26.7 C
New York
Friday, September 11, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 53

मुंबईत लोकलमधून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू 

तेजस उदय पवार

देवगड दि.१८: काकांच्या दिवसकार्याला जात असताना देवगड तालुक्यातील मूळ रामेश्वर कोलवाडी येथील तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) याचा गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई ठाणे रेल्वेस्टेशन येथील अपघातात मृत्यू झाला. रामेश्वर येथील जि. प. च्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा तो मुलगा आहे. तेजसच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच रामेश्वरसह गिर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो सध्या दिवा मुंबई येथे पत्नीसमवेत स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होता. दरम्यान, नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या दिवसकार्याला जाण्यासाठी तेजस हा पत्नीसमवेत गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला रेल्वेत महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरित्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून रेल्वे मार्गस्थ होत असतानाच डब्यात अचानक गर्दी वाढली. या गर्दीचा झटका बसून तो रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तेथील ग – ामस्थांनी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सल्लागार उदय पवार यांचा तो मुलगा होता.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

कणकवलीत एसटी बसखाली गेली दुचाकी; चालकासह दुचाकीस्वाराच्या बेजबाबदारपणामुळे भीषण अपघात टळला

कणकवली दि.१८: मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा थरारक अपघात घडला. बस वळत असताना वेगात असलेली दुचाकी थेट बसच्या खाली गेली. सुदैवाने, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीवरून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तळेरे ते कणकवली या दिशेने जाणारी एसटी बस बसस्थानकात जाण्यासाठी मिडलकटवरून वळत होती. याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणारा एक दुचाकीस्वार वेगात जात होता. बस चालकाला आपल्या पाठीमागून दुचाकी येत असल्याचे लक्षात आले नाही, तर दुसरीकडे दुचाकीस्वाराला समोरून बस वळत असल्याचा अंदाज आला नाही.

बस वळताच दुचाकी थेट बसच्या चाकाखाली गेली. मात्र, तत्पूर्वीच दुचाकीस्वाराने गाडी सोडून बाजूला उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातानंतर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

अल्पवयीन दुचाकीस्वार अन् राजकीय मध्यस्थी

या घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी, पोलीस हवालदार विनोद चव्हाण आणि वाहतूक पोलीस संदेश अबिटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान असे समोर आले की, दुचाकी चालवणारा तरुण हा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी असून तो अल्पवयीन आहे. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता.अपघातानंतर पोलिसांनी कारवाईची तयारी दर्शवली होती, मात्र काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. दोन्ही बाजूंनी सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यात आल्याने, पोलीस ठाण्यात या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कणकवली बसस्थानकासमोरील या कटवर अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडतात. आजच्या घटनेत एसटी चालक आणि दुचाकीस्वार या दोघांचाही बेजबाबदारपणा दिसून आला आहे. परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपवणे किती धोकादायक ठरू शकते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 कोकण रेल्वेवर मराठी माणसाचा अपमान आता थांबणार कधी? 🚨

स्वतःच्याच मातीत कोकणी माणूस झाला परका! कन्फर्म तिकीट असूनही रत्नागिरीत तरुणाला गाडीबाहेर काढले!

रत्नागिरी दि.१८: काल रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरुणाकडे हक्काचे ‘कन्फर्म तिकीट’ होते, पण गाडीत घुसायला जागाच नव्हती! का? कारण गोव्यातून बिहारला जाणारी ट्रेन उत्तर भारतीयांच्या गर्दीने आधीच खच्च भरून आली होती.

🔥 संतापाची लाट: आमची जमीन, आमची रेल्वे, मग आम्हीच बाहेर का?

ज्या कोकण रेल्वेसाठी आपल्या बापजाद्यांनी जमिनी दिल्या, त्याच रेल्वेवर आज कोकणी माणसाला ‘भिकाऱ्यासारखी’ वागणूक मिळत आहे. परराज्यातून येणाऱ्या गाड्यांच्या तुकड्यांवर आम्ही किती दिवस जगायचे? हा प्रश्न आता प्रत्येक कोकणवासी विचारत आहे.

✅ उपाय एकच: सावंतवाडी रेल्वे टर्मिनस!

रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, जोपर्यंत गाड्या मडगाव किंवा इतर राज्यांतून सुटतील, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.

📍 सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास 1️⃣ गाड्या थेट तिथून सुटतील आणि कोकणी माणसाला पहिली जागा मिळेल.2️⃣ गाड्यांच्या देखभालीसाठी त्या गोव्याला पाठवण्याची गरज उरणार नाही.3️⃣ परप्रांतीय गर्दीचा त्रास कमी होऊन महाराष्ट्रासाठी स्वतंत्र गाड्या धावतील.

📢 आता वेळ आली आहे हक्क हिसकावून घेण्याची !

रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला चपराक देण्यासाठी आणि झोपलेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी सज्ज व्हा!

🗓️ चला दादरला ! विषय: महाराष्ट्र रेल्वे परिषद (आरपारची लढाई), तारीख: २६ एप्रिल २०२६

वेळ: सकाळी १० वाजता,ठिकाण: दादर, मुंबई.

कोकणी माणसाच्या स्वाभिमानासाठी हा मेसेज वाऱ्यासारखा पसरवा! 🚩

 

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सिंधुदुर्गात अंमली पदार्थ, मटका – जुगाराविरोधात शिवसेनेचा इशारा.! ; कारवाई न झाल्यास धाड टाकणार – परशुराम उपरकर

कणकवली दि.१८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना स्वतः अवैध धंद्यांवर धाड टाकणार, असा इशाराही त्यांनी दिला.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, पोलीस यंत्रणेकडून आठवड्यातून एक-दोन दिवस अमली पदार्थ आणि मटक्यावर धाडी टाकल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात अमली पदार्थांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. या व्यसनाधीनतेत अडकलेल्या अनेक तरुणांवर आत्महत्येची वेळ येत असून जिल्ह्यात वर्षाला सरासरी दीडशे आत्महत्या होत असल्याचा दावा त्यांनी केला.

उपरकर यांनी पुढे सांगितले की, सिंधुदुर्गात पत्ते आणि जुगाराचे अड्डेही खुलेआम सुरू आहेत. पोलीस मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ओरोस खुर्द येथे मोठा जुगार अड्डा चालत असून त्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. याशिवाय माजगाव, कोलगाव, नरेंद्र डोंगर, इन्सुली, निवती, वेंगुर्ले, कलमठ, मसुरे, वराड आणि कट्टा या ठिकाणीही खुलेआम जुगार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सिंधुदुर्गात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप करत, पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्रीही मटका व जुगार रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका उपरकर यांनी केली. येत्या काही दिवसांत पोलिसांनी सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद न केल्यास शिवसेना अशा ठिकाणी धाड टाकून ते बंद करेल, असा इशारा त्यांनी दिला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

प्रसिद्ध गावठी वैद्य रामा गावडे यांचे निधन

सावंतवाडी दि.१८: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवासी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधासाठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुलगे, सुना, विवाहित मुली, नातवंडे , पतवंडे असा मोठा परिवार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

अवैध वाळू माफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; १५ वाहने जप्त

सिंधुदुर्गनगरी दि. १८:  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फोफावलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट नेतृत्वाखाली महसूल विभागाने जिल्ह्याभरात एकाच वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत १५ वाहने जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशासनाची गुपित मोहीम यशस्वी

जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक निर्देशानुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अत्यंत गोपनीयरीत्या ही मोहीम आखली होती. सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे सूर्यकांत पाटील, कणकवलीचे दीक्षात देशपांडे, मालवणचे गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे ओंकार ओतारी आणि कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई यशस्वी केली.

कुठे किती कारवाई?

प्रशासनाने विविध भागांत सापळा रचून एकूण १५ वाहने ताब्यात घेतली आहेत:वैभववाडी: आचरा-कणकवली मार्ग (२ वाहने),वेंगुर्ला: देवली-परुळे मार्ग (३ वाहने),कणकवली: कुंभारमाठ (३ वाहने),सावंतवाडी: तोंडवली (३ वाहने),कुडाळ: कुडाळ परिसर (४ वाहने) जप्त केलेली सर्व वाहने संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात जमा करण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पहाटे ३ पर्यंत चालली मोहीम

या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः रात्री उशिरा झाराप परिसरात भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. रात्री उशिरा सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. प्रशासनाच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेक वाळू व्यावसायिकांनी भीतीने वाहनातील वाळू रस्त्यावरच ओतून पळ काढला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि सर्व तहसीलदारांच्या समन्वयाने पार पडलेली ही कारवाई म्हणजे अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेले युद्ध असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारच्या गुप्त आणि संयुक्त कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚩 माजगाववर महायुतीचाच झेंडा फडकणार! 🚩 पोटनिवडणुकीसाठी विक्रांत सावंत यांचा ठाम निर्धार; सौ. रंजना कानसे यांच्या प्रचाराचा धडाका!

विक्रांत  विकासभाई सावंत

सावंतवाडी दि.१८: माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे! महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. रंजना रवि कानसे यांच्या विजयासाठी महायुतीने कंबर कसली असून, माजगाववर पुन्हा एकदा भगवा फडकवणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद सदस्य श्री. विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला आहे.

💪📌 ठळक मुद्दे:
उमेदवार: सौ. रंजना रवि कानसे (महायुती)
संकल्प: माजगाव ग्रामपंचायतीवर महायुतीचा विजय मिळवणे.

*मार्गदर्शक: मा. नरेंद्र मोदी, मा. देवेंद्र फडणवीस, मा. एकनाथ शिंदे, मा. नारायण राणे, मा. रवींद्र चव्हाण, मा. नितेश राणे, मा. निलेश राणे, मा. दीपक केसरकर आणि मा. प्रभाकर सावंत.
स्थानिक नेतृत्व: संजू परब, महेश सारंग, रेश्माताई सावंत, अशोक दळवी.

🗓️ मतदान विसरू नका! 📍 दिनांक: २८ एप्रिल २०२६ 🗳️ मतदान करा, विकास निवडा!

🎤 विक्रांत सावंत म्हणाले,
“श्री देव महादेव आणि देवी सातेरीच्या आशीर्वादाने माजगावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. येत्या २८ तारखेला महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करून विरोधकांना धोबीपछाड देऊया आणि माजगाव भगवामय करूया!”

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 सावधान सावंतवाडीकर! एक ‘क्लिक’ आणि १.८५ लाख गायब! 🚨सावंतवाडीत सायबर भामट्यांचा कहर; गॅस कंपनीच्या नावाखाली महिलेची मोठी फसवणूक!

📍 सावंतवाडी (सर्वोदय नगर)दि.१७ : सावंतवाडी शहरात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चोरांनी आता थेट तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव केला असून, सर्वोदय नगर येथील एका महिलेला तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

काय घडलं नेमकं? 🤔
सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, त्याने ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस’चा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं.
“गॅस कनेक्शन अपडेट करायचं आहे,” असं सांगून एक लिंक पाठवली.

महिलेनं लिंक ओपन करून माहिती ‘स्वाईप’ केली आणि काही सेकंदातच बँक खात्यातून १,८५,००० रुपये गायब झाले!

🛑 या चुका टाळा, अन्यथा तुमचंही खातं रिकामं होईल!
✅ बनावट कॉल्सकडे दुर्लक्ष करा: गॅस कंपनी, बँक किंवा वीज वितरण कंपनी कधीही फोनवर तुमची वैयक्तिक माहिती मागत नाही.
✅ लिंकवर क्लिक करू नका: अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणं महागात पडू शकतं.
✅ OTP शेअर करू नका: तुमचा वन-टाइम पासवर्ड (OTP) ही तुमच्या खात्याची चावी आहे, ती कोणालाही देऊ नका.
✅ खातरजमा करा: असा कोणताही फोन आल्यास अधिकृत ऑफिसला भेट देऊन शहानिशा करा.
जागरूक राहा आणि आपल्या मित्र-परिवाराला ही बातमी शेअर करून सतर्क करा! 🙏

⚠️ “सायबर चोर आता घरात घुसण्याची गरज नाही, ते मोबाईलमधूनच तुमचं खातं साफ करत आहेत!” — प्रतीक बांदेकर (पाणीपुरवठा सभापती, सावंतवाडी नगरपालिका)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 खळबळजनक: ५ लाखांची मोरी बांधून पूर्ण होताच खचली! 🚨वेर्ले-सटवाडी रस्त्यावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश; सदा कदम आक्रमक!

📍 सावंतवाडी (वेर्ले)दि.१७: तालुक्यातील वेर्ले-सटवाडी मार्गावर ‘जलसुविधा’ योजनेच्या नावाखाली पैशांचा अक्षरशः चिखल झाला आहे. ५ लाख रुपये खर्चून बांधलेली मोरी महिनाभरातच खचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण? 🤔योजना: जलसुविधा सन २०२५-२६,खर्च: ४ लाख ९९ हजार ८६३ रुपये 💰

स्थिती: काम पूर्ण झाल्याची मुदत २९ जानेवारी २०२६ होती, पण मोरी आताच एका बाजूने जमिनीखाली खचली आहे!🔥 “सार्वजनिक पैशांचा हा उघड अपव्यय आहे!” सामाजिक कार्यकर्ते सदा उर्फ सदाशिव कदम यांनी या निकृष्ट कामावर बोट ठेवत प्रशासनाला धारेवर धरले आहे. “हे काम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच निकृष्ट झाले आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.📢 प्रमुख मागण्या:

✅ क्वालिटी कंट्रोल चौकशी: या कामाच्या दर्जाची तातडीने वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी.✅ बिल थांबवा: जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत या कामाचे बिल देऊ नये.✅ कारवाई करा: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कडक कारवाई झालीच पाहिजे!जनतेचा पैसा असाच वाया जाणार का? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती आणि कारवाई करणे गरजेचे आहे.

जागरूक नागरिक म्हणून ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवा असे आवाहन करण्यात आले आहे! 🗣️📢

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🔥 माजगावमध्ये रणधुमाळी! भाजप पुरस्कृत विरुद्ध अपक्ष अशी थेट लढत! 🚩माजगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ‘काटे की टक्कर’; दोन उमेदवार रिंगणात!

📍 सावंतवाडी दि.१७:माजगावच्या राजकारणातून मोठी बातमी! ग्रामपंचायत सरपंचपदासाठीची चुरस आता शिगेला पोहोचली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून आता भाजप पुरस्कृत उमेदवार विरुद्ध अपक्ष उमेदवार यांच्यात ‘थेट सामना’ रंगणार आहे.

💥 काय घडले अर्ज माघारीच्या दिवशी?

सुरुवातीला सरपंचपदासाठी ४ महिला उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, श्रद्धा मुकुंद सावंत आणि सपना सतीश गावडे यांनी माघार घेतल्यामुळे आता मैदानात केवळ दोनच उमेदवार उरले आहेत:

१) रंजना रवींद्र कानसे २) जयश्री दिनेश सावंत

✅ दोन सदस्य आधीच बिनविरोध! सरपंचपदासाठी लढत होत असली, तरी सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत मात्र बाजी मारली गेली आहे:🔹 प्रभाग क्र. ४: राजीवी रुपेश पेडणेकर (बिनविरोध निवड)🔹 प्रभाग क्र. २: अनघा प्रदीप धुरी (बिनविरोध निवड) 👨‍ा निवडणूक अधिकारी: यशवंत परब (कृषी अधिकारी)

माजगावची जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार? भाजपचा गड राखला जाणार की अपक्ष उमेदवार बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563