21.2 C
New York
Monday, July 6, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 35

शिरोडा येथे ७ कोटींचे ‘अंबरग्रीस’ जप्त; वनविभागाच्या जाळ्यात चौघे जण अडकले

वेंगुर्ले दि.१७: शिरोडा परिसरात दुर्मिळ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींचे मूल्य असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्ल्यू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाने उधळून लावला आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईत सुमारे ९.१२० किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची बाजार किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बनावट ग्राहक बनवून रचला सापळा
शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीस विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी वनक्षेत्रपाल फिरते पथकाचे श्री. सचिन शिडतुरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, विभागीय वनअधिकारी (दक्षता) संजय वाघमोडे आणि सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने स्वतः बनावट ग्राहक बनून संशयितांशी संपर्क साधला आणि सापळा रचला. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास व्यवहार निश्चित झाला असतानाच, वनविभागाने छापा टाकून या टोळीला रंगेहाथ पकडले.
चौघांना अटक; ९ किलो मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी खालील संशयितांना अटक केली आहे: १. रणजित रामचंद्र नायर (वय ४०, रा. परबगाव-शिरोडा) २. गुरुनाथ नाईक (वय ७०, रा. परबगाव-शिरोडा) ३. विभव आडारकर (वय ३५, रा. शिरोडा) ४. निलेश मनोहर पांडजी (वय ३३, रा. रेडी) यांच्या ताब्यातून ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. हे अंबरग्रीस सुमारे ७ कोटी रुपयांना विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ब्ल्यू व्हेल हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ‘अनुसूची १’ मध्ये येत असल्याने, त्याच्या शरीरातील पदार्थांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे.
कारवाईत सहभागी पथक
सदरची धाडसी कारवाई वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे, अमित कटके (दोडामार्ग), वनपाल सावळा कांबळे (मठ), महेश पाटील, वनरक्षक ब्रम्हकुमार भोजने, संग्राम पाटील, अनिकेत माने, रवींद्र पाटील, ऋषीका होले आणि चालक नितीन सावंत यांनी यशस्वी केली.

वनाधिकाऱ्यांचे आवाहन: “अंबरग्रीस किंवा कोणत्याही वन्यप्राण्यांचे अवयव, उपपदार्थ यांची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार आढळल्यास तात्काळ वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,” असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

२९ एप्रिलच्या ‘जनता आरोग्य दरबारा’साठी शनिवारी संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक; पालकमंत्री नितेश राणे यांना निमंत्रित करणार; नियोजन बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी येत्या २९ एप्रिल २०२६ रोजी सावंतवाडी येथे “जनता आरोग्य दरबार” आयोजित करण्यात आला आहे. या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सावंतवाडी तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

भवानी मंदिरात होणार मंथन

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कळसुलकर हायस्कूलमधील भवानी मंदिरात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आरोग्य दरबाराचे स्वरूप, तालुक्यातील संस्थांचा सहभाग आणि प्रत्यक्ष आयोजनाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

पालकमंत्र्यांची उपस्थिती राहणार?

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि सामान्यांचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या ‘जनता आरोग्य दरबारा’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे.

सहभागाचे आवाहन

सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त संस्था आणि मंडळांनी या नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील खालावलेली आरोग्य यंत्रणा आणि सामान्यांची होणारी गैरसोय या पार्श्वभूमीवर आयोजित या ‘आरोग्य दरबारा’कडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  1. “आरोग्य हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे.”— एन.बी. रेडकर व राजू केळुसकर (कृती समिती)

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीत गॅस कंपनीचा ‘जुगाड’; ब्रिटिशकालीन लोखंडी जलवाहिनीला ठोकला प्लास्टिकचा जोड!

सावंतवाडी दि.१६: शहरात गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान गॅस कंपनीचा अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. रामेश्वर प्लाझा परिसरात खोदकाम करताना फुटलेली ब्रिटिशकालीन ‘भीडाची’ (लोखंडी) जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कंपनीने चक्क प्लास्टिक पाईपचा वापर करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमका प्रकार काय? गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी रामेश्वर प्लाझा परिसरात खोदाई सुरू असताना पिण्याच्या पाण्याची मुख्य वाहिनी फुटली. ही वाहिनी ब्रिटीशकालीन असून ती अतिशय मजबूत मानली जाते. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही वाहिनी पूर्ववत करताना कोणताही तांत्रिक विचार न करता लोखंडी पाईपला प्लास्टिकचा तुकडा जोडून त्यावर माती लोटण्याचा प्रयत्न केला.

स्थानिकांचा आक्षेप अन् काम रोखले गॅस कंपनीचा हा ‘जुगाड’ स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने यावर आक्षेप घेतला. याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचे अधिकारी वैभव सरडे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत सदर काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

गॅस कंपनीचा अजब तर्क: एककीडे तांत्रिक निकष धाब्यावर बसवल्याचा आरोप होत असताना, गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी अजब सारवासारव केली. “आमचा प्लास्टिक पाईप भीडाच्या पाईपपेक्षा जास्त टिकेल,” असा अजब दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला. मात्र, अशा प्रकारच्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे भविष्यात मोठी पाणी गळती होण्याची आणि रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नगरपरिषदेचा कारभार रडारवर शहरात ५७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेवरून आधीच सत्ताधारी महायुतीमध्ये (भाजप-शिवसेना) आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, या नवीन प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.शहरात खोदाई सुरू असताना नगरपालिकेकडे कोणताही तांत्रिक आराखडा उपलब्ध नाही का?गॅस कंपनीच्या मनमानीवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेची यंत्रणा अपयशी ठरली आहे का?असे सवाल आता सावंतवाडीकर विचारत आहेत.सध्या याठिकाणी काम थांबवण्यात आले असले तरी, गॅस कंपनीच्या या अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण आहे. आता प्रशासन कंपनीवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“ब्रिटिशकालीन पाईपलाईन ही शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा आहे. अशा प्रकारे प्लास्टिकचा जोड देऊन काम दडपणे हे भविष्यात धोक्याचे ठरू शकते. जोपर्यंत योग्य तांत्रिक पद्धतीने दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत काम करू दिले जाणार नाही.”— स्थानिक नागरिक

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

अमेरिका बनली भारताची सर्वात मोठी LPG पुरवठादार!मध्यपूर्व संघर्षाचा भारताच्या गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम; आयात घटली! 📉🔥

नवी दिल्ली दि.१६: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारताच्या स्वयंपाकाच्या गॅसवर (LPG) दिसू लागला आहे. एप्रिल महिन्यात भारताची LPG आयात मोठी घटली असून, ती फेब्रुवारीच्या तुलनेत चक्क निम्म्यावर आली आहे. या कठीण काळात अमेरिका भारताचा सर्वात मोठा आधार आणि पुरवठादार म्हणून पुढे आली आहे.

📊 महत्त्वाचे मुद्दे:आयातीत मोठी घट: फेब्रुवारीमध्ये दररोज ७३,००० टन होणारी आयात एप्रिलमध्ये केवळ ३७,००० टनांवर आली आहे.

देशांतर्गत उत्पादनात घट: देशातील गॅस उत्पादनातही १०% घट झाल्याने पुरवठ्यावर ताण वाढला आहे.अमेरिकेचा वाटा: एप्रिलमध्ये झालेल्या एकूण आयातीपैकी सर्वाधिक २७% (१,४२,००० टन) पुरवठा एकट्या अमेरिकेने केला आहे.

इतर पुरवठादार: यूएई (१.४१ लाख टन), सौदी अरेबिया (९२ हजार टन) आणि कतार (८२ हजार टन) या देशांचा क्रमांक लागतो.

⚠️ का वाढले संकट? १. यूएस-इराण संघर्ष: आखाती देशांतून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत.२. स्पॉट मार्केटची मर्यादा: जागतिक बाजारपेठेत केवळ १०% गॅस उपलब्ध असल्याने जादा पैसे देऊनही पुरवठा मिळवणे कठीण होत आहे.

पुढील काळात आव्हाने कायम: तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील अस्थिरता अशीच राहिली तर भारताला ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी स्रोतांचा विचार करावा लागेल. सध्यातरी अमेरिकेच्या मदतीमुळे पुरवठा साखळी टिकून आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

सावंतवाडीत आंबा विक्रेत्या महिलांवरील कारवाई थांबवा; स्वतंत्र बाजारपेठ देण्याची विलास जाधव यांची मागणी

विलास जाधव, माजी नगरसेवक,भाजप

सावंतवाडी दि.१६: शहरात ग्रामीण भागातून आंबे विक्रीसाठी येणाऱ्या कष्टकरी महिलांवर नगरपरिषदेकडून होणाऱ्या कारवाईचा मुद्दा आता तापू लागला आहे. माजी नगरसेवक विलास जाधव यांनी या महिलांच्या समर्थनार्थ धाव घेत, त्यांच्यावरील कारवाई तात्काळ थांबवून त्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे केली आहे.

उपजीविकेवर गदा; कारवाई अन्यायकारक

ग्रामीण भागातील अनेक महिला दरवर्षी आंबा हंगामात दोन महिन्यांसाठी शहरात विक्रीसाठी येतात. या हंगामी व्यवसायावरच त्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, शहरात हक्काची जागा नसल्याने या महिला मिळेल त्या ठिकाणी बसून व्यवसाय करतात. अशा परिस्थितीत नगरपरिषदेकडून त्यांना हुसकावून लावणे किंवा त्यांच्यावर कारवाई करणे हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

अवकाळीचे संकट आणि प्रशासनाची भूमिका

यावर्षी आधीच अवकाळी पावसामुळे बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा कठीण काळात महिला विक्रेत्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

काय आहे विलास जाधव यांची मागणी?विलास जाधव यांनी या समस्येवर प्रशासनाला पर्याय सुचवला आहे: स्वतंत्र आंबा बाजारपेठ: आठवडा बाजाराच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी.

सन्मानाने व्यवसायाची संधी: यामुळे महिलांना अधिकृतपणे आणि सन्मानाने आपला व्यवसाय करता येईल.प्रशासनाला आवाहन: नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले आणि मुख्याधिकाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.

“कष्टकरी महिलांच्या पोटावर पाय न देता, त्यांना हक्काची जागा देऊन प्रशासनाने दिलासा द्यावा,” असे आवाहन माजी नगरसेवक विलास जाधव यांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

CBSE १० वीचा निकाल जाहीर: पुणे विभागाची दमदार कामगिरी; मुलींचे पुन्हा वर्चस्व!

पुणे/मुंबई दि.१६:केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.७% इतके नोंदवण्यात आले आहे. यामध्ये पुणे विभागाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, शहरातील अनेक नामांकित शाळांनी १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

📊 निकालाची ठळक वैशिष्ट्ये (राष्ट्रीय स्तर)

यंदाच्या निकालात मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी करत आपली आघाडी कायम ठेवली आहे.

प्रवर्ग उत्तीर्णता प्रमाण (%)

मुली९५.०% मुले ९२.७% ट्रान्सजेंडर विद्यार्थी ८७.५% एकूण राष्ट्रीय सरासरी ९३.७%

🏆 पुण्याचा दबदबा: शाळांनिहाय कामगिरी

पुण्यातील विविध शाळांमध्ये गुणांचा पाऊस पडला असून, अनेक विद्यार्थ्यांनी ९८% पेक्षा जास्त गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. प्रमुख शाळांची आकडेवारी खालीलप्रमाणे: एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल: येथील मुर्तझा रावत याने ९९.८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. शाळेतील ५६.४% विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

SNBP इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी: शाळेचा निकाल १००% लागला असून अर्जुन महामुलकर (९८.८%) अव्वल ठरला.

ऑर्बिस स्कूल्स: दोन्ही कॅम्पसमध्ये १००% निकाल. शिवांश सिंग (९८.६%) आणि जैविक मोटा (९८.२%) यांनी बाजी मारली.

अक्षरा इंटरनॅशनल स्कूल: ७५% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले. रिद्धिमा भगवती (९८%) हिने विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि हिंदीत १०० पैकी १०० गुण पटकावले.

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला: १००% निकाल आणि विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी ९०.५% इतकी उच्च राहिली. अथर्व भिभडे (९८%) शाळेत प्रथम आला.

रायन इंटरनॅशनल ॲकॅडमी, बावधन: १००% निकाल; रितिका रेओसेकर (९६.८%) हिने प्रथम क्रमांक पटकावला.

इतर शाळा: हेलिओस इंटरनॅशनल स्कूल (वडगाव बुद्रुक), संस्कृती ग्रुप ऑफ स्कूल आणि कल्याणी शाळा यांनीही १००% निकालाची नोंद केली आहे. आर्यन गोदानी, रोमिल कुलकर्णी आणि रुपशा भट्टाचार्य यांनीही उल्लेखनीय गुण मिळवले.

“पुण्यातील शाळांनी सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता राखून आपला दबदबा कायम ठेवला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या कष्टाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फळ आहे.” या निकालामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :

📱9422054887,8275659563

🚨 बांदा सटमटवाडीत माकडतापाचा धोका? पुणे प्रयोगशाळेचे पथक सतर्क! 🚨

सावंतवाडी/बांदा दि.१६: सटमटवाडी परिसरात मृत माकड सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. माकडतापाचा (KFD) संभाव्य धोका ओळखून पुणे येथील विशेष वैद्यकीय पथकाने आज बांद्यात धाव घेतली.

🔍 मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये: 🥼 पीपीई किट घालून सर्वेक्षण: पुणे येथील पथकाने पीपीई किट परिधान करून मृत माकड आढळलेल्या ठिकाणच्या झाडाझुडपांतून शेकडो गोचीडींचे नमुने गोळा केले आहेत.🧪 पुणे प्रयोगशाळेत तपासणी: हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, पुढील ८ दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल.

🚩 दोन रुग्ण पॉझिटिव्ह: परिसरात यापूर्वीच दोन रुग्ण माकडताप पॉझिटिव्ह आढळल्याने भीतीचे वातावरण असून आरोग्य विभाग ‘अलर्ट मोड’वर आहे.

🐒 डिंगणे-बांबरवाडीतही भीती: डिंगणे बांबरवाडी येथेही मृत माकडाचे अवशेष आढळल्याने वनविभाग आणि आरोग्य विभागाने शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली आहे.📢 प्रशासनाचे आवाहन (ग्रामस्थांनी काय करावे?):१. परिसरात मृत माकड आढळल्यास त्यास कदापि स्पर्श करू नये.२. तत्काळ आरोग्य किंवा वनविभागाशी संपर्क साधावा.३. शेतात किंवा जंगलात जाताना पूर्ण कपडे घालावेत आणि गोचीड चावणार नाही याची काळजी घ्यावी.📣 ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून आपल्या भागातील नागरिकांना सतर्क करा!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🎓 यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग ५ व्या वर्षी ‘१००% निकाल’! 🎓सीबीएसई १० वी परीक्षेत ‘भोसले पॅटर्न’चा दबदबा; २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण! 🚩

सावंतवाडी दि.१६: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखत सीबीएसई १० वी परीक्षेत पुन्हा एकदा गगनभरारी घेतली आहे. शाळेचा निकाल सलग पाचव्या वर्षी १००% लागला असून विद्यार्थ्यांनी विषयागणिक गुणांचा पाऊस पाडला आहे.🌟 यशाचे मानकरी (१००/१०० गुण):

🚩 मराठी: गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा केरकर, वेदांत सावंत.💻 आयटी: खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, वेदांत सावंत.🇮🇳 हिंदी: खुशल सावंत, साहर्ष धुमाळे.

🏆 ठळक वैशिष्ट्ये:

✅ एकूण २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण.✅ सलग ५ व्या वर्षी १००% निकालाचा विक्रम.✅ विविध विषयांत अनेक विद्यार्थ्यांनी मिळवले १०० पैकी १०० गुण.

या दिमाखदार यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंतभोसले, कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे भरभरून अभिनंदन केले आहे!👏 विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563

🚩 सावंतवाडी टर्मिनससाठी आता ‘जनआक्रोश’! २६ एप्रिलला मुंबईत घुमणार महाराष्ट्राचा आवाज! 🚩

शांताराम नाईक

सिंधुदुर्ग दि.१६: कोकण रेल्वेच्या रखडलेल्या प्रकल्पांविरुद्ध आणि रेल्वे प्रशासनाच्या दुजाभावाविरुद्ध आता संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे! आपल्या हक्काच्या ‘सावंतवाडी टर्मिनस’ साठी आता विनंती नाही, तर थेट जाब विचारला जाणार!

❓ का आहे ही परिषद?
✅ ३० वर्षांपासून रखडलेले सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करण्यासाठी.
✅ कोकण रेल्वेच्या रखडलेल्या दुहेरीकरणाला गती देण्यासाठी.
✅ परराज्यातील गाड्यांना मुंबईत प्राधान्य आणि महाराष्ट्रातील गाड्यांना ‘दिवा-पनवेल’ला फेकण्याच्या अन्यायाविरुद्ध.
✅ बंद झालेल्या २५-३० रेल्वे गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी.  🗓️ सविस्तर तपशील:
📅 दिनांक: रविवार, २६ एप्रिल २०२६
🕙 वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, गावस्कर हॉल, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई.

“हा लढा कोणत्याही पक्षाचा नाही, तर हा लढा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आणि आपल्या पुढच्या पिढीच्या सुरक्षित प्रवासाचा आहे!”

आयोजक:
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र व संलग्न १३ प्रमुख संघटना.
(अध्यक्ष: श्री. शांताराम पार्वती शंकर नाईक)

📢 महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांना विनंती – मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करा!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________ 🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________ 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

ओटवणे-करमळगाळूवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध; जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची ग्वाही

सावंतवाडी दि. १५: ओटवणे गावाला गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. माझ्या कुटुंबाचे या गावाशी पिढ्यानपिढ्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे ओटवणेसह करमळगाळूवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या विविध योजनांमधून सर्वतोपरी निधी व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.

ओटवणे-करमळगाळूवाडी येथील लिंग देवस्थान येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक
यावेळी बोलताना अशोक दळवी यांनी करमळगाळूवाडीतील आबालवृद्ध ग्रामस्थ प्रथमच अशा प्रकारे एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. वाडीच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर यांनी वाडीतील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर सरपंच आत्माराम गावकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या वाडीच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.

मान्यवरांचा सत्कार
कार्यक्रमात विक्रांत सावंत, अशोक दळवी, उत्कर्षा गावकर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला रवींद्र म्हापसेकर, रवींद्र गावकर, सगुण गावकर, उमेश गावकर, संजय कानसे, सिद्धेश कलिंगण, विश्वनाथ केळकर, गोविंद देवधर, मनोहर मयेकर, पोलीस पाटील शेखर गावकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अश्विनी तावडे यांनी केले, तर अक्षय तावडे यांनी आभार मानले.

अधिक माहितीसाठी पहा: akhandhindustanlive.com
अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज
संपर्क: ९४२२०५४८८७ / ८२७५६५९५६३