💰 १० लाखांचा निधी मंजूर; संजू परब यांच्या हस्ते दिमाखात पार पडले भूमिपूजन!
सावंतवाडी दि.१९: तालुक्यातील पारपोली गावचे ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचे रूप आता पालटणार आहे. शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आज या विकासकामाचे अधिकृत भूमिपूजन जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आले.
“धार्मिक स्थळांचा विकास आणि जतन करणे ही काळाची गरज आहे. ग्रामस्थांच्या सोयीसुविधांसाठी आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे शिवसेना नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील.”— संजू परब (जिल्हाप्रमुख)
यावेळी पारपोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या या निधीबद्दल ग्रामस्थांनी आमदार केसरकर यांचे आभार मानले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563



सावंतवाडी दि.१९: तळकोकणच्या लाल मातीतील संघर्षाला जिद्दीची जोड देत, सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडेमीची विद्यार्थिनी दया पालव हिने पोलीस होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. दयाची ठाणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाली असून, तिच्या या यशामुळे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने यशाचे उत्तुंग शिखर गाठल्याची भावना व्यक्त होत आहे. संघर्षातून खाकी वर्दीपर्यंतचा प्रवास दया पालव ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही तिने कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. स्पर्धा परीक्षेचा कठीण मार्ग, शारीरिक मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. कष्टाला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास यश नक्की मिळते, हेच दयाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. परिसरातून कौतुकाचा वर्षाव दयाच्या या निवडीची बातमी समजताच सावंतवाडी आणि परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महेंद्रा अकॅडेमीच्या शिक्षकांनी, नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील आणि विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुली अशा प्रकारे मोठ्या पदावर विराजमान होत असल्याने इतर तरुण-तरुणींसाठी ती एक प्रेरणास्थान ठरली आहे. महेंद्रा अकॅडेमीचे यशस्वी पाऊल विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या महेंद्रा अकॅडेमीसाठी हा सुवर्णक्षण ठरला आहे. संस्थेचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी दयाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, “दयाचे यश हे तिच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. तिने घेतलेली ही भरारी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांना उंच झेप घेण्याची प्रेरणा देईल. तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस आमच्या खूप शुभेच्छा!” दया पालव हिच्या या यशामुळे कोकणच्या सुपुत्रीने पुन्हा एकदा आपल्या जिद्दीच्या जोरावर ‘खाकी’ मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
सावंतवाडी दि.१९: सावंतवाडीत भाजपने काढलेल्या रॅलीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजपच्या ‘क्रेडिट पॉलिटिक्स’चा समाचार घेताना सडकून टीका केली आहे.
कुडाळ दि.१८ : अणाव बामणवाडी मधील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले. अणावकर याची माहिती वनपाल- कसाल यांना दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचारी प्रकाश शिंदे, प्रियांका पाटील, वनरक्षक कसाल ऊत्तम कांबळे, पंकज घाडी, ऊदय परब, प्रशांत जाधव, प्रवीण पवार, बाबुराव कांबळे, सुनिल आंगणे यांनी घटनास्थळी धाव घेत त्या खवले मांजराला जेरबंद केले. त्यांना अणाव बामणवाडीमधील ग्रामस्थ अजित अणावकर, राजन जडये, विपुल हडकर, पार्थ अणावकर यांनी मदत केली. वैद्यकीय तपासणीनंतर खवलेमांजरास परिक्षेत्र अधिकारी कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
रेडी दि. १९: कोकणचे प्रतिपंढरपूर मानले जाणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेले रेडी (ता. वेंगुर्ला) येथील श्री द्विभुज गणपती मंदिराचा आज ५० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बाप्पाच्या चरणी फळांचा महानैवेद्य आणि गाभाऱ्यात केळ्यांच्या घडांची विलोभनीय आरास करण्यात आली आहे.
कणकवली दि.१८: मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा थरारक अपघात घडला. बस वळत असताना वेगात असलेली दुचाकी थेट बसच्या खाली गेली. सुदैवाने, दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीवरून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला.
रत्नागिरी दि.१८: काल रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरुणाकडे हक्काचे ‘कन्फर्म तिकीट’ होते, पण गाडीत घुसायला जागाच नव्हती! का? कारण गोव्यातून बिहारला जाणारी ट्रेन उत्तर भारतीयांच्या गर्दीने आधीच खच्च भरून आली होती
कणकवली दि.१८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना स्वतः अवैध धंद्यांवर धाड टाकणार, असा इशाराही त्यांनी दिला.
सावंतवाडी दि.१८: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवासी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधासाठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुलगे, सुना, विवाहित मुली, नातवंडे , पतवंडे असा मोठा परिवार आहे.