सावंतवाडी दि.१२:नेमळे हायस्कूलसमोरील महामार्गावर वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून तातडीने गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसविण्यात आले आहेत. या कामामुळे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
अपघाताचे सावट दूर; ग्रामस्थांच्या मागणीला यश
नेमळे हायस्कूलसमोरून जाणाऱ्या महामार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत चालली आहे. भरधाव वेगाने जाणारी अवजड वाहने आणि इतर गाड्यांमुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ही बाब गांभीर्याने घेत शिक्षक, पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची आग्रही मागणी केली होती.
भाजप आणि लोकप्रतिनिधींचा विशेष पुढाकार
या मागणीची दखल घेत संदीप गावडे यांनी तातडीने निधी उपलब्ध करून हे काम पूर्णत्वास नेले. या प्रक्रियेत सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक तसेच भारतीय जनता पार्टी, नेमळे शाखा यांनी विशेष पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधींच्या या सक्रिय सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.
“विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गावरील धोका ओळखून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत आम्ही हे काम पूर्ण केले आहे.”
— संदीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य.
प्रशालेकडून आभार व्यक्त
गतिरोधक बसविल्याबद्दल नेमळे हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी संदीप गावडे, गौरव मुळीक व भाजप कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सिंधुदुर्ग दि.१२: पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आणि दूध दराच्या आंदोलनातून प्रस्थापितांची ‘नांगी’ ठेचणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता कोकणच्या रणधुकटात उतरले आहेत. निसर्गाचा कोप आणि सरकारी अनास्थेमुळे होरपळलेल्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आज १२ मार्च रोजी एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कधीही न झुकणारा आणि आत्महत्या न करणारा’ अशी ओळख असलेला कोकणी शेतकरी आज प्रथमच आपल्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत.
सावंतवाडी दि.१२: येथील ‘प्रयाण टुरिस्ट महिला संस्था, सावंतवाडी’ यांच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर भर देत विविध मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
संवेदना ! 🙏🕊️ सावंतवाडी दि.१२: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या मातोश्री सौ. जयश्री दत्ताराम गावडे (वय ८४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन.
सावंतवाडी दि.१२: राज्य परिवहनच्या
सावंतवाडी दि. ११: शहरात सध्या सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या नियोजित कामावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सजू परब यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “शहरात चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले गॅस पाईपलाईनचे काम तात्काळ थांबवावे, अन्यथा या कामासाठी गॅस कंपनीसोबत कोणी, कुठे आणि का बैठका घेतल्या, त्यांची नावे पुराव्यासह जाहीर करेन,” असा खळबळजनक इशारा त्यांनी आज दिला.
मुंबई दि.११: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत खासदार रवींद्र वायकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत: