकते.

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका

मोदींनी जनतेला परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले असताना, स्वतः पंतप्रधान १५ मेपासून परदेश दौऱ्यावर जात आहेत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले. वाढत्या पेट्रोल दरामुळे सामान्य माणूस आधीच हैराण असून, टू-व्हीलर वापरणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच नव्या करांचा बोजा पडणार असल्याने जनतेचे जगणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सोन्यातील गुंतवणूक आणि मोठे उद्योगपती

सोन्यावरील गुंतवणुकीबाबत बोलताना नाईक म्हणाले की, “सामान्य माणूस अडचणीच्या काळासाठी थोडं-थोडं सोनं खरेदी करतो. देशहितासाठी तो खरेदी कमी करेलही, पण मोठे उद्योगपती, राजकीय नेते आणि गुन्हेगार जे मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का?”

“नोटबंदीच्या काळात सामान्य जनता जशी होरपळली, तशीच परिस्थिती आता पेट्रोल आणि सोन्याच्या मुद्द्यावर निर्माण होत आहे. सरकारने जनतेला वेठीस धरू नये, अन्यथा ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल.”— वैभव नाईक (जिल्हाप्रमुख, ठाकरे शिवसेना)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 मोठी बातमी: सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा अधीक्षक ACB च्या जाळ्यात!

ओरोस (सिंधुदुर्ग) दि.१२: वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी चक्क ३% लाचेची मागणी करणाऱ्या कार्यालयीन अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे.

काय आहे प्रकरण? 🧐
आरोपी: महादेव नारायण तेली (वय ५६), कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा रुग्णालय ओरोस.

लाचेची मागणी: एका व्यक्तीचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या ३% (१८,००० रुपये) मागितले होते.तडजोड: अखेर १०,००० रुपये घेण्याचे ठरले.

एसीबीची धडक कारवाई! 🚔
तक्रारदाराने कुडाळ ACB कडे तक्रार केल्यानंतर, जिल्हा रुग्णालयातील अधीक्षकांच्या कक्षातच सापळा रचण्यात आला. १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

“भ्रष्टाचार मुळासकट उपटून टाका!”
जर तुमच्याकडेही कोणी लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा.असे आवाहन करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कुणकेश्वर मंदिरात हापूसची भव्य आरास; म्हात्रे कुटुंबीयांकडून अनोखी नवसपूर्ती!

दक्षिण कोकणच्या काशीत आंबा महोत्सव आणि सोमनाथ मंदिराच्या लाईव्ह दर्शनाचा त्रिवेणी संगम

देवगड दि.११: दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि पर्यटनाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. हजारो देवगड हापूस आंब्यांची भव्य आरास, स्थानिक शेतकऱ्यांसाठी आयोजित आंबा महोत्सव आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिराचे थेट प्रक्षेपण यामुळे संपूर्ण कुणकेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.

हापूसची आरास आणि आंबा महोत्सव
२०१७ मध्ये सुरू झालेल्या हापूस आरास उपक्रमाला यंदा १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात आणि सभामंडपात हजारो हापूस आंब्यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. यंदाच्या आरासचे विशेष आकर्षण म्हणजे जगातील सर्वात महागडा मानला जाणारा जपानचा ‘मियाझाकी’ आंबा!

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या संकल्पनेतून यंदा ‘आंबा महोत्सवा’चेही आयोजन करण्यात आले होते. पर्यटकांना अस्सल देवगड हापूस मिळावा आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी १० मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. आंबापोळी, आंबावडी आणि आंबा शेक यांसारख्या पदार्थांना पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

‘मागितला एक पदरी, दिले दोन’: भावूक नवसपूर्ती
डोंबिवली येथील म्हात्रे कुटुंबीयांच्या श्रद्धेचा एक हृदयस्पर्शी प्रसंग यावेळी पाहायला मिळाला. तीन वर्षांपूर्वी म्हात्रे आजींनी नातवाला मुलगा व्हावा म्हणून मुलाच्या वजनाएवढे पेढे अर्पण करण्याचा नवस केला होता. ईश्वराच्या कृपेने त्यांना दोन नातवंडे (नंदेश आणि शिवांग) झाली. आज दोन्ही मुलांचे वजन करून त्या वजनाएवढे पेढे आणि फळे अर्पण करत म्हात्रे कुटुंबीयांनी आपली नवसपूर्ती केली.

सोमनाथ मंदिराचे थेट दर्शन
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने गुजरातमधील श्री सोमनाथ मंदिरातील पूजा आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण कुणकेश्वर मंदिर परिसरात एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आले. दोन महान ज्योतिर्लिंगांचे एकाच वेळी दर्शन घडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

सरपंचांच्या तत्परतेचे कौतुक
कुणकेश्वरमधील एका घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझवण्यासाठी सरपंच महेश ताम्हणकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला तहसीलदार रमेश पवार, देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. संपूर्ण परिसर हापूसच्या सुगंधाने आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

वृक्ष संवर्धन व जतन ही काळाची गरज; केवळ फोटोपुरते वृक्षारोपण नको – आ. दीपक केसरकर

कुडाळमध्ये ५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन उत्साहात संपन्न; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

कुडाळ दि.११:“वृक्ष लागवड करून फक्त फोटो काढण्यापुरते मर्यादित न राहता, लावलेले प्रत्येक झाड जगवण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. निसर्गाचे चक्र बिघडल्याने आज हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी केले.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ रविवारी कुडाळ येथील ‘जय वासुदेवानंद हॉल’मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

भव्य वृक्षदिंडीने संमेलनाचा प्रारंभ : संमेलनाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशा भव्य ‘वृक्षदिंडी’ने झाली. वृक्षदिंडी प्रमुख संजय पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि वृक्ष पूजन करून संमेलनाचे अधिकृत उद्घाटन झाले.

प्रदर्शने आणि स्मरणिका प्रकाशन

संमेलनामध्ये निसर्ग आणि इतिहासाचा वारसा जपणारी विविध प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती:

गणेश नाईक: शिवकालीन साहित्य प्रदर्शन.पिटर शेरॉन: गडकिल्ले तैलचित्र प्रदर्शन.प्रकाश कदम: निसर्ग फोटो गॅलरी.यावेळी ऋतूजा गवस यांच्या ‘स्मरणिकेचे’ प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मान्यवरांचा गौरव आणि विशेष सत्कार

समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:रक्तदान क्षेत्र: ७७ वेळा रक्तदान करणारे सुधीर पराडकर, २४ वेळा रक्तदान करणारे पत्रकार निलेश मोरजकार आणि ९ वेळा रक्तदान करणाऱ्या सौ. शामल मांजरेकर-पिळणकर.जीवनरक्षक: गर्भवती महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल डॉ. पांचाळ व १०८ रुग्णवाहिका चालक साईसिद्धी मेस्त्री.प्राणिमित्र: सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे, कार्मिस अल्मेडा व ज्ञानेश्वर रेडकर.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही यावेळी आपले विचार मांडले. “निसर्ग टिकला तरच मानव टिकेल. झाडे लावणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले. संमेलनात महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यावरण प्रेमी आणि तज्ज्ञांनी हवामान बदलावर मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवर:यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयोग धस, देवगड नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर, आशिया रिझवी, अपर्णा धस, बादल बेले (महाराष्ट्र अध्यक्ष), जोवेल डिसिल्व्हा (गोवा अध्यक्ष), बापू परब, संजय पिळणकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिळणकर यांनी केले, सूत्रसंचालन ऋतुजा गवस व संजय पिळणकर यांनी केले, तर बापू परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीत घुमणार ‘माणिक मोती’; पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्त खास संगीत मैफिलीचे आयोजन

सावंतवाडी दि.११: विदुषी पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने सावंतवाडीत सुरांची खास मेजवानी रंगणार आहे. स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या वतीने ‘माणिक मोती’ या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील:दिनांक: शनिवार, १६ मे २०२६,वेळ: सायंकाळी ५:३० वाजता.स्थळ: राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सभागृह, सावंतवाडी.

प्रमुख उपस्थिती:या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रदीप शेवडे, शैलेश पई, रवींद्र गांवकर आणि डॉ. दिनेश नागवेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

स्वररंगाचा नजराणा:

माणिक वर्मा यांनी अजरामर केलेल्या गीतांचा सदाबहार वारसा या मैफिलीत अनुभवता येईल. यामध्ये गायिका मंजिरी धोपेश्वरकर, नूतन परब, वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत यांच्यासह अनेक स्थानिक कलाकार गायन करणार आहेत. त्यांना निलेश मेस्त्री, किशोर सावंत आणि सिद्धेश सावंत यांच्यासह अन्य कलाकार साथसंगत करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे करणार असून ध्वनी संयोजन स्मितेश पंडीत यांचे असेल. उपस्थित राहण्याचे आवाहन:सावंतवाडीतील रसिक प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे निरज भोसले व विनायक गांवस यांनी केले आहे.ठळक वैशिष्ट्ये:

पद्मश्री माणिक वर्मा यांच्या गीतांचा नजराणा.स्थानिक नामवंत कलाकारांचा सहभाग.सावंतवाडीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा उपक्रम.

 

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🔥 मोठी बातमी: शिक्षक संघाची कुरुक्षेत्रमध्ये ऐतिहासिक बैठक! 🔥

कुरुक्षेत्र (हरियाणा)दि.११: येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

✅ TET मधून सुटका? – २०११ पूर्वीच्या शिक्षकांना TET मधून सूट मिळवण्यासाठी दाखल याचिकेची १३ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी.

✅ ८ वा वेतन आयोग – माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन; ‘वन नेशन-वन पेन्शन’ची प्रमुख मागणी राहणार.

✅ त्रिसूत्री मागणी – वन नेशन वन पेन्शन, वन नेशन वन एज्युकेशन आणि वन नेशन सेम सॅलरी!

✅ अधिवेशन २०२७ – पुढील राष्ट्रीय अधिवेशन बेंगलोरमध्ये होणार.

महाराष्ट्राचे नेतृत्व: देविदास बस्वदे, कल्याण लवांडे, आण्णाजी आडे व विनयश्री पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

कचरा डेपोला भीषण आग; न.प. प्रशासनाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू 

सावंतवाडी दि.११ -: शहराच्या सीमेवर असणाऱ्या न.प.च्या कचरा डेपोला आज दुपारच्या वेळी आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट वाहू लागले होते. न.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

येथील कचरा डेपोत सुका कचरा ठेवला जातो. आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट वाहू लागले. आगीन उग्र रूप धारण केल्यानंतर न.प.चे अधिकारी, कर्मचारी अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडीत, शेखर मेहत्तर, अग्नीशमन नंदू गावकर व कर्मचारी उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

संगीत हे तणावपूर्ण जीवनातील ‘रामबाण औषध’ – आमदार प्रेमेंद्र शेट

​सावंतवाडीत ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा सुरेल शुभारंभ! 🎶✨

सावंतवाडी दि.१०: येथील बॅ. नाथ पै सभागृहात, सम्राट क्लब इंटरनॅशनल (राज्य-१) आणि सम्राट क्लब मये यांच्या वतीने २०व्या ‘सम्राट संगीत सितारा’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
​ठळक मुद्दे:
🔹 प्रमुख उपस्थिती: गोव्याचे आमदार श्री. प्रेमेंद्र शेट (मये मतदारसंघ) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात.कार्यक्रमासाठी सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक चे अध्यक्ष शशिकांत पुनाजी सचिव विनोद मळीक खजिनदार सुबोध रामनाथकर सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष नरेश पेडणेकर, निखिल साळगांवकर,स्वप्ना मातोंडकर, विवेकानंद नार्वेकर, मंगेश गांवकर,कालिदास कोळेकर,
मये सम्राट इंटरनॅशनल क्लब आणि परिक्षक सौ.आमोणकर स्टेट वन चे अध्यक्ष पांडुरंग दादा आदी उपस्थित होते.

🔹 संगीताचे महत्त्व: “आजच्या धावपळीच्या युगात संगीत मनाला शांती देते आणि भावनांशी नाते जोडते,” असे मत आमदार शेट यांनी व्यक्त केले.
🔹 सांस्कृतिक वारसा: मातृदिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊंना वंदन आणि लता मंगेशकर, अजित कडकडे यांच्यासारख्या दिग्गजांच्या स्मृतींना उजाळा.
🔹 पुढील प्रवास: ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी चळवळ आहे. प्राथमिक फेरीनंतर आता गोवा आणि बेळगाव येथे पुढील फेऱ्या रंगणार आहेत!
​नव्या दमाच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सम्राट क्लबचा हा स्तुत्य उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहे. 👏
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563