सिंधुदुर्गनगरी दि. १८: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून फोफावलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या थेट नेतृत्वाखाली महसूल विभागाने जिल्ह्याभरात एकाच वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत १५ वाहने जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशासनाची गुपित मोहीम यशस्वी
जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक निर्देशानुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अत्यंत गोपनीयरीत्या ही मोहीम आखली होती. सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे सूर्यकांत पाटील, कणकवलीचे दीक्षात देशपांडे, मालवणचे गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे ओंकार ओतारी आणि कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई यशस्वी केली.
कुठे किती कारवाई?
प्रशासनाने विविध भागांत सापळा रचून एकूण १५ वाहने ताब्यात घेतली आहेत:वैभववाडी: आचरा-कणकवली मार्ग (२ वाहने),वेंगुर्ला: देवली-परुळे मार्ग (३ वाहने),कणकवली: कुंभारमाठ (३ वाहने),सावंतवाडी: तोंडवली (३ वाहने),कुडाळ: कुडाळ परिसर (४ वाहने) जप्त केलेली सर्व वाहने संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात जमा करण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पहाटे ३ पर्यंत चालली मोहीम
या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः रात्री उशिरा झाराप परिसरात भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. रात्री उशिरा सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. प्रशासनाच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे अनेक वाळू व्यावसायिकांनी भीतीने वाहनातील वाळू रस्त्यावरच ओतून पळ काढला, तर काहींच्या बोटी खाडी पात्रातच अडकून पडल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि सर्व तहसीलदारांच्या समन्वयाने पार पडलेली ही कारवाई म्हणजे अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेले युद्ध असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारच्या गुप्त आणि संयुक्त कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563




📍 सावंतवाडी (वेर्ले)दि.१७: तालुक्यातील वेर्ले-सटवाडी मार्गावर ‘जलसुविधा’ योजनेच्या नावाखाली पैशांचा अक्षरशः चिखल झाला आहे. ५ लाख रुपये खर्चून बांधलेली मोरी महिनाभरातच खचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सावंतवाडी दि.१७:
सावंतवाडी दि.१७ : शहरातील रस्त्यांची गेल्या तीन महिन्यांपासून झालेली दुरवस्था आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास यामुळे नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोती तलाव परिसरातील गॅस पाईपलाईनचे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत जुने काम पूर्ण करून रस्ते सुस्थितीत आणले जात नाहीत, तोपर्यंत नवीन काम करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीला दिला आहे.
कणकवली दि.१७: मुंबई-गोवा महामार्गावर प्राण्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असून, आज जांभूळवाडी बसस्टॉप परिसरात एका अज्ञात वाहनाने पाच म्हशींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून २ म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत.