सावंतवाडी दि. ०६: येथील पालिकेच्या माजी नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने स्थानिक भाजप वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने अंतर्गत कुरघोडी केली जात असून, पक्ष बैठकीत आपला अपमान करण्यात आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. आज आयोजित एका जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना मडगावकर यांनी पक्षांतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट बॉम्बगोळा टाकला.
“तो सूत्रधार कोलगावचा; महिला जिल्हाध्यक्षा त्यांना का घाबरतात?”
पत्रकार परिषदेत बोलताना मोहिनी मडगावकर यांनी पक्षातील काही व्यक्तींवर थेट निशाणा साधला. विशेषतः कोलगावातील एका पदाधिकाऱ्यामुळे आपल्यावर मोठा अन्याय होत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. “तो सूत्रधार कोलगावचा आहे,” असा उल्लेख करत मडगावकर यांनी खळबळ उडवून दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “पक्ष संघटनेत काम करत असताना सहकार्याऐवजी वारंवार अडथळे निर्माण केले जात आहेत. या संपूर्ण प्रकाराबाबत आणि संबंधित पदाधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत मी भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यासमोरही माझी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, महिला जिल्हाध्यक्षा तरी त्यांना एवढ्या का घाबरतात?” असा रोकडा सवालही मडगावकर यांनी यावेळी उपस्थित केला.
बाहेरच्या मंडळींची शहरात ढवळाढवळ!
पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मडगावकर म्हणाल्या की, “माझा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच मला पद सोडण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारणी न बदलता केवळ सावंतवाडीतच अशी ढवळाढवळ का केली जात आहे? जिल्ह्याचे सरचिटणीस इतरत्र कुठेही न जाता फक्त सावंतवाडीतच वारंवार बैठका का घेतात? बाहेरची मंडळी शहरात येऊन नाहक ढवळाढवळ करत आहेत.” पक्षात महिला पदाधिकाऱ्याला सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळेच अखेर आपण शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आपल्या या निर्णयानंतर शहरातील कार्यकारणीतील इतर पदाधिकारी देखील आपल्या पदाचा राजीनामा देतील, असा इशाराही त्यांनी दिला.
नेत्यांवर विश्वास, नगरसेवक म्हणून काम सुरूच राहणार!
“मी आज राजीनामा देत असून पुन्हा कोणत्याही परिस्थितीत हे पद स्वीकारणार नाही. आज मी अत्यंत स्वाभिमानाने आणि सन्मानाने या पदावरून बाजूला होत आहे,” असे मडगावकर यांनी ठामपणे सांगितले. मात्र, आपला भाजप पक्षावर जीव आहे आणि पक्षावरील प्रेम कायम राहील, असे स्पष्ट करत त्या म्हणाल्या, “देशाचे नेते नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हेच आमचे नेते असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढेही पक्षात काम करत राहू. शहराध्यक्ष पद सोडले असले तरी नगरसेवक म्हणून मी लोकांची कामे करत राहीन आणि पक्षाची एक निष्ठावंत सदस्य म्हणून पक्षाचे काम करत राहीन.”
दरम्यान, मोहिनी मडगावकर यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे आणि पत्रकार परिषदेतील थेट आरोपांमुळे सावंतवाडी भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजीनामा सत्राचे तालुक्यात आणि जिल्ह्यात काय राजकीय पडसाद उमटतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



🚨 🚨सावंतवाडी दि.०६: सावंतवाडी तालुक्यातील वीज पुरवठ्याचा प्रश्न आता राजकीयदृष्ट्या कमालीचा तापला असून, यामध्ये आता ‘नेमळे’ गाव केंद्रस्थानी आले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांचे हे सासुरवाडीचे गाव, तर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक हेही याच गावचे सुपुत्र! असे असूनही हे गाव विजेसाठी आजही वेंगुर्ला तालुक्याशी जोडलेले असल्याने ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. गाव सावंतवाडीत आणि वीज पुरवठा वेंगुर्ल्यातून, अशा विचित्र प्रशासकीय व्यवस्थेमुळे नेमळे, आजगाव, भोमवाडी, मळेवाड, कोंडुरे, सातार्डा, सातोसे, आरोस, पाडलोस अशा १५ ते १६ गावांची पुरती कोंडी झाली आहे.
सावंतवाडी दि.०५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडीच्या वनविभागाने उचलले मोठे पाऊल! पुढील १५ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ५,००० वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची घोषणा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी केली आहे.
चंद्रपूर दि.०५ : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी पक्ष नेतृत्वाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. या धक्कादायक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (MPCC) अग्रवाल यांच्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे. त्यांचे पक्ष सदस्यत्व तातडीने रद्द करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
सावंतवाडी दि.०५: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
— हरिश्चंद्र चंद्रकांत पवार ( विजय )

सावंतवाडी दि.०२: गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सावंतवाडी येथील पर्यटन सुविधा केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या केंद्रातील महागड्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न करत असताना सावंतवाडी पोलिसांनी आज पहाटे दोन तरुणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत असले तरी, कोट्यवधींच्या या वास्तूची होत असलेली दुरवस्था पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सावंतवाडी दि.०२: शहराच्या स्वच्छतेसाठी आणि प्लास्टिक मुक्तीसाठी सावंतवाडी नगरपालिकेने एक अतिशय कौतुकास्पद आणि अनोखे पाऊल उचलले आहे. शहरात बसवण्यात आलेल्या ‘बॉटल क्रश मशीन’मध्ये प्लास्टिकची रिकामी बॉटल टाकणाऱ्या नागरिकांना आता चक्क एक चॉकलेट गिफ्ट म्हणून मिळणार आहे. शहराला ‘कुठेही प्लास्टिक न फेकणारे शहर’ बनवण्यासाठी पालिकेने ही पर्यावरणपूरक मोहीम हाती घेतली असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.