सावंतवाडी दि.१७:“लोकांना धूळ खायला लावू नका आणि सावंतवाडीकरांच्या संयमाचा अंत पाहू नका!” अशा कडक शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख सजू परब यांनी MNGL च्या अधिकाऱ्यांना झापले.
📍 काय घडलं?
सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईनचे काम सायंकाळच्या गर्दीच्या वेळीही सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. ही माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घटनास्थळी धाव घेतली.🔥अधिकारी निरुत्तर: सायंकाळी गर्दीच्या वेळी काम सुरू ठेवून रस्ता अडवल्याने संजू परब यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना भररस्त्यात फैलावर घेतले.
मुख्याधिकाऱ्यांना जाब: “रात्री काम करण्याची परवानगी दिली आहे का?” असा सवाल करत त्यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना फोन लावून जाब विचारला.
धुळीचे साम्राज्य: काम झाल्यावर रोलर न फिरवल्याने शहरात धूळ उडत आहे, त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी सत्यवान बांदेकर, श्री. सावंत आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“लोकांना त्रास होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. तात्काळ रस्ते व्यवस्थित करा, अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे!” — संजू परब (जिल्हाप्रमुख, शिवसेना)
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/ *अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.१७:
सावंतवाडी दि.१७ : शहरातील रस्त्यांची गेल्या तीन महिन्यांपासून झालेली दुरवस्था आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास यामुळे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोती तलाव परिसरातील गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत जुने काम पूर्ण करून रस्ते सुस्थितीत आणले जात नाहीत, तोपर्यंत नवीन काम करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीला दिला आहे.
कणकवली दि.१७: मुंबई-गोवा महामार्गावर प्राण्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असून, आज जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात एका अज्ञात वाहनाने पाच म्हशींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून २ म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत.
वेंगुर्ले दि.१७: शिरोडा परिसरात दुर्मिळ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींचे मूल्य असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्ल्यू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाने उधळून लावला आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईत सुमारे ९.१२० किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची बाजार किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सावंतवाडी दि.१६: शहरात गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान गॅस कंपनीचा अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. रामेश्वर प्लाझा परिसरात खोदकाम करताना फुटलेली ब्रिटिशकालीन ‘भीडाची’ (लोखंडी) जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कंपनीने चक्क प्लास्टिक पाईपचा वापर करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नवी दिल्ली दि.१६: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारताच्या स्वयंपाकाच्या गॅसवर (LPG) दिसू लागला आहे. एप्रिल महिन्यात भारताची LPG आयात मोठी घटली असून, ती फेब्रुवारीच्या तुलनेत चक्क निम्म्यावर आली आहे. या कठीण काळात अमेरिका भारताचा सर्वात मोठा आधार आणि पुरवठादार म्हणून पुढे आली आहे.