29.5 C
New York
Friday, June 5, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 71

सिंधुदुर्गात भाजपचा सर्जिकल स्ट्राईक! २३ बंडखोरांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

सिंधुदुर्गात भाजपचा ‘मोठा झटका’! निवडणुकीच्या तोंडावर भाजपची खळबळ धडाकेबाज कारवाई

सिंधुदुर्ग दि.२९: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने शिस्तीचा बडगा उगारत मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या २३ जणांचे प्राथमिक सदस्यत्व ६ वर्षांसाठी रद्द करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २८ जानेवारी रोजी हे आदेश जारी केले आहेत.

नेमकी कारवाई कशासाठी?
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षादेश झुगारून अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले होते, तर काही जण विरोधी उमेदवारांना छुपी मदत करत असल्याचे समोर आले होते. या पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळू नये, यासाठी ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या प्रमुख व्यक्ती:
या कारवाईत एकूण २३ जणांचा समावेश असून, त्यातील काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत.राजन बाळकृष्ण चिके,राजेंद्र दत्ताराम महापसेकर,सुजाता अजित पडवळ,वंदना किरण किनळेकर,विजय महादेव रेडकर,जितेंद्र पांडुरंग गावकर,शर्वाणी शेखर गावकर,उल्हास उत्तम परब,स्नेहल संदीप नेमळेकर यांचा समावेश आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ
निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपने इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईचा परिणाम मतदानावर होणार की पक्ष आपली शिस्त राखण्यात यशस्वी ठरणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

“पक्षशिस्त हीच भाजपची खरी ओळख आहे. पक्षाच्या विरोधात जाणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही.” — प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप सिंधुदुर्ग.

मानवतेचा हात !

राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्यामुळे दोघांना ‘संजय गांधी निराधार योजने’चा लाभ

सावंतवाडी दि.२९: समाजातील गरजू आणि दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजू मसुरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. सावंतवाडी येथील शुभांगी वसंत गवंडी आणि सुवर्ण कारागीर नितीन कारेकर या दोघांनाही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आता दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

उभा बाजार येथील रहिवासी आणि कष्टकरी सुवर्ण कारागीर नितीन कारेकर हे दिव्यांगत्वामुळे अडचणीत होते. त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वात मोठी अडचण ‘अपंगत्वाचा अधिकृत दाखला’ मिळवणे ही होती. श्री. राजू मसुरकर यांनी केवळ मार्गदर्शन न करता, स्वतःच्या खासगी वाहनाने कारेकर यांना जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे आवश्यक सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अधिकृत दाखला मिळवून दिला.

दाखला मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालयात रीतसर अर्ज सादर करण्यापासून ते मदत मंजूर होईपर्यंत मसुरकर यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या संवेदनशील प्रयत्नांमुळेच:शुभांगी वसंत गवंडी (रा. वैश्य वाडा) यांना दरमहा २,५०० रुपयांचे अर्थसहाय्य सुरू झाले आहे.नितीन कारेकर (उभा बाजार) यांनाही या योजनेचा लाभ मिळून त्यांच्या जीवनाला आर्थिक आधार प्राप्त झाला आहे.राजू मसुरकर यांनी दाखवलेली ही तत्परता आणि मानवतावादी दृष्टिकोन पाहून सावंतवाडी परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सामान्य नागरिकांना शासकीय योजनांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून प्रत्यक्ष लाभ मिळवून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात असून, लाभार्थ्यांनी व नागरिकांनी मसुरकर यांचे आभार मानले आहेत.

“नितीन कारेकर हे अत्यंत कष्टाळू आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना हक्काची शासकीय मदत मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलता आला, याचे समाधान आहे.” — राजू मसुरकर, अध्यक्ष – जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्यदर्शन थेट प्रक्षेपण (Live) — बारामती विद्या प्रतिष्ठान वरून


उपमुख्यमंत्री अजित पवार अंत्यदर्शन – थेट प्रक्षेपण (Live)
👉 https://www.youtube.com/live/dy5Td1fzJ-w
हे अंतिम दर्शन वर्तमानात थेट (live) सुरू आहे किंवा जिथे तुम्ही पुढे पुनर्बघू शकता — वर दिलेल्या YouTube Live लिंक वर क्लिक करा.

वन विभागाची धडक कारवाई! 

🌳

निरवडे येथे विनापरवाना खैर वाहतूक उघड💰 ₹१ लाखांपर्यंतचा खैर माल व टेम्पो जप्त

  • सावंतवाडी दि.२९: बुधवारी दि. २८/०१/२०२६ रोजी रात्री गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सावंतवाडी वन विभागाच्या पथकाने मौजे निरवडे येथे मोठी कारवाई केली.यात
    🚚 वाहन क्रमांक MH-07 थांबवून तपासणी केली असता
    👉 १.५ ते २.०० घन मीटर खैर लाकूड
    👉 अंदाजे किंमत ₹८०,००० ते ₹१,००,०००
    👉 विनापरवाना वाहतूक
    📌 मालासह टेम्पो जप्त करून
    📌 संबंधितांविरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला
    👮‍♂️ ही कारवाई उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी
    🌿 श्री. पृथ्वीराज प्रताप, श्री. प्रमोद राणे, श्री. प्रकाश रानगिरे व श्री. चंद्रकांत पडते यांच्या पथकाने केली.
    🌱 वनसंपत्तीचे संरक्षण ही आपली जबाबदारी!
    बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सावंतवाडीकरांच्या तक्रारींची दखल! प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर ॲक्शन मोडमध्ये… 👊🔥

 

सावंतवाडी दि.२८: शहरात सुरू असलेल्या पाईपलाइन आणि खोदाईच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर, उपनगराध्यक्ष डॅा. अनिल निरवडेकर यांनी स्वतः मैदानात उतरून कामाची पाहणी केली.

✅ महत्त्वाचे मुद्दे: 🔹 शिल्पग्राम आणि ज्यूस्तीनगर भागातील कामांची बारकाईने तपासणी. 🔹 नागरिकांना होणारा त्रास त्वरित कमी करण्याचे आदेश. 🔹 कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना दिली कडक ताकीद.

  1. “विकास हवा, पण नागरिकांना त्रास देऊन नको!” – हीच भूमिका मांडत त्यांनी कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन

सावंतवाडी दि.२८: अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उद्या २९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बहुजन समाजाचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे . या शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष अभिषेक सावंत, मनोज घाटकर यांनी केले आहे.

सावंतवाडीत ‘श्री स्वामी’ समर्थांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

 

जयघोषाने परिसर दुमदुमला

सावंतवाडी दि.२८: अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पालखीचे आज सावंतवाडीतील चांदतळी, भटवाडी येथे मोठ्या भक्तिभावात आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण सावंतवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

भव्य मिरवणूक आणि फुलांची उधळण

सायंकाळी शहराच्या मुख्य भागातून श्री स्वामी समर्थांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांच्या मुखातील “श्री स्वामी समर्थ” या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण करत दर्शन घेतले. मिरवणुकीतील शिस्त आणि उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

पालखी आगमनानिमित्त रात्री भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भक्तिमय सोहळ्याचे औचित्य साधून सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि शांततेत हा कार्यक्रम पार पडला.

नियोजनाची यशस्वी सांगता

श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा यशस्वी झाला. ग्रामस्थांनी दाखविलेले सहकार्य आणि शिस्तीमुळे हा पालखी सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पहाटेचा झंझावात’ शांत

 

उपमुख्यमंत्री अजित पवार 

सावंतवाडी दि.२८: प्रशासनावर उत्तम पकड असलेला, कार्यकर्त्यांची नस जाणणारा आणि राज्याचे राजकारण नेहमी स्वतःभोवती फिरवत ठेवणारा एक धडाडीचा नेता हरपला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन हे संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारे आहे, अशी भावना मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी व्यक्त केली.

प्रशासनावरील पकड आणि कामाचा उरक
अजितदादांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ॲड. केसरकर म्हणाले की, “दादांची कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि निराळी होती. पहाटेपासूनच कामाला सुरुवात करून सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा असा हा लोकनेता होता. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.”

“अजितदादांशिवाय राज्याचे राजकारण पुढील काही वर्षे तरी निस्तेज वाटेल. त्यांच्या जाण्याने एका पर्वचा अंत झाला आहे.” — ॲड. अनिल केसरकर (जिल्हाध्यक्ष, मनसे)

तिरोडा पंचक्रोशीत बीएसएनएलची ‘४जी’ सेवा अखेर कार्यान्वित

सागर नाणोसकर यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश

सावंतवाडी दि.२८: सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा आणि नाणोस पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आंदोलनाच्या पवित्र्यानंतर तिरोडा येथील बीएसएनएलचा ४जी टॉवर सुरू करण्यात आला असून, यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

तिरोडा गावात सुमारे पाच वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर मंजूर झाला होता. अनेक प्रयत्नांनंतर १० महिन्यांपूर्वी टॉवरची उभारणी पूर्ण झाली, परंतु तांत्रिक कारणांमुळे तो बंद अवस्थेत होता. यामुळे तिरोडा, नाणोस आणि परिसरातील गावांमधील नागरिकांना मोबाईल नेटवर्कसाठी मोठी कसरत करावी लागत होती.

नेटवर्कच्या या समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, लेखी पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासन आणि दिरंगाई मिळत होती. अखेर नाणोस ग्रामपंचायत सदस्य सागर सोमकांत नाणोसकर यांनी आक्रमक भूमिका घेत, “येत्या आठ दिवसांत टॉवर सुरू न झाल्यास २६ जानेवारी रोजी टॉवरवर चढून आंदोलन करू,” असा इशारा दिला होता.

या इशाऱ्याची दखल घेत बीएसएनएल प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या. २६ जानेवारीपूर्वीच या टॉवरची ४जी सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली. नेटवर्क सुरू झाल्यामुळे आता तिरोडा आणि नाणोस गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार असून ऑनलाइन कामांना गती मिळणार आहे. या यशाबद्दल सागर नाणोसकर यांच्यासह पाठपुरावा करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत आहे.

अजितदादांच्या आठवणीने सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना फुटला पान्हा; ‘एक कार्यक्षम नेतृत्व हरपले’ अशा शब्दांत भावना व्यक्त

सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांची व्याकुळ भावना
सावंतवाडी दि.२८:“राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ आमचे नेते नव्हते, तर तो आम्हा कार्यकर्त्यांचा मोठा आधार होते. त्यांच्या जाण्याने आज घरातील माणूस गेल्याची भावना आमच्या मनात आहे,” अशा शब्दांत सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी आपल्या अतीव संवेदना व्यक्त केल्या.

विमान अपघाताच्या कथित वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, दादांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले आहेत.

अजितदादांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिस्तीचे आणि कार्यकर्त्यांवरील प्रेमाचे दाखले दिले. “काही दिवसांपूर्वीच आम्ही दादांना भेटायला गेलो होतो. सकाळी साडेपाच-सहा वाजता हा नेता बंगल्यावर हजर राहून कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकत होता. गवस साहेब आणि मी जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तातडीने कामाचे आदेश दिले होते. असा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत रात्रंदिवस राबणारा नेता पुन्हा होणे कठीण आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

अजितदादांनी एकदा ‘हो’ म्हटले की ते काम झालेच पाहिजे, हा त्यांचा शब्द प्रशासनासाठी आदेश असायचा. “दादांकडे पाहिल्यावर आम्हाला पक्षात सुरक्षित वाटायचे. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात आम्ही जो जोमाने काम करतोय, तो केवळ दादांनी दिलेल्या उभारीमुळेच,” असेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.

या कठीण प्रसंगी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जनता पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. नियतीने घातलेला हा घाला अत्यंत क्लेशदायक असून, दादांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.