19.5 C
New York
Monday, July 6, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 37

ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांना मातृशोक; चंद्रावती पवार यांचे दुखःद निधन

सावंतवाडी दि.१४: तालुक्यातील सातार्डा-तरचावाडा येथील रहिवासी आणि माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार (७९) यांचे मंगळवारी पहाटे ६.३५ वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातार्डा परिसरासह संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सौ. चंद्रावती पवार या अत्यंत प्रेमळ, साध्या आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. आयुष्यभर त्यांनी कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. घरातील प्रत्येकाला प्रेमाने जोडून ठेवणाऱ्या त्या एक भक्कम दुवा होत्या. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे परिसरातही त्या सर्वांच्या आदरास पात्र होत्या.

त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एक मायेची सावली हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

सौ. पवार यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शोकसंवेदना व्यक्त करत पवार कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी धीर दिला आहे.
चौकट
बुधवारी होणार अंत्यसंस्कार

सौ चंद्रावती हिच्या पार्थिवावर सातार्डा तरचावाडा स्मशानभूमीत बुधवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात. ; १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

संशयित चोरटे

सावंतवाडी दि.१३ : चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले असून, त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता १५ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे राजपूत संतराम पाल (वय ५२, सध्या राहणार घोडदेव नाका भाजी मार्केट, भाईंदर पूर्व; मूळ रा. तौकलपूर नगर, ता. सहगंज, उत्तर प्रदेश) आणि राहुल उर्फ दिवानसिंग ओमप्रकाश तोमर (वय ३६, सध्या राहणार घोडदेव नाका भाजी मार्केट, भाईंदर पूर्व; मूळ रा. गोकुळ गाव, ता. महावल, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) अशी आहेत. या दोन्ही आरोपींना सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सरदार पाटील व त्यांच्या पथकाने कणकवली न्यायालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुढील तपासासाठी १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे, चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करणे तसेच इतर ठिकाणीही त्यांनी अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग घेतला आहे का, याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीत स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य- युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन.!भाजप स्थापना दिनानिमित्त स्वच्छता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

सावंतवाडी दि.१३: भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे “स्वच्छता सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सन्मान करून त्यांना आरोग्य विषयक वस्तू भेट देण्यात आल्या. हा उपक्रम भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता कामगारांना आवश्यक आरोग्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. समाजाच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता कामगारांचे योगदान अनमोल असल्याचे सांगत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी भाजपा युवानेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनील ” निरवडेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक राजू बेग, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, राजे प्रतिष्ठान चे शिवा गावडे, मंडल चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

 

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–

◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________

🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :

📱9422054887,8275659563

भोसले इन्स्टिट्यूटच्या ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सीमध्ये निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मिळाले यश…*मरीन व शिप डिझाईन क्षेत्रात कामाची संधी

सावंतवाडी दि.१३: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ६ विद्यार्थ्यांची बॉयन्सी कन्सल्टंट्स अँड इंजिनिअरिंग या जहाज डिझाईन क्षेत्रातील कंपनीत यशस्वी निवड झाली आहे. कॉलेजमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यू दरम्यान ही निवड करण्यात आली. बॉयन्सी कन्सल्टंट्स ही मरीन इंजिनिअरिंग व शिप डिझाईन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून जहाजांचे डिझाईन, ऑफशोअर प्रोजेक्ट्स, थ्री-डी मॉडेलिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच जहाजांच्या दुरुस्ती व रूपांतरणाशी संबंधित सेवा पुरवते. भारतासोबतच कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असून अमेरिका, नॉर्वे, सिंगापूर आदी देशांतील प्रकल्पांसाठी कंपनी सेवा पुरवते.

_या कॅम्पस ड्राइव्हमध्ये कंपनी प्रेझेंटेशन, लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, टेक्निकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यू अशा विविध टप्प्यांद्वारे निवड प्रक्रिया पार पडली. यात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पैकी ६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. मुलाखतींचे यशस्वी नियोजन कॉलेजचे टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील व इलेक्ट्रीकल अधिव्याख्याता समित निर्मळकर यांनी केले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/

*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–

◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________

🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com

📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :

📱9422054887,8275659563

नॅब (NAB) नेत्र रुग्णालय सावंतवाडीचा वर्धापन दिन; ३० मे पर्यंत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया मोहिमेचे आयोजन

सावंतवाडी दि.१३: येथील नॅब (NAB) नेत्र रुग्णालयाने रुग्णसेवेची तीन यशस्वी वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णालयाने सिंधुदुर्गवासीयांसाठी ‘दृष्टी’ भेटीचे आयोजन केले असून, ३० मे २०२६ पर्यंत विशेष सवलत मोहीम राबवण्यात येणार आहे.

या मंगलप्रसंगी रुग्णालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष अनंत उजगांवकर, सोमनाथ जिगजिन्नी, आबा कशाळीकर, डॉ. सुहास नायडू, राजेश रेडीज यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

वर्धापन दिन विशेष मोहीम: काय आहेत फायदे?
गेल्या तीन वर्षांत हजारो रुग्णांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पसरवणाऱ्या नॅब रुग्णालयाने यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत खालील सेवा जाहीर केल्या आहेत:

मोफत नेत्र तपासणी: तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची संपूर्ण तपासणी विनामूल्य केली जाईल.

मोफत शस्त्रक्रिया: मोतीबिंदू तसेच इतर आवश्यक शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.

अल्प दरात चष्मे: गरजू रुग्णांसाठी अत्यंत कमी दरात दर्जेदार चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

वेळ आणि ठिकाण:
ही विशेष मोहीम ३० मे २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. रुग्ण दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत रुग्णालयात भेट देऊन या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
ठिकाण: नॅब (NAB) नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सावंतवाडी भटवाडी येथील नॅब नेत्र रुग्णालयातील पूजनोत्सवात अध्यक्ष अनंत उजगांवकर यांच्यासोबत सोमनाथ जिगजिन्नी, आबा कशाळीकर, डॉ. सुहास नायडू, राजेश रेडीज व इतर मान्यवर.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

मध्यरात्री कारिवडे येथे भीषण अपघातात युवक गंभीर जखमी; ‘सामाजिक बांधिलकी’च्या कार्यकर्त्यांनी धावून येत वाचवले प्राण

सावंतवाडी दि.१३: रस्त्यावरील प्रवास करताना आलेली एक डुलकी किती जीवघेणी ठरू शकते, याचा प्रत्यय काल मध्यरात्री कारिवडे येथे आला. एका नाटक कंपनीत झांजवादक म्हणून काम करणाऱ्या युवकाचा कारिवडे गोठण देवस्थानजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून, सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्याला वेळेत उपचार मिळाले आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, माडखोल येथील रहिवासी संतोष गुळदवेकर (वय २३) हे एका नाटक कंपनीमध्ये झांजवादक आहेत. रविवारी (दिनांक १२) रात्री नाटकाचा प्रयोग संपवून ते आपल्या मोटारसायकलने माडखोलच्या दिशेने जात होते. रात्री १२ च्या सुमारास कारिवडे येथील गोठण देवस्थान परिसरात आले असता, त्यांना अचानक झोपेची डुलकी आली. यामुळे त्यांच्या मोटारसायकलने समोरून येणाऱ्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की संतोष यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली.

देवदूत बनून धावले मदतीला
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी निलेश राऊळ, त्यांचे सहकारी शरद पवार आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी संतोषला तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची कल्पना ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चे रवी जाधव यांना देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णालय गाठले. प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यानंतर, जखमीची प्रकृती पाहता त्याला अधिक उपचारांची गरज होती. रवी जाधव यांनी तातडीने त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि पुढील उपचारासाठी त्याला गोवा-बाम्बोळी (GMC) येथे हलवले.

प्रकृतीत सुधारणा
आज सकाळी रवी जाधव यांनी संतोषच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे समजते. ऐन मध्यरात्री मदतीसाठी धावून गेलेले रवी जाधव, अमोल आरोस्कर आणि आरोग्य कर्मचारी निलेश राऊळ यांच्या या सेवाभावी वृत्तीचे परिसरात कौतुक होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

‘प्रती झाड ₹२२० म्हणजे बागायतदारांची थट्टाच’; जाब विचारण्यासाठी वर्षा बंगल्यावर धडक देणार – राजू शेट्टी

देवगड दि.१२:“कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना नुकसानीपोटी प्रती झाड अवघी २२० ते २५० रुपये मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांसह थेट मुंबई येथील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देणार,” असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

देवगड येथील जामसंडे येथे आयोजित आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या ‘एल्गार मेळाव्यात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘बिलंदर मुख्यमंत्री’ अशी घणाघाती टीका केली.

सरकारकडे बागायतदारांसाठी पैसे नाहीत का?
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, “शक्तीपीठ महामार्ग किंवा कुंभमेळ्यासारख्या इव्हेंटसाठी सरकारकडे हजारो कोटी रुपये आहेत. नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मुख्यमंत्री सिंधुदुर्गात येतात, मात्र संकटात सापडलेल्या बागायतदारांशी संवाद साधायला त्यांना वेळ नाही. बागायतदारांची मागणी प्रती झाड ५ हजार रुपयांची असताना, सरकारने दिलेली तुटपुंजी मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.”

परराज्यातील आंब्याविरोधात मोहीम
कोकणच्या हापूसच्या नावाने परराज्यातील आंबा विकणाऱ्यांविरोधातही शेट्टी यांनी कडक इशारा दिला. “देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या नावाखाली इतर राज्यातील आंबा विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे आंबे थेट रस्त्यावर फेकून देऊ,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच व्यापाऱ्यांनी बागायतदारांकडून बेकायदेशीर व्याजाची वसुली केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रत्नागिरीच्या मेळाव्यात तारीख ठरणार
मुंबईतील आंदोलनाची निश्चित तारीख शनिवार, ११ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या मेळाव्यात जाहीर केली जाणार आहे. या आंदोलनात कोकणातील जास्तीत जास्त बागायतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार बाळ माने यांनी केले.

स्थानिक नेत्यांचा सरकारवर निशाणा
सुशांत नाईक: “नुकसानीचे पंचनामेच झाले नसताना सरकार मदत कशी देणार? सत्ताधारी लोकप्रतिनिधी संकटाच्या काळात कुठे गायब आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुधीर जोशी: “प्रती झाड २२० रुपये देणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? कोकणच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवायला हवा होता.”

या मेळाव्याला माजी आमदार बाळ माने, काका ढोके, संजय गावडे, सुशांत नाईक, सुधीर जोशी, विष्णू घाडी यांसह मोठ्या संख्येने बागायतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण टेंबुलकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सागर जोईल यांनी केले.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग व्हॉईस ऑफ मीडिया: मुख्यालय जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर, तर दोन विभागांसाठी धावडे आणि सावंत यांची निवड!* ​’व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर; पत्रकारांच्या कल्याणासाठी सिंधुदुर्गात नवी टीम कार्यान्वित

शैलेश मयेकर

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर; पत्रकारांच्या कल्याणासाठी सिंधुदुर्गात नवी टीम कार्यान्वित

सावंतवाडी दि.१२​:पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) या आंतरराष्ट्रीय संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली असून जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी शैलेश मयेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी मयेकर यांच्या नेतृत्वाखालील नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या निवडीमुळे संघटनेचा ‘चांदा ते बांदा’ हा विस्तार आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाला आहे.

जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेऊन उत्तर आणि दक्षिण अशा दोन विभागांत संघटनात्मक विभागणी करण्यात आली आहे. उत्तर सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विष्णू धावडे यांची, तर दक्षिण सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी भूषण सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या बदलत्या आव्हानांमध्ये पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही नवी टीम कार्य करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

​या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून मिलिंद धुरी, भूषण देसाई आणि संजय पिळणकर यांची निवड झाली असून सुयोग पंडित, राजा दळवी, तुळशीदास कुडतरकर आणि जय भोसले यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. संघटनेच्या बळकटीकरणासाठी अमित पालव (सरचिटणीस), संजय भाईप (सह सरचिटणीस) आणि आनंद कांडरकर (खजिनदार) महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतील. तसेच वासुदेव (नयनेश) गावडे, शंकर जाधव, चिन्मय घोगळे आणि विवेक परब यांची संघटक म्हणून, तर विजय सावंत, नागेश दुखंडे आणि मकरंद मेस्त्री यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख म्हणून दीपक पटेकर काम पाहणार आहेत.
​विशेष म्हणजे, या टीममध्ये महिला पत्रकारांच्या सहभागावरही भर देण्यात आला असून रुपाली खपाले, प्रिया मिश्रा, रेवती वालावलकर, सानिका वायंगणकर आणि जान्हवी सावंत यांना सहयोगी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन आज,12 एप्रिल 2026 – सायं.5 वा.सावंतवाडीत
श्रीराम वाचनालय – सावंतवाडी येथे होणार आहे.

अध्यक्ष – कवी अजय कांडर
प्रमुख पाहुणे – कवी वीरधवल परब
उद्घघाटक – ॲड.अनिल निरवडेकर
उपनगराध्यक्ष – सावंतवाडी
प्रमुख उपस्थिती – प्रा.एस.एन.पाटील
संस्कृतिक – सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी सहभागी व्हावे!

विनीत
संमेलन प्रमुख
मधुकर मातोंडकर
विठ्ठल कदम

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आंबोली घाटात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत १० वर्षांची चिमुकली ठार

सावंतवाडी दि.१२: आंबोली घाटात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत निकिता प्रसाद राऊत (वय १०) या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिची आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या असून, घाटातील ‘यू’ आकाराच्या वळणावर हा थरार घडला.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राऊत कुटुंबीय आपल्या दुचाकीवरून आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. याच वेळी फरशा वाहून नेणाऱ्या एका ट्रकने (जो चालक नशेच्या अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, निकिता दुचाकीवरून खाली फेकली गेली आणि तिचा जागीच अंत झाला.

पळून जाण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटी
अपघात घडल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही किलोमीटर अंतरावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. ट्रक मधील फरशा रस्त्यावर विखुरल्या गेल्यामुळे घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती.

ग्रामस्थांचा संताप आणि पोलिसांची कारवाई
या घटनेची माहिती मिळताच आंबोलीतील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली. चिमुकलीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, “संबंधित चालक आणि क्लीनरला आमच्या ताब्यात द्या,” अशी मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस हवालदार रामदास जाधव, संतोष गलोले आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
रस्त्यावर पलटी झालेला ट्रक आणि विखुरलेल्या फरशांमुळे लागलेली वाहनांची रांग जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा आणि नगरसेवक देवा टेमकर यांच्या सहकार्याने पोलिसांनी बाजूला केली आणि वाहतूक पूर्ववत केली. या दुःखद घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563