20.6 C
New York
Monday, July 6, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 33

🚩 पारपोली येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा! 🚩

💰 १० लाखांचा निधी मंजूर; संजू परब यांच्या हस्ते दिमाखात पार पडले भूमिपूजन!

सावंतवाडी दि.१९: तालुक्यातील पारपोली गावचे ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचे रूप आता पालटणार आहे. शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आज या विकासकामाचे अधिकृत भूमिपूजन जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आले.

“धार्मिक स्थळांचा विकास आणि जतन करणे ही काळाची गरज आहे. ग्रामस्थांच्या सोयीसुविधांसाठी आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे शिवसेना नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील.”— संजू परब (जिल्हाप्रमुख)

यावेळी पारपोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या या निधीबद्दल ग्रामस्थांनी आमदार केसरकर यांचे आभार मानले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

जिद्द आणि चिकाटीचे फळ! शेतकरी कुटुंबातील दया पालवची पोलीस दलात निवड; महेंद्रा अकॅडेमीच्या शिरपेचात मानाचा तुरा ठाणे ग्रामीण पोलीस दलात निवडीमुळे सावंतवाडी परिसरात आनंदाचे वातावरण

सावंतवाडी दि.१९: तळकोकणच्या लाल मातीतील संघर्षाला जिद्दीची जोड देत, सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडेमीची विद्यार्थिनी दया पालव हिने पोलीस होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. दयाची ठाणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाली असून, तिच्या या यशामुळे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याची भावना व्यक्त होत आहे. संघर्षातून खाकी वर्दीपर्यंतचा प्रवास दया पालव ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही तिने कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. स्पर्धा परीक्षेचा कठीण मार्ग, शारीरिक मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. कष्टाला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश नक्की मिळते, हेच दयाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. परिसरातून कौतुकाचा वर्षाव दयाच्या या निवडीची बातमी समजताच सावंतवाडी आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महेंद्रा अकॅडेमीच्या शिक्षकांनी, नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील आणि विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुली अशा प्रकारे मोठ्या पदावर विराजमान होत असल्याने इतर तरुण-तरुणींसाठी ती एक प्रेरणास्थान ठरली आहे. महेंद्रा अकॅडेमीचे यशस्वी पाऊल विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या महेंद्रा अकॅडेमीसाठी हा सुवर्णक्षण ठरला आहे. संस्थेचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी दयाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, “दयाचे यश हे तिच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. तिने घेतलेली ही भरारी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना उंच झेप घेण्याची प्रेरणा देईल. तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस आमच्या खूप शुभेच्छा!” दया पालव हिच्या या यशामुळे कोकणच्या सुपुत्रीने पुन्हा एकदा आपल्या जिद्दीच्या जोरावर ‘खाकी’ मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/ *अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज* 🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क : 📱9422054887,8275659563

भाजपची रॅली म्हणजे ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’! 🚩 विरुद्ध ✋महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल!

सावंतवाडी दि.१९: सावंतवाडीत भाजपने काढलेल्या रॅलीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजपच्या ‘क्रेडिट पॉलिटिक्स’चा समाचार घेताना सडकून टीका केली आहे.

📌 मुख्य आरोप आणि मुद्दे:
🔹 प्रसिद्धीचा हव्यास: “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या म्हणीप्रमाणे भाजपने केवळ प्रसिद्धीसाठी घाईघाईत रॅली काढली. एक दिवसही संयम न दाखवता श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद आहे.

🔹 विद्यार्थ्यांचा वापर: स्वतःच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा राजकीय रॅलीसाठी वापर करणे चुकीचे आहे. ज्यांना आरक्षणाचे महत्त्व ठाऊक नाही, अशा विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

🔹 फसवणुकीचा डाव: काल मांडलेले विधेयक हे आरक्षणाचे नसून ‘मतदारसंघ पुनर्रचना’ (Delimitation) संदर्भातील होते. आरक्षणाची अंमलबजावणी लांबणीवर टाकून महिलांची फसवणूक केली जात आहे.

✋ काँग्रेसची स्पष्ट भूमिका:
✅ महिला आरक्षण तात्काळ लागू झाले पाहिजे.
✅ आरक्षणात ओबीसी (OBC) महिलांसाठी स्वतंत्र कोटा असावा, जेणेकरून सत्तेत खरा ‘सामाजिक न्याय’ प्रस्थापित होईल.
✅ केवळ उच्चवर्गीयांपुरते आरक्षण मर्यादित न राहता ते तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचावे.

“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीचा जुमला नसावा, तर तो समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देणारा मार्ग असावा.”
— सौ. साक्षी वंजारी (अध्यक्षा, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

वनविभागाकडून रेस्कू; नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले

कुडाळ दि.१८ : अणाव बामणवाडी मधील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. अणावकर याची माहिती वनपाल- कसाल यांना दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचारी प्रकाश शिंदे, प्रियांका पाटील, वनरक्षक कसाल ऊत्तम कांबळे, पंकज घाडी, ऊदय परब, प्रशांत जाधव, प्रवीण पवार, बाबुराव कांबळे, सुनिल आंगणे यांनी घटनास्थळी धाव घेत त्या खवले मांजराला जेरबंद केले. त्यांना अणाव बामणवाडीमधील ग्रामस्थ अजित अणावकर, राजन जडये, विपुल हडकर, पार्थ अणावकर यांनी मदत केली. वैद्यकीय तपासणीनंतर खवलेमांजरास परिक्षेत्र अधिकारी कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

रेडीच्या द्विभुज गणपतीचा सुवर्ण महोत्सव; ५० व्या वर्धापन दिनानिमित्त केळ्यांची आरास आणि फळांचा महानैवेद्य!

रेडी दि. १९: कोकणचे प्रतिपंढरपूर मानले जाणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेले रेडी (ता. वेंगुर्ला) येथील श्री द्विभुज गणपती मंदिराचा आज ५० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बाप्पाच्या चरणी फळांचा महानैवेद्य आणि गाभाऱ्यात केळ्यांच्या घडांची विलोभनीय आरास करण्यात आली आहे.

निसर्गरम्य आरास आणि भक्तीचा मेळ
आजच्या विशेष सोहळ्यासाठी मंदिराचा गाभारा अत्यंत कल्पकतेने सजवण्यात आला होता. संपूर्ण गाभाऱ्यात केळ्यांच्या घडांची आकर्षक मांडणी करण्यात आली असून, समोर विविध प्रकारच्या फळांची रास मांडण्यात आली होती. यामध्ये कोकणचा राजा आंबा,सफरचंद, चिकू, डाळिंब,संत्री व मोसंबी.

या नैसर्गिक सजावटीमुळे बाप्पाचे रूप अधिकच खुलून दिसत होते. ही नयनरम्य आरास पाहून उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

५० वर्षांची अतूट परंपरा
रेडीच्या या गणपतीचा इतिहास आणि भक्तांची श्रद्धा खूप मोठी आहे. आज या मूर्तीच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याने सकाळपासूनच मंदिरात धार्मिक विधी आणि अभिषेक करण्यात आले. ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी ओळख असल्याने केवळ कोकणातूनच नव्हे, तर गोवा आणि कर्नाटक सीमाभागातूनही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

“बाप्पाचे हे सुवर्ण महोत्सवी रूप आणि फळांची केलेली ही सुंदर मांडणी पाहून मन प्रसन्न झाले. ५० वर्षांची ही परंपरा अशीच अखंड राहो, हीच चरणी प्रार्थना!”  — एक भाविक

भक्तांच्या रांगा आणि जयघोष
सुवर्ण महोत्सवी वर्षामुळे आज दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संपूर्ण रेडी परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. प्रशासनाकडून आणि मंदिर समितीकडून भाविकांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

फळांच्या या महानैवेद्याने आणि केळ्यांच्या सजावटीने सजलेला हा सुवर्ण महोत्सवी सोहळा रेडीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मुंबईत लोकलमधून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू 

तेजस उदय पवार

देवगड दि.१८: काकांच्या दिवसकार्याला जात असताना देवगड तालुक्यातील मूळ रामेश्वर कोलवाडी येथील तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) याचा गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई ठाणे रेल्वेस्टेशन येथील अपघातात मृत्यू झाला. रामेश्वर येथील जि. प. च्या माजी सदस्या वर्षा पवार यांचा तो मुलगा आहे. तेजसच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच रामेश्वरसह गिर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. तो सध्या दिवा मुंबई येथे पत्नीसमवेत स्वमालकीच्या घरात वास्तव्यास होता. दरम्यान, नालासोपारा येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या काकांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या दिवसकार्याला जाण्यासाठी तेजस हा पत्नीसमवेत गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला रेल्वेत महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरित्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून रेल्वे मार्गस्थ होत असतानाच डब्यात अचानक गर्दी वाढली. या गर्दीचा झटका बसून तो रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकला गेला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तेथील ग – ामस्थांनी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी असा परिवार आहे. तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सल्लागार उदय पवार यांचा तो मुलगा होता.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

कणकवलीत एसटी बसखाली गेली दुचाकी; चालकासह दुचाकीस्वाराच्या बेजबाबदारपणामुळे भीषण अपघात टळला

कणकवली दि.१८: मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा थरारक अपघात घडला. बस वळत असताना वेगात असलेली दुचाकी थेट बसच्या खाली गेली. सुदैवाने, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीवरून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तळेरे ते कणकवली या दिशेने जाणारी एसटी बस बसस्थानकात जाण्यासाठी मिडलकटवरून वळत होती. याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणारा एक दुचाकीस्वार वेगात जात होता. बस चालकाला आपल्या पाठीमागून दुचाकी येत असल्याचे लक्षात आले नाही, तर दुसरीकडे दुचाकीस्वाराला समोरून बस वळत असल्याचा अंदाज आला नाही.

बस वळताच दुचाकी थेट बसच्या चाकाखाली गेली. मात्र, तत्पूर्वीच दुचाकीस्वाराने गाडी सोडून बाजूला उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली. या अपघातानंतर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

अल्पवयीन दुचाकीस्वार अन् राजकीय मध्यस्थी

या घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी, पोलीस हवालदार विनोद चव्हाण आणि वाहतूक पोलीस संदेश अबिटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान असे समोर आले की, दुचाकी चालवणारा तरुण हा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी असून तो अल्पवयीन आहे. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता.अपघातानंतर पोलिसांनी कारवाईची तयारी दर्शवली होती, मात्र काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. दोन्ही बाजूंनी सामंजस्याने हे प्रकरण मिटवण्यात आल्याने, पोलीस ठाण्यात या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कणकवली बसस्थानकासमोरील या कटवर अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडतात. आजच्या घटनेत एसटी चालक आणि दुचाकीस्वार या दोघांचाही बेजबाबदारपणा दिसून आला आहे. परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपवणे किती धोकादायक ठरू शकते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚨 कोकण रेल्वेवर मराठी माणसाचा अपमान आता थांबणार कधी? 🚨

स्वतःच्याच मातीत कोकणी माणूस झाला परका! कन्फर्म तिकीट असूनही रत्नागिरीत तरुणाला गाडीबाहेर काढले!

रत्नागिरी दि.१८: काल रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरुणाकडे हक्काचे ‘कन्फर्म तिकीट’ होते, पण गाडीत घुसायला जागाच नव्हती! का? कारण गोव्यातून बिहारला जाणारी ट्रेन उत्तर भारतीयांच्या गर्दीने आधीच खच्च भरून आली होती.

🔥 संतापाची लाट: आमची जमीन, आमची रेल्वे, मग आम्हीच बाहेर का?

ज्या कोकण रेल्वेसाठी आपल्या बापजाद्यांनी जमिनी दिल्या, त्याच रेल्वेवर आज कोकणी माणसाला ‘भिकाऱ्यासारखी’ वागणूक मिळत आहे. परराज्यातून येणाऱ्या गाड्यांच्या तुकड्यांवर आम्ही किती दिवस जगायचे? हा प्रश्न आता प्रत्येक कोकणवासी विचारत आहे.

✅ उपाय एकच: सावंतवाडी रेल्वे टर्मिनस!

रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, जोपर्यंत गाड्या मडगाव किंवा इतर राज्यांतून सुटतील, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.

📍 सावंतवाडी टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास 1️⃣ गाड्या थेट तिथून सुटतील आणि कोकणी माणसाला पहिली जागा मिळेल.2️⃣ गाड्यांच्या देखभालीसाठी त्या गोव्याला पाठवण्याची गरज उरणार नाही.3️⃣ परप्रांतीय गर्दीचा त्रास कमी होऊन महाराष्ट्रासाठी स्वतंत्र गाड्या धावतील.

📢 आता वेळ आली आहे हक्क हिसकावून घेण्याची !

रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला चपराक देण्यासाठी आणि झोपलेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी सज्ज व्हा!

🗓️ चला दादरला ! विषय: महाराष्ट्र रेल्वे परिषद (आरपारची लढाई), तारीख: २६ एप्रिल २०२६

वेळ: सकाळी १० वाजता,ठिकाण: दादर, मुंबई.

कोकणी माणसाच्या स्वाभिमानासाठी हा मेसेज वाऱ्यासारखा पसरवा! 🚩

 

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सिंधुदुर्गात अंमली पदार्थ, मटका – जुगाराविरोधात शिवसेनेचा इशारा.! ; कारवाई न झाल्यास धाड टाकणार – परशुराम उपरकर

कणकवली दि.१८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना स्वतः अवैध धंद्यांवर धाड टाकणार, असा इशाराही त्यांनी दिला.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, पोलीस यंत्रणेकडून आठवड्यातून एक-दोन दिवस अमली पदार्थ आणि मटक्यावर धाडी टाकल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात अमली पदार्थांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. या व्यसनाधीनतेत अडकलेल्या अनेक तरुणांवर आत्महत्येची वेळ येत असून जिल्ह्यात वर्षाला सरासरी दीडशे आत्महत्या होत असल्याचा दावा त्यांनी केला.

उपरकर यांनी पुढे सांगितले की, सिंधुदुर्गात पत्ते आणि जुगाराचे अड्डेही खुलेआम सुरू आहेत. पोलीस मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ओरोस खुर्द येथे मोठा जुगार अड्डा चालत असून त्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. याशिवाय माजगाव, कोलगाव, नरेंद्र डोंगर, इन्सुली, निवती, वेंगुर्ले, कलमठ, मसुरे, वराड आणि कट्टा या ठिकाणीही खुलेआम जुगार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सिंधुदुर्गात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप करत, पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्रीही मटका व जुगार रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका उपरकर यांनी केली. येत्या काही दिवसांत पोलिसांनी सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद न केल्यास शिवसेना अशा ठिकाणी धाड टाकून ते बंद करेल, असा इशारा त्यांनी दिला.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

प्रसिद्ध गावठी वैद्य रामा गावडे यांचे निधन

सावंतवाडी दि.१८: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवासी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधासाठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुलगे, सुना, विवाहित मुली, नातवंडे , पतवंडे असा मोठा परिवार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563