सावंतवाडी,दि.०२: येथील भोसले संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस आज सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते युवराज लखमराजे यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी युवराजांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
या सोहळ्याला राजे खेम सावंत-भोसले, युवराज्ञी तथा नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, अजय दोडिया, जयश्री दोडिया, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. दिलीप भारमल, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर आणि सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजवाड्यात उपस्थित राहून युवराज लखमराजे भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563




रत्नागिरी दि.०२: कागदावर ‘समृद्धी’, पण कोकणच्या नशिबी फक्त ‘मरणयाती’! देश बुलेट ट्रेनच्या गप्पा मारत असताना, मुंबईला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गोव्याशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) गेल्या १८ वर्षांपासून रखडलाय. मार्च २०२६ ची डेडलाईन हुकली, त्यानंतर दिलेली ३१ मेची मुदतही संपली, पण काम अजूनही अपूर्णच!

📍 आंबोली दि. ०१: घाटात आज निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले! अचानक आलेल्या वादळी पावसामुळे घाटात तीन मोठी झाडे उन्मळून पडली, ज्यामुळे पर्यटकांची आणि वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली.
मालवण (वायरी)दि.०१: तालुक्यातील वायरी भूतनाथ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या १० वर्षांपासून येथे भाड्याच्या खोलीत एकटाच राहणाऱ्या रुपेश विष्णू कुरले (वय ३९) या तरुणाने आपल्या राहत्या घरी पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
सावंतवाडी दि.३१: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सावंतवाडी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक बस स्थानकाची पाहणी करून प्रवाशांच्या सोयीसाठी २० नव्या बसगाड्या सावंतवाडी आगाराला देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.